शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025: घासून नाही ठासून जिंकली मॅच! राजस्थान रॉयल्सला 'आउट' करत मुंबई इंडियन्स टॉपला
2
मतदार याद्यांमधील घोळ कमी होणार! निवडणूक आयोग करणार हे महत्त्वाचे बदल, जाणून घ्या सविस्तर
3
IPL 2025 : रोहित शर्माचा बॉल बॉयसोबतचा व्हिडिओ होतोय व्हायरल; नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
"दहशतवाद्यांनाही त्यांच्या कुटुंबीयांसमोर गोळ्या घालाव्यात’’, पहलगाममध्ये मृत्युमुखी पडलेल्या शुभम यांच्या पत्नीची मागणी 
5
...अन् हिटमॅन रोहितनं युवा बॅटर वैभवला पुन्हा हिमतीनं मैदानात उतरण्यासाठी दिलं बळ
6
काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या गिरिजा व्यास यांचं निधन, पूजा करताना साडीला आग लागून झाल्या होत्या गंभीर जखमी
7
जे रोहित-विराटलाही नाही जमलं ते सूर्या भाऊनं करून दाखवलं; मोडला ११ वर्षांपूर्वीचा विक्रम
8
बुलढाण्यात जळका भडंग नजिक एसटी बस उलटली; दिवसभरात किरकोळ अपघातांची मालिका सुरूच
9
जातनिहाय जनगणनेनंतर आता काँग्रेसचा आणखी मोठा डाव, मल्लिकार्जुन खर्गेंनी केली अशी मागणी
10
केवळ युद्धाच्या नावानेच पाकिस्तानला भरलीय धडकी, बंद केले पीओकेतील 1000 हून अधिक मदरसे!
11
IPL 2025 : विक्रमी शतकवीर वैभवच्या पदरी भोपळा! विकेट गमावल्यावर १४ वर्षांच्या पोरानं डोळे मिटले अन्...
12
भारतासाठी गुड न्यूज...! सीमेवर तणावाची स्थिती असतानाच मोठी मदत करणार अमेरिका; पाकिस्तानचं टेन्शन वाढणार!
13
"मुस्लिम आणि काश्मिरींविरोधात द्वेष पसरवू नका’’, पहलगाममध्ये हत्या झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीचं आवाहन
14
"जातीनिहाय जनगणनेसाठी गळा काढणारे शरद पवार, उद्धव ठाकरे आता गप्प का?"; भाजपाचा सवाल
15
भारतासोबतचा तणाव कमी करण्यासाठी पाकिस्तानची ट्रम्प यांच्याकडे धाव, म्हणाला मोठ्या...
16
सरकार जात विचारणार, पण एखाद्याने जात सांगितली नाही तर? याबाबत कायदा काय सांगतो  
17
RR vs MI : एक सेकंद बाकी असताना DRS घेतल्यामुळे वाचला; मग रोहितनं फिफ्टीसह नवा इतिहास रचला
18
"घर में घुसकर मारेंगे नहीं, अब घर में घुस के...!"; पाकिस्तान विरुद्ध निर्णायक युद्ध करण्याची ओवेसी यांची मागणी, बघा VIDEO
19
IPL 2025: राजस्थान रॉयल्सला मोठा धक्का! स्टार गोलंदाज दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर
20
Mumbai RTO: महिलेकडून आरटीओ कर्मचाऱ्याला मारहाण, कार्यालयातही तोडफोड; मुंबईतील घटना

आतापर्यंतच्या टोल वसुलीचा हिशेब द्या

By admin | Updated: November 22, 2014 00:04 IST

आयुक्त : महापालिकेचे ‘एमएसआरडीसी’ला पत्र

कोल्हापूर : शहरात ३० टक्क्यांपेक्षा कमी टोलवसुली होत आहे. त्यामुळे अपूर्ण कामे करण्यास ‘आयआरबी’ कंपनीने असमर्थता दर्शविली आहे. या पार्श्वभूमीवर ‘आयआरबी’ची २५ कोटींची अनामत रक्कम जप्त करण्याची हालचाल महापालिकेने सुरू केली. आज, शुक्रवारी आयुक्त विजयालक्ष्मी बिदरी यांनी महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालकांकडे टोलचा संपूर्ण हिशेब देण्याची मागणी करीत दुसरा दणका दिला. या आधारे टोलवसुलीतून नुकसान होत असल्याचा ‘आयआरबी’चा दावा फोल ठरविण्याचा महापालिकेचा इरादा आहे. एकात्मिक रस्तेविकास प्रकल्पातील करारानुसार प्रलंबित व अपूर्ण कामे पूर्ण करावीत, असे १ आॅक्टोबर २०१४ रोजी महापालिकेने पत्राद्वारे ‘आयआरबी’ला कळविले होते. ही मागणी फेटाळत ‘आयआरबी’ने उद्दिष्टापेक्षा ३० टक्क्यांनी कमी टोलवसुली होत आहे. कृती समितीचे आंदोलन व नागरिकांतील रोष यांमुळे कामे करण्यास अडचणी येत आहेत. शहरातील या अपूर्ण कामांचा दर चार वर्षांपूर्वीच्या ‘डीएसआर’नुसार आहे. त्यामुळे रंकाळा-जुना वाशीनाक्यासह इतर कामे करणे सध्या तरी अशक्य असून, ही अपूर्ण कामे कंपनीने केलेल्या जादा कामाच्या खर्चातून महापालिकेनेच करावीत, असे ‘आयआरबी’ व्यवस्थापनाने १७ आॅक्टोबर २०१४ च्या पत्राद्वारे कळविले आहे. यानंतर महपालिकेने चार दिवसांपूर्वी नगरविकास सचिव श्रीकांत सिंह यांच्याकडे ‘आयआरबी’ ची २५ कोटींची अनामत रक्कम जप्त करण्याची विनंती केली होती.शहरात टोलवसुली सुरू झाल्यापासून आजअखेर किती वाहने शहरात आली व गेली, ‘आयआरबी’ने किती टोलवसुली केली, याचा सर्व हिशेब व माहिती देण्याची विनंती आयुक्तांनी रस्ते महामंडळाकडे केली आहे. महामंडळाने खरी व वेळेत माहिती दिल्यास ३० टक्केच टोलवसुली होत आहे, हा ‘आयआरबी’चा मुद्दा खोडून २५ कोटी अनामत रक्कम जप्तीचा मार्ग खुला होणार आहे. आयुक्तांच्या या दणक्याने ‘आयआरबी’ला शहरातील उर्वरित अपूर्ण कामे पूर्ण करण्याशिवाय गत्यंतर राहणार नाही. (प्रतिनिधी)आठवड्यात दुसरा दणका‘आयआरबी’ची अनामत रक्कम जप्त करण्याच्या हालचाली महापालिकेने सुरू केल्या आहेत. आता टोलवसुलीच्या हिशेबाच्या आधारे ‘आयआरबी’ला खोटे पाडण्याचा डाव महापालिकेने आखला आहे. टोलमुक्तीबाबत राज्य शासनाकडून हालचाली झाल्यास प्रकल्पाची किंमत ठरविण्यासाठीही याचा उपयोग होणार आहे. या प्रशासकीय खेळीमुळे आयआरबीची गोची होणार असल्याची चर्चा महापालिकेत सुरू आहे.