शहरं
Join us  
Trending Stories
1
Ceasefire Violation: पाकिस्तानने खरंच सीमेवर गोळीबार केला का?; लष्कराने दिली महत्त्वाची माहिती
2
Aarti Sathe Judge: "काँग्रेसवाल्यांनो आणि रोहित पवार आता याचे उत्तर द्या"; भाजपचे विरोधकांना आव्हान
3
गझल हेच व्रत हाच ध्यास! पंडित भीमराव पांचाळे यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार प्रदान
4
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
5
एका कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारे संघ, भारताने मोडला ९६ वर्षांचा जुना विक्रम!
6
अजितदादांचा शरद पवारांना धक्का, तानाजी सावंतांचंही टेन्शन वाढवलं, माजी आमदार राहुल मोटे अजित पवार गटात
7
"मी अजून करिअरमध्ये मध्यंतरापर्यंतही पोहोचलेलो नाही", जीवनगौरव पुरस्कारानंतर अनुपम खेर यांची प्रतिक्रिया
8
Joe Root: जो रूट सुसाट! सचिन तेंडुलकरचा 'हा' विश्वविक्रमही धोक्यात, फक्त 'इतक्या' धावा दूर
9
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
10
छ. शिवरायांच्या किल्ल्यांना जागतिक दर्जा मिळवून देण्यात योगदान देणाऱ्या विशाल शर्मांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान
11
Dharali floods: 43 किमी वेग... 1230 उंच डोंगरावरून आले पाणी अन् गाळ; कशी उद्ध्वस्त झाली धराली?
12
अभिनेत्री काजोलला राज कपूर विशेष योगदान पुरस्कार प्रदान, म्हणाली, "आज माझा वाढदिवस..."
13
VVPAT शिवाय होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, निवडणूक आयोगाने केलं स्पष्ट 
14
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?
15
एअरटेलने जिओला मागे टाकले! पहिल्या तिमाहीत ५९४८ कोटींचा नफा; महसुलातही मोठी वाढ
16
अभिनेत्री मुक्ता बर्वे व्ही. शांताराम विशेष योगदान पुरस्काराने सन्मानित, भावना व्यक्त करत म्हणाली...
17
VIDEO: साडी नेसून.. डोक्यावर पदर घेऊन... 'देसी भाभी'चा शकिराच्या 'हिप्स डोन्ट लाय' वर भन्नाट डान्स
18
जायचं होतं जपानला, पोहोचल्या जयपूरला! युक्रेनच्या अध्यक्षांची बायको भारतात कशा पोहोचल्या?
19
₹500 नोट एटीएममधून मिळणे बंद होणार? मोदी सरकारने संसदेत दिले उत्तर
20
मुलगा वापरायचा मृत आईचं बँक खातं, अचानक खात्यात आले १०० कोटी रुपये, त्यानंतर...

गाय दूध दर दोन रुपयांनी घटले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 5, 2017 17:08 IST

शासनाने शेतकºयांना खूष करण्यासाठी दोन रुपये गाय दुधास दरवाढ जाहीर केली; मात्र दूध उत्पादकांना ही दरवाढ मृगजळ ठरली आहे. दरवाढ जाहीर झाल्यापासून महिनाभरही दरवाढ टिकली नाही. दूध संघांनी विक्री दरात वाढ झाली नसल्याचे कारण पुढे करत दूध दरवाढ कमी केली आहे. त्यामुळे गाय दुधाचे दर प्रतिलिटर दोन रुपयांनी कमी झाले आहेत.

ठळक मुद्देशासनाची दरवाढ ठरली मृगजळगाय दुधाचे दर प्रतिलिटर दोन रुपयांनी कमीविक्री दरात वाढ झाली नसल्याचे दूध संघांचे कारण

अतुल जाधवदेवराष्ट्रे : शासनाने शेतकºयांना खूष करण्यासाठी दोन रुपये गाय दुधास दरवाढ जाहीर केली; मात्र दूध उत्पादकांना ही दरवाढ मृगजळ ठरली आहे. दरवाढ जाहीर झाल्यापासून महिनाभरही दरवाढ टिकली नाही. दूध संघांनी विक्री दरात वाढ झाली नसल्याचे कारण पुढे करत दूध दरवाढ कमी केली आहे. त्यामुळे गाय दुधाचे दर प्रतिलिटर दोन रुपयांनी कमी झाले आहेत.

राज्य शासनाने गाईच्या दुधासाठी प्रतिलिटर ३.५ फॅटसाठी २७ रुपयांचा खरेदी दर जुलैपासून लागू केला; पण अनेक दूध संघांनी त्यांची अंमलबजावणी केलीच नाही. अंमलबजावणीबाबत सहकारी दूध संघांकडून चाल-ढकल सुरू राहिली आहे. ज्या संघांनी कायद्याच्या भीतीपोटी दर वाढ केली, त्यांच्यावर दूध संघाच्या संघटनांनी दबाव आणल्याचे चित्र अनेक ठिकाणी दिसून आले आहे. दूध दराबाबत शासनाच्या लवचिक भूमिकेमुळे दूध उत्पादकांना आर्थिक फटका बसत आहे.

काही खासगी दूध संघांनी मात्र थेट प्रतिलिटर २३ रुपयांपर्यंतचा दूध खरेदी दर स्वत:च ठरवून घेतला आहे. शासन दरापेशा सहकारी दूध संघांनी दोन रुपयांनी दर कमी केले आहेत. तरीही विशेष म्हणजे खासगी व सहकारी दूध संघांच्या या निर्णयावर शासनाकडून अद्याप कोणताच हस्तक्षेप झालेला नाही. त्यामुळे शेतकºयांचे आर्थिक गणित पुन्हा एकदा कोलमडण्याची चिन्हे आहेत.

चार महिन्यांपूर्वी शेतकºयांच्या कर्जमाफी आंदोलनावेळी दूध दराचा मुद्दा चांगलाच चर्चेत आला होता. त्यावेळी दुग्धविकासमंत्री महादेव जानकर यांनी गाईच्या ३.५ ते ८.५ फॅटच्या दुधाला प्रतिलिटर २७ रुपये आणि म्हैशीच्या दुधाला ३८ रुपये दर जाहीर केला होता; पण त्यानंतर काही मोजक्या संस्था आणि संघ वगळता अन्य संस्थांनी हा वाढीव दर देण्याबाबत चालढकल केली. दुधाची वाढलेली आवक आणि कमी मागणी, त्यात दूध पावडरचे उत्पादन आणि विक्रीतील अडचणीचे अनेक मुद्दे पुढे करण्यात आले.

खासगी व सहकारी दूध संघांच्या संघटनांनी अनेक मुद्दे पुढे करून दूध दरवाढ कमी केली आहे. याचा फटका शेतकºयांना बसत आहे व सरकार कोणताही ठोस निर्णय घेताना दिसत नाही. त्यामुळे कायद्याची भीती घालणारे शासन गप्प का? असा प्रश्न दूध उत्पादकांना पडला आहे.