शहरं
Join us  
Trending Stories
1
लंडनमध्ये १ लाखाहून अधिक स्थलांतर विरोधी निदर्शक रस्त्यावर उतरले, अनेक पोलिसांवर हल्ला
2
आजचे राशीभविष्य- १४ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस फायद्याने भरलेला, पण हितशत्रूंपासून सावध राहा
3
पोलिसांच्या ८ तासांच्या ड्युटीचे काय झाले? मनुष्यबळ वाढल्यास ८ तासांची ड्युटी शक्य
4
तुम्ही आता मागास झालात, आपआपसात विवाह ठरवूया; प्रा. लक्ष्मण हाके यांचा मनोज जरांगे यांना प्रस्ताव
5
अंगात 'सिंदूर' नव्हे तर खरी देशभक्ती भिनली पाहिजे; उद्धव ठाकरे यांची भाजपवर टीका
6
'एआय'मुळे खासगी आयुष्य धोक्यात! चेहऱ्यांचे बनावट फोटो, खोटे आवाज, सही याचा गैरवापर
7
आशिया चषकात दुबईच्या मैदानावर आज भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज द्वंद्व
8
सर्व्हर डाऊनमुळे शेकडोंची 'स्टाफ सिलेक्शन' परीक्षा हुकली; केंद्रावर झाला गोंधळ : पोलिसांना केले पाचारण
9
तुम्हीही शौचालयात मोबाइल घेऊन जाता का?
10
एसईबीसी आरक्षणावर काय परिणाम होईल? मराठा आरक्षणावरील नव्या जीआरबाबत हायकोर्टाची राज्य सरकारला विचारणा
11
कोर्टाचे वारंवार निर्देश म्हणजे आमच्या अधिकारांवर गदा; निवडणूक आयोग म्हणाले, एसआयआर विशेषाधिकार
12
नवरात्रीत लवकर देवीदर्शन हवंय, दामदुप्पट मोजा; मंदिर प्रशासनाने केली शुल्कात वाढ
13
हिंसाचार सोडा, शांतीचा मार्ग स्वीकारा; मणिपूरला शांततेचे प्रतीक बनवू ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आवाहन
14
अमेरिकेनं ओसामा संपवला, पण त्याच्या बायकांचं काय झालं? पाकिस्तानच्या माजी राष्ट्रपतीच्या सहकाऱ्यानं सागितलं
15
IND vs PAK: गंभीरनं टीम इंडियातील खेळाडूंना स्पष्ट सांगितलंय की...; सहाय्यक कोच नेमकं काय म्हणाले?
16
याला म्हणतात 'दृढनिश्चय'...! मणिपूरमध्ये पाऊस बनला अडथळा, मग पंतप्रधान मोदींनी 'हा' मार्ग अवलंबला! 
17
Asia Cup 2025 Points Table : भारत-पाक लढतीआधी लंकेची विजयी सलामी! तरीही अफगाणिस्तान ठरले भारी!
18
नेपाळ हिंसाचारासंदर्भात CM योगी आदित्यनाथ यांचं मोठं विधान; म्हणाले - "छोट्या-छोट्या गोष्टींकडे..."
19
BAN vs SL : श्रीलंकेचा डंका! एका पराभवासह बांगलादेश संघ स्पर्धेतून OUT होण्याच्या उंबरठ्यावर
20
चार दिवसांत थंड व्हाल, हिंम्मत असेल तर कारागृहात पाठवून दाखवा; प्रशांत किशोर यांचं संजय जायसवाल यांना आव्हान

बाजार समितीच्या विकासासाठीच एकत्र

By admin | Updated: July 25, 2015 01:13 IST

मोहनराव कदम : वांगी येथे शेतकरी विकास पॅनेल प्रचारार्थ बैठक

वांगी : तालुकास्तरीय राजकारण बाजूला ठेवून बाजार समितीच्या विकासासाठी आम्ही एकत्र आलो आहोत. तरी सर्व कार्यकर्त्यांनी कामाला लागून जास्तीत जास्त मतदान करवून घेणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन कॉँग्रेसचे जिल्हाध्यक्ष मोहनराव कदम यांनी केले.वांगी (ता. कडेगाव) येथे सोनहिरा साखर कारखान्याजवळ कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पंचवार्षिक निवडणुकीनिमित्त शेतकरी विकास पॅनेलच्या प्रचारार्थ आयोजित बैठकीत ते बोलत होते.कदम म्हणाले, आम्ही कधीही लबाडीचे राजकारण केले नाही. सर्व मित्रपक्षांना बरोबर घेऊन शेतकरी विकास पॅनेल तयार केले आहे. आमच्याबरोबर माजी आमदार पृथ्वीराज देशमुख, आमदार अनिल बाबर यांच्यासह अन्य मंडळी असून ही निवडणूक विकासाच्या मुद्यावर लढविणार आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांनी गट-तट विसरून पॅनेलच्या विजयासाठी प्रयत्न केले पाहिजेत. तालुक्यात असणारे एक न् एक मत हे झालेच पाहिजे. यासाठी युवक कार्यकर्त्यांनी पुढाकार घेतला पाहिजे. या पॅनेलमध्ये नवीन युवकांना संधी दिली आहे. त्यांनी या संधीचे सोने करून दाखविणे गरजेचे आहे. सोनहिरा कारखान्याने ताकारी योजनेसाठी ८२ लाख रूपये जमा केले असून योजनेचे पाणी लवकर शेतकऱ्यांना मिळण्यासाठी प्रयत्न करणार आहे.यावेळी नथुराम पवार, सुभाष मोरे, दीपक शिंदे यांनी मनोगत व्यक्त केले. पंचायत समिती सदस्य सखाराम सूर्यवंशी, व्यंकटराव पवार, वांगीच्या सरपंच मनीषा कांबळे, सुभाष मोरे, येवलेवाडीचे माजी सरपंच संभाजी जगताप, पांडुरंग पोळ, बाबासाहेब सूर्यवंशी, धनाजी सूर्यवंशी, ‘सोनहिरा’चे संचालक दिलीप सूर्यवंशी, युवराज कदम, माजी उपसभापती मोहन मोरे, संजय साळुंखे, अधिकराव जाधव यावेळी उपस्थित होते. (वार्ताहर)