शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election Results 2025: भाजपाचं 'शतक', ठाकरेसेना सगळ्यात मागे; सर्वाधिक नगराध्यक्ष कुणाचे? शिंदे-अजितदादांमध्ये 'टफ फाइट'
2
Loha Nagar Parishad Election Result 2025: लोह्यात भाजपाला घराणेशाहीचा मोठा फटका; एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव
3
भोकरदनमध्ये दानवे पिता-पुत्रांना मोठा धक्का, शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या समरीन मिर्जा विजयी; भाजपला किती जागा मिळाल्या? 
4
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 : 'एकदम ओक्के'! सर्वांनी एकट पाडलं, पण शहाजीबापूंनी मैदान मारलं; सांगोल्यात शिवसेनेचा मोठा विजय
5
Shahada Nagar Parishad Election Results 2025: २९ पैकी २० जागा भाजपाने जिंकल्या, पण नगराध्यक्षद जनता विकास आघाडीकडे
6
Bhagur Nagar Parishad Election Result 2025: २७ वर्षांची शिवसेनेची सत्ता गेली, भगूरमध्ये अजित पवार गटाचा मोठा विजय; ‘अशी’ झाली लढत!
7
Kankavali Nagar Parishad Election Result 2025: कणकवलीत भाजपा मंत्री नितेश राणेंना मोठा धक्का; शहर विकास आघाडीचे संदेश पारकर विजयी
8
Georai Nagar Parishad Election Result 2025: गेवराईत भाजपचे कमळ फुलले; नगराध्यक्षपदाच्या उमेदवार गीता पवार विजयी
9
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: राज्यात शिवसेनेची जोरदार फाईट, भाजपाही मजबूत; उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला किती जागा? जाणून घ्या
10
शूटिंग करताना अक्षय खन्नाला 'या' गोष्टीचा होतो त्रास, 'धुरंधर' अभिनेता म्हणाला- "रात्रीच्या वेळी मला..."
11
Maharashtra Nagar Palika Election Result: अमरावतीत १२ पैकी ४ निकाल हाती, बच्चू कडूंच्या 'प्रहार', भाजपचं काय झालं?
12
क्रूरतेचा कळस! कोंबडा बनवलं, नाक घासायला लावलं...; कचरा वेचणाऱ्या मुलांना अमानुषपणे मारलं
13
धोक्याची घंटा! डिजिटल युगाचा 'सायलेंट किलर'; १८ हजार वृद्ध विसरले घरचा पत्ता, ५०० जणांचा मृत्यू
14
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींवर अष्टविनायक कृपा, सरकारी नोकरी योग; अडकलेले पैसे येतील, धनलाभ!
15
Dharangoan Nagar Parishad Election Result 2025 : शिंदेसेनेचे मंत्री गुलाबराव पाटील यांना होमपीचवर मोठा धक्का; मविआ उमेदवाराचा मोठा विजय
16
Jawhar Nagar Parishad Election Result 2025: जव्हार नगरपरिषदेवर भाजपचा भगवा, १४ जागांवर उधळला गुलाल, पूजा उदावंत नगरध्यक्ष; शिंदे सेनेला फक्त एवढ्या जागा
17
बँका तुम्हाला क्रेडिट कार्ड घेण्यासाठी का आग्रह धरतात? कुठून होते त्यांची खरी कमाई?
18
Newasa Nagar Panchayat Elections Results 2025 : नेवासामध्ये शिंदेंच्या शिवसेनेचा नगराध्यक्ष, तर शंकरराव गडाखांचा दबदबा कायम
19
Vengurla Nagar Parishad Election Result 2025: दीपक केसरकरांना धक्का, वेंगुर्ल्यात भाजपाचा ७ जागांवर विजय; शिंदेसेनेला मिळाली १ जागा
20
'देश सोडू नका, अन्यथा परतणे कठीण'; अमेरिकेत नोकरी करणाऱ्या भारतीयांना गुगलचा इशारा!
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनामुळे मृत्यूची छाया झाली गडद; मृत्यूपत्र करणाऱ्यांची संख्याही वाढतेय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2021 04:19 IST

सांगली : गेल्या दीड वर्षांपासून कोरोनाच्या सावटाखाली असलेल्या प्रत्येकाला आरोग्याची आणि भविष्याची चिंता सतावताना दिसत आहे. त्यामुळेच कोरोनाचा संसर्ग ...

सांगली : गेल्या दीड वर्षांपासून कोरोनाच्या सावटाखाली असलेल्या प्रत्येकाला आरोग्याची आणि भविष्याची चिंता सतावताना दिसत आहे. त्यामुळेच कोरोनाचा संसर्ग झाला नसला तरी भविष्यकालीन तरतुदी करण्यास अनेकजण प्राधान्य देत आहेत. आता कोरोनामुळे मृत्यूची शक्यता अधिक असल्याने अनेकांनी आपल्या पश्चात होणारे वाद टाळण्यासाठी मृत्यूपत्र करण्यास सुरुवात केली आहे.

कोरोना कालावधीअगोदर मृत्यूपत्रांचे प्रमाण खूपच नगण्य होते. उपनिबंधक कार्यालयात वकिलामार्फत ते करावे लागते. त्यात अशी मोठी वाढ झाली नसली तरी प्रमाण वाढले आहे.

शेती, संपत्तीवरून असलेले वाद, सांभाळण्यास दिलेला नकार आणि नाहक त्रासाला कंटाळून अनेकजण मृत्यूपत्र करत असतात. मृत्यूपत्र एकाच व्यक्तीच्या आणि कोणाच्याही नावावर करता येऊ शकते. वैद्यकीयदृष्ट्या सक्षम नसलेल्या व्यक्तीने मृत्यूपत्र करायची इच्छा व्यक्त केल्यास डॉक्टरांच्या देखरेखीखाली व वकिलांच्या उपस्थितीत ही प्रक्रिया करता येते. कोरोना काळात मात्र, असे एकही मृत्यूपत्र झालेले नाही. तरीही एकूण मृत्यूपत्रांचे प्रमाण वाढल्याचे चित्र आहे.

चौकट

साथ न देणाऱ्यांना उत्तर

सांगली जिल्ह्यात अगोदरपासूनच मृत्यूपत्राचे प्रमाण तुलनेने नगण्य आहे. उभारीच्या काळात नातेवाईकांनीच सोडलेली साथ, कुटुंबाने दिलेली वागणूक याला कंटाळून अनेकजण मृत्यूपत्र तयार करतात. आजारपणात अडचणीत सांभाळलेल्या व्यक्तीपोटी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठीही अनेकजण हा मार्ग अवलंबतात.

चौकट

आई - वडिलांनी मुलाला मोठ्या कष्टाने नोकरी लावली असतानाही लग्नानंतर पत्नी वारसदार बनते. यातून अनेक कुटुंबात अडचणी येतात. आई - वडिलांनाही मदत केली जात नाही, त्यामुळेच मग काही आई - वडीलही वारसा हक्कानुसार न्याय मागत असल्याची उदाहरणे आहेत.

चौकट

जिल्ह्यात वर्षाला साधारणपणे २० ते ३५ मृत्यूपत्राची नोंदणी होत असते. यातील काही नोंदणी या निबंधक कार्यालयात, तर काही नोटरीसुध्दा केल्या जातात. एखाद्या वर्षी त्यातही घट होत असली तरी आता मात्र याच प्रमाणात नोंद होत आहेत.

कोट

आपल्यानंतर संपत्तीवरून वादविवाद होऊ नयेत, यासाठी मृत्यूपत्र केले जाते. कोरोना काळात असे प्रमाण वाढले नसले तरी अनेकांना त्याची गरज वाटू लागली आहे. आरोग्याची काळजी घेणाऱ्यालाही मदत होते. त्यामुळे सध्या मृत्यूपत्राची प्रक्रिया होत आहे.

ॲड. दीपक हजारे

कोट

गेल्या दोन वर्षांपेक्षा मृत्यूपत्राचे प्रमाण वाढले असले तरी कोरोनामुळे वाढले असे वाटत नाही. आपल्याला जिवंतपणी आपला पैसा, संपत्ती बघून नव्हे, तर माणुसकीच्या नात्याने सांभाळणाऱ्या व्यक्तीस याव्दारे अधिकार दिले जातात.

ॲड. विक्रांत वडेर