शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताने आमची शस्त्रास्त्रे, सैनिकी तळ उद्ध्वस्त केले, युद्धविरामानंतर शाहबाज शरीफ यांची कबुली
2
“भारताला युद्ध नको, पण...”; अजित डोवाल यांनी चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांना स्पष्टच सांगितले
3
पाकिस्तानकडून युद्धविरामाचं घोर उल्लंघन, भारताची संतप्त प्रतिक्रिया, दिला सक्त इशारा
4
Pakistan Ceasefire Violations : पाकिस्तानकडून जम्मूमध्ये गोळीबार, BSF जवान मोहम्मद इम्तियाज शहीद, सात जण जखमी
5
"पाकिस्तानी लोक 'ऑफिशियल भिकमंगे'..."; असदुद्दीन ओवेसींनी पाकड्यांची पार लक्तरं काढली!
6
Pakistan Violates Ceasefire: पाकिस्तानचं शेपूट वाकडंच!! चार तासांतच शस्त्रसंधीचे उल्लंघन; जम्मूमध्ये पुन्हा ड्रोन हल्ले, गोळीबार
7
"युद्धविरामाचं झालं काय? श्रीनगरमध्ये अनेक स्फोट’’, पाकिस्तानच्या आगळीकीनंतर ओमर अब्दुल्ला संतप्त 
8
India Pakistan Ceasefire: पाकिस्तानकडून ३.३५ वाजता फोन आला, अन्...; परराष्ट्र सचिवांनी सांगितलं नेमकं काय ठरलं! १२ तारीख महत्त्वाची
9
पाकिस्तानशी 'युद्धविराम' करण्याच्या निर्णयानंतर शरद पवार यांचे ट्विट, म्हणाले- "भारताने कधीच..."
10
सकाळपर्यंत डागली जात होती क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, अचानक संध्याकाळी युद्धविराम कसा झाला? मागच्या ४८ तासांत काय घडलं
11
पाकिस्तानसोबतच्या युद्धविरामावर असदुद्दीन ओवेसींनी उपस्थित केलं प्रश्नचिन्ह, सरकारला विचारले चार सवाल  
12
India Pakistan Ceasefire: युद्धविराम! देशासाठी सर्वात मोठी बातमी; भारत-पाकिस्तान संघर्षात सहमतीने तोडगा; दोन्हीकडून हल्ले बंद
13
"काँग्रेस पक्षाचा आणि देशाचा डीएनए एकच, काँग्रेस कधीही न संपणारा पक्ष’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास   
14
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांचा खरंच तुरुंगात मृत्यू झाला? जाणून घ्या काय आहे सत्य
15
पुढे धोका आहे! रात्री मोबाईलचा जास्त वापर करणं 'डेंजर'; शरीरातील 'हा' हार्मोन होतो कमी अन्...
16
India Pakistan Ceasefire: भारत-पाकिस्तान संघर्षात अखेर 'युद्धविराम', हल्ले पूर्ण थांबणार! सिंधू पाणी वाटप करारचं काय?
17
Operation Sindoor Live Updates: नागरोटा येथे लष्कराच्या तळावर गोळीबार, १ जवान जखमी
18
Vyomika Singh : कडक सॅल्यूट! "डॅडी, मम्मीला सांगू नका, ती मला जाऊ देणार नाही"; व्योमिका सिंह यांची संघर्षकथा
19
हृदयस्पर्शी! "पप्पा..."; ड्युटीवर जाणाऱ्या जवानाला लेकीने मारली मिठी, डोळे पाणावणारा Video
20
Act of War: 'यापुढे कुठलाही दहशतवादी हल्ला हा देशाविरोधातील युद्ध मानलं जाणार’, केंद्र सरकारचा मोठा निर्णय

ग्राहकांच्या तक्रारींनी ओलांडला पंधरा हजारी टप्पा

By admin | Updated: March 14, 2017 23:44 IST

राज्यातही डंका : प्रकरणांचा निपटारा करण्यातही मोठ्या शहरांच्या तुलनेत सांगली जिल्हा मंच आघाडीवर

अविनाश कोळी ल्ल सांगलीजिल्ह्यातील ग्राहकांमधील हक्काप्रती जागृतीचा आलेख वाढत असून, जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचाच्या स्थापनेपासून दाखल झालेल्या तक्रारींची संख्या आता पंधरा हजारावर गेली आहे. यातील १४ हजारावर तक्रारींचा निपटारा करण्यातही येथील मंचला यश मिळाले आहे. तक्रारींच्या बाबतीत आघाडीवर असलेल्या राज्यातील मोजक्याच जिल्ह्यांमध्ये सांगली जिल्ह्याचा समावेश झाला आहे. ग्राहक संरक्षण कायदा देशात दिनांक २४ डिसेंबर १९८६ रोजी लागू करण्यात आला. राज्य स्तरावर राज्य ग्राहक तक्रार निवारण आयोग व जिल्हास्तरावर ४० जिल्हा ग्राहक मंच कार्यान्वित आहेत. सांगलीचा मंच १९९0 ला कार्यान्वित झाला. राज्य ग्राहक तक्रार निवारण आयोगाच्या आकडेवारीनुसार जुलै २०१५ अखेर स्थापनेपासून दाखल झालेल्या एकूण तक्रारींमध्ये मुंबई उपनगर जिल्हा, ठाणे, पुणे, कोल्हापूर, सांगली, सोलापूर, जळगाव, अहमदनगर, औरंगाबाद यवतमाळ आणि नागपूर या जिल्ह्यांनीच दहा हजारी टप्पा ओलांडला होता. सांगली आजही तक्रारींच्या संख्येत आणि निपटारा करण्याच्या गतीत राज्यात आघाडीवर दिसत आहे. १९९0 पासून फेब्रुवारी २0१७ अखेर जिल्ह्यातील तक्रारींनी पंधरा हजाराचा टप्पा ओलांडला आहे. सध्यस्थितीत केवळ १ हजार ९९ प्रकरणे प्रलंबित आहेत. निपटारा करण्याची टक्केवारी ९३ टक्के इतकी आहे. जानेवारी २0१६ ते डिसेंबर २0१६ या कालावधित जिल्हा मंचाकडे एकूण २७९ तक्रारी दाखल झाल्या आहेत. तक्रारींच्या विवरणानुसार सध्या डॉक्टर, बिल्डर यांच्याबद्दलच्या तक्रारीही दाखल होत आहेत. सहकारी संस्था, पतसंस्था, बॅँकांबाबतच्या तक्रारींचे प्रमाण सांगली जिल्ह्यात सर्वाधिक आहे. यातील अनेक प्रकरणांचा निपटारा झाला आहे. इशाऱ्यानेही होतो फायदाअनेक ग्राहकांनी सेवेतील त्रुटीबद्दल, अतिरिक्त आर्थिक भुर्दंड बसल्याबद्दल ग्राहक मंचाकडे तक्रार करण्याचा इशारा दिल्यानंतरही संबंधित सेवा देणाऱ्या व्यक्ती आणि संस्थांनी ग्राहकांना सहकार्य केल्याची उदाहरणेही समोर येत आहेत. त्यामुळे जागृतीचा हासुद्धा फायदा आता ग्राहकांच्या पदरात पडत आहे. राज्यातील स्थिती जिल्हा मंचकडे स्थापनेपासून जुलै २०१५ पर्यंत दाखल झालेल्या आकेवारीत आघाडीवर असलेले जिल्हे पुढीलप्रमाणेमंच दाखल प्रकरणे निपटारा प्रलंबितनागपूर१८,९२४१६,९२३२00१पुण१७,१२९१५,७१५१,४१४मुंबई १५,७८३१३,७२५२0५८उपनगर जिल्हाठाणे १४,५0१११,३९६३,१0५कोल्हापूर१४,३८३१३,६७0७१६जळगाव १३,५७११२,१0४१,४६७सांगली१२,२५२११,७१४५३८औरंगाबाद१२,२0७११,९0८२९९