शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

गाय दूध दर दोन रुपयांनी घटले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 5, 2017 17:08 IST

शासनाने शेतकºयांना खूष करण्यासाठी दोन रुपये गाय दुधास दरवाढ जाहीर केली; मात्र दूध उत्पादकांना ही दरवाढ मृगजळ ठरली आहे. दरवाढ जाहीर झाल्यापासून महिनाभरही दरवाढ टिकली नाही. दूध संघांनी विक्री दरात वाढ झाली नसल्याचे कारण पुढे करत दूध दरवाढ कमी केली आहे. त्यामुळे गाय दुधाचे दर प्रतिलिटर दोन रुपयांनी कमी झाले आहेत.

ठळक मुद्देशासनाची दरवाढ ठरली मृगजळगाय दुधाचे दर प्रतिलिटर दोन रुपयांनी कमीविक्री दरात वाढ झाली नसल्याचे दूध संघांचे कारण

अतुल जाधवदेवराष्ट्रे : शासनाने शेतकºयांना खूष करण्यासाठी दोन रुपये गाय दुधास दरवाढ जाहीर केली; मात्र दूध उत्पादकांना ही दरवाढ मृगजळ ठरली आहे. दरवाढ जाहीर झाल्यापासून महिनाभरही दरवाढ टिकली नाही. दूध संघांनी विक्री दरात वाढ झाली नसल्याचे कारण पुढे करत दूध दरवाढ कमी केली आहे. त्यामुळे गाय दुधाचे दर प्रतिलिटर दोन रुपयांनी कमी झाले आहेत.

राज्य शासनाने गाईच्या दुधासाठी प्रतिलिटर ३.५ फॅटसाठी २७ रुपयांचा खरेदी दर जुलैपासून लागू केला; पण अनेक दूध संघांनी त्यांची अंमलबजावणी केलीच नाही. अंमलबजावणीबाबत सहकारी दूध संघांकडून चाल-ढकल सुरू राहिली आहे. ज्या संघांनी कायद्याच्या भीतीपोटी दर वाढ केली, त्यांच्यावर दूध संघाच्या संघटनांनी दबाव आणल्याचे चित्र अनेक ठिकाणी दिसून आले आहे. दूध दराबाबत शासनाच्या लवचिक भूमिकेमुळे दूध उत्पादकांना आर्थिक फटका बसत आहे.

काही खासगी दूध संघांनी मात्र थेट प्रतिलिटर २३ रुपयांपर्यंतचा दूध खरेदी दर स्वत:च ठरवून घेतला आहे. शासन दरापेशा सहकारी दूध संघांनी दोन रुपयांनी दर कमी केले आहेत. तरीही विशेष म्हणजे खासगी व सहकारी दूध संघांच्या या निर्णयावर शासनाकडून अद्याप कोणताच हस्तक्षेप झालेला नाही. त्यामुळे शेतकºयांचे आर्थिक गणित पुन्हा एकदा कोलमडण्याची चिन्हे आहेत.

चार महिन्यांपूर्वी शेतकºयांच्या कर्जमाफी आंदोलनावेळी दूध दराचा मुद्दा चांगलाच चर्चेत आला होता. त्यावेळी दुग्धविकासमंत्री महादेव जानकर यांनी गाईच्या ३.५ ते ८.५ फॅटच्या दुधाला प्रतिलिटर २७ रुपये आणि म्हैशीच्या दुधाला ३८ रुपये दर जाहीर केला होता; पण त्यानंतर काही मोजक्या संस्था आणि संघ वगळता अन्य संस्थांनी हा वाढीव दर देण्याबाबत चालढकल केली. दुधाची वाढलेली आवक आणि कमी मागणी, त्यात दूध पावडरचे उत्पादन आणि विक्रीतील अडचणीचे अनेक मुद्दे पुढे करण्यात आले.

खासगी व सहकारी दूध संघांच्या संघटनांनी अनेक मुद्दे पुढे करून दूध दरवाढ कमी केली आहे. याचा फटका शेतकºयांना बसत आहे व सरकार कोणताही ठोस निर्णय घेताना दिसत नाही. त्यामुळे कायद्याची भीती घालणारे शासन गप्प का? असा प्रश्न दूध उत्पादकांना पडला आहे.