शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ; भाजपा मित्रपक्षालाच देणार धक्का?; आमदार फुटीची चर्चा
2
Devayani Farande: डोळ्यात पाणी, आवाजही गहिवरला...! नाशिकमधील पक्षप्रवेशानंतर भाजपा आमदार देवयानी फरांदे भावूक
3
"मूर्ती तोडण्यामागे धार्मिक हेतू नाही, तर...!"; भगवान विष्णू यांची मूर्ती पाडल्याबद्दल भारतानं व्यक्त केली होती चिंता, आता थायलंडनं दिलं असं स्पष्टीकरण
4
"चीन भारतासोबतचे संबंध विकसित करण्यावर भर देतो, कोणत्याही तिसऱ्या देशाला..."; अमेरिकेच्या अहवालावरून चीन भडकला
5
‘मी स्नेहाची हत्या केलेली नाही…’, पँटवर लिहून प्रियकरानं संपवलं जीवन, पोलिसांवर गंभीर आरोप
6
२०२६ मध्ये कोणाची साडेसातीतून मुक्तता होणार? ५ राशींवर शनि वक्री दृष्टी; सतर्क-सावध राहावे!
7
क्रिश का गाना सुनेगा..? अचानक २० वर्षांनी रंगली तुफान चर्चा, 'ले बेटा' वाला Video Viral
8
श्रीमंत व्हायचंय? 'रिच डॅड पुअर डॅड'च्या लेखकाचा गुंतवणुकीचा नवा 'मंत्र', चांदी विषयी केलं मोठं भाकित
9
मुंबईतील उत्तर भारतीयांना OBC आरक्षण मिळणार?: शिंदेसेनेचे नेते संजय निरुपम यांनी दिले संकेत
10
"हिंदू वेळीच एकवटला नाही तर भारतात गल्लोगल्ली बांगलादेशसारखा..."; धीरेंद्र शास्त्रींचा इशारा
11
“महानगरपालिकांमध्ये ‘वंचित’बरोबर आघाडी करण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न सुरू”: हर्षवर्धन सपकाळ
12
नवीन वर्षात करा नवीन भाषा शिकण्याचा संकल्प, मिळेल आयुष्याला कलाटणी; पाहा सोप्या टिप्स
13
३१ डिसेंबरला अयोध्येतील राम मंदिर खरोखरच बंद राहणार का? महत्त्वाची माहिती आली समोर
14
विधानसभेला संधी हुकली कृष्णराज महाडिक आता महापालिका निवडणूक लढवणार, प्रभागही ठरला!
15
धक्कातंत्र! कार्यालयाबाहेर निष्ठावंतांची घोषणाबाजी; आतमध्ये मविआ-मनसेतील ५ बड्या नेत्यांचा भाजपात प्रवेश
16
ना पोस्ट, ना लाइक, ना कमेंट...; आता जवानांना केवळ इंस्टाग्राम बघण्याचीच परवानगी
17
गुंतवणूकदारांनो लक्ष द्या! नवीन वर्षात शेअर बाजाराला १५ दिवस सुट्टी; एनएसईकडून कॅलेंडर प्रसिद्ध
18
नाताळाला गालबोट; महाराष्ट्र, केरळसह काही राज्यांत तोडफोड अन् झटापटीच्या घटना...
19
“मी खरा वाघ आहे, त्यांच्यासारखा कागदी नाही”; रावसाहेब दानवेंचे ठाकरे बंधूंना प्रत्युत्तर
20
कर्क राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? स्वप्नपूर्ती आणि मानसन्मानाचे वर्ष; पण आरोग्याबाबत राहा सतर्क!
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील ८३ गावांत दूषित पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2017 23:49 IST

जिल्ह्यातील ८३ गावांत दूषित पाणी

लोकमत न्यूज नेटवर्कसांगली : जिल्ह्यातील ८३ गावांतील पाण्याचे १२५ नमुने दूषित आढळून आले असून टीसीएल पावडरचे १६६ नमुनेही निकृष्ट दर्जाचे सापडले आहेत. या टीसीएल पावडरमध्ये क्लोरिनचे प्रमाण ३० टक्केच्या पुढे असणे गरजेचे आहे. परंतु, तपासणी केलेल्या नमुन्यामध्ये ३० टक्केपेक्षा कमी क्लोरिनचे प्रमाण असल्यामुळे जिल्हा परिषदेकडून गावांना नोटिसा बजाविल्या आहेत. जिल्हा परिषदेकडून वारंवार पाण्याचे नमुने दूषित आढळून आलेल्या चोवीस गावांना पिवळे कार्ड दिले आहे.जिल्हा परिषदेकडून दर महिन्याला पाणी आणि टीसीएल पावडरच्या नमुन्यांची तपासणी केली जाते. जून २०१७ या महिन्यात जिल्ह्यातील गावांचे पाणी नमुने तपासणीसाठी घेतले होते. यामध्ये नऊ तालुक्यातील ८३ गावांतील १२५ पाण्याचे नमुने दूषित आढळून आले. आटपाडी तालुक्यातील खुद्द आटपाडी गावातील हजारो जनतेला दूषित पाणी प्यावे लागत आहे. तालुक्याच्या ठिकाणाबरोबरच १६ गावांतील २० पाण्याचे नमुने दूषित आहेत. आटपाडी तालुक्यातील ४३ गावांपैकी २७ गावातील टीसीएल पावडरचे नमुनेही निकृष्ट आढळले आहेत. टीसीएल पावडरमध्ये क्लोरिनचे प्रमाण ३० टक्के गरजेचे असताना, ते त्यापेक्षा कमी आढळून आले आहे. येथील ग्रामपंचायतींना टीसीएलचे प्रमाण जादा वापरण्याच्या जिल्हा परिषदेकडून सूचना दिल्या आहेत. मिरज तालुक्यातील माधवनगर, हरिपूर, बुधगाव, नांद्रेसह वीस गावांतील पाण्याचे नमुने दूषित आढळले आहेत. तसेच मिरज तालुक्यातील १२ गावांतील टीसीएल पावडरचे नमुने घेतले होते. त्यापैकी चार ठिकाणचे टीसीएल पावडरचे नमुने निकृष्ट आढळून आले आहेत. येथेही ग्रामपंचायतींना प्रमाणापेक्षा जादा टीसीएल पावडर वापरण्याच्या सूचना दिल्या आहेत.जत तालुक्यातील १०, कवठेमहांकाळ १५, तासगाव १७, पलूस पाच, वाळवा १२, शिराळा १० आणि खानापूर तालुक्यातील १६ ठिकाणचे पाण्याचे नमुने दूषित आढळले आहेत. टीसीएल पावडरचे नमुनेही निकृष्ट आढळले आहेत. त्यामुळे जादा प्रमाणात टीसीएल पावडर पाण्यात वापरण्याच्या सूचना ग्रामपंचायतींना जिल्हा परिषदेकडून दिल्या आहेत. कडेगाव तालुक्यातील एकाही गावामध्ये पाण्याचे दूषित नमुने आढळून आले नाही.दरम्यान, जिल्ह्यातील काही ग्रामपंचातीकडून वारंवार दुषित पाण्याचा पुरवठा होवूनही त्याकडे जिल्हा परिषद प्रशासन गांभीर्याने लक्ष देत नाही. त्यांच्यावर ठोस कारवाई होत नसल्याच्या नागरिकांच्या तक्रारी आहेत.दूषित पाणी नमुने आढळलेली गावे...आटपाडी तालुका : आटपाडी, मिटकी, पुजारवाडी, देशमुखवाडी, पात्रेवाडी, कौठुळी, कुरूंदवाडी, विभूतवाडी, झरे, घरनिकी, कामत, घानंद, बोंबेवाडी, लेंगरेवाडी, करगणी, माळेवाडी, जत : लोहगांव, हळ्ळी, उटगी, उमदी, बेळोंडगी, बालगांव, कवठेमहांकाळ : आगळगांव, आरेवाडी, ढालगांव, अलकुड एस, कोकळे, बसप्पावाडी, धुळगांव, जायगव्हाण, मळणगांव, शिरढोण, लांडगेवाडी, मिरज : गुंडेवाडी, कदमवाडी, खंडेराजुरी, नांद्रे, कर्नाळ, माधवनगर, हरिपूर, बेळंकी, बुधगावं, बिसूर, काकडवाडी, बेडग, तासगाव : सावर्डे, वासुंबे, बलगवडे, पेड, नरसेवाडी, नागेवाडी, सावळज, पलूस : दुधोंडी, दह्यारी, तुपारी, सुर्यगांव, हजारवाडी, वाळवा : कोरेगांव, फाणेवाडी, येडेनिपाणी, भडकंबे, वाळवा, शिरगांव, जुनेखेड, बावची. शिराळा : आरळा, कणदूर, चिखली, भाटशिरगांव, शिरसटवाडी, शेडगेवाडी, बिळाशी, मांगरूळ. खानापूर : पारे, वाझर, आळसंद, कळंबी, लेंगरे, भेंडवडे, साळशिंगे, करंजे.