शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
4
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
5
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
6
शालेय सहलींनी भरली एसटीची तिजोरी, मिळाले तब्बल १२७ कोटी रुपयांचे उत्पन्न
7
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
8
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
9
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
10
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
11
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
12
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
13
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
14
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
15
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
16
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
17
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
18
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
19
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
20
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
Daily Top 2Weekly Top 5

प्रत्येक गावात बोट चालविणाऱ्या किमान 5 व्यक्ती तयार करा :  डॉ. अभिजीत चौधरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2019 14:50 IST

प्रशिक्षणाच्या माध्यमातून प्रत्येक गावात बोट चालविणाऱ्या किमान 5 व्यक्ती तयार कराव्यात. आपत्तीच्या काळात या प्रशिक्षण घेतलेल्या व्यक्तींचाच वापर करावा. सरकारी यंत्रणेमार्फत दिलेल्या सूचना आपत्ती व्यवस्थापन दलामार्फत लोकांच्यापर्यंत वेळेवर पोहोचणे आवश्यक आहे. या दृष्टीने नियोजन करून प्रशिक्षणाचे कार्यक्रम वेळोवेळी आयोजित करावेत, अशा सूचना जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिल्या.

ठळक मुद्देपूरप्रवण गावातील सर्वांनी आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षणात सहभागी व्हावेगाव आपत्ती प्रतिसाद दल, गाव आपत्ती व्यवस्थापन आराखडा तयार करणार

सांगली : आपत्तीस तात्काळ प्रतिसाद देण्याकामी जीवन मुक्ती सेवा संस्था कोल्हापूर (व्हाईट आर्मी, कोल्हापूर) यांच्या प्रशिक्षकांमार्फत पूरप्रवण गावात आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण देण्यात येत असून प्रशिक्षण घेतेलेल्या युवकांमधून गावस्तरावर गाव आपत्ती प्रतिसाद दल तयार करण्यात येणार आहे. या प्रशिक्षणात पूरप्रवण गावातील सर्वांनी सहभागी व्हावे.

प्रशिक्षणाच्या माध्यमातून प्रत्येक गावात बोट चालविणाऱ्या किमान 5 व्यक्ती तयार कराव्यात. आपत्तीच्या काळात या प्रशिक्षण घेतलेल्या व्यक्तींचाच वापर करावा. सरकारी यंत्रणेमार्फत दिलेल्या सूचना आपत्ती व्यवस्थापन दलामार्फत लोकांच्यापर्यंत वेळेवर पोहोचणे आवश्यक आहे. या दृष्टीने नियोजन करून प्रशिक्षणाचे कार्यक्रम वेळोवेळी आयोजित करावेत, अशा सूचना जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिल्या.पंचायत समिती पलूस येथील सभागृहात आयोजित आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण पूर्व तयारी आढावा बैठकीत मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यावेळी उपविभागीय अधिकारी गणेश मरकड, पंचायत समिती सभापती सिमाताई मांगलेकर, उपसभापती अरूण पवार, तहसिलदार राजेंद्र पोळ, गटविकास अधिकारी राहुल रोकडे, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी रफिक नदाफ, व्हाईट आर्मीचे अशोक रोकडे आदि व्यासपीठावर उपस्थित होते.जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी म्हणाले, आपत्तीस तात्काळ प्रतिसाद देण्यासाठी पूरप्रवण गावात आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षणाच्या माध्यमातून गाव आपत्ती व्यवस्थापन दल तयार करण्यात येणार आहे.

या प्रशिक्षणात सर्व लोकांनी, तरूण मंडळे, गणेश मंडळे यांनी सहभागी व्हावे. आपत्तीमध्ये पहिला प्रतिसाद गावातील लोकांचा असतो. तो अत्यंत चांगल्या प्रकारे मिळाला तर पुढे अडचण येत नाही. यासाठी लोकांना नेमके काय करावयाचे आहे हे माहिती असणे आवश्यक असून त्यासाठी समन्वय ठेवणे गरजेचे आहे. यासाठी हे प्रशिक्षण घेण्यात येत आहे.प्रशिक्षण घेतलेल्या युवकांचे (15-20) गावस्तरावर गाव आपत्ती प्रतिसाद दल तयार करून त्यांना ओळखपत्र देण्यात येणार आहे. प्रत्येक दलाला पुन्हा प्रशिक्षण देण्यात येणार आहे. आपत्तीला सामोरे जाण्यासाठी प्रत्येक गावाचा आपत्ती व्यवस्थापन आराखडा असणे आवश्यक आहे.

यासाठी तज्ज्ञाचा सल्ला घेऊन त्याप्रमाणे गाव आपत्ती व्यवस्थापन आराखडा तयार करण्यात येणार आहे. यामध्ये पाण्याची पातळी वाढू लागली तर काय करावे, नागरिक, पशु यांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यासाठी उंचावरची ठिकाणे शोधणे आदि विविध बाबींचा या आपत्ती व्यवस्थापन आरखड्यामध्ये समावेश असणार आहे.

आपत्ती व्यवस्थापन ही निरंतर प्रक्रिया असून सर्वांनी एकोप्याने काम करणे आवश्यक आहे. जिल्हा प्रशासनाच्या वतीने बोटी देण्याबरोबरच आपत्तीच्या काळात उपयुक्त असणारे दोरखंड, सर्च लाईट आदि साहित्यांचे किट तयार करून देण्यात येणार आहे. जिल्हा परिषदेमार्फत ज्या ग्रामपंचायतींना बोटी देण्यात आल्या आहेत त्या दुरूस्त करून घ्याव्यात व त्यांची निरंतर देखभाल ठेवावी. ही ग्रामपंचायतींची जबाबदारी असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.यावेळी उपविभागीय अधिकारी गणेश मरकड, तहसिलदार राजेंद्र पोळ व व्हाईट आर्मीचे अशोक रोकडे यांनी आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षणाबाबत मार्गदर्शन केले. यावेळी उपस्थितांनी महापूरात आलेल्या त्यांना आलेल्या अडचणी मांडल्या. या अडचणींची सोडवणूक करण्यासाठी अशा बाबींचा गाव आपत्ती व्यपस्थापन आराखड्यात समावेश करण्यात येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.प्रास्ताविकात जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी रफिक नदाफ यांनी बैठकीचा हेतू विशद करून आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षणाबाबत सविस्तर माहिती दिली. आभार गटविकास अधिकारी राहुल रोकडे यांनी मानले.यावेळी पोलीस विभागाचे अधिकारी, पूरप्रवण गावातील सरपंच, उपसरपंच, पोलीस पाटील, तलाठी, ग्रामसेवक आदि उपस्थित होते.

 

टॅग्स :collectorजिल्हाधिकारीSangliसांगली