शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

सांगलीत मुलीच ठरल्या सरस

By admin | Updated: June 7, 2016 07:33 IST

दहावीचा जिल्ह्याचा निकाल ९२.९६ टक्के : गतवर्षीपेक्षा निकालात घसरण

सांगली : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाच्यावतीने मार्च २०१६ मध्ये घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल सोमवारी आॅनलाईन जाहीर झाला. जिल्ह्याचा निकाल ९२.९६ टक्के लागला. त्यात मागील वर्षीप्रमाणे यंदाही मुलींनीच बाजी मारली आहे. उत्तीर्ण होण्याची मुलांची टक्केवारी ९१.८० टक्के, तर मुलींची ९४.४० टक्के इतकी असून निकालाच्याबाबतीत कोल्हापूर विभागात सांगली तिसऱ्या क्रमांकावर आहे. दरम्यान, जिल्ह्यातील १३३ शाळांचा निकाल शंभर टक्के लागला असून गेल्यावर्षीपेक्षा जिल्ह्याच्या निकालात घट झाली आहे. दहावीच्या निकालाच्या तारखेबाबत अनेक तर्कवितर्क सोशल मीडियावर लढवले जात होते. अखेर मंडळाने सोमवारी निकाल जाहीर होणार असल्याचे जाहीर केले होते. त्यानुसार आॅनलाईन निकाल जाहीर करण्यात आला. नेटवर दुपारी एक वाजता निकाल जाहीर होणार असल्याने, मुलांसह पालकांनी नेट कॅफेमध्ये गर्दी केली होती. निकाल जाहीर झाल्यानंतर पहिली दहा मिनिटे सर्व यंत्रणा धिम्या गतीने चालल्याने, निकाल समजण्यास उशीर लागत होता. त्यानंतर मात्र संकेतस्थळावर त्वरित निकाल मिळत होता. जिल्ह्यातील ४३ हजार १९ विद्यार्थ्यांनी दहावी परीक्षेसाठी अर्ज दाखल केले होते. त्यापैकी ४२ हजार ९१७ विद्यार्थी परीक्षेस बसले होते, त्यातील ३९ हजार ८९७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. ११ हजार ६०३ विद्यार्थ्यांनी विशेष प्रावीण्य श्रेणी प्राप्त केली. तसेच १५ हजार ३४ विद्यार्थी प्रथम श्रेणीत, ११ हजार १७४ द्वितीय श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत. पुनर्परीक्षार्थींचा निकाल ३३.०२ टक्के लागला आहे. १ हजार ४९० विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. त्यापैकी ४९२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले.मागीलवर्षी जिल्ह्याचा निकाल ९४.४३ टक्के लागला होता. त्यात मुलींचीच सरशी झाली होती. विद्यार्थिनींचा निकाल ९५.९० टक्के, तर मुलांचा ९३.४४ टक्के लागला होता. यंदा देखील मुलींनीच बाजी मारल्याचे चित्र आहे. जिल्ह्यात सर्वाधिक कडेगाव तालुक्यातील तब्बल ९६.८१ टक्के विद्यार्थिनी दहावीत उत्तीर्ण झाल्या आहेत. त्यानंतर वाळवा (९५.६९), शिराळा (९५.४४) आणि आटपाडी (९५.४२) या तालुक्यांचा समावेश आहे. सांगली शहरातून उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थिनींचे प्रमाण ९३.७४ टक्के आहे. जिल्ह्यातील १३३ शाळांचा निकाल शंभर टक्के लागला आहे. विद्यार्थ्यांना निकालाची मूळ प्रत दि. १५ जून रोजी वितरित करण्यात येणार आहे. अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांची १८ जुलैपासून पुनर्परीक्षा होेणार आहे. (प्रतिनिधी)सावित्रीच्या लेकी लय भारीगेल्या काही वर्षांपासून निकालात मुलांपेक्षा मुलींचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण अधिक आहे. हा पायंडा यंदाही कायम राहिला असून, ९४.४० टक्के इतकी मुलींच्या उत्तीर्णतेची टक्केवारी आहे, तर मुलांची टक्केवारी ९१.८० टक्के इतकी आहे. शंभर नंबरी शाळासोमवारी जाहीर झालेल्या दहावीच्या निकालात जिल्ह्यातील १३३ शाळांचा निकाल १०० टक्के लागला आहे. यात सर्वाधिक १९ शाळा सांगली शहरातील आहेत. शंभर टक्के निकाल लागलेल्या शाळाची तालुकानिहाय संख्या अशी : वाळवा १९, शिराळा १२, तासगाव ५, सांगली १९, मिरज १४, पलूस १०, खानापूर १६, कडेगाव ८, कवठेमहांकाळ ५, जत १५, आटपाडी १० अशा जिल्ह्यातील १३३ शाळांचा निकाल शंभर टक्के लागला आहे.