शहरं
Join us  
Trending Stories
1
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
2
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
3
IND vs PAK मॅचनंतर वातावरण तापलंय! बॉयकॉटची धमकी देणाऱ्या पाक संघानं घेतला हा निर्णय
4
'या' मुस्लीम देशावर मोठा हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल, दिला बंदरं रिकामी करण्याचा अल्टीमेटम!
5
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
6
जीएसटीत कपात अन् बँकांत गर्दी...! लोक कार लोन रद्द करू लागले, काय आहे कारण...
7
कोराडी परिसरात पर्यावरण पर्यटन प्रकल्पाला प्रतिवर्ष १ रूपये भाडे तत्वावर जमीन मंजूर
8
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
9
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
10
केवळ ₹11,000 मध्ये आपली बनवा 'ही' नवी ढासू SUV, 52 भाषांसह AI असिस्टंन्ट अन् बरंच काही;  कंपनीनं सुरू केली बुकिंग
11
Nagpur Rains : अंदाज खरा ठरला ! मुसळधार पावसाने नागपूरकरांना झाेडपले; अजून किती दिवस असाच बरसणार?
12
Shalarth ID Scam : 'ते' ६३२ शिक्षक, मुख्याध्यापक तुरुंगात जाणार? शिक्षण क्षेत्रातील सर्वात माेठा घोटाळ्याची झाडाझडती सुरु
13
Video - "तीळ कुठे आहे हे Gemini ला कसं कळलं?"; तरुणीने सांगितला धक्कादायक अनुभव
14
Video: मोहम्मद युसूफने खालची पातळी गाठली! लाईव्ह टीव्हीवर सूर्यकुमारच्या नावाचा अभद्र उच्चार...
15
पडळकरांवर गुन्हा दाखल करा, अन्यथा जीवाचे बरे-वाईट करू; कुणी दिला इशारा, नेमके प्रकरण काय?
16
IND vs PAK हस्तांदोलन वादावर ऑस्ट्रेलियाचा रिकी पॉन्टींग स्पष्ट बोलला, पाकिस्तानला झापलं...
17
मेघालयमध्ये मोठी राजकीय उलथापालथ, ८ मंत्र्यांनी दिला राजीनामा, नेमकं कारण काय?
18
'तो जिच्यासोबत आहे तिला मी चांगलं ओळखतो', आरजे महावशबद्दल अरबाज अन् धनश्रीचं संभाषण
19
“चुकीच्या गोष्टी सुरू, खाडाखोड करून कुणबी नोंदी; रिपोर्ट मुख्यमंत्र्यांना देणार”: छगन भुजबळ
20
RSS च्या विचारानुसार नरेंद्र मोदी ७५ वर्षानंतर वानप्रस्थाश्रमात जाण्याचा राजधर्म पाळतील का?, काँग्रेसचा सवाल

बिबट्यांची चांदोलीबाहेर भटकंती धोक्याची : तीन तालुक्यांमध्ये घबराट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2020 00:08 IST

जंगल परिसर विरळ होणे, अभयारण्यात हरीण, काळवीट व अन्य खाद्य उपलब्ध नसणे, अशा प्रकारांमुळे बिबटे सैरभैर होत असून, त्याचा फटका मानवी वस्त्यांना बसू लागला आहे. बिबटे दिवसा न फिरता रात्रीच्या सुमारास फिरतात.

ठळक मुद्देमृत्यूचे प्रमाण वाढले ; वन विभागाने लक्ष देण्याची गरज

गंगाराम पाटील ।वारणावती : चांदोली अभयारण्य व जंगलातील भुकेले बिबटे खाद्यासाठी प्रकल्प क्षेत्राबाहेर फिरू लागले आहेत. अभयारण्याशेजारील शिराळा, पाटण व वाळवा तालुक्यामध्ये वारंवार त्यांचे दर्शन होऊ लागले आहे. त्यामुळे बिबट्यांच्या भटकंतीचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

ही भटकंती बिबट्यांच्या जिवावर बेतू लागली आहे. गेल्या दहा वर्षात अभयारण्याबाहेर सात, तर अभयारण्यात दोन बिबट्यांचा मृत्यू झाला आहे. वन विभागाने बिबट्यांच्या रक्षणासाठी योग्य ती कार्यवाही करणे गरजेचे आहे.जंगल परिसर विरळ होणे, अभयारण्यात हरीण, काळवीट व अन्य खाद्य उपलब्ध नसणे, अशा प्रकारांमुळे बिबटे सैरभैर होत असून, त्याचा फटका मानवी वस्त्यांना बसू लागला आहे. बिबटे दिवसा न फिरता रात्रीच्या सुमारास फिरतात.

आपल्या घराजवळ राहून आपल्या पिलांचे संरक्षण करण्याचा प्रयत्न करतात. अशातच अभयारण्याबाहेर पडलेले बिबटे पुन्हा अभयारण्यात फिरकलेच नाहीत. मादी बिबट्याने उसाच्या शेतात पिलांना जन्म दिला की, त्यांचा वावर तेथील परिसरातच असतो. त्यांना तोच आपला अधिवास आहे असे वाटते.

बिबट्यांच्या भटकंतीबरोबर त्यांच्या अपघाती तसेच नैसर्गिक मृत्यूचे प्रमाणही वाढू लागले आहे. काही चोरट्य शिकारीमुळे, काही विषबाधा झाल्याने, तर काही अपघात झाल्याने बिबट्यांचा मृत्यू होत आहे. त्यामुळे आता वन विभागाने ही बाब गांभीर्याने घेऊन बिबट्यांविषयी गावा-गावात जनजागृती करणे, त्यांच्याविषयीची भीती दूर करणे, बिबट्यांच्या सवयी, आपल्या पशुधनाची काळजी कशी घ्यावी, याविषयी मार्गदर्शन करुन बिबट्या व मानव या दोघांचेही संरक्षण करण्याची गरज आहे.

  • उद्यानात सोय व्हावी

गाव परिसरामध्ये भटकी जनावरे असतात. बिबट्यांना ही भटकी जनावरे सहजासहजी भक्ष्य म्हणून उपलब्ध होतात. त्यामुळे अनेक बिबटे मानवी वस्त्यांकडे येतात. त्यामुळे गाव स्वच्छ ठेवणे आणि भटक्या जनावरांचा बंदोबस्त, हाच बिबट्याला नागरी वस्तीत फिरकू न देण्याचा उपाय आहे. तसेच त्यासाठी वनाच्छादित क्षेत्र वाढविणे, खाद्यान्न उपलब्ध करणे ही काळाची गरज आहे.

  • वन विभाग सुस्त

बिबट्याचा वावर असणाऱ्या परिसरात वन विभागाकडून पिंजरा लावण्यापलीकडे काहीच केले जात नाही. बिबट्या दिसल्यावर कोणती खबरदारी घ्यावी, याची माहिती दिली जात नाही. तसेच नागरिकांना मार्गदर्शनही केले जात नाही.

टॅग्स :Sangliसांगलीleopardबिबट्या