शहरं
Join us  
Trending Stories
1
जगातील सर्वात आनंदी देश धोक्यात! रशियन सैन्याने तळ उभारले; युरोपमध्ये खळबळ, युक्रेननंतर..
2
ऑपरेशन सिंदूर: पाकमधील गुप्तहेरांकडून सिग्नल आला, भारतीय सैन्याने पाच दिवस आधीच हल्ला चढवला
3
कुटुंबासाठी पाकिस्तानला वाचवतायेत डोनाल्ड ट्रम्प?; पहलगाम हल्ल्यानंतर झाली मोठी डील
4
ब्लूस्मार्ट कंपनी बंद पडल्यानंतर 'क्लोज्ड लूप ई-वॉलेट' वादात? आबरबीआयकडून चौकशी; काय आहे प्रकरण?
5
Stock Market Today: शेअर बाजाराची फ्लॅट सुरुवात, नंतर Sensex-Nifty रेड झोनमध्ये; NBFC, फार्मा स्टॉक्समध्ये घसरण
6
अचानक बसला आग लागली, ५ जणांचा मृत्यू, काच फोडून चालक पळून गेला
7
IPL 2025 : बीसीसीआयनं लागू केला नवा नियम; लगेच 'अनसोल्ड' खेळाडूलाही मिळाला भाव, पण...
8
पाकिस्तानच्या किराना हिल्समध्ये रेडिएशन गळती? अणुऊर्जा संस्थेने सत्य सांगितले, अमेरिकेचे मौन
9
४ दिवसांच्या संघर्षात भारत ठरला वरचढ, पाकिस्तानला मोठं नुकसान; न्यूयॉर्क टाईम्सचा रिपोर्ट
10
भाजप-संघातील घटक नाराज; म्हणे, ‘ऑपरेशन सिंदूर’नंतरचा युद्धविराम ही तर चूक, शत्रुत्व थांबले
11
पाकिस्ताननंतर बांगलादेशनं IMF कडे पसरले हात, बुडत्या अर्थव्यवस्थेचं कारण देत 'इतक्या' पैशांची मागणी
12
आजचे राशीभविष्य १५ मे २०२५: आर्थिक लाभ संभवतात, दुपारनंंतर मात्र अनेकांचे नशीब बदलेल...
13
शूरवीरांचा देश आहे, असा संदेश पाकला देणे आवश्यक होते; RSSचे सुनील अंबेकर यांचे प्रतिपादन
14
कर्नल सोफियांवर टीका भोवली, मंत्री विजय शाहवर FIR; हायकोर्टाने फटकारले, रात्री गुन्हा दाखल
15
न्या. भूषण गवई देशाचे ५२वे सरन्यायाधीश; अनेक महत्त्वपूर्ण निर्णय देणाऱ्या पीठांमध्ये सहभाग
16
अनामिक भीती वाटते, अस्थिर मन शांत होत नाही? कळकळीने स्वामींना हाक मारा, ‘ही’ प्रार्थना कराच
17
ब्रह्मोस अण्वस्त्रांच्या डेपोवर आदळले असते तर काय झाले असते? किती मोठा स्फोट झाला असता?
18
महिला राफेल उडवू शकतात, तर लष्करात त्यांची संख्या मर्यादित का? सुप्रीम कोर्टाचा सरकारला सवाल
19
गरिबांच्या सेवेमुळे माझ्या मुलाला हे पद मिळाले; सरन्यायाधीश गवई यांच्या मातोश्री भावुक
20
२१ दिवसांत ३१ माओवादी यमसदनी; छत्तीसगड-तेलंगणा सीमेवर कारवाईला मोठे यश

चुकीच्या निर्णयामुळे गर्दीस निमंत्रण : समीर शहा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2021 15:00 IST

CoronaVirus Sangli : महापालिका व पालकमंत्र्यांनी वेगवेगळ्या लॉकडाऊनच्या घोषणा करुन संभ्रम वाढविला. कडक अंमलबजावणी करायची नव्हती तर मग चुकीच्या निर्णयातून गर्दीला निमंत्रण का दिले, असा सवाल व्यापारी एकता असोसिशनचे अध्यक्ष समीर शहा यांनी उपस्थित केला.

ठळक मुद्देचुकीच्या निर्णयामुळे गर्दीस निमंत्रण : समीर शहानियाजनशून्य उपक्रमात यापुढे सहभाग नाही

सांगली : महापालिका व पालकमंत्र्यांनी वेगवेगळ्या लॉकडाऊनच्या घोषणा करुन संभ्रम वाढविला. कडक अंमलबजावणी करायची नव्हती तर मग चुकीच्या निर्णयातून गर्दीला निमंत्रण का दिले, असा सवाल व्यापारी एकता असोसिशनचे अध्यक्ष समीर शहा यांनी उपस्थित केला.यासंदर्भात त्यांनी दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, ३ मे रोजी महापौरांनी असोसिएशनला बैठकीसाठी आमंत्रित केले होते. त्या बैठकीत अत्यावश्यक सेवेतील दुकाने सुरू असणाऱ्या असोसिएशनचे नेतेही हजर होते. महापौरांनी कडक लॉकडाऊनसाठी विनंती केली. त्याला असोसिएशनने सकारात्मकता दर्शविली. तेव्हा ५ ते ११ मे या आठ दिवसांच्या लॉकडाऊनचा निर्णय झाला होता.त्यानंतर लगेचच जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांनी सांगली जिल्हयात ६ मे पासून कडक लॉकडाऊनची घोषणा केली. दोन्हीही घोषणेत फक्त एक दिवस आणि ४ तासाचा अत्यावश्यक व्यवसायाचा फरक आहे. आम्ही प्रशासनास ही बाब विचारली आणि नेमक्या तारखेबाबत विचारणा केली. या गोंधळामुळे गर्दी झाली.त्यामुळे यापुढे अशा नियोजनशून्य उपक्रमात संघटना इथून पुढे सहभागी होणार नाही. गेले वर्षभर अखंड लॉकडाऊनमध्ये सुरूच असलेल्या दुकानांनी फक्त सकाळचे चार तासही दुकाने बंद ठेवली नाहीत. सोमवारी शहरात झालेली गर्दी ही कपडे, भांडी, सोने खरेदी करण्यासाठी नव्हती, तर ती अत्यावश्यक सेवेतील दुकानांमध्येच होती. याचे आत्मचिंतन व्हावे. कुठतरी एकवाक्यता ठेवण्यात प्रशासनाची चूक होत आहे. इथून पुढे आरोग्य आणि व्यवसाय दोन्हीची सांगड घालूच, पण इतर व्यापारी बांधवांवर होणारा अनावश्यक अन्याय सहन केला जाणार नाही, असा इशारा त्यांनी दिला. 

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याSangliसांगली