शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदीचे दोन्ही जीआर रद्द, त्रिभाषा सूत्राचा निर्णय घेण्यासाठी नवी समिती स्थापन
2
Today's Horoscope: आर्थिक बाबतीत मात्र सावध राहावे लागेल, काय सांगतेय तुमची राशी? 
3
गुंतवणुकीसाठी सुवर्णसंधी ! बाजारात ७ आयपीओ होणार खुले; योग्य कंपनी निवडल्यास होऊ शकतो फायदा
4
भाजपच्या नव्या अध्यक्षांची निवड लवकरच; प्रधान आघाडीवर, पावसाळी अधिवेशनापूर्वी प्रक्रिया होऊ शकते पूर्ण
5
राज्य सरकारला घेरण्याची विरोधी पक्षांची रणनीती; मविआचा सरकारच्या चहा पानावर बहिष्कार, जनतेला वाऱ्यावर सोडले
6
प्रशासकीय सीमा ३१ डिसेंबरला होणार ‘फ्रीझ’, जनगणना : नंतर होणार नाही नवे गाव, जिल्हा, महापालिका
7
विकले जात राहणे हेच पाकिस्तानचे नशीब
8
अधिवेशनाकडून अपेक्षा; विरोधक हिंदीच्या मुद्द्यावरून अधिवेशनापूर्वीच एकवटले
9
कार्ला येथील एकवीरा मंदिरात ड्रेसकोड; ७ जुलैपासून नव्या नियमांची अंमलबजावणी
10
लुटालुटीला आरटीओची मूक संमती? अधिकृत रिक्षा स्टॅंडवर दरपत्रकच नाही; कल्याण आरटीओ क्षेत्रातील वास्तव
11
मुंबई काँग्रेसबद्दल दिल्लीत आज काही निर्णय होईल का?
12
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
13
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
14
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
15
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
16
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
17
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
18
...म्हणून मराठी माणूस मुंबईत राहू शकत नाही !
19
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
20
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग

बेदाणा उत्पादन कमालीचे घटले

By admin | Updated: April 16, 2016 00:20 IST

उतारा कमी : जत तालुक्यात परिस्थिती गंभीर

गजानन पाटील -- संख -दुष्काळी परिस्थिती, अवकाळी पाऊस, तसेच खत व पाण्याच्या योग्य मात्रेच्या अभावामुळे जत तालुक्यातील बेदाण्यात मोठ्या प्रमाणात फोलपटे तयार झाली आहेत. उत्पादनात कमालीची घट झाली आहे. बेदाण्याला बाजारात चांगला दर असूनही त्याचा फायदा शेतकऱ्यांना होत नाही. अवकाळी पावसामुळे काही भागातील द्राक्षातील साखर कमी झाल्यामुळे बेदाण्याचा प्रतिएकरी उताराही कमी झाला आहे. त्यामुळे द्राक्ष उत्पादक शेतकरी अडचणीत सापडला आहे.पाणीटंचाई असूनही जत पूर्व भागात द्राक्षबागांची संख्या अधिक आहे. गतवर्षी १९७२ पेक्षा गंभीर दुष्काळी परिस्थिती असतानासुद्धा, शेतकऱ्यांनी कूपनलिका, विहिरीतील उपलब्ध पाणीसाठा तसेच टँकरद्वारे पाणी आणून बागा जगविल्या आहेत. तसेच काही बागांना खोड जगविण्यासाठीही पाणी मिळाले नाही. परंतु ज्या शेतकऱ्यांना थोडे फार पाणी उपलब्ध होते, त्यांनी बागा महत्प्रयासाने जगविल्या. शेतकऱ्यांना उमदी परिसरामध्ये टँकरने पाणी पुरवठा करुन बागा आणल्या आहेत. टँकरसाठी लाखो रुपये खर्च केले आहेत. प्रतिकूल हवामानामुळे प्रारंभापासूनच दावण्या, भुरी, रोगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात झाला. पाण्याच्या कमतरतेमुळे काड्या मध्यम प्रमाणात तयार झाल्या. खरड छाटण्या उशिरा झाल्या होत्या. पाण्याअभावी खताची मात्रा कमी पडल्यामुळे फळ मोठे होण्यास, मण्यांचा आकार वाढविण्यास, मणी फुगविण्यास अनुकूल स्थिती लाभली नाही. त्यामुळे द्राक्षघड, मणी लहान तयार झाले.आलेली साखरही अवकाळी पावसामुळे कमी झाली. बेदाणा चपटा झाला. चार ते साडेचार किलो द्राक्षातून एक किलो बेदाणा तयार झाला आहे. बेदाण्याचा उतारा कमी झाला. वातावरणातील बदलामुळे बेदाणा दर्जेदार झाला नाही. काळपट बेदाणा तयार झाला. वजनातही कमालीची घट झाली. बेदाण्याचा उतारा एकरी दोन टनाऐवजी दीड लाखापेक्षाही कमी झाला आहे.द्राक्षाला बाजारात म्हणावा तसा भाव मिळत नसल्यामुळे उत्पादक शेतकरी बेदाणा निर्मितीकडे वळला आहे. अनुकूल हवामान, खडकाळ जमीन यामुळे शेतकऱ्यांनी स्वत:ची बेदाणा शेड उभी केली आहेत. सध्या बाजारात बेदाण्याला १३० ते १९० रुपये प्रति किलो भाव मिळत आहे. परंतु कमी पाण्यामुळे दर्जेदार बेदाणा तयार झालेला नाही. यावर्षी द्राक्षांवर बागायतदारांनी मोठा खर्च केला आहे. बँक, सोसायटी, सावकारांकडून काढलेल्या कर्जाची परतफेड कशी होणार? हा प्रश्न आहे.अवकाळीने नुकसान : मदतीची मागणीबेदाण्यासाठी द्राक्षाचा कालावधी १२० दिवस पूर्ण होणे गरजेचे आहे. मण्यामध्ये साखरेचे प्रमाण २४ ते २८ इतके असावे लागते. दिवस पूर्ण झाले तरच साखरेचे प्रमाण वाढते. वाढते तापमान, कमी झालेला पाऊस यामुळे कूपनलिका, विहिरीतील पाणी कमी झाले. कमी पाण्यामुळे द्राक्षे लवकर बेदाण्यासाठी शेडवर टाकावी लागली. याचाही परिणाम बेदाणा उत्पादनावर झाला आहे. अवकाळी पाऊस, दुष्काळी परिस्थिती यामुळे द्राक्ष उत्पादनात घट झाली आहे. मणी, घड गळून पडले आहेत. साखरेचे प्रमाण कमी झाल्याने बेदाणा चपटा झाला. शासनाने द्राक्षबागेवरील कर्जे, वीज बिल माफ करावे, अशी आमची मागणी आहे, असे द्राक्षबागायतदार विलास कुंडलिक शिंदे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.