शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
4
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
5
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
6
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
7
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
8
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
9
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
10
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
11
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
12
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
13
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
14
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
15
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
16
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
17
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
18
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
19
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
20
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’

जिल्ह्यात कोरोनाचा कहर; १७ जणांचा मृत्यू; ९२१ नवे रुग्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2021 04:28 IST

सांगली : जिल्ह्यातील कोरोनास्थिती अधिक चिंताजनक होत असून, गुरूवारी दिवसभरात तब्बल १७ जणांचा मृत्यू झाला, तर ९२१ जणांना कोरोनाचे ...

सांगली : जिल्ह्यातील कोरोनास्थिती अधिक चिंताजनक होत असून, गुरूवारी दिवसभरात तब्बल १७ जणांचा मृत्यू झाला, तर ९२१ जणांना कोरोनाचे निदान झाले. वाळवा तालुका कोरोनाचा ‘हॉट स्पॉट’ ठरत असून सर्वाधिक १७९ जणांना लागण होत पाचजणांचा मृत्यू झाला आहे. २४५ जण कोरोनामुक्त झाले आहेत.

जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या वाढत असतानाच एकाचवेळी महापालिका क्षेत्रासह ग्रामीण भागातही रुग्ण वाढत आहेत. वाळवा तालुक्यात विक्रमी संख्येने रुग्ण आढळून येत आहेत. गुरुवारी १७ जणांचा मृत्यू झाला त्यात वाळवा तालुक्यातील ५, खानापूर ३, मिरज व पलूस प्रत्येकी २ तर मिरज शहर, जत, कडेगाव, कवठेमहांकाळ आणि शिराळा तालुक्यात प्रत्येकी एकाचा मृत्यू झाला आहे.

आरोग्य विभागाच्यावतीने गुरुवारी आरटीपीसीआर अंतर्गत २३९३ जणांच्या नमुन्यांची तपासणी केली त्यात ५८७ जणांना कोरोनाचे निदान झाले आहे. रॅपिड ॲन्टिजेनच्या १७०६ तपासणीतून ३६५ जण बाधित आढळले आहेत.

जिल्ह्यातील उपचार घेत असलेल्या रुग्णसंख्या सध्या वाढत आहेत. सध्या ५५२८ जण रुग्णालयात उपचार घेत आहेत. त्यातील ७३७ जणांची प्रकृती चिंताजनक आहे. यात ६५१ जण ऑक्सिजनवर तर ८६ जण व्हेंटिलेटरवर उपचार घेत आहेत. बाहेरच्या जिल्ह्यातील ३१ जण पॉझिटिव्ह आढळले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

चौकट

आतापर्यंतचे एकूण बाधित ५८४२०

उपचार घेत असलेले ५५२८

कोरोनामुक्त झालेेले ५१००३

आतापर्यंतचे एकूण मृत्यू १८८९

गुरुवारी दिवसभरात

सांगली १३०

मिरज ६३

वाळवा १७९

खानापूर ९०

मिरज, कडेगाव प्रत्येकी ८६

जत ८४

तासगाव ६१

कवठेमहांकाळ ४९

आटपाडी ३८

पलूस ३३

शिराळा २२