सांगली : जिल्ह्यात शुक्रवारी दिवसभरात ३२ जणांना कोरोनाचे निदान झाले. उपचार घेत असलेल्या ४३ जणांनी कोरोनावर मात केली असून, तिघांचा मृत्यू झाला आहे. बाधितांपेक्षा बरे होणाऱ्यांचे प्रमाण पुन्हा एकदा वाढल्याने दिलासा मिळाला आहे.
जिल्ह्यातील उपचार घेत असलेल्या रुग्णांपैकी तिघांचा मृत्यू झाला आहे. यात कडेगाव, खानापूर आणि वाळवा तालुक्यांतील प्रत्येकी एकाचा समावेश आहे. यामुळे जिल्ह्यातील कोरोनाबळींची संख्या १७२० वर पोहोचली आहे. महापालिका क्षेत्रात पुन्हा एकदा एकाही मृत्यूची नोंद झालेली नाही.
उपचार घेत असलेल्या ३७६ रुग्णांपैकी ६४ जणांची प्रकृती चिंताजनक असून, यातील ५४ जण ऑक्सिजनवर, तर १० जण व्हेंटिलेटरवर उपचार घेत आहेत.
शुक्रवारी आरोग्य विभागाच्यावतीने आरटीपीसीआरअंतर्गत ४८६ जणांच्या नमुन्यांची तपासणी करण्यात आली. त्यात २१ जणांना कोरोनाचे निदान झाले आहे, तर रॅपिड ॲन्टिजेनच्या १४४० जणांच्या तपासणीतून १२ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. सोलापूर जिल्हयातील एकास कोराेनाचे निदान झाले आहे.
चौकट
आतापर्यंतचे एकूण बाधित ४७१९७
उपचार घेत असलेले ३७६
कोरोनामुक्त झालेले ४५१०१
आतापर्यंतचे एकूण मृत्यू १७२०
शुक्रवारी दिवसभरात
सांगली २
कडेगाव ८
मिरज तालुका ६
खानापूर ३
तासगाव, शिराळा, जत प्रत्येकी २
पलूस, वाळवा प्रत्येकी १