शहरं
Join us  
Trending Stories
1
मी २०२९ सालापर्यंत महाराष्ट्रातच राहणार; दिल्लीला जाण्याची शक्यता फडणवीस यांनी फेटाळली!
2
आजचे राशीभविष्य, २८ सप्टेंबर २०२५: अचानक धनलाभ होईल; आनंददायी बातमी मिळेल
3
पाकिस्तानी लष्करानेच केली होती शस्त्रसंधीसाठी विनंती; भारताने सुनावले खडेबोल!
4
भारत विरुद्ध इंडिया; शहरी-ग्रामीण विषमतेचा अर्थ आणि परिणाम काय?
5
तामिळनाडूत अभिनेता विजय यांच्या सभेत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा मृत्यू!
6
लेह हिंसाचार प्रकरण: वांगचूक जोधपूर तुरुंगात; पोलिसांकडून कसून चौकशी
7
आज पुन्हा युद्ध; आशिया चषक फायनलमध्ये भारत-पाक भिडणार!
8
टिकटॉक अमेरिकेत सुरूच राहणार, काय झाली डील?
9
बाबांचे पुस्तकप्रेम, आईची शिस्त अन् धैर्याची शिखरवारी! १३ वर्षांची धैर्या पोहोचली माउंट एलब्रुसवर
10
आधीच पुराने बेजार, त्यात आज पुन्हा 'मुसळधार'; मुंबई, ठाण्यात रेड अलर्ट
11
‘फुलराणी’ म्हणते, सध्या मी खेळणंच सोडून दिलंय..! सायना नेहवाल नेमकं काय म्हणाली?
12
‘बीएसएनएल’ची स्वदेशी ४जी सेवा कार्यान्वित, पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते उद्घाटन; स्वयंपूर्णतेकडे वाटचाल
13
अमेरिकेत १६ राज्यांचे ट्रम्प प्रशासनाविरुद्ध खटले;  लिंगाधारित अभ्यासक्र, निधी रोखण्याचा सरकारचा इशारा
14
'मी थरथर कापतोय कारण...'; चेंगराचेंगरीत ३६ जणांच्या मृत्यूनंतर अभिनेता विजयने सोडलं शहर
15
९ वर्षांच्या बेपत्ता मुलीला शोधायला लागले अन्... चेंगराचेंगरीचे कारण समोर, पाण्याच्या बाटल्या फेकत होता विजय
16
ओल्या संकटावर पुन्हा धो-धो प्रहार; मराठवाड्यात २,८८० गावांना तडाखा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्रालाही झोडपले
17
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
18
'दारुल इस्लाम'वर विश्वास ठेवणाऱ्यांना आधी 'जहन्नुम'मध्ये जावे लागेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा इशारा
19
"ठाकरेंना हात जोडून विनंती की...!" उद्धव ठाकरे यांच्या शेतकऱ्यांसंदर्भातील 'त्या' विधानावर गुलाबराव पाटलांची एका वाक्यात प्रतिक्रिया
20
पनवेलकडे जात असताना बाईक बेलापूर खाडीत कोसळली; एकाचा शोध लागला, दुसरा तरुण बेपत्ता

कोरोनामुळे २५,१०० टन बेदाणा शीतगृहातच; दरावरही परिणाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2020 01:21 IST

केवळ १०० कंटेनर निर्यात; सांगली, नाशिक जिल्ह्यातील माल पडून

सांगली : महाराष्ट्रातून दरवर्षी दोन हजार कंटेनरमधून युरोप, रशिया, युक्रेन, सौदी अरेबिया, दुबई, श्रीलंका, इंडोनेशिया या देशांना निर्यात होणाऱ्या २७ हजार टन बेदाण्यास यावर्षी ब्रेक लागला आहे. सांगली, नाशिक जिल्ह्यातील शीतगृहांत २५,१०० टन बेदाणा अडकून पडला आहे.

आतापर्यंत केवळ १०० कंटेनरमधून १९०० टन बेदाण्याची निर्यात झाली आहे. यामुळे द्राक्ष, बेदाणा उत्पादक शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे. देशातील द्राक्षाच्या एकूण उत्पादनापैकी ९५ टक्के उत्पादन महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यात घेतले जाते. त्यातील ७१ टक्के द्राक्षे खाण्यासाठी, तर २७ टक्के द्राक्षाचा वापर बेदाणा तयार करण्यासाठी होतो.

निर्यात मंदावल्याने स्थानिक दरही पडले

बेदाण्याला प्रतिकिलो ८० ते १२५ रुपयेपर्यंतच दर मिळत आहे. निर्यात मंदावल्याचा परिणाम स्थानिक सौद्यातील दरावरही झाला आहे. मध्यम प्रतीच्या बेदाण्यास प्रतिकिलो १२५ ते २०० रुपयेपर्यंत मिळणारा दर, सध्या केवळ ७० ते १२५ रुपय्आला आहे, असे येथील निर्यातदार मनोज मालू यांनी सांगितले.

नाशिक, सांगली, सोलापूर जिल्ह्यांचे अर्थकारण द्राक्षासोबत बेदाण्याभोवती केंद्रित झाले आहे. वर्षाला चारशे ते पाचशे कोटीपर्यंत बेदाण्याची उलाढाल होते. यावर्षी ती ठप्प झाली आहे. दर नसल्यामुळे द्राक्षबागायतदार आणि निर्यातदारांचे अर्थकारण बिघडले आहे. उत्पादन खर्चही पदरात पडत नाही, असे चित्र आहे.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस