शहरं
Join us  
Trending Stories
1
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
2
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
3
मनसेनं मोर्चाची तारीख बदलली, राज ठाकरेंनी जारी केलं निवेदन, काय म्हणाले? जाणून घ्या...
4
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
5
"एनआरसी सारखे षड्‍यंत्र..."; बिहारमधील मतदार यादीवरून ममता बॅनर्जी यांचा निवडणूक आयोगाला टोला
6
'अमेरिकेच्या थोबाडीत मारली...', युद्धविराम जाहीर केल्यानंतर खामेनी यांनी केला विजयाचा दावा
7
..त्यामुळे हिंदी सक्तीचे नकोच; राज्य शासनाने हट्ट सोडावा, शरद पवार यांचा सल्ला 
8
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
9
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
10
इतिहास घडला! 'ड्रॅगन'मधून शुभांशु शुक्ला आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर पोहोचले, १४ दिवस करणार संशोधन
11
"हिंदी कुठल्याही भाषेची शत्रू नाही..."; भाषावादावर पुन्हा एकदा अमित शाह स्पष्ट बोलले
12
दोन दिग्गज एकत्र आले; अदानी-अंबानी यांच्यात मोठा करार, 'या' क्षेत्रात क्रांती घडणार...
13
"राज्यात मराठीच सक्तीची, पण..."; त्रिभाषा सूत्रावरून भाजपाने स्पष्ट केली भूमिका
14
काँग्रेस नेते शशी थरुर अचानक रशिया दौऱ्यावर; रशियन परराष्ट्र मंत्र्यांची घेतली भेट, कारण काय?
15
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
16
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत
17
२८ जुलैपर्यंत मंगळ राहु-केतु अशुभ योग: ८ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; शुभ-कल्याणाचा काळ!
18
कुठल्याही वादापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज ठाकरेंचे संकेत; ६ जुलैला ठाकरे बंधू एकत्र येणार?
19
मुख्यमंत्री फडणवीसांनी समज देऊ म्हणताच लोणीकर म्हणाले, "मी हजारवेळा माफी मागेल, पण..."
20
रिलायन्स-एअरटेलचा नवा रेकॉर्ड, सेन्सेक्स १००० अंकांनी वधारला, ‘या’ शेअर्सनी घेतली मोठी उसळी!

दर घसरल्याने बेदाणा उत्पादक हवालदिल

By admin | Updated: December 24, 2015 00:39 IST

नवीन हंगाम तोंडावर : सध्याचा ८० ते १३५ रुपये दर न परवडणारा

गजानन पाटील- संख -बाजारात आवक मोठ्या प्रमाणात झाल्याने बेदाण्याचा दर कमालीचा घसरला आहे. कोल्ड स्टोअरेजचे भाडे, प्रक्रिया करण्याचा खर्च वजा जाता, द्राक्ष उत्पादक शेतकऱ्याच्या पदरात काहीच पडत नाही. त्यामुळे जत तालुक्यातील द्राक्ष उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. दुष्काळी परिस्थिती, त्यात द्राक्ष हंगामाचा खर्च यामुळे मार्च महिन्यात कोल्ड स्टोअरेजमध्ये ठेवलेला बेदाणा विकण्याशिवाय पर्याय राहिला नसल्याने, द्राक्ष उत्पादक व बेदाणा शेतकरी अडचणीत सापडला आहे. सध्या ८० ते १३५ रुपये प्रति किलो भाव आहे. जत तालुक्यातील दुष्काळी परिस्थितीमुळे बेजार झालेला द्राक्ष उत्पादक शेतकरी कमी भाव असूनही बेदाणा उत्पादक शेतकऱ्यावर कमी भावाने बेदाणा विकण्याची वेळ आली आहे. त्यामुळे तालुक्यातील शेतकरी दुष्काळाने बेजार झाला असल्याने चिंताग्रस्त बनला आहे. तालुक्यामध्ये ५ हजार ६६० हेक्टर क्षेत्रावर द्राक्षबागा आहेत. प्रतिकूल परिस्थितीत तंत्रज्ञानाचा वापर करीत उजाड माळरानावर बागा उभ्या केल्या आहेत. पाण्याचा काटकसरीने वापर करीत ठिबक सिंचनचा वापर करीत बागा उभा केल्या आहेत. मडकी सिंचनाच्या साहाय्याने बागा लावल्या आहेत. तसेच कृषी विभागाच्या अनुदानावर व स्थत: शेततळी बांधली आहेत. पाण्याचा नियोजनबध्द वापर करुन दर्जेदार द्राक्षांचे उत्पादन घेतले जाते. शरद सोनाक्का, माणिक चमन, सुपर सोनाक्का, थॉमसन आदी जातीच्या बागा आहेत. विहिरीतील काळ्या दगडातील गोड पाणी असल्याने दर्जेदार सुट्या बेदाण्याची निर्मिती केली जात आहे.गेल्यावर्षी पाणीटंचाई, दुष्काळी परिस्थिती असतानासुध्दा शेतकऱ्यांनी कूपनलिका, विहिरीतील उपलब्ध पाणीसाठा तसेच टँकरद्वारे बागा जगविल्या आहेत. काही बागांना खोड जगविण्याएवढेही पाणी मिळाले नाही. परंतु शेतकऱ्यांनी बागा महत्प्रयासाने जगवून फळ आणले आहे. पण प्रतिकूलहवामानामुळे प्रारंभापासूनच दावण्या रोगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात झाला. औषधांवर मोठा खर्च झाला होता. पाण्याच्या कमतरतेमुळे काड्या मध्यम प्रमाणात तयार झाल्या. पाण्याअभावी खतांची मात्रा कमी पडल्यामुळे फळ मोठे होण्यास, मण्यांचा आकार वाढण्यास, मणी फुगण्यास अनुकूल स्थिती लाभली नाही. त्यामुळे द्राक्षघड आणि मणी लहान तयार झाले. अवकाळी पावसामुळे काढणीसाठी परिपक्व झालेल्या द्राक्षात आलेली साखर कमी झाली. बेदाणा चपटा झाला होता. बेदाण्याचा उतारा कमी झाला होता. बेदाण्याचा उतारा कमी झाला होता.असे असतानाही द्राक्ष बागायतदारांनी बाजारात विक्रीसाठी न आणता पुढे जास्त भाव मिळेल, या उद्देशाने कोल्ड स्टोअरेजमध्ये माल वॉशिंग, त्याची प्रतवारी करून ठेवला. यावर हजारो रुपये खर्च केला होता.मार्च-एप्रिल महिन्यामध्ये चांगला दर्जेदार बेदाणा २२५ ते २५५ रुपये, तर दोन नंबर बेदाण्यास १६० ते २२५ रुपये भाव होता. परंतु २०१४ मध्ये बेदाण्याला उच्चांकी भाव मिळाला होता. त्यावेळी २७५ ते ३५० रुपये इतका भाव मिळाला होता. त्यामुळे याहीवर्षी भाव मिळेल, या आशेवर शेतकऱ्यांनी कोल्ड स्टोअरेजमध्ये माल ठेवला आहे. सुरुवातीला चांगला भाव होता; पण सध्या मोठी घसरण झाली आहे. कोल्ड स्टोअरेजचा दहा महिन्यांचा खर्च, वॉशिंग, प्रतवारीचा खर्च, बेदाणा निर्मितीचा खर्च, औषधे, खते, मशागतीचा खर्च वजा जाता, सध्याचा दर अजिबात परवडत नाही. परंतु द्राक्ष हंगामाचा खर्च करण्यासाठी बेदाणा विकण्याशिवाय पर्याय नाही. शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे. - कामाण्णा पाटील, बेदाणा उत्पादक शेतकरी