शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
2
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
3
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
4
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
5
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
6
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर
7
ह्युंदाईच्या या SUV ची किंमत ₹6 लाखही नव्हती, नव्या GST नंतर ₹86156 नं स्वस्त झाली; वरून ₹50000 चा डिस्काउंटही!
8
"क्लेमोर, वायर, पावडर... सगळं तयार होतं !" गुप्त माहितीने गडचिरोली पोलिसांनी रोखला भीषण कट
9
पाक आशिया कप स्पर्धेतून Out? सामान बसमध्ये अन् पाक खेळाडू हॉटेलमध्ये! नेमकं काय घडलं?
10
वाघाला घोरताना कधी पाहिलंय? VIDEO पाहून नेटकरी म्हणतायत, "हे तर आमच्या बाबांसारखेच..."
11
नवरात्रीचा मुहूर्त? पंतप्रधान मोदी नव्या ठिकाणाहून कामकाज पाहणार; PMOचा पत्ता बदलणार
12
"भेटायला येतो असा मी मित्रासारखा हट्ट केला होता पण...", प्रियाच्या आठवणीत अभिजीत भावुक
13
Video - पैशांचा पाऊस! चालत्या ट्रेनमधून उडवल्या ५०० च्या नोटा; गोळा करण्यासाठी लोकांची झुंबड
14
बच्चू कडूंना कधीच सोडणार नाही म्हणणारे माजी आमदार सोडून गेले; काँग्रेसमध्ये पक्ष प्रवेश
15
सारख्या नावाचे दिवस गेले... सेम चेहराही शोधावा लागणार; यापुढे EVM वर उमेदवाराचा रंगीत फोटो छापणार...
16
प्रसिद्धीचा मुद्दा, अजितदादांचा फडणवीसांकडे रोख;  म्हणाले, “जाहिरात करावी तर देवाभाऊंसारखी”
17
समुद्रात दडलाय सोन्याचा खजिना; किंमत 2000 अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त, काढणार कसा?
18
आरोपीला पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर प्राणघातक हल्ला: अनेक पोलिस एम्समध्ये दाखल
19
कार अन् ट्रकचा भीषण अपघात; एकाच कुटुंबातील सात जणांचा जागीच मृत्यू
20
ICC T20I Rankings : नंबर वन अभिषेक शर्मानं साधला मोठा डाव; कॅप्टन सूर्यासह तिलक वर्मा घाट्यात

पाण्याअभावी डाळिंब बागा उद्ध्वस्त

By admin | Updated: August 24, 2016 23:43 IST

जत तालुक्यातील स्थिती : शेतकरी संकटात; पाच वर्षांपासून पाऊस नाही

गजानन पाटील -- संख --भीषण दुष्काळी परिस्थितीने जत तालुक्यातील २ हजार एकर क्षेत्रातील डाळिंब बागा पाण्याअभावी वाळून गेल्या आहेत. मान्सून पावसाने ही दडी दिल्याने डाळिंब बागा काढण्याशिवाय कोणताही पर्याय राहिलेला नाही. दोन वर्षापासून बिब्ब्या रोगाने बागा उद्ध्वस्त झाल्या आहेत. त्यातच गेल्या पाच वर्षांपासून पावसाचे प्रमाण कमी झाल्यामुळे पाण्याची पातळी ८०० ते ९०० फुटापर्यंत गेली आहे. यामुळे डाळिंब, बागायत शेतकऱ्यांसमोर नैसर्गिक पाण्याचे संकट उभा राहिल्याने अक्षरश: शेतकरी देशोधडीला लागला आहे. बँका, विकास सोसायट्यांकडून काढलेल्या कर्जाची परतफेड कशी होणार? हा प्रश्न उपस्थित होत आहे.अनुकूल हवामान, कमी पाणी व खडकाळ जमिनीवर येणारे फळबागेचे हे पीक आहे. ठिबक सिंचन, शेत तलाव बांधून, कूपनलिका खोदून उजाड माळरानावर बागा फुलविल्या आहेत. गणेश, केशर, भगवा वाणाच्या बागा आहेत. बाजारात भाव चांगला मिळत असल्यामुळे केशर जातीच्या बागांचे प्रमाण अधिक आहे. तालुक्यामध्ये डाळिंबाचे क्षेत्र ११ हजार ३४४.५९ हेक्टर आहे. दरीबडची, काशिलिंगवाडी, सोन्याळ, कुंभारी, उमदी, आसंगी (जत) जाडरबोबलाद, जालिहाळ खुर्द, दरीकोणूर या गावांमध्ये डाळिंब क्षेत्र अधिक आहे.तालुक्यात २६ पाटबंधारे तलाव व २ मध्यम प्रकल्प आहेत. पाऊस बऱ्यापैकी पडत असल्याने पाणी टंचाई नव्हती. ४०० ते ५०० फुटापर्यंत पाणी लागत होते. अनेक शेतकऱ्यांनी तलावातून, तलावाशेजारी, ओढ्यालगत विहीर खोदून पाईपलाईन करून पाणी आणले. मात्र २०१० पासून सलग पाच वर्षे पाणी कमी झाल्याने तलाव, विहिरी व कूपनलिका कोरड्या पडल्या. यावर्षी तर पाऊसच झाला नसल्याने १९७२ पेक्षा भीषण दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली होती.जानेवारी महिन्यापासून पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली होती. रब्बी व खरीप हंगाम सलग दुसऱ्यावर्षी वाया गेला होता. मार्च-एप्रिलमध्ये आतापर्यंत सर्वाधिक पाणी टंचाई गावामध्ये निर्माण झाली होती. तालुक्यातील ८१ गावांमध्ये त्याखालील ३४२ वाड्या-वस्तीवर टँकरने पाणी पुरवठा केला जात होता. पिण्याच्या पाण्याची भीष0ण टंचाई, शेतीच्या पाण्याची तर आडात नाही, तर पोहऱ्यात येणार कोठून? अशी स्थिती निर्माण झाली आहे.पाण्याअभावी बागा पूर्णपणे वाळून गेल्याने बागांचे फक्त सांगाडे राहिले आहेत. थोडाफार झालेल्या पावसाने वाळलेल्या झाडांना फक्त पालवी फुटली आहे. परंतु त्या बागाचे आयुष्य कमी होते. रोगप्रतिकारशक्ती घटते. उत्पादन क्षमताही कमी होते. शेतकऱ्यांना बागा उभा करण्यासाठी तालुक्यातील विकास सोसायटीने कोट्यवधी रुपयांचे कर्जाचे वाटप करण्यात आले. पूर्व भागातील दरीबडची, जालिहाळ खुर्द, आसंगी, सोन्याळ, उटगी, जाडरबोबलाद, मुचंडी, दरीकोणूर येथील विकास सोसायटीने २० कोटींपर्यंत कर्ज दिले आहे. बागा जळल्याने शेतकरी अडचणीत आल्याने शेतकऱ्यांकडून कोट्यवधी रुपयाची येणे बाकी असल्याने विकास सोसायट्या अडचणीत आल्या आहेत.बागेचे आर्थिक उत्पन्न संपल्याने साठवण ठेवलेल्या पैशावर उदरनिर्वाह सुरू आहे. दुष्काळी सवलत देऊन बँका, विकास सोसायटीची कर्जे माफ करावीत व परत बागा उभ्या करण्यासाठी अनुदान द्यावे, अशी मागणी डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांमधून होत आहे.मजुरांचे स्थलांतर : उचल घेण्याची वेळपावसाने यंदाही जत तालुक्याकडे पाठ फिरवली आहे. परिसरात पुरेसे पाणी उपलब्ध नसल्याने डाळिंब, द्राक्षबागेत काम करणाऱ्या मजुरांना आता रोजगार हमीच्या कामावर जावे लागत आहे. सर्वांना शेतात काम मिळत नसल्याने उपासमारीची वेळ आली आहे. कोल्हापूर, सांगली, वाळवा, सातारा आदी ठिकाणी मजुरांनी स्थलांतर केले आहे. ते वीटभट्टीवर काम करू लागले आहेत. गाव सोडून नदीकाठचा आधार घेतला आहे. बागा वाळून गेल्याने ऊसतोडी करण्याशिवाय पर्याय राहिला नाही. बागेसाठी व पाईपलाईनसाठी काढलेल्या कर्जाची परतफेड करण्यासाठी ऊसतोडी, वीटभट्टी कंत्राटदारांकडून उचल घेण्याची वेळ आलेली आहे.