शहरं
Join us  
Trending Stories
1
इकडे विरोधक टीका करतायत; तिकडे आफ्रिकेचा निवडणूक आयोग पारदर्शक प्रणाली पाहण्यासाठी खासदारांना पाठविणार
2
बिहारमध्ये राडा! उपमुख्यमंत्र्यांच्या ताफ्यावर हल्ला; दुसरीकडे सीपीएम आमदाराला मारहाण, गाडी फोडली
3
Ravi Shastri On Shubman Gill : शुभमन गिल आधीच होतोय ट्रोल, त्यात शास्त्रींच्या कमेंटची भर, म्हणाले...
4
सैनिकी शाळेत १२ वर्षीय मुलाचा गूढ मृत्यू,'त्या' बंद दारामागे काय घडले?; बहिणीचा गंभीर आरोप
5
सोशल मीडियाच्या ट्रॉलिंगचा बळी; माफी मागितली तरी छळ थांबेना, तरुणाने अखेर जीवन संपवले
6
"14 तारखेला 11 वाजेपर्यंत लालू अँड कंपनीचा..."; अमित शाह स्पष्टच बोलले, घुसखोरांसंदर्भात काय म्हणाले?
7
Anil Ambani ED: अनिल अंबानींची पुन्हा चौकशी होणार, ED नं १४ नोव्हेंबरला बोलावलं; प्रकरण काय?
8
विजय देवराकोंडा-रश्मिका मंदाना 'या' महिन्यात लग्न करणार? काही दिवसांपूर्वीच झालेला साखरपुडा
9
बायकोला ब्रेन ट्युमर, नवऱ्याने मृत्यूच्या दारातून परत आणलं; मराठी रीलस्टार कपलच्या रिअल लाइफ स्टोरीवर येतोय साऊथ मुव्ही
10
भाजप कार्यकर्त्याने आधी दिल्लीत नंतर बिहारमध्ये मतदान केले; राहुल गांधींनंतर आप नेत्याने आरोप केला
11
Canada Visa Rules : कॅनडाने व्हिसा नियमांमध्ये केला मोठा बदल, भारतावर काय परिणाम होईल?
12
SBI नं रचला इतिहास, मार्केट कॅप १०० अब्ज डॉलर्सच्या पार; देशातील दिग्गजांच्या यादीत सामील
13
"माझ्या पप्पांना अडकवण्यात आलंय"; वडील जेलमध्ये, लेकीने अभ्यास सोडून केला प्रचार
14
Jara Hatke: चांदीचा वर्ख कसा तयार होतो माहितीय? वर्ख लावलेली मिठाई खावी की नाही? तुम्हीच ठरवा!
15
सोन्याकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलायला हवा? SBI ची मोठी मागणी, म्हणाले घरांमध्ये पडून असलेलं सोनं..
16
मोठी बातमी! पार्थ पवार जमीन व्यवहार प्रकरणी तहसीलदार सूर्यकांत येवले निलंबित
17
बिहार निवडणूक 2025: व्होटर स्लीपशिवाय मतदान नाही! सकाळी ६.३० वाजल्यापासून रांगेत असलेल्या महिलांना रोखले
18
चारित्र्यावर संशय! रस्त्यात दुसऱ्या तरुणासोबत बोलली म्हणून संतापलेल्या पतीने ब्लेडने कापले पत्नीचे नाक
19
याला म्हणतात ऑफर...! Tata च्या इलेक्ट्रिक कारवर ₹1.30 लाखांपर्यंतची सूट, Curvv EV अन् Punch EV वर मोठा डिस्काउंट
20
तो प्रवास ठरला अखेरचा..; प्रसिद्ध ट्रॅव्हल इन्फ्लुएंसर अनुनय सूदचे 32व्या वर्षी निधन

‘म्हैैसाळ’च्या लाभक्षेत्रात पिकांना फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2018 00:53 IST

योजनेचे आवर्तन रखडले : वीजबिल भरण्यास शेतकºयांचा प्रतिसाद नसल्याने परिणामलोकमत न्यूज नेटवर्कमिरज : ताकारी, टेंभू योजनेचे आवर्तन सुरू झाले; मात्र वसुलीस प्रतिसाद नसल्याने म्हैसाळ योजनेचे पंप अद्याप बंदच आहेत. म्हैसाळचे आवर्तन सुरू करण्यासाठी ३४ कोटी थकीत वीजबिलाचा अडथळा आहे. म्हैसाळच्या लाभक्षेत्रातील शेतकºयांचा वीजबिल भरण्यासाठी प्रतिसाद नसल्याने आवर्तन रखडण्याची चिन्हे आहेत.द्राक्षांच्या ...

योजनेचे आवर्तन रखडले : वीजबिल भरण्यास शेतकºयांचा प्रतिसाद नसल्याने परिणामलोकमत न्यूज नेटवर्कमिरज : ताकारी, टेंभू योजनेचे आवर्तन सुरू झाले; मात्र वसुलीस प्रतिसाद नसल्याने म्हैसाळ योजनेचे पंप अद्याप बंदच आहेत. म्हैसाळचे आवर्तन सुरू करण्यासाठी ३४ कोटी थकीत वीजबिलाचा अडथळा आहे. म्हैसाळच्या लाभक्षेत्रातील शेतकºयांचा वीजबिल भरण्यासाठी प्रतिसाद नसल्याने आवर्तन रखडण्याची चिन्हे आहेत.द्राक्षांच्या छाटण्या व ऊस पिकाला पाणीटंचाई जाणवू लागल्याने जानेवारीपासून म्हैसाळचे आवर्तन सुरू करण्याची शेतकºयांची मागणी होती. थकीत वीजबिलाची रक्कम जमा नसल्याने म्हैसाळचे आवर्तन रखडले आहे. वीजबिलाचे ३४ कोटी थकीत असल्याने योजनेचा विद्युत पुरवठा खंडित आहे. म्हैसाळच्या आवर्तनासाठी यापैकी ५० टक्के थकीत वीजबिल भरावे लागणार आहे. टंचाई निधीतून साडेपाच कोटी रुपये मिळणार असून, उर्वरीत साडेबारा कोटी रुपये जमा करण्यासाठी पाणीपट्टी वसुली मोहीम सुरू आहे. मात्र प्रतिसाद नसल्याने म्हैसाळचे मार्च महिन्यातही आवर्तन सुरू झालेले नाही. ताकारी योजना सुरू करण्यासाठी साखर कारखान्यांनी पाणीपट्टी भरली आहे. मात्र म्हैसाळच्या आवर्तनासाठी शेतकºयांना रक्कम भरावी लागणार आहे. योजनेचे आवर्तन रखडल्याने बागायती पिकांना फटका बसणार आहे.शेतकºयांत संभ्रममाजी मंत्री अजितराव घोरपडे यांनी मिरज पूर्व भागातील शेतकºयांच्या बैठका घेऊन एकरी दोन हजार रुपये पाणीपट्टी भरण्याचे आवाहन केले आहे. मात्र त्यास प्रतिसाद नसल्याने केवळ १० लाख रुपये जमा झाले आहेत. योजनेचे ३० हजार एकर लाभक्षेत्र असून, एकरी दोन हजार रुपये जमा झाले तरीही आवर्तन सुरू होईल, असे योजनेच्या अधिकाºयांनी सांगितले. मात्र विजेची थकबाकी शासनाने माफ करावी, या मागणीसाठी काँग्रेस व राष्टÑवादी काँग्रेसने आंदोलनाचा पवित्रा घेतल्याने शेतकरी संभ्रमात आहेत.भविष्यात फायदा...दोन वर्षापूर्वी टंचाई परिस्थितीमुळे मिरज, सांगली व कवठेमहांकाळ येथील साखर कारखान्यांनी तीन कोटी रुपये व शेतकºयांनी ३० लाख रुपये जमा केल्यामुळे म्हैसाळ योजनेचे पंप सुरू झाले होते. दोन टप्प्यात १६० दिवस तब्बल आठ टीएमसी पाण्याचा उपसा करून मिरज, कवठेमहांकाळ व जत तालुक्यात शेती व पिण्यासाठी पाणी पुरवठा करण्यात आला होता. मात्र त्यानंतर म्हैसाळच्या लाभक्षेत्रातील कारखान्यांनी पाणीपट्टी भरण्यासाठी प्रतिसाद मिळालेला नाही. सिंचन योजनांसाठी ८०-२० या नवीन योजनेप्रमाणे यापुढे शेतकºयांना २० टक्के वीजबिलाची रक्कम भरावी लागणार आहे. मात्र म्हैसाळ योजनेच्या थकीत वीजबिलाच्या समस्येमुळे आवर्तन अद्याप सुरू झालेले नाही.