शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेस सिद्धारामय्यांना हटवणार? कर्नाटकात CM पदावरून पुन्हा वाद पेटला, डीके गटातील आमदारांनी दिल्लीत तळ ठोकला
2
चीन-जपान तणावात भारताची 'बल्ले-बल्ले'! झाला बंपर फायदा, बाजार 11% नं वधारला; आता ट्रम्प टॅरिफचं 'नो-टेंशन'!
3
पाकिस्तानचे डोळे उघडले! चक्क चक्क चिनी कंपन्यांना ठणकावले; म्हणाले, 'आमची लूट थांबवा, अन्यथा काम बंद करा'
4
"बौद्ध धर्माचे पालन करतो, पण..., आज जो काही आहे तो..."; निवृत्तीपूर्वी CJI बीआर गवई यांचं मोठं विधान!
5
जेव्हा मुख्यमंत्री नितीश कुमार पंतप्रधान मोदींच्या पायाला स्पर्श करण्यासाठी वाकले..., पाटणा विमानतळावरील 'आदराचं' अद्भुत दृश्य - Video
6
भाजपने आणखी एक नगरपालिका बिनविरोध जिंकली; मविआच्या तिन्ही उमेदवारांनी अर्ज मागे घेतले... 
7
Breaking: भारत - इस्रायल समृद्धीच्या नव्या पर्वाचे 'टेक ऑफ'; मुक्त व्यापार करार, थेट विमानसेवा अन् बरंच काही...
8
मोठी बातमी! लुधियाना टोल प्लाझाजवळ पोलीस आणि दहशतवाद्यांमध्ये भीषण चकमक; परिसरात गोळीबाराचा आवाज
9
IND vs SA: शुबमन गिलच्या दुखापतीबद्दल बॅटिंग कोचने दिली महत्त्वाची अपडेट, म्हणाले...
10
२०० महिलांनी कोर्टातच घेतला जीव; मालेगावात जे घडता घडता राहिलं ते नागपूरमध्ये झालं होतं
11
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला धक्का, अनिल देशमुख यांचे पुत्र सलिल देशमुख यांचा राजीनामा
12
Viral : जगातला सगळ्यात आळशी व्यक्ती! स्पर्धा जिंकण्यासाठी तब्बल 'इतके' तास गादीवर झोपून राहिला
13
'अनगरच्या पाटलांचा माज आम्ही उतरवणार, चुकीला माफी नाही'; अजित पवारांच्या नेत्याचा थेट इशारा
14
बंगालमध्ये 'घमासान'! "परिस्थिती अत्यंत बिघडलीये, SIR त्वरित थांबवा..."; ममता बॅनर्जींच CECना पत्र, आणखी काय म्हणाल्या?
15
IND vs SA: हार्दिक पांड्या आफ्रिकेविरूद्धच्या वनडे मालिकेत खेळणार की नाही? वाचा ताजी अपडेट
16
लाकडाचेच ते...! चीनमधील १,५०० वर्षे जुन्या प्राचीन मंदिराचे पॅव्हेलिअन पेटले; पर्यटकांनी मेणबत्ती लावली अन्...
17
भारतात विकली जाणारी टेस्ला मॉडेल Y किती सुरक्षित; युरो एनकॅप क्रॅश टेस्टमध्ये मिळवले 'एवढे' स्टार रेटिंग!
18
पश्चिम बंगालमध्ये ९०० मतदारांची नावे यादीतून गायब; निवडणूक आयोगाचा संताप, बीएलओंवर कारवाईचे आदेश
19
लोकांचे पैसे गुंतविता गुंतविता Groww ने १९,००० कोटींचे नुकसान केले; गुंतवणूकदार डोके धरून बसले...
20
पती नव्हे राक्षस! पत्नीने मित्रांना विरोध केला म्हणून मारहाण, गर्भपात आणि नंतर अश्लील व्हिडीओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

करार शेती, एपीएमसी कायदे हे कॉंग्रेस-राष्ट्रवादीचीच देण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2021 12:52 IST

Agriculture Sector Sangli- महाराष्ट्रात कृषी उत्पन्न बाजार समिती (एपीएमसी) व करार शेती याबाबतचा सुधारित कायदा सन २००५-०६ रोजी तत्कालीन कॉंग्रेस- राष्ट्रवादी कॉंग्रेस सरकारनेच पारित केलेला आहे. त्यात न्यायालयीन अपिलाची संधी नाकारली गेली आहे. त्याचेच अनुकरण केंद्र सरकारने नवीन कायदे करताना केले. त्यामुळे ही काँग्रेस, राष्ट्रवादीचीच देण आहे, अशी टीका रिपब्लिकन स्टुडंट युनियनचे महासचिव अमोल वेटम यांनी केली आहे.

ठळक मुद्देकरार शेती, एपीएमसी कायदे हे कॉंग्रेस-राष्ट्रवादीचीच देन महाराष्ट्राचेच केंद्राकडून अनुकरण : अमोल वेटम

सांगली : महाराष्ट्रात कृषी उत्पन्न बाजार समिती (एपीएमसी) व करार शेती याबाबतचा सुधारित कायदा सन २००५-०६ रोजी तत्कालीन कॉंग्रेस- राष्ट्रवादी कॉंग्रेस सरकारनेच पारित केलेला आहे. त्यात न्यायालयीन अपिलाची संधी नाकारली गेली आहे. त्याचेच अनुकरण केंद्र सरकारने नवीन कायदे करताना केले. त्यामुळे ही काँग्रेस, राष्ट्रवादीचीच देण आहे, अशी टीका रिपब्लिकन स्टुडंट युनियनचे महासचिव अमोल वेटम यांनी केली आहे.पत्रकात त्यांनी म्हटले आहे की, २७ डिसेंबर २००५ रोजी तत्कालीन कॉंग्रेस- राष्ट्रवादी कॉंग्रेस सरकारने महाराष्ट्र कृषी उत्पन्न बाजार (रेगुलेशन) सुधारित कायदाबाबतचे राजपत्र प्रसिद्ध केले. तसेच दि.१९ जुलै २००६ रोजी महाराष्ट्र कृषी उत्पन्न बाजार (डेव्हलपमेंट आणि रेग्युलेशन) सुधारित कायदा २००६ बाबतचे राजपत्र प्रसिद्ध केले. या कायद्यामध्ये करार शेतीबाबत स्पष्ट उल्लेख आहे.

या कायद्याला राज्यपाल यांची कायदेशीर मान्यता त्यावेळी दिली आहे. या पारित केलेल्या करार शेतीच्या अनुषंगाने कंपनी / प्रायोजक आणि शेतकरी या दोघांच्या सहमतीने काम करणे अभिप्रेत होते, पण काही वाद उद्भवल्यास तो तडजोड प्राधिकरणाकडे घेऊन जाण्यात येईल, तसेच याबाबत अपील प्राधिकरण यांचा निर्णय हा शेवटचा असेल, याबाबत शेतकऱ्यांना निर्णयाविरोधात कोणत्याही कोर्टात जाण्याचा अधिकार नाही, असे या राजपत्रात नमूद आहे. अशी अट म्हणजे एकप्रकारे हुकुमशाहीच आहे.पारित केलेले हे राजपत्र व कायदे सध्याच्या राज्य अधिवेशनात त्वरित रद्द करणे अपेक्षित होते, पण तसे झाले नाही. याबाबत सर्व शेतकऱ्यांनी केंद्र तसेच राज्य सरकारची राजकीय खेळी ओळखावी व सावध व्हावे असे आवाहन वेटम यांनी केले आहे. 

टॅग्स :Agriculture Sectorशेती क्षेत्रSangliसांगली