शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: तोंडाला रुमाल बांधून आला अन् धाड, धाड; धारावीत भर बाजारात महिलेवर गोळीबार!
2
हिंजवडीत इमारतीवरून उडी मारून आयटी अभियंत्याची आत्महत्या, चिठ्ठीत लिहिले...
3
Badlapur: बदलापुरात रासायनिक कंपनीत आग!
4
Russia Ukraine War: 'रशियाकडे युद्ध थांबवण्याची शेवटची संधी' डोनाल्ड ट्रम्प यांचा पुतिन यांना इशारा!
5
मनसे कार्यकर्त्यांकडून कोचिंग सेंटरच्या संचालकाला मारहाण, कल्याण येथील व्हिडीओ व्हायरल
6
Sangli: नागपंचमीनिमित्त सांगलीत भाविकांना जिवंत नागांचे दर्शन घडणार, खेळावर बंदी कायम!
7
निशिकांत दुबेंना घेराव घातल्यानं राज ठाकरेंकडून वर्षा गायकवाड यांचे कौतुक, म्हणाले...
8
महापालिका निवडणुकीत आघाडी असणार की नाही, त्वरीत सांगा! पुण्यातून शरद पवार गटाची जाहीर मागणी
9
तब्बल ३८ तास बंद राहिला टोलनाका, तरीही २४ हजार लोकांनी प्रामाणिकपणे भरला टोल     
10
How To Deal With Heart Attack: घरात एकटे असताना 'हार्ट अटॅक' आला तर स्वत:चा जीव कसा वाचवाल? डॉक्टरांनी सांगितल्या 'या' सोप्या टिप्स
11
'नागपूरची लेक' वर्ल्ड चॅम्पियन दिव्या देशमुखला नितीन गडकरींचा 'व्हिडीओ कॉल', काय झाल्या गप्पा?
12
"महाराष्ट्राकडे 'बुद्धी आणि बळ' दोन्ही ओतप्रोत, ते जेव्हा..."; राज ठाकरेंकडून दिव्या देशमुखचं कौतुक
13
Pune Crime: 'छातीत दुखतंय', इंजिनिअर तरुण मीटिंग रुममधून उठला अन् सातव्या मजल्यावरून मारली उडी
14
वयोवृद्ध महिलेच्या खुनाचे रहस्य उलगडले, सावत्र मुलाला व पतीला अटक, गुन्हे शाखा दोनची कामगिरी
15
नागपुरला मिळाले ३५ वे पोलीस ठाणे; खापरखेडा पोलीस ठाणे आता नागपुरच्या कार्यकक्षेत
16
'अर्थव्यवस्था बंद करावी का?' रशियाकडून स्वस्त तेल खरेदी करण्याच्या वादाला भारताचे प्रत्युत्तर, आरसा दाखवला
17
Divya Deshmukh: बुद्धिबळाच्या पटावर नव्या 'क्वीन'चं राज्य! 'महाराष्ट्राची लेक' दिव्या देशमुख 'वर्ल्ड चॅम्पियन'; कोनेरु हम्पी उपविजेती
18
"ऑपरेशनला सिंदूर नाव देणं म्हणजे भावनांशी खेळ, एकाही देशाने साथ दिली नाही’’, अरविंद सावंत यांचा मोदी सरकारवर हल्लाबोल
19
'लाडकी बहीण योजनेला सुद्धा भ्रष्टाचारातून सुट्टी नाही'; रोहित पवारांचा अजित पवारांवर पलटवार, आदिती तटकरेंच्या खात्याचं प्रकरण काढलं
20
'शत्रूची किती विमानं पाडली, हे त्यांनी कधीच विचारलं नाही'; राजनाथ सिंह यांचा लोकसभेत राहुल गांधींवर निशाणा

कोरोनामुळे मृत्यूची छाया झाली गडद; मृत्यूपत्र करणाऱ्यांची संख्याही वाढतेय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2021 04:19 IST

सांगली : गेल्या दीड वर्षांपासून कोरोनाच्या सावटाखाली असलेल्या प्रत्येकाला आरोग्याची आणि भविष्याची चिंता सतावताना दिसत आहे. त्यामुळेच कोरोनाचा संसर्ग ...

सांगली : गेल्या दीड वर्षांपासून कोरोनाच्या सावटाखाली असलेल्या प्रत्येकाला आरोग्याची आणि भविष्याची चिंता सतावताना दिसत आहे. त्यामुळेच कोरोनाचा संसर्ग झाला नसला तरी भविष्यकालीन तरतुदी करण्यास अनेकजण प्राधान्य देत आहेत. आता कोरोनामुळे मृत्यूची शक्यता अधिक असल्याने अनेकांनी आपल्या पश्चात होणारे वाद टाळण्यासाठी मृत्यूपत्र करण्यास सुरुवात केली आहे.

कोरोना कालावधीअगोदर मृत्यूपत्रांचे प्रमाण खूपच नगण्य होते. उपनिबंधक कार्यालयात वकिलामार्फत ते करावे लागते. त्यात अशी मोठी वाढ झाली नसली तरी प्रमाण वाढले आहे.

शेती, संपत्तीवरून असलेले वाद, सांभाळण्यास दिलेला नकार आणि नाहक त्रासाला कंटाळून अनेकजण मृत्यूपत्र करत असतात. मृत्यूपत्र एकाच व्यक्तीच्या आणि कोणाच्याही नावावर करता येऊ शकते. वैद्यकीयदृष्ट्या सक्षम नसलेल्या व्यक्तीने मृत्यूपत्र करायची इच्छा व्यक्त केल्यास डॉक्टरांच्या देखरेखीखाली व वकिलांच्या उपस्थितीत ही प्रक्रिया करता येते. कोरोना काळात मात्र, असे एकही मृत्यूपत्र झालेले नाही. तरीही एकूण मृत्यूपत्रांचे प्रमाण वाढल्याचे चित्र आहे.

चौकट

साथ न देणाऱ्यांना उत्तर

सांगली जिल्ह्यात अगोदरपासूनच मृत्यूपत्राचे प्रमाण तुलनेने नगण्य आहे. उभारीच्या काळात नातेवाईकांनीच सोडलेली साथ, कुटुंबाने दिलेली वागणूक याला कंटाळून अनेकजण मृत्यूपत्र तयार करतात. आजारपणात अडचणीत सांभाळलेल्या व्यक्तीपोटी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठीही अनेकजण हा मार्ग अवलंबतात.

चौकट

आई - वडिलांनी मुलाला मोठ्या कष्टाने नोकरी लावली असतानाही लग्नानंतर पत्नी वारसदार बनते. यातून अनेक कुटुंबात अडचणी येतात. आई - वडिलांनाही मदत केली जात नाही, त्यामुळेच मग काही आई - वडीलही वारसा हक्कानुसार न्याय मागत असल्याची उदाहरणे आहेत.

चौकट

जिल्ह्यात वर्षाला साधारणपणे २० ते ३५ मृत्यूपत्राची नोंदणी होत असते. यातील काही नोंदणी या निबंधक कार्यालयात, तर काही नोटरीसुध्दा केल्या जातात. एखाद्या वर्षी त्यातही घट होत असली तरी आता मात्र याच प्रमाणात नोंद होत आहेत.

कोट

आपल्यानंतर संपत्तीवरून वादविवाद होऊ नयेत, यासाठी मृत्यूपत्र केले जाते. कोरोना काळात असे प्रमाण वाढले नसले तरी अनेकांना त्याची गरज वाटू लागली आहे. आरोग्याची काळजी घेणाऱ्यालाही मदत होते. त्यामुळे सध्या मृत्यूपत्राची प्रक्रिया होत आहे.

ॲड. दीपक हजारे

कोट

गेल्या दोन वर्षांपेक्षा मृत्यूपत्राचे प्रमाण वाढले असले तरी कोरोनामुळे वाढले असे वाटत नाही. आपल्याला जिवंतपणी आपला पैसा, संपत्ती बघून नव्हे, तर माणुसकीच्या नात्याने सांभाळणाऱ्या व्यक्तीस याव्दारे अधिकार दिले जातात.

ॲड. विक्रांत वडेर