शहरं
Join us  
Trending Stories
1
गुवाहाटीची खरी कथा मला विचारूनच लिहावी लागेल- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
2
न्यूयॉर्कचे पहिले मुस्लीम मेअर बनले जोहरान ममदानी, ट्रम्प यांच्या धमक्यांनंतरही मोठा विजय!
3
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
4
अमिताभ बच्चन यांनी विकले २ लक्झरी फ्लॅट्स; ‘बिग बीं’ची प्रॅापर्टीमधून बंपर कमाई, कितीमध्ये झाली ही ‘सुपर डील’?
5
"आम्ही कार्यक्रम वेळेत सुरु केलेला, पण..."; माधुरी दीक्षितच्या उशीरा येण्यामागचं खरं कारण आयोजकांनी सांगितलं
6
२०२६ला डबल धमाका, ७ राशींवर असीम शनि कृपा; उत्पन्नात लक्षणीय वाढ, घर खरेदीचे स्वप्न पूर्ण!
7
“६ महिन्यात ४८ लाख मतदार वाढ, डबल स्टार नाही, डबल मतदारांची यादी हवी”; शरद पवार गटाची मागणी
8
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
9
१३,००० कोटींचे कोकेन प्रकरण: डॉन वीरूच्या मुलाला पकडण्यासाठी १८० देशांची फौज; इंटरपोलची रेड नोटीस जारी
10
पालघरमधील तीन नगरपरिषदा, एका नगरपंचायतीत रणधुमाळी; यंदा कोण मारणार बाजी?
11
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
12
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
13
बदलापुरात युतीत लढाई? तर अंबरनाथमध्ये मविआत तडजोड? निवडणुकांमध्ये चुरशीची लढाई
14
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
15
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
16
रायगडमध्ये १० नगरपरिषदांमध्ये धूम युतीची की आघाडीची..? सर्व राजकीय पक्षांकडून हालचाली
17
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
18
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
19
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
20
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू

पाण्याअभावी डाळिंब बागा उद्ध्वस्त

By admin | Updated: August 24, 2016 23:43 IST

जत तालुक्यातील स्थिती : शेतकरी संकटात; पाच वर्षांपासून पाऊस नाही

गजानन पाटील -- संख --भीषण दुष्काळी परिस्थितीने जत तालुक्यातील २ हजार एकर क्षेत्रातील डाळिंब बागा पाण्याअभावी वाळून गेल्या आहेत. मान्सून पावसाने ही दडी दिल्याने डाळिंब बागा काढण्याशिवाय कोणताही पर्याय राहिलेला नाही. दोन वर्षापासून बिब्ब्या रोगाने बागा उद्ध्वस्त झाल्या आहेत. त्यातच गेल्या पाच वर्षांपासून पावसाचे प्रमाण कमी झाल्यामुळे पाण्याची पातळी ८०० ते ९०० फुटापर्यंत गेली आहे. यामुळे डाळिंब, बागायत शेतकऱ्यांसमोर नैसर्गिक पाण्याचे संकट उभा राहिल्याने अक्षरश: शेतकरी देशोधडीला लागला आहे. बँका, विकास सोसायट्यांकडून काढलेल्या कर्जाची परतफेड कशी होणार? हा प्रश्न उपस्थित होत आहे.अनुकूल हवामान, कमी पाणी व खडकाळ जमिनीवर येणारे फळबागेचे हे पीक आहे. ठिबक सिंचन, शेत तलाव बांधून, कूपनलिका खोदून उजाड माळरानावर बागा फुलविल्या आहेत. गणेश, केशर, भगवा वाणाच्या बागा आहेत. बाजारात भाव चांगला मिळत असल्यामुळे केशर जातीच्या बागांचे प्रमाण अधिक आहे. तालुक्यामध्ये डाळिंबाचे क्षेत्र ११ हजार ३४४.५९ हेक्टर आहे. दरीबडची, काशिलिंगवाडी, सोन्याळ, कुंभारी, उमदी, आसंगी (जत) जाडरबोबलाद, जालिहाळ खुर्द, दरीकोणूर या गावांमध्ये डाळिंब क्षेत्र अधिक आहे.तालुक्यात २६ पाटबंधारे तलाव व २ मध्यम प्रकल्प आहेत. पाऊस बऱ्यापैकी पडत असल्याने पाणी टंचाई नव्हती. ४०० ते ५०० फुटापर्यंत पाणी लागत होते. अनेक शेतकऱ्यांनी तलावातून, तलावाशेजारी, ओढ्यालगत विहीर खोदून पाईपलाईन करून पाणी आणले. मात्र २०१० पासून सलग पाच वर्षे पाणी कमी झाल्याने तलाव, विहिरी व कूपनलिका कोरड्या पडल्या. यावर्षी तर पाऊसच झाला नसल्याने १९७२ पेक्षा भीषण दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली होती.जानेवारी महिन्यापासून पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली होती. रब्बी व खरीप हंगाम सलग दुसऱ्यावर्षी वाया गेला होता. मार्च-एप्रिलमध्ये आतापर्यंत सर्वाधिक पाणी टंचाई गावामध्ये निर्माण झाली होती. तालुक्यातील ८१ गावांमध्ये त्याखालील ३४२ वाड्या-वस्तीवर टँकरने पाणी पुरवठा केला जात होता. पिण्याच्या पाण्याची भीष0ण टंचाई, शेतीच्या पाण्याची तर आडात नाही, तर पोहऱ्यात येणार कोठून? अशी स्थिती निर्माण झाली आहे.पाण्याअभावी बागा पूर्णपणे वाळून गेल्याने बागांचे फक्त सांगाडे राहिले आहेत. थोडाफार झालेल्या पावसाने वाळलेल्या झाडांना फक्त पालवी फुटली आहे. परंतु त्या बागाचे आयुष्य कमी होते. रोगप्रतिकारशक्ती घटते. उत्पादन क्षमताही कमी होते. शेतकऱ्यांना बागा उभा करण्यासाठी तालुक्यातील विकास सोसायटीने कोट्यवधी रुपयांचे कर्जाचे वाटप करण्यात आले. पूर्व भागातील दरीबडची, जालिहाळ खुर्द, आसंगी, सोन्याळ, उटगी, जाडरबोबलाद, मुचंडी, दरीकोणूर येथील विकास सोसायटीने २० कोटींपर्यंत कर्ज दिले आहे. बागा जळल्याने शेतकरी अडचणीत आल्याने शेतकऱ्यांकडून कोट्यवधी रुपयाची येणे बाकी असल्याने विकास सोसायट्या अडचणीत आल्या आहेत.बागेचे आर्थिक उत्पन्न संपल्याने साठवण ठेवलेल्या पैशावर उदरनिर्वाह सुरू आहे. दुष्काळी सवलत देऊन बँका, विकास सोसायटीची कर्जे माफ करावीत व परत बागा उभ्या करण्यासाठी अनुदान द्यावे, अशी मागणी डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांमधून होत आहे.मजुरांचे स्थलांतर : उचल घेण्याची वेळपावसाने यंदाही जत तालुक्याकडे पाठ फिरवली आहे. परिसरात पुरेसे पाणी उपलब्ध नसल्याने डाळिंब, द्राक्षबागेत काम करणाऱ्या मजुरांना आता रोजगार हमीच्या कामावर जावे लागत आहे. सर्वांना शेतात काम मिळत नसल्याने उपासमारीची वेळ आली आहे. कोल्हापूर, सांगली, वाळवा, सातारा आदी ठिकाणी मजुरांनी स्थलांतर केले आहे. ते वीटभट्टीवर काम करू लागले आहेत. गाव सोडून नदीकाठचा आधार घेतला आहे. बागा वाळून गेल्याने ऊसतोडी करण्याशिवाय पर्याय राहिला नाही. बागेसाठी व पाईपलाईनसाठी काढलेल्या कर्जाची परतफेड करण्यासाठी ऊसतोडी, वीटभट्टी कंत्राटदारांकडून उचल घेण्याची वेळ आलेली आहे.