शहरं
Join us  
Trending Stories
1
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
2
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
3
AC बंद, ५ तास लहान मुलं, वृद्ध गरमीने हैराण; एअर इंडियाच्या विमानाचा धक्कादायक Video
4
१५ वर्ष भारतीय सेनेत देशसेवा केली, केदारनाथ हेलिकॉप्टर दुर्घटनेत आला मृत्यू; कोण होते पायलट राजवीर सिंह?
5
कुंडमळा पूल दुर्घटनेनंतर सुप्रिया सुळे घटनास्थळी; जखमींना दिला धीर, मदतीचे निर्देश
6
नागरिकांनी अपघाताची केली होती, शक्यता व्यक्त;सार्वजनिक बांधकाम विभाग प्रशासनाने केले दुर्लक्ष
7
कुंडमळा येथे क्षणात कोसळला पूल..! रांजणखळग्यांमुळे शोध मोहिमेत अडथळे
8
राजकोट किल्ल्यावरील शिवरायांच्या पुतळ्याला पुन्हा धोका?; चबुतऱ्याजवळील माती खचली
9
Pune Bridge Collapse: पूल दुर्घटनेत २ मृत्यू, ३२ जखमी, ६ जणांना वाचवले, मात्र आणखी काही...; CM देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
10
Bridge Collapse: कुंडमाळ्याजवळील इंद्रायणी नदीवरील पूल कोसळला; अनेक पर्यटक बुडाल्याची भीती
11
Pune Bridge Collapse: दोन महिन्यांपूर्वी इंद्रायणी नदीवरील पूल बंद झाला होता, बचाव मोहिम सुरू, व्हिडीओ आला समोर
12
नवरी जोमात, नवरा कोमात! लग्नानंतर १० दिवसांनी शॉपिंगच्या नावाने पत्नी फरार, पती पाहतोय वाट
13
एका दिवसात किती भाविक हेलिकॉप्टरने केदारनाथला जातात? किती वेळ लागतो? जाणून घ्या...
14
कुंडमळा दुर्घटनेत पहिला बळी..! बचाव कार्यादरम्यान महिलेचा मृतदेह सापडला
15
शिवसेना फुटीमागे कोण होतं जबाबदार?; मंत्री भरत गोगावले यांचा खळबळजनक दावा
16
Ahmedabad Plane Crash : हृदयद्रावक! "मला बाबांशी बोलायचंय..."; विमान अपघातात ८ वर्षांच्या मुलाने गमावले वडील
17
तुमचा EMI कमी होणार! RBI च्या निर्णयानंतर 'या' बँका देतायत सर्वात स्वस्त कर्ज, पाहा संपूर्ण यादी!
18
पाठवणी होताच झालं नवरीचं अपहरण; शोधाशोध करताच समोर आलं धक्कादायक सत्य! नवराही शॉक
19
"महेश सापडेल अशी आशा..!" अहमदाबाद विमान दुर्घटनेत लोकप्रिय संगीतकार बेपत्ता, शेवटचं लोकेशन सापडलं, पण...
20
Neha Marda : 'बालिका वधू'मधील 'गेहना' कुठे झाली गायब? अभिनेत्री बनली बिझनेसवुमन, आता करणार कमबॅक

बिबट्यांची चांदोलीबाहेर भटकंती धोक्याची : तीन तालुक्यांमध्ये घबराट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2020 00:08 IST

जंगल परिसर विरळ होणे, अभयारण्यात हरीण, काळवीट व अन्य खाद्य उपलब्ध नसणे, अशा प्रकारांमुळे बिबटे सैरभैर होत असून, त्याचा फटका मानवी वस्त्यांना बसू लागला आहे. बिबटे दिवसा न फिरता रात्रीच्या सुमारास फिरतात.

ठळक मुद्देमृत्यूचे प्रमाण वाढले ; वन विभागाने लक्ष देण्याची गरज

गंगाराम पाटील ।वारणावती : चांदोली अभयारण्य व जंगलातील भुकेले बिबटे खाद्यासाठी प्रकल्प क्षेत्राबाहेर फिरू लागले आहेत. अभयारण्याशेजारील शिराळा, पाटण व वाळवा तालुक्यामध्ये वारंवार त्यांचे दर्शन होऊ लागले आहे. त्यामुळे बिबट्यांच्या भटकंतीचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

ही भटकंती बिबट्यांच्या जिवावर बेतू लागली आहे. गेल्या दहा वर्षात अभयारण्याबाहेर सात, तर अभयारण्यात दोन बिबट्यांचा मृत्यू झाला आहे. वन विभागाने बिबट्यांच्या रक्षणासाठी योग्य ती कार्यवाही करणे गरजेचे आहे.जंगल परिसर विरळ होणे, अभयारण्यात हरीण, काळवीट व अन्य खाद्य उपलब्ध नसणे, अशा प्रकारांमुळे बिबटे सैरभैर होत असून, त्याचा फटका मानवी वस्त्यांना बसू लागला आहे. बिबटे दिवसा न फिरता रात्रीच्या सुमारास फिरतात.

आपल्या घराजवळ राहून आपल्या पिलांचे संरक्षण करण्याचा प्रयत्न करतात. अशातच अभयारण्याबाहेर पडलेले बिबटे पुन्हा अभयारण्यात फिरकलेच नाहीत. मादी बिबट्याने उसाच्या शेतात पिलांना जन्म दिला की, त्यांचा वावर तेथील परिसरातच असतो. त्यांना तोच आपला अधिवास आहे असे वाटते.

बिबट्यांच्या भटकंतीबरोबर त्यांच्या अपघाती तसेच नैसर्गिक मृत्यूचे प्रमाणही वाढू लागले आहे. काही चोरट्य शिकारीमुळे, काही विषबाधा झाल्याने, तर काही अपघात झाल्याने बिबट्यांचा मृत्यू होत आहे. त्यामुळे आता वन विभागाने ही बाब गांभीर्याने घेऊन बिबट्यांविषयी गावा-गावात जनजागृती करणे, त्यांच्याविषयीची भीती दूर करणे, बिबट्यांच्या सवयी, आपल्या पशुधनाची काळजी कशी घ्यावी, याविषयी मार्गदर्शन करुन बिबट्या व मानव या दोघांचेही संरक्षण करण्याची गरज आहे.

  • उद्यानात सोय व्हावी

गाव परिसरामध्ये भटकी जनावरे असतात. बिबट्यांना ही भटकी जनावरे सहजासहजी भक्ष्य म्हणून उपलब्ध होतात. त्यामुळे अनेक बिबटे मानवी वस्त्यांकडे येतात. त्यामुळे गाव स्वच्छ ठेवणे आणि भटक्या जनावरांचा बंदोबस्त, हाच बिबट्याला नागरी वस्तीत फिरकू न देण्याचा उपाय आहे. तसेच त्यासाठी वनाच्छादित क्षेत्र वाढविणे, खाद्यान्न उपलब्ध करणे ही काळाची गरज आहे.

  • वन विभाग सुस्त

बिबट्याचा वावर असणाऱ्या परिसरात वन विभागाकडून पिंजरा लावण्यापलीकडे काहीच केले जात नाही. बिबट्या दिसल्यावर कोणती खबरदारी घ्यावी, याची माहिती दिली जात नाही. तसेच नागरिकांना मार्गदर्शनही केले जात नाही.

टॅग्स :Sangliसांगलीleopardबिबट्या