शहरं
Join us  
Trending Stories
1
'जीएसटी कपातीमुळे अर्थव्यवस्थेला मोठी चालना'; पंतप्रधान मोदींच्या भाषणानंतर CM फडणवीसांनी मानले आभार
2
IND vs PAK : हार्दिक पांड्यानं सलामीवीराचं काम केलं होतं तमाम, पण अभिषेक शर्मानं कॅच सोडला अन्...(VIDEO)
3
'उद्यापासून सर्वांचे तोंड गोड होणार'; GST रिफॉर्मची पंतप्रधान मोदींकडून घोषणा, म्हणाले, 'नागरिक देवो भव'
4
IND vs PAK: सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला अन् ती चिंताही मिटली! बुमराहसह वरुण चक्रवर्तीचंही कमबॅक
5
इस्रायलला मोठा धक्का; ब्रिटनसह ३ देशांची पॅलेस्टाईनला स्वतंत्र देश म्हणून मान्यता
6
यूपी एटीएसने तीन संशयितांना भिवंडीतून पकडलं; पैसे गोळा करुन पॅलेस्टाइनला पाठवल्याचा आरोप
7
जीएसटी कपातीच्या पूर्वसंध्येलाच घोषणा; MG Hector १.४९ लाख, Gloster  ३.०४ लाख तर Astor एवढ्या हजारांनी कमी झाली...
8
'भारतीयांनी घाम गाळून तयार केलेल्याच गोष्टी घ्या'; ट्रम्प टॅरिफवरुन PM मोदींचे देशवासियांना आवाहन
9
'९९% वस्तू ५% GST स्लॅबमध्ये येणार', PM मोदींनी सांगितले नवीन जीएसटी सुधारणांचे फायदे...
10
खोटी वचनं देऊन नर्सला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, लग्नाचा तगादा लावताच खरं रूप दाखवलं! ऐकून होईल संताप
11
२२ सप्टेंबरपासून 'या' वस्तूंच्या किमतीत कोणताही बदल नाही; तुमच्या यादीत आहे का?
12
जातीऐवजी आर्थिक निकषावरील आरक्षणाला सुप्रिया सुळेंचा पाठिंबा? नेमकं काय म्हणाल्या वाचा...
13
उद्यापासून अनेक वस्तू होणार स्वस्त! पाहा तुमच्या घरातील कोणत्या गोष्टींवर किती जीएसटी लागणार...
14
AUS vs IND : वैभव सूर्यवंशीचा ऑस्ट्रेलियात धमाका; हा फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी!
15
'महानायक' मोहनलाल; एका वर्षात दिले २५ ब्लॉकबस्टर चित्रपट, ५ वेळा मिळाला राष्ट्रीय पुरस्कार
16
भारताच्या शेजारील देश भूकंपाने हादरला; म्यानमारमध्ये ४.० तीव्रतेचा भूकंप, भारतावरही परिणाम?
17
शेअर्स आहे की पैशांचा पाऊस? 'या' ५ स्टॉक्सनी एकाच आठवड्यात दिले तब्बल ५५% रिटर्न!
18
१६ कोटींचा बंगला, चॉपर, दुबईच्या कंपनीत ३८ कोटी... ईडीच्या कारवाईत मोठं घबाड हाती, पोलिसांना कल्पनाच नाही
19
कोरोनापासून जगाला सावध करणाऱ्या चिनी पत्रकाराला पुन्हा तुरुंगवास; आधीच चार वर्षे भोगली शिक्षा..., आता पुन्हा
20
गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीवर हल्ला, आंदोलकांनी ताफा अडवल्याने उडाला गोंधळ; पोलिसांची धावपळ

जिल्ह्यातील ८३ गावांत दूषित पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2017 23:49 IST

जिल्ह्यातील ८३ गावांत दूषित पाणी

लोकमत न्यूज नेटवर्कसांगली : जिल्ह्यातील ८३ गावांतील पाण्याचे १२५ नमुने दूषित आढळून आले असून टीसीएल पावडरचे १६६ नमुनेही निकृष्ट दर्जाचे सापडले आहेत. या टीसीएल पावडरमध्ये क्लोरिनचे प्रमाण ३० टक्केच्या पुढे असणे गरजेचे आहे. परंतु, तपासणी केलेल्या नमुन्यामध्ये ३० टक्केपेक्षा कमी क्लोरिनचे प्रमाण असल्यामुळे जिल्हा परिषदेकडून गावांना नोटिसा बजाविल्या आहेत. जिल्हा परिषदेकडून वारंवार पाण्याचे नमुने दूषित आढळून आलेल्या चोवीस गावांना पिवळे कार्ड दिले आहे.जिल्हा परिषदेकडून दर महिन्याला पाणी आणि टीसीएल पावडरच्या नमुन्यांची तपासणी केली जाते. जून २०१७ या महिन्यात जिल्ह्यातील गावांचे पाणी नमुने तपासणीसाठी घेतले होते. यामध्ये नऊ तालुक्यातील ८३ गावांतील १२५ पाण्याचे नमुने दूषित आढळून आले. आटपाडी तालुक्यातील खुद्द आटपाडी गावातील हजारो जनतेला दूषित पाणी प्यावे लागत आहे. तालुक्याच्या ठिकाणाबरोबरच १६ गावांतील २० पाण्याचे नमुने दूषित आहेत. आटपाडी तालुक्यातील ४३ गावांपैकी २७ गावातील टीसीएल पावडरचे नमुनेही निकृष्ट आढळले आहेत. टीसीएल पावडरमध्ये क्लोरिनचे प्रमाण ३० टक्के गरजेचे असताना, ते त्यापेक्षा कमी आढळून आले आहे. येथील ग्रामपंचायतींना टीसीएलचे प्रमाण जादा वापरण्याच्या जिल्हा परिषदेकडून सूचना दिल्या आहेत. मिरज तालुक्यातील माधवनगर, हरिपूर, बुधगाव, नांद्रेसह वीस गावांतील पाण्याचे नमुने दूषित आढळले आहेत. तसेच मिरज तालुक्यातील १२ गावांतील टीसीएल पावडरचे नमुने घेतले होते. त्यापैकी चार ठिकाणचे टीसीएल पावडरचे नमुने निकृष्ट आढळून आले आहेत. येथेही ग्रामपंचायतींना प्रमाणापेक्षा जादा टीसीएल पावडर वापरण्याच्या सूचना दिल्या आहेत.जत तालुक्यातील १०, कवठेमहांकाळ १५, तासगाव १७, पलूस पाच, वाळवा १२, शिराळा १० आणि खानापूर तालुक्यातील १६ ठिकाणचे पाण्याचे नमुने दूषित आढळले आहेत. टीसीएल पावडरचे नमुनेही निकृष्ट आढळले आहेत. त्यामुळे जादा प्रमाणात टीसीएल पावडर पाण्यात वापरण्याच्या सूचना ग्रामपंचायतींना जिल्हा परिषदेकडून दिल्या आहेत. कडेगाव तालुक्यातील एकाही गावामध्ये पाण्याचे दूषित नमुने आढळून आले नाही.दरम्यान, जिल्ह्यातील काही ग्रामपंचातीकडून वारंवार दुषित पाण्याचा पुरवठा होवूनही त्याकडे जिल्हा परिषद प्रशासन गांभीर्याने लक्ष देत नाही. त्यांच्यावर ठोस कारवाई होत नसल्याच्या नागरिकांच्या तक्रारी आहेत.दूषित पाणी नमुने आढळलेली गावे...आटपाडी तालुका : आटपाडी, मिटकी, पुजारवाडी, देशमुखवाडी, पात्रेवाडी, कौठुळी, कुरूंदवाडी, विभूतवाडी, झरे, घरनिकी, कामत, घानंद, बोंबेवाडी, लेंगरेवाडी, करगणी, माळेवाडी, जत : लोहगांव, हळ्ळी, उटगी, उमदी, बेळोंडगी, बालगांव, कवठेमहांकाळ : आगळगांव, आरेवाडी, ढालगांव, अलकुड एस, कोकळे, बसप्पावाडी, धुळगांव, जायगव्हाण, मळणगांव, शिरढोण, लांडगेवाडी, मिरज : गुंडेवाडी, कदमवाडी, खंडेराजुरी, नांद्रे, कर्नाळ, माधवनगर, हरिपूर, बेळंकी, बुधगावं, बिसूर, काकडवाडी, बेडग, तासगाव : सावर्डे, वासुंबे, बलगवडे, पेड, नरसेवाडी, नागेवाडी, सावळज, पलूस : दुधोंडी, दह्यारी, तुपारी, सुर्यगांव, हजारवाडी, वाळवा : कोरेगांव, फाणेवाडी, येडेनिपाणी, भडकंबे, वाळवा, शिरगांव, जुनेखेड, बावची. शिराळा : आरळा, कणदूर, चिखली, भाटशिरगांव, शिरसटवाडी, शेडगेवाडी, बिळाशी, मांगरूळ. खानापूर : पारे, वाझर, आळसंद, कळंबी, लेंगरे, भेंडवडे, साळशिंगे, करंजे.