शहरं
Join us  
Trending Stories
1
वीजग्राहकांसाठी आनंदाची बातमी! २६ टक्के वीजदर कमी होणार; CM फडणवीस म्हणाले, “इतिहासात प्रथमच…”
2
“मोदी माझे चांगले मित्र, व्यापार निवडला अन्...”; भारत-पाक युद्धविरामावर पुन्हा ट्रम्प बोलले
3
“घोषित-अघोषित आणीबाणीत फरक करण्याची वेळ आली आहे, पुन्हा सावध राहण्याचा काळ”: शरद पवार
4
Malegaon Factory Election Result: माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणूक अजित पवारांच्या लाटेत
5
Swargate Case :स्वारगेट बलात्कार प्रकरणी पोलिसांकडून पीडितेला मानसिक त्रास; वकिलांचा आरोप
6
लग्नाआधी सरकारी नोकरी! नववी नापास रिंकू सिंह होणार थेट 'शिक्षण अधिकारी'
7
अमेरिकेच्या हल्ल्यांमुळे अणु-प्रकल्प मोठ्या प्रमाणावर उद्ध्वस्त; इराणने अखेर कबुल केलं!
8
प्रकाश आंबेडकरांना धक्का, ७६ लाख वाढीव मतदान याचिका फेटाळली; कोर्ट म्हणाले, “वेळ वाया गेला”
9
तारीख ठरली! इंडिया चॅम्पियन्स पुन्हा एकदा पाकचा धुव्वा उडवण्यासाठी उतरणार मैदानात
10
अणुबॉम्ब पडला तरी काहीही होणार नाही! कुठे आहे जगातील सर्वात सुरक्षित घर?
11
“पहिलीपासून हिंदी लादण्याचा निर्णय रद्द करण्यास सरकारला भाग पाडू”; काँग्रेसचा निर्धार
12
ENG vs IND : पहिल्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियानं या गोलंदाजाला पाठवलं घरी, कारण...
13
भारतातील ५ सर्वात महागड्या गाड्या, किंमत ऐकून बसेल धक्का; कोण आहेत मालक? जाणून घ्या...
14
आणीबाणीविरोधात केंद्रीय मंत्रिमंडळात प्रस्ताव, PM मोदींसह उपस्थित मंत्र्यांनी दिले अनुमोदन
15
सर्व सरकारी कामात कन्नड भाषेचा वापर अनिवार्य; कर्नाटकतील काँग्रेस सरकारचा मोठा आदेश
16
'पंख तुमचे, पण आकाश सर्वांचे...', काँग्रेस अध्यक्ष खरगेंच्या टीकेला शशी थरुर यांचे प्रत्युत्तर!
17
साडूच्या स्टेटसवर दिसला बायकोचा फोटो; नवऱ्याने जाब विचारताच केली 'अशी' हालत
18
जिथे अमेरिका-इस्रायल पोहचू शकत नाहीत; इराणने 'या' पर्वतात लपवले ४०० किलो युरेनियम
19
पुणेकरांसाठी मोठी बातमी! मेट्रो लाईन २ च्या विस्ताराला मंजुरी, केंद्राचा ३६२६ कोटींचा निधी
20
Viral Video : आजीबाईंनी असा ट्रॅक्टर चालवला की सगळे बघतच राहिले! नेटकरीही म्हणतायत वाह वाह...

Lok Sabha Election 2019 लोकसभेच्या प्रचारात नगरसेवकांची पायपीट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2019 23:27 IST

शीतल पाटील । लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : लोकसभा निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात आला आहे. प्रचारासाठी तीनच दिवस उरले ...

शीतल पाटील ।लोकमत न्यूज नेटवर्कसांगली : लोकसभा निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात आला आहे. प्रचारासाठी तीनच दिवस उरले असताना, महापालिकेच्या नगरसेवकांनी जोर लावण्यास सुरूवात केली आहे. ‘स्वाभिमानी’साठी काँग्रेस व राष्ट्रवादीचे नगरसेवक सक्रिय झाले आहेत, तर भाजपच्या नगरसेवकांनीही प्रभागात बैठका, पदयात्रांवर भर दिला आहे. मात्र उन्हाच्या तडाख्यामुळे प्रचारात जोर कमी आहे.महापालिकेत भाजपचे ४१ व दोन सहयोगी असे ४३ नगरसेवक आहेत, तर काँग्रेसचे २० व राष्ट्रवादीचे १५ नगरसेवक आहेत. आठ महिन्यांपूर्वीच महापालिकेची सार्वत्रिक निवडणूक पार पडली होती. या निवडणुकीत काँग्रेस व राष्ट्रवादीने आघाडी केली, तर भाजप स्वतंत्रपणे निवडणुकीला सामोरा गेला होता. महापालिका क्षेत्रात काँग्रेस आघाडीला ३६ टक्के, तर भाजपला ३५ टक्के मते मिळाली होती. शिवसेनेला दीड टक्का मते मिळाली. यावेळी लोकसभेची जागा स्वाभिमानी पक्षाकडे असली तरी, उमेदवार मात्र काँग्रेसच्या घरातील आहे. त्यामुळे प्रचाराच्या सुरूवातीपासूनच काँग्रेसचे नगरसेवक सक्रिय झाले होते. त्यात महापालिकेत मदनभाऊ पाटील यांना मानणाऱ्या नगरसेवकांची संख्या अधिक आहे. मदनभाऊ-विशाल पाटील गटातील मतभेद विसरून सारेच कामाला लागले.प्रचाराच्या दुसºया आठवड्यात राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी भाग घेतला. त्यामुळे राष्ट्रवादीचे नगरसेवकही स्वाभिमानीच्या प्रचारात सहभागी झाले आहेत. सध्या काँग्रेस व राष्ट्रवादीचे नगरसेवक एकत्र येऊन शहरात प्रचाराची धुरा सांभाळत आहेत. काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील, मदनभाऊ पाटील यांच्या पत्नी जयश्रीताई पाटील यांच्या नेतृत्वाखाली शहरात प्रचार सुरू आहे. पदयात्रा, मेळावे, बैठका घेऊन पाटील यांनी प्रचारात रंगत आणली आहे.दुसरीकडे भाजपमध्ये काहीकाळ शांतता होती. काही मोजकेच नगरसेवक प्रचारात दिसत होते. महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी नगरसेवकांची बैठक घेतली. त्यानंतर मात्र भाजपचे नगरसेवकही प्रचारात उतरले आहेत. आमदार सुधीर गाडगीळ, सुरेश खाडे यांच्या नेतृत्वाखाली प्रभागात बैठका, पदयात्रांवर भर दिला जात आहे.काहीजण तळ्यात-मळ्यातदोन्ही बाजूंचे काही नगरसेवक अद्यापही तळ्यात-मळ्यात आहेत. वंचित आघाडीने उमेदवार दिल्याने या नगरसेवकांनी प्रचारापासून दूर राहणेच पसंत केले आहे. त्यात रसद मिळाली नसल्यानेही काहीजण लांब आहेत. नुकत्याच झालेल्या महापालिकेच्या निवडणुकीत खर्च अधिक झाला आहे. त्यात निवडणुका म्हटल्या की मतदारांच्या अपेक्षा असतात. वरून रसद न आल्याने त्यांच्या अपेक्षा कशा पूर्ण करायच्या? असा सवाल करीत काहीजणांनी रसद आल्यानंतर बघू, अशी भूमिका घेतली आहे.महाआघाडी, महायुतीचा अपक्षांशी संपर्कमहापालिका निवडणुकीत सर्वच पक्षांत बंडखोरीला उधाण आले होते. त्यात काँग्रेस-राष्ट्रवादीत आघाडी झाल्याने या पक्षात मोठी बंडखोरी झाली होती. अपक्ष उमेदवारांना एकूण मतदानाच्या १६ टक्के मते मिळाली होती. त्यामुळे काँग्रेस व भाजपने प्रभागात दोन हजारपेक्षा जादा मते मिळालेल्या अपक्षांशी संपर्क साधला आहे. महापालिका निवडणुकीतील त्यांची नाराजी दूर करून त्यांनाही प्रचारात सक्रिय केले जात आहे.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक