शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025: भारत-पाकिस्तान सामना रद्द होणार? सुप्रीम कोर्टात याचिका दाखल, जाणून घ्या A टू Z माहिती
2
Pune Accident : पुण्यात डीजेच्या गाडीने सहा जणांना चिरडले, स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्याचा मृत्यू; सह जण जखमी
3
"धोनीने मला 'सरडा' बनायला भाग पाडलं..."; दिनेश कार्तिकने सांगितलं टीम इंडियाचं मोठं गुपित
4
'ठाकरे गटाच्या पाच आणि शरद पवार यांच्या पक्षाच्या काही खासदारांनी क्रॉस व्होटिंग केले'; नव्या दाव्याने राजकीय वर्तुळात चर्चा
5
लोन घेणाऱ्यांसाठी दिलासा! 'या' सरकारी बँकेनं कर्जाचे दर केले स्वस्त, EMI चा भार होणार कमी
6
Sushila Karki: सुशीला कार्की आहेत तरी कोण? नेपाळच्या पंतप्रधानाच्या शर्यतीत आघाडीवर!
7
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निकटवर्तीयाची गोळ्या झाडून हत्या, विद्यापीठातील कार्यक्रमात घडलेल्या घटनेने अमेरिकेत खळबळ
8
आरजेडीच्या नेत्याची हॉटेलमध्ये घुसून हत्या, विधानसभा निवडणूक लढवण्याची करत होता तयारी
9
केवळ ₹५ लाखांपासून ते ₹२.६४ कोटींचा प्रवास! आपल्या मुलांना द्या हे फायनान्शिअल फ्रीडमचं गिफ्ट; कम्पाऊंडींगची जादू पाहा
10
समीकरणे बदलली अन् अशी वाढत गेली ठाकरे बंधूंची जवळीक; युती होण्याच्या चर्चेने कार्यकर्त्यांत उत्सुकता
11
युतीबाबत एक पाऊल पुढे! शिवतीर्थावर उद्धव-राज यांच्यात अडीच तास चर्चा, बंधुऐक्याची ‘फ्रेम’ ठरली 
12
नेपाळमधील तुरुंगात झालेल्या संघर्षात पाच जणांचा मृत्यू, देशभरातील सुमारे ७००० कैदी फरार
13
अकरावी प्रवेशासाठी विशेष अंतिम फेरी आजपासून, १३ तारखेपर्यंत विद्यार्थ्यांना करता येणार अर्ज
14
आजचे राशीभविष्य- ११ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस लाभदायी, नियोजित कामे पूर्ण होतील!
15
Maratha Reservation: हैदराबाद गॅझेटियर अधिसूचनेला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान; काय आहे याचिकेत?
16
अग्रलेख: राधाकृष्णन आता देशाचे! नव्या उपराष्ट्रपतींनी हे लक्षात ठेवायला हवेच
17
सोने-चांदीने गुंतवणूकदार मालामाल, गेल्या एका वर्षात मिळाले सोन्यातून ४४ तर चांदीतून ४५ टक्के रिटर्न
18
विम्याचा हप्ता दहा वर्षांत दुप्पट! कंपन्यांकडून ग्राहकांची लूट; भीती दाखवून प्रीमियमवाढ
19
‘डीवाय पाटील’ बीकेसीत उभारणार शैक्षणिक संकुल; दहा भूखंड भाडेतत्त्वावर देण्याचा निर्णय
20
‘कोहिनूर’ची ‘बहीण’ ११७ वर्षांनी दिसणार! या बहिणीचं नाव आहे ‘दरिया-ए-नूर’ 

सांगलीत मुलीच ठरल्या सरस

By admin | Updated: June 7, 2016 07:33 IST

दहावीचा जिल्ह्याचा निकाल ९२.९६ टक्के : गतवर्षीपेक्षा निकालात घसरण

सांगली : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाच्यावतीने मार्च २०१६ मध्ये घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल सोमवारी आॅनलाईन जाहीर झाला. जिल्ह्याचा निकाल ९२.९६ टक्के लागला. त्यात मागील वर्षीप्रमाणे यंदाही मुलींनीच बाजी मारली आहे. उत्तीर्ण होण्याची मुलांची टक्केवारी ९१.८० टक्के, तर मुलींची ९४.४० टक्के इतकी असून निकालाच्याबाबतीत कोल्हापूर विभागात सांगली तिसऱ्या क्रमांकावर आहे. दरम्यान, जिल्ह्यातील १३३ शाळांचा निकाल शंभर टक्के लागला असून गेल्यावर्षीपेक्षा जिल्ह्याच्या निकालात घट झाली आहे. दहावीच्या निकालाच्या तारखेबाबत अनेक तर्कवितर्क सोशल मीडियावर लढवले जात होते. अखेर मंडळाने सोमवारी निकाल जाहीर होणार असल्याचे जाहीर केले होते. त्यानुसार आॅनलाईन निकाल जाहीर करण्यात आला. नेटवर दुपारी एक वाजता निकाल जाहीर होणार असल्याने, मुलांसह पालकांनी नेट कॅफेमध्ये गर्दी केली होती. निकाल जाहीर झाल्यानंतर पहिली दहा मिनिटे सर्व यंत्रणा धिम्या गतीने चालल्याने, निकाल समजण्यास उशीर लागत होता. त्यानंतर मात्र संकेतस्थळावर त्वरित निकाल मिळत होता. जिल्ह्यातील ४३ हजार १९ विद्यार्थ्यांनी दहावी परीक्षेसाठी अर्ज दाखल केले होते. त्यापैकी ४२ हजार ९१७ विद्यार्थी परीक्षेस बसले होते, त्यातील ३९ हजार ८९७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. ११ हजार ६०३ विद्यार्थ्यांनी विशेष प्रावीण्य श्रेणी प्राप्त केली. तसेच १५ हजार ३४ विद्यार्थी प्रथम श्रेणीत, ११ हजार १७४ द्वितीय श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत. पुनर्परीक्षार्थींचा निकाल ३३.०२ टक्के लागला आहे. १ हजार ४९० विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. त्यापैकी ४९२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले.मागीलवर्षी जिल्ह्याचा निकाल ९४.४३ टक्के लागला होता. त्यात मुलींचीच सरशी झाली होती. विद्यार्थिनींचा निकाल ९५.९० टक्के, तर मुलांचा ९३.४४ टक्के लागला होता. यंदा देखील मुलींनीच बाजी मारल्याचे चित्र आहे. जिल्ह्यात सर्वाधिक कडेगाव तालुक्यातील तब्बल ९६.८१ टक्के विद्यार्थिनी दहावीत उत्तीर्ण झाल्या आहेत. त्यानंतर वाळवा (९५.६९), शिराळा (९५.४४) आणि आटपाडी (९५.४२) या तालुक्यांचा समावेश आहे. सांगली शहरातून उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थिनींचे प्रमाण ९३.७४ टक्के आहे. जिल्ह्यातील १३३ शाळांचा निकाल शंभर टक्के लागला आहे. विद्यार्थ्यांना निकालाची मूळ प्रत दि. १५ जून रोजी वितरित करण्यात येणार आहे. अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांची १८ जुलैपासून पुनर्परीक्षा होेणार आहे. (प्रतिनिधी)सावित्रीच्या लेकी लय भारीगेल्या काही वर्षांपासून निकालात मुलांपेक्षा मुलींचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण अधिक आहे. हा पायंडा यंदाही कायम राहिला असून, ९४.४० टक्के इतकी मुलींच्या उत्तीर्णतेची टक्केवारी आहे, तर मुलांची टक्केवारी ९१.८० टक्के इतकी आहे. शंभर नंबरी शाळासोमवारी जाहीर झालेल्या दहावीच्या निकालात जिल्ह्यातील १३३ शाळांचा निकाल १०० टक्के लागला आहे. यात सर्वाधिक १९ शाळा सांगली शहरातील आहेत. शंभर टक्के निकाल लागलेल्या शाळाची तालुकानिहाय संख्या अशी : वाळवा १९, शिराळा १२, तासगाव ५, सांगली १९, मिरज १४, पलूस १०, खानापूर १६, कडेगाव ८, कवठेमहांकाळ ५, जत १५, आटपाडी १० अशा जिल्ह्यातील १३३ शाळांचा निकाल शंभर टक्के लागला आहे.