शहरं
Join us  
Trending Stories
1
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
2
कोपरगावजवळ भीषण अपघात; लक्झरी बसच्या धडकेत कार जळून खाक, चालकाचा जागीच मृत्यू
3
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
4
२०१५ ते २०२५.... संघ सक्रियतेनंतर बिहारमध्ये भाजपचा ‘ग्राफ’ वर!
5
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
6
कर्ज फेडण्यासाठी इंजिनिअरच्या मुलानेच रचले स्वतःच्या अपहरणाचे नाटक; ५० लाखांची खंडणी मागितली अन्... 
7
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
8
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
9
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
10
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
11
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
12
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
13
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
14
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
15
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
16
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
17
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
18
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
19
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
20
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
Daily Top 2Weekly Top 5

सांगलीतील ‘ओन्ली आज्या’ टोळीला अखेर मोक्का

By घनशाम नवाथे | Updated: June 14, 2024 19:56 IST

सुनील फुलारी यांची मंजुरी; टोळीवर खुनासह गंभीर गुन्हे

सांगली: वडर कॉलनीतील अश्विनकुमार मुळके याच्या खुनातील संशयित असलेल्या ‘ओन्ली आज्या’ टोळीतील सात जणांना विशेष पोलिस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी ‘मोक्का’ लावण्यास मंजुरी दिली.

टोळीप्रमुख अजय उर्फ अजित पांडुरंग खोत (वय २३, बाल हनुमान गल्ली), टोळी सदस्य विकी प्रशांत पवार (वय २३), कुणाल प्रशांत पवार (वय २२, वडर कॉलनी, उत्तर शिवाजीनगर), गणेश रामाप्पा ऐवळे (वय ३६, गोकुळनगर), सुजित दादासाहेब चंदनशिवे (वय २९, फायर स्टेशनसमोर, उत्तर शिवाजीनगर), अमोल गंगाप्पा कुंचीकोरवी (वय २८), अर्जुन हणमंत पवार (वय २२, रेल्वे स्टेशन रस्ता, वडर कॉलनी) या सात जणांच्या टोळीविरुद्ध खुनाबरोबर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम (मोक्का) नुसार वाढीव कलम लावण्यात आले आहे.

संशयित अजय ऊर्फ अजित खोत याने ‘ओन्ली आज्या’ नावाने टोळी बनवली होती. या टोळीने दि. १३ मार्च रोजी रात्री ११ च्या सुमारास नवीन वसाहत येथील गुरुद्वाराजवळ घरासमोर अश्विनकुमार मल्हारी मुळके (वय ३०, नवीन वसाहत, सांगली) याचा खून केला होता. त्या दिवशी संशयित विकी पवार हा तेथून दुचाकीवरून चालला होता. विकी याला अश्विनकुमारने हा रस्ता वाहतुकीसाठी नसल्याने दुसऱ्या मार्गाने जावा असे सांगितले. याचा राग मनात धरून विकी तेथून गेला. त्यानंतर दोन तासांनी मध्यरात्री १ च्या सुमारास दुचाकींवरून आलेल्या सात जणांनी अश्विनकुमारला घराबाहेर बोलावून चाकू आणि इतर हत्यारांनी भोसकून खून केला. अश्विनकुमारचा आरडाओरडा ऐकून त्याचा मित्र गणेश महादेव हाताळे मदतीसाठी घटनास्थळी आला. तो देखील हल्ल्यात जखमी झाला. त्यानंतर संशयित हवेत हत्यारे नाचवत ‘नाद करायचा नाही’ असे म्हणत दहशत माजवत पसार झाले होते.

टोळीविरुद्ध विश्रामबाग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर सात जणांना अटक केली. टोळीविरुद्ध २०१४ पासून २०२४ पर्यंत गुन्हे दाखल आहेत. टोळीचे वर्चस्व आणि आर्थिक फायद्यासाठी टोळीने दहशत निर्माण केली होती. खून, खुनाचा प्रयत्न, चोरी, जबरी चोरी, विनापरवाना शस्त्र बाळगणे असे गुन्हे दाखल आहेत. टोळीविरुद्ध ‘मोक्का’ लावण्यासाठी विश्रामबागचे निरीक्षक ईश्वर ओमासे यांनी अधीक्षक संदीप घुगे यांना प्रस्ताव सादर केला. अधीक्षक घुगे, अप्पर अधीक्षक रितू खोखर यांनी प्रस्ताव विशेष पोलिस महानिरीक्षक फुलारी यांना पाठवला. त्यांनी अवलोकन करून टोळीविरुद्ध मोक्का कलम लावून तपास करण्यास मंजुरी दिली. उपअधीक्षक अण्णासाहेब जाधव तपास करत आहेत.

गुन्हे अन्वेषणचे निरीक्षक सतीश शिंदे, निरीक्षक ओमासे, उपनिरीक्षक सिद्धार्थ रुपनर, कर्मचारी अमोल ऐवळे, दीपक गट्टे, बसवराज शिरगुप्पी, पूजा जगदाळे आदींनी सहभाग घेतला.

टोळीची परिसरात दहशत-

‘ओन्ली आज्या’ टोळीतील कोणीही कामधंदा करत नाही. टोळीविरुद्ध गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. वर्चस्व आणि आर्थिक फायद्यासाठी टोळीने गुन्हे केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. त्यामुळे ‘मोक्का’ लावण्यास मंजुरी मिळाली आहे

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीSangliसांगली