शहरं
Join us  
Trending Stories
1
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
2
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
3
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
4
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
5
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
6
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
7
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
8
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
9
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
10
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
11
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
12
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
13
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
14
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
15
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
16
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
17
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
18
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
19
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
20
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?

‘म्हैैसाळ’च्या लाभक्षेत्रात पिकांना फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2018 00:53 IST

योजनेचे आवर्तन रखडले : वीजबिल भरण्यास शेतकºयांचा प्रतिसाद नसल्याने परिणामलोकमत न्यूज नेटवर्कमिरज : ताकारी, टेंभू योजनेचे आवर्तन सुरू झाले; मात्र वसुलीस प्रतिसाद नसल्याने म्हैसाळ योजनेचे पंप अद्याप बंदच आहेत. म्हैसाळचे आवर्तन सुरू करण्यासाठी ३४ कोटी थकीत वीजबिलाचा अडथळा आहे. म्हैसाळच्या लाभक्षेत्रातील शेतकºयांचा वीजबिल भरण्यासाठी प्रतिसाद नसल्याने आवर्तन रखडण्याची चिन्हे आहेत.द्राक्षांच्या ...

योजनेचे आवर्तन रखडले : वीजबिल भरण्यास शेतकºयांचा प्रतिसाद नसल्याने परिणामलोकमत न्यूज नेटवर्कमिरज : ताकारी, टेंभू योजनेचे आवर्तन सुरू झाले; मात्र वसुलीस प्रतिसाद नसल्याने म्हैसाळ योजनेचे पंप अद्याप बंदच आहेत. म्हैसाळचे आवर्तन सुरू करण्यासाठी ३४ कोटी थकीत वीजबिलाचा अडथळा आहे. म्हैसाळच्या लाभक्षेत्रातील शेतकºयांचा वीजबिल भरण्यासाठी प्रतिसाद नसल्याने आवर्तन रखडण्याची चिन्हे आहेत.द्राक्षांच्या छाटण्या व ऊस पिकाला पाणीटंचाई जाणवू लागल्याने जानेवारीपासून म्हैसाळचे आवर्तन सुरू करण्याची शेतकºयांची मागणी होती. थकीत वीजबिलाची रक्कम जमा नसल्याने म्हैसाळचे आवर्तन रखडले आहे. वीजबिलाचे ३४ कोटी थकीत असल्याने योजनेचा विद्युत पुरवठा खंडित आहे. म्हैसाळच्या आवर्तनासाठी यापैकी ५० टक्के थकीत वीजबिल भरावे लागणार आहे. टंचाई निधीतून साडेपाच कोटी रुपये मिळणार असून, उर्वरीत साडेबारा कोटी रुपये जमा करण्यासाठी पाणीपट्टी वसुली मोहीम सुरू आहे. मात्र प्रतिसाद नसल्याने म्हैसाळचे मार्च महिन्यातही आवर्तन सुरू झालेले नाही. ताकारी योजना सुरू करण्यासाठी साखर कारखान्यांनी पाणीपट्टी भरली आहे. मात्र म्हैसाळच्या आवर्तनासाठी शेतकºयांना रक्कम भरावी लागणार आहे. योजनेचे आवर्तन रखडल्याने बागायती पिकांना फटका बसणार आहे.शेतकºयांत संभ्रममाजी मंत्री अजितराव घोरपडे यांनी मिरज पूर्व भागातील शेतकºयांच्या बैठका घेऊन एकरी दोन हजार रुपये पाणीपट्टी भरण्याचे आवाहन केले आहे. मात्र त्यास प्रतिसाद नसल्याने केवळ १० लाख रुपये जमा झाले आहेत. योजनेचे ३० हजार एकर लाभक्षेत्र असून, एकरी दोन हजार रुपये जमा झाले तरीही आवर्तन सुरू होईल, असे योजनेच्या अधिकाºयांनी सांगितले. मात्र विजेची थकबाकी शासनाने माफ करावी, या मागणीसाठी काँग्रेस व राष्टÑवादी काँग्रेसने आंदोलनाचा पवित्रा घेतल्याने शेतकरी संभ्रमात आहेत.भविष्यात फायदा...दोन वर्षापूर्वी टंचाई परिस्थितीमुळे मिरज, सांगली व कवठेमहांकाळ येथील साखर कारखान्यांनी तीन कोटी रुपये व शेतकºयांनी ३० लाख रुपये जमा केल्यामुळे म्हैसाळ योजनेचे पंप सुरू झाले होते. दोन टप्प्यात १६० दिवस तब्बल आठ टीएमसी पाण्याचा उपसा करून मिरज, कवठेमहांकाळ व जत तालुक्यात शेती व पिण्यासाठी पाणी पुरवठा करण्यात आला होता. मात्र त्यानंतर म्हैसाळच्या लाभक्षेत्रातील कारखान्यांनी पाणीपट्टी भरण्यासाठी प्रतिसाद मिळालेला नाही. सिंचन योजनांसाठी ८०-२० या नवीन योजनेप्रमाणे यापुढे शेतकºयांना २० टक्के वीजबिलाची रक्कम भरावी लागणार आहे. मात्र म्हैसाळ योजनेच्या थकीत वीजबिलाच्या समस्येमुळे आवर्तन अद्याप सुरू झालेले नाही.