शहरं
Join us  
Trending Stories
1
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय दलित तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
4
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
5
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
6
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
7
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
8
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
9
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
10
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
11
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
12
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
13
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
14
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
15
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
16
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
17
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
18
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
19
बाजारात जोरदार उसळी! गुंतवणूकदारांनी कमावले ३.५ लाख कोटी रुपये; 'ही' ६ कारणे ठरली गेमचेंजर
20
सात दिवसांत खचला नवा रस्ता, आठ फूट खोल खड्ड्यात अडकला टँकर, महिला जखमी   
Daily Top 2Weekly Top 5

ताकारी योजनेचा खर्च सातशे कोटींच्या घरात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2018 23:40 IST

अतुल जाधव ।लोकमत न्यूज नेटवर्कदेवराष्ट्रे : कडेगाव, पलूस, खानापूर, तासगाव या तालुक्यातील शेतीला वरदान ठरलेल्या ताकारी योजनेच्या कामावर १७-१८ या वर्षात फक्त २५ कोटी रुपयांचा खर्च करण्यात आला आहे. त्यामुळे मोठ्या नेत्यांनी केलेल्या शेकडो कोटींच्या घोषणा खोट्या ठरताना दिसत आहेत. या योजनेवर शासनाने आजअखेर ६८८ कोटींचा खर्च केला आहे. तरीही ...

अतुल जाधव ।लोकमत न्यूज नेटवर्कदेवराष्ट्रे : कडेगाव, पलूस, खानापूर, तासगाव या तालुक्यातील शेतीला वरदान ठरलेल्या ताकारी योजनेच्या कामावर १७-१८ या वर्षात फक्त २५ कोटी रुपयांचा खर्च करण्यात आला आहे. त्यामुळे मोठ्या नेत्यांनी केलेल्या शेकडो कोटींच्या घोषणा खोट्या ठरताना दिसत आहेत. या योजनेवर शासनाने आजअखेर ६८८ कोटींचा खर्च केला आहे. तरीही अजून योजना पूर्ण होण्यासाठी २०० कोटी रुपयांचा निधी गरजेचा आहे.ताकारी योजनेच्या कामावर शासनाने आजअखेर कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च केला; पण योजना अजूनही अपूर्ण आहे. गेल्या ३५ वर्षांपासून योजनेची कामे चालू आहेत; मात्र तेव्हापासून योजनेचा विस्तारही वाढत गेला आहे. प्रत्येक नेत्याने आपल्या मतदार संघातील हक्काची गावे ताकारी योजनेच्या लाभक्षेत्रातील घालण्याचा प्रयत्न केला आहे. सध्या या योजनेत चार तालुक्यातील ५१ गावांतील शेतीचा समावेश आहे. तासगाव व खानापूर तालुक्यातील अनेक गावांत कालवा खुदाईचे काम गतीने चालू आहे, तर कडेगाव तालुक्यातील तडसर, हिंगणगाव खुर्द येथील कालवा, पोटकालव्याची कामे चालू आहेत. पलूस-खानापूर तालुक्यातील गावांचा समावेश असलेली नवीन वितरिकावरील कामेही चालू आहेत.या योजनेच्या माध्यमातून १०८ किलोमीटरपर्यंतच्या गावांना पाणी पुरवठा केला जात आहे. या परिसरातही कालवा दुरुस्ती, पोटपाट खुदाई, दारे बसविणे यासह विविध कामे अपूर्ण आहेत. यावरही शासनाने खर्च करणे गरजेचे आहे. अपूर्ण कामे जलदगतीने पूर्ण न केल्यामुळे योजनेचे बजेट दिवसेंदिवस वाढत चालले आहे.अनेक नेत्यांनी योजनेस यावर्षी शेकडो कोटी निधी देण्याची घोषणा केली; होती पण या योजनेस यावर्षी फक्त २५ कोटी रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे.२०० कोटींची गरजताकारी योजनेचा कालवा, पोटकालवा खुदाई, दारे बसविणे यासह विविध कामे पूर्ण होण्यासाठी व शेतकऱ्यांच्या शेतीपर्यंत पाणी देण्यासाठी अजून २०० कोटींची गरज असल्याचे अधिकाºयांनी सांगितले.