शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

बेदाणा उत्पादन कमालीचे घटले

By admin | Updated: April 16, 2016 00:20 IST

उतारा कमी : जत तालुक्यात परिस्थिती गंभीर

गजानन पाटील -- संख -दुष्काळी परिस्थिती, अवकाळी पाऊस, तसेच खत व पाण्याच्या योग्य मात्रेच्या अभावामुळे जत तालुक्यातील बेदाण्यात मोठ्या प्रमाणात फोलपटे तयार झाली आहेत. उत्पादनात कमालीची घट झाली आहे. बेदाण्याला बाजारात चांगला दर असूनही त्याचा फायदा शेतकऱ्यांना होत नाही. अवकाळी पावसामुळे काही भागातील द्राक्षातील साखर कमी झाल्यामुळे बेदाण्याचा प्रतिएकरी उताराही कमी झाला आहे. त्यामुळे द्राक्ष उत्पादक शेतकरी अडचणीत सापडला आहे.पाणीटंचाई असूनही जत पूर्व भागात द्राक्षबागांची संख्या अधिक आहे. गतवर्षी १९७२ पेक्षा गंभीर दुष्काळी परिस्थिती असतानासुद्धा, शेतकऱ्यांनी कूपनलिका, विहिरीतील उपलब्ध पाणीसाठा तसेच टँकरद्वारे पाणी आणून बागा जगविल्या आहेत. तसेच काही बागांना खोड जगविण्यासाठीही पाणी मिळाले नाही. परंतु ज्या शेतकऱ्यांना थोडे फार पाणी उपलब्ध होते, त्यांनी बागा महत्प्रयासाने जगविल्या. शेतकऱ्यांना उमदी परिसरामध्ये टँकरने पाणी पुरवठा करुन बागा आणल्या आहेत. टँकरसाठी लाखो रुपये खर्च केले आहेत. प्रतिकूल हवामानामुळे प्रारंभापासूनच दावण्या, भुरी, रोगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात झाला. पाण्याच्या कमतरतेमुळे काड्या मध्यम प्रमाणात तयार झाल्या. खरड छाटण्या उशिरा झाल्या होत्या. पाण्याअभावी खताची मात्रा कमी पडल्यामुळे फळ मोठे होण्यास, मण्यांचा आकार वाढविण्यास, मणी फुगविण्यास अनुकूल स्थिती लाभली नाही. त्यामुळे द्राक्षघड, मणी लहान तयार झाले.आलेली साखरही अवकाळी पावसामुळे कमी झाली. बेदाणा चपटा झाला. चार ते साडेचार किलो द्राक्षातून एक किलो बेदाणा तयार झाला आहे. बेदाण्याचा उतारा कमी झाला. वातावरणातील बदलामुळे बेदाणा दर्जेदार झाला नाही. काळपट बेदाणा तयार झाला. वजनातही कमालीची घट झाली. बेदाण्याचा उतारा एकरी दोन टनाऐवजी दीड लाखापेक्षाही कमी झाला आहे.द्राक्षाला बाजारात म्हणावा तसा भाव मिळत नसल्यामुळे उत्पादक शेतकरी बेदाणा निर्मितीकडे वळला आहे. अनुकूल हवामान, खडकाळ जमीन यामुळे शेतकऱ्यांनी स्वत:ची बेदाणा शेड उभी केली आहेत. सध्या बाजारात बेदाण्याला १३० ते १९० रुपये प्रति किलो भाव मिळत आहे. परंतु कमी पाण्यामुळे दर्जेदार बेदाणा तयार झालेला नाही. यावर्षी द्राक्षांवर बागायतदारांनी मोठा खर्च केला आहे. बँक, सोसायटी, सावकारांकडून काढलेल्या कर्जाची परतफेड कशी होणार? हा प्रश्न आहे.अवकाळीने नुकसान : मदतीची मागणीबेदाण्यासाठी द्राक्षाचा कालावधी १२० दिवस पूर्ण होणे गरजेचे आहे. मण्यामध्ये साखरेचे प्रमाण २४ ते २८ इतके असावे लागते. दिवस पूर्ण झाले तरच साखरेचे प्रमाण वाढते. वाढते तापमान, कमी झालेला पाऊस यामुळे कूपनलिका, विहिरीतील पाणी कमी झाले. कमी पाण्यामुळे द्राक्षे लवकर बेदाण्यासाठी शेडवर टाकावी लागली. याचाही परिणाम बेदाणा उत्पादनावर झाला आहे. अवकाळी पाऊस, दुष्काळी परिस्थिती यामुळे द्राक्ष उत्पादनात घट झाली आहे. मणी, घड गळून पडले आहेत. साखरेचे प्रमाण कमी झाल्याने बेदाणा चपटा झाला. शासनाने द्राक्षबागेवरील कर्जे, वीज बिल माफ करावे, अशी आमची मागणी आहे, असे द्राक्षबागायतदार विलास कुंडलिक शिंदे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.