शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
3
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
4
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
5
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
6
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
7
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
8
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
9
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
10
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
11
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
12
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
13
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
14
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
15
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
17
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
18
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
19
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
20
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus Lockdown : कोरोनापेक्षाही भयंकर मोबाईलरूपी व्हायरस; तुंगच्या घटनेने गांभीर्य वाढले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2020 15:43 IST

मिरज तालुक्यातील तुंगजवळील विठलाईनगर येथे एका अल्पवयीन मुलाने आठवर्षीय मुलीवर अत्याचार करून, तिचा गळा आवळून खून केला. त्या मुलीला मोबाईलवर पॉर्न क्लिप दाखवित या मुलाने हा अत्याचार केल्याने, घटनेतील गांभीर्य अधिक वाढले आहे.

ठळक मुद्देकोरोनापेक्षाही भयंकर ठरतोय मोबाईलरूपी व्हायरस; तुंगच्या घटनेने गांभीर्य वाढलेकुटुंबातील संवाद हरवतोय; मोबाईलचा अतिवापर ठरतोय घातक

सांगली : मिरज तालुक्यातील तुंगजवळील विठलाईनगर येथे एका अल्पवयीन मुलाने आठवर्षीय मुलीवर अत्याचार करून, तिचा गळा आवळून खून केला. त्या मुलीला मोबाईलवर पॉर्न क्लिप दाखवित या मुलाने हा अत्याचार केल्याने, घटनेतील गांभीर्य अधिक वाढले आहे.

अजाणत्या वयात हाती आलेला मोबाईल आणि त्याचा माहीत नसलेला योग्य वापर, तसेच त्याचा योग्य वापरापेक्षा गैरवापरच अधिक होत असल्याने, अल्पवयीन मुलांच्या हाती मोबाईल देणे घातक ठरत आहे. सध्या सर्वत्र दहशत असलेल्या कोरोनापेक्षाही हा मोबाईलरूपी व्हायरसच अधिक चिंतनीय आहे, अशाच प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.

तुंग येथील घटना सुन्न करणारी असून पालकांनी आपल्या मुलांना किती ह्यटेक्नोसॅव्हीह्ण करावे, याचा विचार करायला लावणारी आहे. मुलांच्या हाती मोबाईल दिल्यानंतर आई-वडिलांसह कुटुंबातील ज्येष्ठांनी मुलांवर लक्ष द्यायला हवे. पॉर्न फिल्म असो किंवा गेम्स, त्यामुळे मुलांकडून असे गैरप्रकार घडत आहेत. कुटुंबातील संवाद हरविल्यानेही मुले मोबाईलमध्ये अडकून पडत आहेत. त्यामुळे पालकांनी, समाजातील प्रत्येक घटकांनी संवेदनशीलता जपावी.- मनीषा दुबुले, अप्पर पोलीस अधीक्षक

अल्पवयीन मुलांकडून होणाऱ्या अशा प्रकाराला अनेक घटक कारणीभूत आहेत. लहान मुलांकडे पालक मोबाईल देतातच कसे, यापासून ते त्यावर पालकांचे नियंत्रण किती? असे अनेक प्रश्न निर्माण होतात. तंत्रज्ञानामुळे आपण संपर्कात आलो असलो तरी, त्यांचा मुलांकडून कार्टून, गेमसाठी होणारा वापर घातक असून, त्यामुळे मुले कमी वयात आक्रमक होत आहेत. लहान कोवळ्या मनावर जे बिंबवता येईल ते बिंबत असल्याने या मुलांमध्येही मोबाईलमुळे बदल घडत आहेत. आपल्या मुलांवर पालकांनी ह्यक्लोज वॉचह्ण ठेवणे हाच यावरील मुख्य पर्याय वाटतो आहे.डॉ. अनिता पागे,वैद्यकीय तज्ज्ञ

आधुनिक तंत्रज्ञानाची प्रत्येकाला समज असावी हे जरी खरे असले तरी, मोबाईलचा अतिवापर अधोगतीला नेत आहे. मोबाईलमधील अतिनील किरणे मुलांच्या डोळ्याला त्रासदायक तर ठरतातच, शिवाय चिडचीड, झोप न लागणे असेही त्रास निर्माण करत आहेत. ह्यस्क्रीन अ‍ॅडीक्टह्ण झालेल्या मुलांमुळे धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे वयाच्या १८ नंतरच मुलांकडे मोबाईल द्यावा.- प्रा. डॉ. संतोष माने, शैक्षणिक तज्ज्ञ

मुलांना मोबाईल द्यावा व त्यावर त्यांनी अभ्यास करावा, असा प्रवाह पुढे येत असतानाच, तुंगची घटना धक्कादायक आहे. पालक हौस म्हणून मुलांना मोबाईल देतात. पण कुतूहलापोटी मोबाईल हाती आल्यानंतर त्याची सवयच मुलांना लागत आहे. ज्याप्रमाणे विषाणू दिसत नसतो, अगदी तसेच मोबाईलचे दुष्परिणामही दिसून येत नाहीत. त्यामुळे पालकांनी मुलांचे मोबाईलचे लाड न पुरविता त्यांना इतर गोष्टींची सवय लावावी.- दयासागर बन्ने, साहित्यिक

मुलांना सहजपणे उपलब्ध होत असलेल्या तंत्रज्ञानामुळे त्याचा योग्य वापर त्यांना माहीत नाही. पालकही मुलांना मोबाईल, इंटरनेट उपलब्ध करून देत आहेत. त्यामुळे पालकांनी मुलांच्या भावनिक बदलाकडे लक्ष देऊन त्यांना सुविधा द्याव्यात. त्यांच्या भावना समजून घेतल्यास बºयाच अडचणी दूर होणार आहेत. किशोरवयीन मुलांचे पालकत्व हे सध्या आव्हानात्मक बनत आहे.- पूनम गायकवाड, मानसोपचार तज्ज्ञ

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीMobileमोबाइलSangliसांगली