शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
4
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
5
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
6
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
7
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
8
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
9
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
10
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
11
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
12
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
13
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
14
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
15
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या
16
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
17
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
18
नाशिक: मुलासोबत ट्रेकिंगला गेले अन् पांडव लेणीच्या डोंगरावर अडकले; नंतर...
19
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
20
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!

‘म्हैैसाळ’च्या लाभक्षेत्रात पिकांना फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2018 00:53 IST

योजनेचे आवर्तन रखडले : वीजबिल भरण्यास शेतकºयांचा प्रतिसाद नसल्याने परिणामलोकमत न्यूज नेटवर्कमिरज : ताकारी, टेंभू योजनेचे आवर्तन सुरू झाले; मात्र वसुलीस प्रतिसाद नसल्याने म्हैसाळ योजनेचे पंप अद्याप बंदच आहेत. म्हैसाळचे आवर्तन सुरू करण्यासाठी ३४ कोटी थकीत वीजबिलाचा अडथळा आहे. म्हैसाळच्या लाभक्षेत्रातील शेतकºयांचा वीजबिल भरण्यासाठी प्रतिसाद नसल्याने आवर्तन रखडण्याची चिन्हे आहेत.द्राक्षांच्या ...

योजनेचे आवर्तन रखडले : वीजबिल भरण्यास शेतकºयांचा प्रतिसाद नसल्याने परिणामलोकमत न्यूज नेटवर्कमिरज : ताकारी, टेंभू योजनेचे आवर्तन सुरू झाले; मात्र वसुलीस प्रतिसाद नसल्याने म्हैसाळ योजनेचे पंप अद्याप बंदच आहेत. म्हैसाळचे आवर्तन सुरू करण्यासाठी ३४ कोटी थकीत वीजबिलाचा अडथळा आहे. म्हैसाळच्या लाभक्षेत्रातील शेतकºयांचा वीजबिल भरण्यासाठी प्रतिसाद नसल्याने आवर्तन रखडण्याची चिन्हे आहेत.द्राक्षांच्या छाटण्या व ऊस पिकाला पाणीटंचाई जाणवू लागल्याने जानेवारीपासून म्हैसाळचे आवर्तन सुरू करण्याची शेतकºयांची मागणी होती. थकीत वीजबिलाची रक्कम जमा नसल्याने म्हैसाळचे आवर्तन रखडले आहे. वीजबिलाचे ३४ कोटी थकीत असल्याने योजनेचा विद्युत पुरवठा खंडित आहे. म्हैसाळच्या आवर्तनासाठी यापैकी ५० टक्के थकीत वीजबिल भरावे लागणार आहे. टंचाई निधीतून साडेपाच कोटी रुपये मिळणार असून, उर्वरीत साडेबारा कोटी रुपये जमा करण्यासाठी पाणीपट्टी वसुली मोहीम सुरू आहे. मात्र प्रतिसाद नसल्याने म्हैसाळचे मार्च महिन्यातही आवर्तन सुरू झालेले नाही. ताकारी योजना सुरू करण्यासाठी साखर कारखान्यांनी पाणीपट्टी भरली आहे. मात्र म्हैसाळच्या आवर्तनासाठी शेतकºयांना रक्कम भरावी लागणार आहे. योजनेचे आवर्तन रखडल्याने बागायती पिकांना फटका बसणार आहे.शेतकºयांत संभ्रममाजी मंत्री अजितराव घोरपडे यांनी मिरज पूर्व भागातील शेतकºयांच्या बैठका घेऊन एकरी दोन हजार रुपये पाणीपट्टी भरण्याचे आवाहन केले आहे. मात्र त्यास प्रतिसाद नसल्याने केवळ १० लाख रुपये जमा झाले आहेत. योजनेचे ३० हजार एकर लाभक्षेत्र असून, एकरी दोन हजार रुपये जमा झाले तरीही आवर्तन सुरू होईल, असे योजनेच्या अधिकाºयांनी सांगितले. मात्र विजेची थकबाकी शासनाने माफ करावी, या मागणीसाठी काँग्रेस व राष्टÑवादी काँग्रेसने आंदोलनाचा पवित्रा घेतल्याने शेतकरी संभ्रमात आहेत.भविष्यात फायदा...दोन वर्षापूर्वी टंचाई परिस्थितीमुळे मिरज, सांगली व कवठेमहांकाळ येथील साखर कारखान्यांनी तीन कोटी रुपये व शेतकºयांनी ३० लाख रुपये जमा केल्यामुळे म्हैसाळ योजनेचे पंप सुरू झाले होते. दोन टप्प्यात १६० दिवस तब्बल आठ टीएमसी पाण्याचा उपसा करून मिरज, कवठेमहांकाळ व जत तालुक्यात शेती व पिण्यासाठी पाणी पुरवठा करण्यात आला होता. मात्र त्यानंतर म्हैसाळच्या लाभक्षेत्रातील कारखान्यांनी पाणीपट्टी भरण्यासाठी प्रतिसाद मिळालेला नाही. सिंचन योजनांसाठी ८०-२० या नवीन योजनेप्रमाणे यापुढे शेतकºयांना २० टक्के वीजबिलाची रक्कम भरावी लागणार आहे. मात्र म्हैसाळ योजनेच्या थकीत वीजबिलाच्या समस्येमुळे आवर्तन अद्याप सुरू झालेले नाही.