शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; दहा वाजता मतमोजणीस होणार सुरुवात
2
"भाजपचे आमदार इतके माजोरडे झालेत की..."; आमदार पराग शाह यांच्यावर वर्षा गायकवाड भडकल्या
3
भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक
4
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
5
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
6
भारती सिंग आता करतेय तिसऱ्या बाळाचा विचार; व्हिडीओ शेअर करत म्हणाली- "मला मुलीची आशा..."
7
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
8
चांगले संस्कार दिले नाहीत! अल्पवीयन मुलीला छेडणाऱ्या ४ आरोपींच्या आईलाच पोलिसांनी केली अटक
9
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
10
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
11
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
12
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
13
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
14
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
15
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
16
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
17
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
18
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
19
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
20
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
Daily Top 2Weekly Top 5

पालिकेने गमावला २३ गाळ्यांचा हक्क

By admin | Updated: February 26, 2015 00:07 IST

सदस्यांचा संताप : न्यायालयीन आदेशानुसार कायमस्वरूपी पुनर्वसन, करारपत्राचा अधिकार गेला

सांगली : उच्च न्यायालयात महापालिकेच्यावतीने योग्य पद्धतीने बाजू न मांडता आल्याने महापालिकेचे २३ गाळे कायमस्वरुपी खोकीधारकांच्या ताब्यात गेल्याची टीका आज, बुधवारी शिवसेनेचे नगरसेवक गौतम पवार यांनी महापालिका सभेत केली. यात दोषी असणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली. आयुक्तांनी याप्रकरणी चौकशीचे आश्वासन पवार यांना दिले. महापालिका क्षेत्रातील खोकी पुनर्वसनाच्या विषयावर आज जोरदार चर्चा झाली. पवार यांनी सांगितले की, स्टेशन चौकातील मॉलच्या पिछाडीस खोकीधारकांचे गाळ्यांमध्ये पुनर्वसन करण्यात आले. तत्कालीन राष्ट्रपतींच्या दौऱ्यावेळी शहरातील अनेक खोकी हटवून त्यांचे येथील दुकानगाळ्यांमध्ये पुनर्वसन करण्यात आले. करारपत्राची वेळ आली तेव्हा कायमस्वरुपी पुनर्वसनाची मागणी खोकीधारकांनी केली. यातील काही खोकीधारक उच्च न्यायालयात गेले. उच्च न्यायालयात महापालिकेला योग्य पद्धतीने बाजू मांडता आली नाही. त्यामुळे उच्च न्यायालयाने कायमस्वरुपी पुनर्वसन करावे, असे आदेश दिले आहेत. अन्य खोकीधारकही याच गोष्टीचा आधार घेऊन न्यायालयात गेले, तर महापालिकेसमोरच्या अडचणी आणखी वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे याप्रकरणी संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, तसेच खोकीधारकांना भाडेपट्टी व घरपट्टी असा दुहेरी भार झेपत नसल्याने याबाबतचे धोरण महापालिकेने निश्चित करावे, अशी मागणी त्यांनी केली. सहायक आयुक्त रमेश वाघमारे यांनी उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार २३ खोकीधारकांचे कायमस्वरुपी पुनर्वसन झाल्याचे सांगितले. नगरसेवक शेखर माने म्हणाले की, मॉलच्या पिछाडीस खोकीधारकांच्या पुनर्वसनासाठी गाळे बांधून तयार आहेत. नियमानुसार त्यांचे वाटपही झाले आहे. मात्र गेल्या अनेक वर्षांपासून या गाळेधारकांशी महापालिकेने करारच केलेला नाही. त्यामुळे भाडेपट्टी व कररुपाने गोळा होणारा महसूल बुडाला आहे. यास जबाबदार असणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करून, त्यांच्या पगारातून ही रक्कम वसूल करावी, अशी मगाणी केली. आयुक्तांनी याप्रकरणी चौकशी करण्याचे आश्वासन दिले.खोकीधारकांना घरपट्टी व भाडेपट्टी एकाचवेळी लावू नये, अशी मागणी दिग्विजय सूर्यवंशी, शेडजी मोहिते, हारुण शिकलगार यांनी केली. काँग्रेसचे नगरसेवक संतोष पाटील म्हणाले की, खोकी पुनर्वसनाबाबतचे धोरण निश्चित करताना खोकीधारकांच्या परिस्थितीची तपासणी केली जावी. शहरातील अनेक खोकीधारक पुनर्वसनात आलेले गाळे भाड्याने देत आहेत. अशा गरज नसलेल्या लोकांचे गाळे महापालिकेने परत ताब्यात घ्यावेत. (प्रतिनिधी)अवैध धंदेवाल्यांचे पुनर्वसन का? नगरसेवक संतोष पाटील, गौतम पवार यांनी, अवैध धंद्यांसाठी जर गाळ्यांचा वापर होत असेल, तर अशा लोकांचे पुनर्वसन रद्द करावे. ते गाळे अन्य गरजू खोकीधारकांना देण्यात यावेत, अशी मागणी यावेळी केली. किशोर जामदार म्हणाले की, महापालिका अधिनियमातील तरतुदीनुसार खोकीधारकांचे पुनर्वसन केले असले तरी, भाडेपट्टीबरोबरच त्यांना घरपट्टीही लागू होते. घरपट्टी रद्द करण्याचा कोणताही अधिकार महापालिकेला नाही. त्यामुळे नियमबाह्य गोष्टींची चर्चा सभागृहात करू नये किंवा त्याबाबत कोणताही निर्णय घेतला जाऊ नये.