शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
2
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; साध्वी प्रज्ञा ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
3
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
4
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
5
मैदानावर विराट, व्यवसायात विकास! विराट कोहलीच्या १०५० कोटींच्या साम्राज्याचा 'हा' आहे खरा हिरो!
6
'पाकिस्तानात नाही, तर बलुचिस्तानमध्ये तेल सापडले', बलोच नेत्याचे डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र
7
भारती सिंगने सर्वांसमोर जाळली महागडी 'लाबूबू डॉल'! कारणही सांगितलं, म्हणाली- "माझा छोट्या मुलाला.."
8
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
9
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
10
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
11
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
12
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
13
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
14
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
15
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
16
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
17
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
18
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
19
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
20
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या

महापालिकेविरोधात नगरसेवक, नागरिकांचा आक्रोश

By admin | Updated: July 5, 2016 00:28 IST

आयुक्तांना घेराव : नागरिकांकडून मुरूम, खडीकरणाची मागणी; पार्श्वनाथ कॉलनी, दत्तनगर परिसर चिखलमय

सांगली : महापालिका क्षेत्रातील गुंठेवारी भागातील रस्ते पावसामुळे चिखलात रुतले असून नागरिकांना नरकयातना भोगाव्या लागत आहेत. त्यांच्या आक्रोशाला सोमवारी आयुक्त रवींद्र खेबूडकर यांना सामोरे जावे लागले. शहरातील विविध ठिकाणी पाहणी दौऱ्यावेळी आयुक्त रवींद्र खेबूडकर यांना नागरिकांनी घेराव घातला, तर स्वाभिमानी आघाडीच्या नगरसेवकांनी पालिका मुख्यालयातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर ठिय्या मारून प्रशासनाचा निषेध केला. गेल्या चार दिवसांच्या पावसाने शहराची दयनीय अवस्था झाली आहे. विशेषत: गुंठेवारी व उपनगरांतील रस्त्यांवर दलदल झाली आहे. मुख्य रस्ते खड्ड्यात गेले आहेत. त्यात प्रशासनाने साडेतीन कोटी रुपयांच्या मुरूम, पॅचवर्कची निविदा अडवून धरल्याने नगरसेवकांतही नाराजीचा सूर आहे. महापौर हारूण शिकलगार, स्थायी समिती सभापती संतोष पाटील यांच्यासह गुंठेवारीतील नगरसेवकांनी सोमवारी सकाळी आयुक्त खेबूडकर यांची भेट घेऊन तातडीने मुरूम देण्याची मागणी केली. तसेच गुंठेवारी भागाचा दौरा करण्याचा आग्रह धरला. दुपारी आयुक्तांनी पदाधिकारी व नगरसेवकांसह शहराच्या विविध ठिकाणी भेटी देऊन पाहणी केली. विश्रामबाग येथील दत्तनगरमधील रस्ते ड्रेनेज वाहिन्यांमुळे खराब झाले आहेत. तेथील नागरिकांनी तर आयुक्तांना घेरावच घातला. आयुक्तांसह पदाधिकाऱ्यांनाही चिखल तुडवत पाहणी करावी लागली. नगरसेवक प्रदीप पाटील, मृणाल पाटील यांनी मुरूमाची मागणी केली. माधव कुलकर्णी, संजय कुलकर्णी यांनी, मुरूम कधी मिळणार, हे आताच जाहीर करा, अशी मागणी केली. त्यानंतर विधाता कॉलनी, टिंबर एरिया, सांगलीवाडी, शामरावनगर या परिसराला महापौर, आयुक्तांनी भेट दिली. प्रत्येक ठिकाणी आयुक्त व पदाधिकाऱ्यांना नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागले. धामणी रस्त्यावरील पार्श्वनाथ कॉलनीत नागरिकांनी, ‘रस्त्यावर चालून दाखवा’, असे आव्हानच आयुक्तांना दिले. (प्रतिनिधी)काँग्रेस, स्वाभिमानीचा पालिकेत ठिय्यामहापालिका मुख्यालयात स्वाभिमानी आघाडीच्या नगरसेवकांनी पावसाळी मुरूमासाठी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोरच ठिय्या मारला. नागरिकांना तातडीने मुरूम उपलब्ध करून द्यावा, खड्डे मुजवावेत, अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला. शहर अभियंता आर. पी. जाधव यांनी, दोन दिवसात मुरूमाची व्यवस्था केली जाईल, असे आश्वासन दिले. या आंदोलनात स्वाभिमानीचे गटनेते शिवराज बोळाज, बाळासाहेब गोंधळी, जगन्नाथ ठोकळे, संगीता खोत, अश्विनी खंडागळे यांच्यासह काँग्रेसचे दिलीप पाटील, प्रभाग समिती सभापती बाळासाहेब काकडे, राष्ट्रवादीचे मनगूआबा सरगर सहभागी झाले होते.