शहरं
Join us  
Trending Stories
1
KL राहुलच्या 'सेल्फिश सेंच्युरी'सह पंतची चूक नडली? शुबमन गिल म्हणाला, मॅच तिथंच फिरली; पण...
2
भारत-इंग्लंड मालिकेतून 'हा' स्टार खेळाडू बाहेर ! हाताला गंभीर दुखापत, लवकरच शस्त्रक्रिया होणार
3
ठाण्यात पाच विद्यार्थिनींचा एकाच तरुणाकडून विनयभंग; पालकांमध्ये संताप; फरार आरोपीच्या अटकेची मागणी
4
टेस्टमधील खतरनाक स्पेल! स्टार्कनं १५ चेंडूत २ धावा खर्च करत साधला ५ विकेट्सचा विश्वविक्रमी डाव
5
IND vs ENG : या चौघांपैकी एकानं बुमराह-सिराजसारखा 'दम' दाखवला असता तर मॅच सहज जिंकता आली असती
6
जड्डूची लढवय्या इनिंग व्यर्थ! बुमराहनंही बॅटिंग वेळी धैर्य दाखवलं, सिराजची अनलकी विकेट अन् इंग्लंडनं मारली बाजी
7
मुंबईतील दोन तरुणांचा पाण्याच्या डोहात बुडून मृत्यू; नायगांवच्या चिंचोटीमधील दुर्दैवी घटना
8
हातातोंडाशी आलेला विजयाचा घास हिरावला... टीम इंडिया कुठे चुकली? वाचा, पराभवाची ५ कारणे
9
अमृतसरचं सुवर्ण मंदिर RDX नं उडवण्याची धमकी, ईमेलनंतर एकच खळबळ
10
लैंगिक समानतेसाठी ३५ वर्षांचा संघर्ष, हिंगणघाटच्या वर्षा देशपांडे यांचा आंतरराष्ट्रीय गौरव
11
"रशिया पुढील ५० दिवसांत युक्रेन युद्ध थांबवण्यास तयार झाला नाही, तर...!" डोनाल्ड ट्रम्प यांची रशियाला थेट धमकी
12
चेनस्नॅचिंग करणाऱ्या दिल्लीतील टोळीला नागपुरात अटक, विविध १० गुन्ह्यांची उकल
13
सातारा: प्रारुप रचना जाहीर ! जिल्ह्यात गट अन् गणात मोडतोड; नावे बदलली, गावांचीही अदलाबदल
14
डोंबिवली: पैशाच्या हव्यासापायी 'हॉटेल अटेंडंट' बनला सोनसाखळी चोर; रामनगर पोलिसांनी मुसक्या आवळल्या !
15
नागपूर: नंदीग्राम एक्सप्रेसमधून पिंपळखुटी रेल्वे स्थानकाजवळ धूर; मोठा अनर्थ टळला...
16
सर्व विमानांचे फ्युएल कंट्रोल स्विच तपासा; एअर इंडिया अपघातानंतर डीजीसीआयने कंपन्यांना दिले महत्त्वाचे आदेश
17
'त्या' तरुणींची छांगूरच्या तावडीतून सुटका करून, त्यांना पुन्हा हिंदू बनवणाऱ्या गोपाल राय यांना जीवे मारण्याची धमकी; केली सुरक्षेची मागणी
18
"दोन हाणा पण मला नेता म्हणा' अशी त्यांची अवस्था"; भाजपा आमदार शिवाजी पाटलांचा खोचक टोला
19
कॅनडात इस्कॉनच्या रथयात्रेवर फेकली अंडी; परराष्ट्र मंत्रालयाने केली कॅनेडियन सरकारकडे कारवाईची मागणी
20
IND vs ENG : बुमराहनं ७ महिन्यांनी उघडलं खातं! १ तास ४० मिनिटे केली बॅटिंग

काटापेमेंट तोडी जोमात, सभासदांच्या उसाला तुरे!

By admin | Updated: February 13, 2015 22:57 IST

५० लाख टन गाळप : कारखाने एफआरपी दर देणार; दुष्काळी पट्ट्यातील कारखान्यांचा कृष्णाकाठी शिरकाव

सांगली : जिल्ह्यातील चार खासगी आणि बारा सहकारी अशा १६ साखर कारखान्यांनी गेल्या दोन ते तीन महिन्यांच्या कालावधित ५० लाख टन उसाचे गाळप केले असून, आजअखेर (शुक्रवार) ५८ लाख क्विंटल साखर पोती तयार झाली आहेत. दुष्काळी पट्ट्यातील काही साखर कारखान्यांनी वजन झाल्यानंतर जाग्यावर पैसे देऊन (काटापेमेंट) मिरज, तासगाव तालुक्यातील ऊस तोडीला प्राधान्य दिल्यामुळे कार्यक्षेत्रातील सभासदांच्या उसाला तुरे आहेत. शिल्लक सर्व ऊस गाळपाचे कारखाना प्रशासनासमोर मोठे आव्हान सध्या तरी दिसत आहे. दुष्काळी जत, आटपाडी, कवठेमहांकाळ, तासगाव, कडेगाव, खानापूर, मिरज पूर्वभागामध्ये म्हैसाळ, टेंभू, ताकारी उपसा सिंचन योजनेचे पाणी पोहोचल्यामुळे तेथे उसाचे क्षेत्र वाढले आहे. जिल्ह्यात ७४ हजार हेक्टर उसाचे क्षेत्र असून, गेल्यावर्षीच्या तुलनेत १० टक्क्यांनी क्षेत्र वाढले आहे. यातच साखर कारखान्यांनी ऊसदराचा तिढा सुटला नसल्यामुळे गळीत हंगाम उशिरा सुरू झाले आहेत. तासगाव, निनाईदेवी (दालमिया शुगर) कारखान्यांचे गळीत हंगाम बंद आहेत. तसेच वसंतदादा कारखानाही पूर्ण क्षमतेने सुरू नसल्यामुळे जिल्ह्यातील उसाचे वेळेत गळीत होणार का? याविषयी शेतकऱ्यांच्या मनात शंका आहे. १६ साखर कारखान्यांनी आतापर्यंत ५० लाख ३४ हजार ८९ टन उसाचे गाळप झाले आहे. त्यापासून ५८ लाख क्विंटल साखर पोती तयार झाली आहेत. आतापर्यंत ४० हजार हेक्टरपर्यंत उसाच्या तोड झाल्याचा कारखाना प्रशासनाचा अंदाज आहे. येत्या दोन महिन्यांत ३४ हेक्टर क्षेत्रावरील ऊस तोडण्याचे कारखाना प्रशासनासमोर मोठे आव्हान आहे. हा अंदाज घेऊनच दुष्काळी भागातील साखर कारखान्यांनी तासगाव, मिरज तालुक्यात शिरकाव करून काटापेमेंट देऊन तोडी सुरू केल्या आहेत. याच काही कारखान्यांनी कर्नाटकातूनही उसाच्या तोडी सुरू केल्या आहेत. काटापेमेंटला कारखानदार प्राधान्य देण्याचे महत्त्वाचे कारण म्हणजे उसाला एकरकमी १६०० ते १८०० रुपये दर घेऊन शेतकरी गप्प बसत आहेत. या शेतकऱ्यांना दुसरा हप्ता देण्याची गरज नसल्यामुळे कारखानदार काटापेमेंटचा ऊस उचलत आहेत. साखर कारखाने कमी दराचा ऊस उचलण्यास प्राधान्य देत असल्यामुळे कार्यक्षेत्रातील उसाला तुरे आले आहेत. जत, कवठेमहांकाळ, आटपाडी, खानापूर, तासगाव तालुक्यातील काही ऊस अठरा महिने झाला तरीही तो गाळपास गेला नाही. यामुळे ऊस वेळेत गाळपाला जाणार की नाही, याची शेतकऱ्यांना चिंता आहे. (प्रतिनिधी)