शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासाठी मिळणार चांगली बातमी? H-1B च्या तणावादरम्यान एस जयशंकर आणि अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्र्यांची भेट
2
PAK vs SL Live Streaming : 'करो वा मरो' लढत; पाकचा रेकॉर्ड भारी! पण तरी त्यांना असेल लंकेची धास्ती; कारण...
3
ट्रम्प यांच्या 50 टक्के टॅरिफला भारतानं का दिलं नाही उत्तर? राजनाथ सिंह यांचा परदेशातून मोठा खुलासा!
4
आता तुम्हीच ओपनिंगला जा! IND vs PAK मॅचनंतर इम्रान खान यांचा PCB अध्यक्ष नक्वी यांना 'यॉर्कर'
5
'मला रिकामं ठेवू नका'; धनंजय मुंडेंच्या विनंतीवर अजित पवार म्हणाले, 'सूचनेचे पालन केलं जाईल'
6
"ED, EVM, भौकने वाले..., फौज तेरी भारी है; जंजीरों में जकड़ा हुआ जयंत पाटील..." पडळकरांच्या वक्तव्यावरून अमोल कोल्हेंचा हल्लाबोल
7
'सुप्रीम कोर्ट आता बेल कोर्ट बनलं आहे'; जामीन अर्जांची संख्या पाहून न्यायमूर्ती नागरत्ना यांनी व्यक्त केली चिंता
8
IND vs AUS : मॅच आधी टीम इंडियाचा कॅप्टन बदलला! श्रेयस अय्यर अचानक घरी परतला; कारण....
9
"सनातनी हज यात्रेला जात नाहीत, त्यांच्या लोकांनीही...; गरबा मंडपाच्या दरवाजावर गोमूत्र ठेवा!"; धीरेंद्र शास्त्री यांचा सल्ला
10
"२० ओव्हर्स टिकणार त्या दिवशी २०० धावा ठोकणार"; अभिषेक शर्मासंदर्भात मोठी भविष्यवाणी
11
बाई, काय हा प्रकार! पाकिस्तान बेक्कार हरला, तरीही हॅरिस रौफच्या बायकोने केली 'तशी' पोस्ट
12
उद्धवसेनेच्या दसऱ्या मेळाव्याला राज ठाकरे जाणार? टिझरने वेधले लक्ष, मिळाले सूचक संकेत!
13
'Before आणि After चा बोर्ड पाहून आनंद झाला', GST 2.0 बाबत PM मोदींचे देशाच्या नावे पत्र
14
India vs West Indies Test Series: गिलच्या संघातून रिषभ पंत 'आउट'; कोण घेणार त्याची जागा?
15
IND vs PAK: "तुम्ही जर पातळी सोडून वागायला लागलात तर बॅटने..."; इरफानने पाकिस्तानला सुनावलं
16
'पोलीस बाजूला ठेवा, दम असेल तर एकदा रणांगणात या'; निलेश लंकेंचा गोपीचंद पडळकरांना जाहीर इशारा
17
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
18
'बेनिफिट ऑफ डाउट' मिळाला असता तर आम्ही जिंकलो असतो; 'त्या' निर्णयावर अख्तरची 'बोलंदाजी'
19
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
20
१५ दिवसात भाजपच्या दुसऱ्या नगरसेवकाला अटक; टोळीला हाताशी धरुन केला गोळीबार, पैसेही पुरवले

प्रत्येक गावात बोट चालविणाऱ्या किमान 5 व्यक्ती तयार करा :  डॉ. अभिजीत चौधरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2019 14:50 IST

प्रशिक्षणाच्या माध्यमातून प्रत्येक गावात बोट चालविणाऱ्या किमान 5 व्यक्ती तयार कराव्यात. आपत्तीच्या काळात या प्रशिक्षण घेतलेल्या व्यक्तींचाच वापर करावा. सरकारी यंत्रणेमार्फत दिलेल्या सूचना आपत्ती व्यवस्थापन दलामार्फत लोकांच्यापर्यंत वेळेवर पोहोचणे आवश्यक आहे. या दृष्टीने नियोजन करून प्रशिक्षणाचे कार्यक्रम वेळोवेळी आयोजित करावेत, अशा सूचना जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिल्या.

ठळक मुद्देपूरप्रवण गावातील सर्वांनी आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षणात सहभागी व्हावेगाव आपत्ती प्रतिसाद दल, गाव आपत्ती व्यवस्थापन आराखडा तयार करणार

सांगली : आपत्तीस तात्काळ प्रतिसाद देण्याकामी जीवन मुक्ती सेवा संस्था कोल्हापूर (व्हाईट आर्मी, कोल्हापूर) यांच्या प्रशिक्षकांमार्फत पूरप्रवण गावात आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण देण्यात येत असून प्रशिक्षण घेतेलेल्या युवकांमधून गावस्तरावर गाव आपत्ती प्रतिसाद दल तयार करण्यात येणार आहे. या प्रशिक्षणात पूरप्रवण गावातील सर्वांनी सहभागी व्हावे.

प्रशिक्षणाच्या माध्यमातून प्रत्येक गावात बोट चालविणाऱ्या किमान 5 व्यक्ती तयार कराव्यात. आपत्तीच्या काळात या प्रशिक्षण घेतलेल्या व्यक्तींचाच वापर करावा. सरकारी यंत्रणेमार्फत दिलेल्या सूचना आपत्ती व्यवस्थापन दलामार्फत लोकांच्यापर्यंत वेळेवर पोहोचणे आवश्यक आहे. या दृष्टीने नियोजन करून प्रशिक्षणाचे कार्यक्रम वेळोवेळी आयोजित करावेत, अशा सूचना जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिल्या.पंचायत समिती पलूस येथील सभागृहात आयोजित आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण पूर्व तयारी आढावा बैठकीत मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यावेळी उपविभागीय अधिकारी गणेश मरकड, पंचायत समिती सभापती सिमाताई मांगलेकर, उपसभापती अरूण पवार, तहसिलदार राजेंद्र पोळ, गटविकास अधिकारी राहुल रोकडे, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी रफिक नदाफ, व्हाईट आर्मीचे अशोक रोकडे आदि व्यासपीठावर उपस्थित होते.जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी म्हणाले, आपत्तीस तात्काळ प्रतिसाद देण्यासाठी पूरप्रवण गावात आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षणाच्या माध्यमातून गाव आपत्ती व्यवस्थापन दल तयार करण्यात येणार आहे.

या प्रशिक्षणात सर्व लोकांनी, तरूण मंडळे, गणेश मंडळे यांनी सहभागी व्हावे. आपत्तीमध्ये पहिला प्रतिसाद गावातील लोकांचा असतो. तो अत्यंत चांगल्या प्रकारे मिळाला तर पुढे अडचण येत नाही. यासाठी लोकांना नेमके काय करावयाचे आहे हे माहिती असणे आवश्यक असून त्यासाठी समन्वय ठेवणे गरजेचे आहे. यासाठी हे प्रशिक्षण घेण्यात येत आहे.प्रशिक्षण घेतलेल्या युवकांचे (15-20) गावस्तरावर गाव आपत्ती प्रतिसाद दल तयार करून त्यांना ओळखपत्र देण्यात येणार आहे. प्रत्येक दलाला पुन्हा प्रशिक्षण देण्यात येणार आहे. आपत्तीला सामोरे जाण्यासाठी प्रत्येक गावाचा आपत्ती व्यवस्थापन आराखडा असणे आवश्यक आहे.

यासाठी तज्ज्ञाचा सल्ला घेऊन त्याप्रमाणे गाव आपत्ती व्यवस्थापन आराखडा तयार करण्यात येणार आहे. यामध्ये पाण्याची पातळी वाढू लागली तर काय करावे, नागरिक, पशु यांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यासाठी उंचावरची ठिकाणे शोधणे आदि विविध बाबींचा या आपत्ती व्यवस्थापन आरखड्यामध्ये समावेश असणार आहे.

आपत्ती व्यवस्थापन ही निरंतर प्रक्रिया असून सर्वांनी एकोप्याने काम करणे आवश्यक आहे. जिल्हा प्रशासनाच्या वतीने बोटी देण्याबरोबरच आपत्तीच्या काळात उपयुक्त असणारे दोरखंड, सर्च लाईट आदि साहित्यांचे किट तयार करून देण्यात येणार आहे. जिल्हा परिषदेमार्फत ज्या ग्रामपंचायतींना बोटी देण्यात आल्या आहेत त्या दुरूस्त करून घ्याव्यात व त्यांची निरंतर देखभाल ठेवावी. ही ग्रामपंचायतींची जबाबदारी असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.यावेळी उपविभागीय अधिकारी गणेश मरकड, तहसिलदार राजेंद्र पोळ व व्हाईट आर्मीचे अशोक रोकडे यांनी आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षणाबाबत मार्गदर्शन केले. यावेळी उपस्थितांनी महापूरात आलेल्या त्यांना आलेल्या अडचणी मांडल्या. या अडचणींची सोडवणूक करण्यासाठी अशा बाबींचा गाव आपत्ती व्यपस्थापन आराखड्यात समावेश करण्यात येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.प्रास्ताविकात जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी रफिक नदाफ यांनी बैठकीचा हेतू विशद करून आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षणाबाबत सविस्तर माहिती दिली. आभार गटविकास अधिकारी राहुल रोकडे यांनी मानले.यावेळी पोलीस विभागाचे अधिकारी, पूरप्रवण गावातील सरपंच, उपसरपंच, पोलीस पाटील, तलाठी, ग्रामसेवक आदि उपस्थित होते.

 

टॅग्स :collectorजिल्हाधिकारीSangliसांगली