शहरं
Join us  
Trending Stories
1
संन्यस्त खड्ग नाटकावरुन पुण्यात वंचितच्या कार्यकर्त्यांचा राडा; यशवंत नाट्यगृहात घोषणाबाजी, पोलिसांचा फौजफाटा तैनात
2
अखेर ज्वालामुखी फुटलाच...! सत्य ठरली नव्या बाबा वेंगाची भविष्यवाणी! जपानमध्येही इतर भयावह भाकितं ठरतायत खरी!
3
IND vs ENG 3rd Test: नो आघाडी...नो पिछाडी; लॉर्ड्सच्या मैदानातील टेस्ट मॅचमध्ये पहिल्यांदाच 'टाय'चा ट्विस्ट!
4
समाज कंटकांनी कावड यात्रा मार्गावर टाकले काचेचे तुकडे; भाजप नेत्याचा दावा
5
अनैतिक संबंधांचा संशय, पतीनं अभिनेत्री पत्नीवर आधी 'पेर स्प्रे' मारला, मग चाकूनं सपासप वार केले अन्...
6
IND vs ENG : इंग्लंडच्या सलामीवीरांची 'नौटंकी'! टीम इंडियाचा 'सेनापती' गिलनं असा काढला राग (VIDEO)
7
'फ्यूल कंट्रोल स्विच'संदर्भात ही एक गोष्ट ऐकली असती तर अहमदाबाद विमान अपघात टळला असता? FAA नं 2018 मध्येच दिला होता इशारा
8
इगा स्वियातेक विम्बल्डनची नवी सम्राज्ञी! तिनं अमांडा अनिसिमोव्हाला रडवलं! १९८८ नंतर पहिल्यांदाच असं घडलं
9
"एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्याने वाईट वाटलं आणि घरी निघून गेलो,पण पुन्हा..."; रवींद्र चव्हाणांचा गौप्यस्फोट
10
मायक्रोसॉफ्टने AI वापरून वाचवले ४,२०० कोटी; पण १५,००० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं
11
शेवटच्या 3 सेकंदांत 'RUN' वरून 'CUTOFF' झालं 'फ्यूल कंट्रोल स्विच' अ्न...; एअर इंडिया प्लेन क्रॅशवेळी शेवटच्या क्षणाला नेमकं काय घडलं?
12
४०० प्लस धावांसह इंग्लंडच्या मैदानात रिषभ पंतचा 'भीम पराक्रम'! MS धोनीलाही जमलं नाही ते करून दाखवलं
13
"माझा नातेवाईक का असेना, टायरमध्ये घालून झोडायला सांगणार"; बारामतीत अजित पवारांचा कडक इशारा
14
मुलगी म्हणतेय, 'माझ्यावर हॉस्टेलमध्ये अत्याचार झाला'; वडील म्हणाले, 'ती कारमधून पडली'
15
KL राहुलची विक्रमी सेंच्युरी; लॉर्ड्सच्या मैदानात अशी कामगिरी करणारा ठरला दुसरा भारतीय
16
भारतातील रस्त्यावरही टेस्लाच्या कार धावणार; या दिवशी पहिलं शोरूम सुरू होणार, लवकरच डिलिव्हरी सुरू होईल
17
Air India Plane Crash :'रिपोर्ट लीक कसा झाला?' अहमदाबाद विमान अपघाताच्या अहवालावर पायलट असोसिएशनने आक्षेप घेतला
18
पंतची मोठी चूक! चोरटी धाव घेण्याच्या नादात फुकटात फेकली विकेट! बेन स्टोक्सचा डायरेक्ट थ्रो अन्...
19
नरेंद्र मोदींनंतर PM म्हणून काँग्रेसकडून राहुल गांधींचा पर्याय? शं‍कराचार्यांचे मोठे विधान
20
“७५ वर्षांचा नियम RSSला लागू करायचा असेल, म्हणून मोहन भागवत तसे म्हणाले असतील”: शंकराचार्य

दंडोबा पर्यटन स्थळाचे अस्तित्व धोक्यात

By admin | Updated: March 16, 2015 00:03 IST

कर्मचाऱ्यांची कमतरता : महिन्यात दोनवेळा आग; वनराईचे नुकसान

देशिंग : मिरज व कवठेमहांकाळ तालुक्यांच्या सीमेवर सुमारे ११५० हेक्टरवर पसरलेल्या निसर्गरम्य दंडोबा डोंगर पर्यटनस्थळास एकाच महिन्यामध्ये तब्बल दोनवेळा आग लागली असल्याने सुमारे पंधरा ते वीस एकर डोंगरावरील वनस्पती जळून खाक झाल्या. त्यामुळे या पर्यटन स्थळाचे अस्तित्व धोक्यात आले आहे.हे पर्यटनस्थळ वन विभागाच्या देखरेखीखाली असून, याची सुरक्षा राखण्यासाठी वन अधिकारी व कर्मचारी कार्यरत आहेत. मात्र तब्बल ११५० हेक्टर लांब डोंगराची पाहणी करण्यासाठी कर्मचारी सध्या कमी असल्याने संपूर्ण परिसराची पाहणी होत नाही. त्यामुळे वारंवार आगीचे प्रकार घडत आहेत. येथील वनराई संपुष्टात येत आहे. या पर्यटन स्थळामध्ये विविध प्रकारच्या औषधी वनस्पती, दुर्मीळ प्राणी, साप, ससे, हरणे, कोल्हे आदी प्राण्यांचा वावर येथे मोठ्या प्रमाणावर आहे. तसेच येथे काही लोकांकडून ससे मारण्याचे प्रकारही घडत आहेत. मात्र याकडे वन विभागाकडून दुर्लक्ष केले जात आहे.दि. ८ रोजी लागलेल्या आगीत सुमारे ८ ते ९ एकर डोंगर परिसरातील वनराई जळून खाक झाली, मात्र दोन्ही वेळी लागलेल्या आगीचे नेमके कारण स्पष्ट झाले नसल्याने, अज्ञाताच्या विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या पर्यटन स्थळाचा आनंद घेण्यासाठी सांगली, मिरज, कोल्हापूर, कर्नाटकातील निसर्गप्रेमी मोठ्या प्रमाणात येत असल्याने, त्यांच्याकडूनही अशा दुर्घटना घडत असल्याचे बोलले जाते. या स्थळास पर्यटनस्थळाचा दर्जा मिळाल्यापासून काही प्रमाणात निधी खर्च करुन विकास करण्याचा प्रयत्न केला आहे; मात्र काही मूलभूत सुविधांचा अभाव, शिवाय कर्मचाऱ्यांची कमतरता असल्याने, याप्रकारच्या घटना वारंवार घडत आहेत. या डोंगर परिसरामध्ये जंगली प्राणीही मोठ्या प्रमाणावर असल्याने त्यांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे दंडोबा डोंगर पर्यटन स्थळाकडे वन विभाग व प्रशासनाने लक्ष देऊन कर्मचाऱ्यांची तसेच पर्यटनस्थळ म्हणून लागणाऱ्या मूलभूत सुविधांची सोय करावी, अशी मागणी निसर्गप्रेमींमधून होत आहे. (वार्ताहर)मूलभूत सुविधांचा अभावदंडोबा डोंगर परिसरास पर्यटनस्थळाचा दर्जा मिळाल्यापासून काही प्रमाणात निधी खर्च करुन विकास करण्याचा प्रयत्न झाला आहे; मात्र मूलभूत सुविधांचा अभाव, शिवाय कर्मचाऱ्यांची कमतरता असल्याने, डोंगर परिसरात आगी लावण्यासारख्या घटना वारंवार घडत आहेत.