शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने शस्त्रसंधी मोडली, अफगाणिस्तानवर हल्ला; चिडलेले तालिबान म्हणतेय, 'आता तुम्हाला तोडणार'
2
"घरात एवढा मोठा व्यवहार होतो अन्..."; पार्थ पवारांच्या जमीन व्यवहारावरून वडेट्टीवार यांचा अजित पवारांना थेट सवाल
3
कोकणात ठाकरे आणि शिंदे गट एकत्र येणार? राणेंच्या बालेकिल्ल्यात भाजपाला आव्हान देणार, गुप्त बैठक झाल्याची चर्चा
4
गुंतवणूकदारांसाठी मोठी संधी! SBI नवीन आयपीओ आणण्याच्या तयारीत, ८ हजार कोटींपर्यंत उभे करण्याचा प्लॅन
5
अमेरिकेचा चीनला मोठा झटका! आणखी एका कंपनीने कामकाज केलं बंद; ४०० कर्मचाऱ्यांची नोकरी गेली
6
कमाईच नव्हे, दिवसाला ७ कोटी दानही ! 'हे' आहेत भारताचे टॉप 10 दानशूर; अंबानी, अदानी कितवे?
7
'मनी हाइस्ट' पाहून १५० कोटींची फसवणूक; लोकांना 'असं' अडकवायचे जाळ्यात, झाला पर्दाफाश
8
स्विमिंग पूलसाठी खोदायला गेला, सापडले घबाड! घराच्या बागेत सापडली सोन्याची बिस्कीटे अन् नाणी..., सरकारने त्यालाच देऊन टाकले...
9
"या गोष्टी बाहेर जाणं चूक आहे..."; राज ठाकरेंनी सुनावल्यानंतर पिट्याभाईची पहिली प्रतिक्रिया
10
Ambadas Danve : Video - "वोटचोरीनंतर 'खतचोरी', भाजपाच्या रुपाने कुंपणच शेत खातंय"; अंबादास दानवेंचा घणाघात
11
दिल्ली विमानतळाच्या एटीसीमध्ये तांत्रिक बिघाड; १०० हून अधिक विमानफेऱ्या रखडल्या, विलंबाने 
12
Infosys Buyback 2025: २२ टक्के प्रीमिअमवर शेअर पुन्हा खरेदी करणार इन्फोसिस; रेकॉर्ड डेट निश्चित, कोणाला होणार फायदा?
13
“मुलाचे ३०० कोटींचे व्यवहार पित्याला ज्ञात नाही, तुमचे तुम्हाला पटते का”; कुणी केली टीका?
14
बिहारमध्ये जेव्हा जेव्हा ५ टक्के मतदान वाढले, तेव्हा सरकार पडले; काल ८.५ टक्के मतदान वाढ कशाचे संकेत?
15
Anna Hazare: पार्थ पवार जमीन घोटाळा, अण्णा हजारेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “कुटुंबाचे संस्कार...”
16
Stock Market Today: शेअर बाजार जोरदार आपटला, सेन्सेक्स ४५० अंकांनी घसरला; निफ्टीही २५,४०० च्या खाली
17
Astro Tips: शुक्रवारी लक्ष्मी उपासनेसाठी तुम्ही कापराचे 'हे' उपाय करता का? मिळते धन-समृद्धी!
18
'ऑपरेशन सिंदूरमध्ये ८ विमाने पडली'; 'टॅरिफ'ने भारत-पाक युद्ध थांबवल्याचा ट्रम्प यांचा नवा गौप्यस्फोट
19
जगातील सर्वात महागडं पॅकेज; मस्क यांची कमाई सिंगापूर, UAE, स्वित्झर्लंडच्या GDP पेक्षाही अधिक, किती मिळणार सॅलरी?
20
आजचे राशीभविष्य,०७ नोव्हेंबर २०२५: नवे कार्य हाती घेऊ नका; मतभेद होणार नाहीत याची दक्षता घ्यावी

ताकारी योजनेचा खर्च सातशे कोटींच्या घरात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2018 23:40 IST

अतुल जाधव ।लोकमत न्यूज नेटवर्कदेवराष्ट्रे : कडेगाव, पलूस, खानापूर, तासगाव या तालुक्यातील शेतीला वरदान ठरलेल्या ताकारी योजनेच्या कामावर १७-१८ या वर्षात फक्त २५ कोटी रुपयांचा खर्च करण्यात आला आहे. त्यामुळे मोठ्या नेत्यांनी केलेल्या शेकडो कोटींच्या घोषणा खोट्या ठरताना दिसत आहेत. या योजनेवर शासनाने आजअखेर ६८८ कोटींचा खर्च केला आहे. तरीही ...

अतुल जाधव ।लोकमत न्यूज नेटवर्कदेवराष्ट्रे : कडेगाव, पलूस, खानापूर, तासगाव या तालुक्यातील शेतीला वरदान ठरलेल्या ताकारी योजनेच्या कामावर १७-१८ या वर्षात फक्त २५ कोटी रुपयांचा खर्च करण्यात आला आहे. त्यामुळे मोठ्या नेत्यांनी केलेल्या शेकडो कोटींच्या घोषणा खोट्या ठरताना दिसत आहेत. या योजनेवर शासनाने आजअखेर ६८८ कोटींचा खर्च केला आहे. तरीही अजून योजना पूर्ण होण्यासाठी २०० कोटी रुपयांचा निधी गरजेचा आहे.ताकारी योजनेच्या कामावर शासनाने आजअखेर कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च केला; पण योजना अजूनही अपूर्ण आहे. गेल्या ३५ वर्षांपासून योजनेची कामे चालू आहेत; मात्र तेव्हापासून योजनेचा विस्तारही वाढत गेला आहे. प्रत्येक नेत्याने आपल्या मतदार संघातील हक्काची गावे ताकारी योजनेच्या लाभक्षेत्रातील घालण्याचा प्रयत्न केला आहे. सध्या या योजनेत चार तालुक्यातील ५१ गावांतील शेतीचा समावेश आहे. तासगाव व खानापूर तालुक्यातील अनेक गावांत कालवा खुदाईचे काम गतीने चालू आहे, तर कडेगाव तालुक्यातील तडसर, हिंगणगाव खुर्द येथील कालवा, पोटकालव्याची कामे चालू आहेत. पलूस-खानापूर तालुक्यातील गावांचा समावेश असलेली नवीन वितरिकावरील कामेही चालू आहेत.या योजनेच्या माध्यमातून १०८ किलोमीटरपर्यंतच्या गावांना पाणी पुरवठा केला जात आहे. या परिसरातही कालवा दुरुस्ती, पोटपाट खुदाई, दारे बसविणे यासह विविध कामे अपूर्ण आहेत. यावरही शासनाने खर्च करणे गरजेचे आहे. अपूर्ण कामे जलदगतीने पूर्ण न केल्यामुळे योजनेचे बजेट दिवसेंदिवस वाढत चालले आहे.अनेक नेत्यांनी योजनेस यावर्षी शेकडो कोटी निधी देण्याची घोषणा केली; होती पण या योजनेस यावर्षी फक्त २५ कोटी रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे.२०० कोटींची गरजताकारी योजनेचा कालवा, पोटकालवा खुदाई, दारे बसविणे यासह विविध कामे पूर्ण होण्यासाठी व शेतकऱ्यांच्या शेतीपर्यंत पाणी देण्यासाठी अजून २०० कोटींची गरज असल्याचे अधिकाºयांनी सांगितले.