शहरं
Join us  
Trending Stories
1
शिवसेना-मनसे युती, संजय राऊतांना मानाचे स्थान, पण बाळा नांदगावकर कुठेच दिसेना; गेले कुठे?
2
"आमचं हिंदुत्व अस्सल, फक्त मतांसाठी भगवी शाल घालणारे आम्ही नाहीत"; मुख्यमंत्र्यांचे राज ठाकरेंना सडेतोड उत्तर
3
Eknath Shinde: आपली पोरं सांभाळू शकत नाहीत, मुंबई काय सांभाळणार? एकनाथ शिंदेंची ठाकरे बंधूंवर टीका
4
विराट सेंच्युरी! किंग कोहलीनं मोडला मास्टर ब्लास्टर सचिनचा रेकॉर्ड; वेगाने गाठला १६००० धावांचा पल्ला
5
नितेश राणे, प्रवीण दरेकर आणि प्रसाद लाड यांना कोर्टाचा दणका, बजावलं अजामिनपात्र वॉरंट
6
युतीची घोषणा मात्र जागांचा सस्पेन्स; उद्धवसेना-मनसेत जागावाटपावर 'असा' ठरलाय फॉर्म्युला?
7
सोनं थांबेना, चांदी आवरेना! सोन्याच्या दरात ७०% तर चांदीत १५० टक्क्यांची वाढ; पाहा कुठे पोहोचतील किमती?
8
राष्ट्रवादीचे नेते राहुल कलाटे भाजपमध्ये;पक्षातील कार्यकर्त्यांचा विरोध डावलून दिला प्रवेश
9
'या' वाक्यापासून आम्ही एकत्र येण्याची सुरुवात झाली; राज ठाकरेंनी सांगितली 'मनोमिलना'ची कथा
10
Christmas Sale 2025: स्मार्टफोन, कपडे आणि घरगुती उपकरणांवर सवलतींचा पाऊस; वर्षाच्या शेवटी कुठे आहेत बंपर ऑफर्स
11
युती होताच दाखवलं शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतरच पहिलं भाषण; भाजपनं राज ठाकरेंना डिवचलं
12
रोहितच्या शतकानं मन भरलं नाही! चाहत्याची थेट मुंबईचा कर्णधार शार्दुल ठाकूरला विनंती! आम्हाला...
13
नोकरी गेली तरी भीती नाही, तुमच्या कर्जाचा हप्ता आता विमा कंपनी भरेल; नक्की काय आहे प्रकरण?
14
उल्हासनगरात उद्धव ठाकरेंना मोठा धक्का; कल्याण जिल्हाप्रमुख धनंजय बोडारे यांचा भाजपात प्रवेश
15
"आमचा हिंदुत्ववाद केवळ पूजापद्धतीवर आधारित नाही तर..."; CM फडणवीसांनी ठाकरे बंधूंना सुनावलं
16
मेष वार्षिक राशिभविष्य २०२६: 'आत्मिक शांती' आणि प्रगतीचे वर्ष; आव्हाने पेलून गाठता येणार यशाचे शिखर!
17
प्राजक्ताच्या स्वप्नातील राजकुमार आहे तरी कसा? लग्नासाठी तिची एकच अट; सिंगल राहण्यामागचं खरं कारण समोर
18
जालना महापालिकेत भाजपानं युती न केल्यास सर्व पर्याय खुले; शिंदेसेनेचे आमदार खोतकरांचा इशारा
19
Vijay Hazare Trophy : हिटमॅनचा हिट शो जारी! मुंबईच्या संघाकडून खेळण्यासाठी मैदानात उतरला अन्...
20
३१ डिसेंबरला उघडणार या वर्षाचा अखेरचा आयपीओ; प्राईज बँड ₹९०, पाहा GMP सह अनेक डिटेल्स
Daily Top 2Weekly Top 5

काटापेमेंट तोडी जोमात, सभासदांच्या उसाला तुरे!

By admin | Updated: February 13, 2015 22:57 IST

५० लाख टन गाळप : कारखाने एफआरपी दर देणार; दुष्काळी पट्ट्यातील कारखान्यांचा कृष्णाकाठी शिरकाव

सांगली : जिल्ह्यातील चार खासगी आणि बारा सहकारी अशा १६ साखर कारखान्यांनी गेल्या दोन ते तीन महिन्यांच्या कालावधित ५० लाख टन उसाचे गाळप केले असून, आजअखेर (शुक्रवार) ५८ लाख क्विंटल साखर पोती तयार झाली आहेत. दुष्काळी पट्ट्यातील काही साखर कारखान्यांनी वजन झाल्यानंतर जाग्यावर पैसे देऊन (काटापेमेंट) मिरज, तासगाव तालुक्यातील ऊस तोडीला प्राधान्य दिल्यामुळे कार्यक्षेत्रातील सभासदांच्या उसाला तुरे आहेत. शिल्लक सर्व ऊस गाळपाचे कारखाना प्रशासनासमोर मोठे आव्हान सध्या तरी दिसत आहे. दुष्काळी जत, आटपाडी, कवठेमहांकाळ, तासगाव, कडेगाव, खानापूर, मिरज पूर्वभागामध्ये म्हैसाळ, टेंभू, ताकारी उपसा सिंचन योजनेचे पाणी पोहोचल्यामुळे तेथे उसाचे क्षेत्र वाढले आहे. जिल्ह्यात ७४ हजार हेक्टर उसाचे क्षेत्र असून, गेल्यावर्षीच्या तुलनेत १० टक्क्यांनी क्षेत्र वाढले आहे. यातच साखर कारखान्यांनी ऊसदराचा तिढा सुटला नसल्यामुळे गळीत हंगाम उशिरा सुरू झाले आहेत. तासगाव, निनाईदेवी (दालमिया शुगर) कारखान्यांचे गळीत हंगाम बंद आहेत. तसेच वसंतदादा कारखानाही पूर्ण क्षमतेने सुरू नसल्यामुळे जिल्ह्यातील उसाचे वेळेत गळीत होणार का? याविषयी शेतकऱ्यांच्या मनात शंका आहे. १६ साखर कारखान्यांनी आतापर्यंत ५० लाख ३४ हजार ८९ टन उसाचे गाळप झाले आहे. त्यापासून ५८ लाख क्विंटल साखर पोती तयार झाली आहेत. आतापर्यंत ४० हजार हेक्टरपर्यंत उसाच्या तोड झाल्याचा कारखाना प्रशासनाचा अंदाज आहे. येत्या दोन महिन्यांत ३४ हेक्टर क्षेत्रावरील ऊस तोडण्याचे कारखाना प्रशासनासमोर मोठे आव्हान आहे. हा अंदाज घेऊनच दुष्काळी भागातील साखर कारखान्यांनी तासगाव, मिरज तालुक्यात शिरकाव करून काटापेमेंट देऊन तोडी सुरू केल्या आहेत. याच काही कारखान्यांनी कर्नाटकातूनही उसाच्या तोडी सुरू केल्या आहेत. काटापेमेंटला कारखानदार प्राधान्य देण्याचे महत्त्वाचे कारण म्हणजे उसाला एकरकमी १६०० ते १८०० रुपये दर घेऊन शेतकरी गप्प बसत आहेत. या शेतकऱ्यांना दुसरा हप्ता देण्याची गरज नसल्यामुळे कारखानदार काटापेमेंटचा ऊस उचलत आहेत. साखर कारखाने कमी दराचा ऊस उचलण्यास प्राधान्य देत असल्यामुळे कार्यक्षेत्रातील उसाला तुरे आले आहेत. जत, कवठेमहांकाळ, आटपाडी, खानापूर, तासगाव तालुक्यातील काही ऊस अठरा महिने झाला तरीही तो गाळपास गेला नाही. यामुळे ऊस वेळेत गाळपाला जाणार की नाही, याची शेतकऱ्यांना चिंता आहे. (प्रतिनिधी)