शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
2
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधुबद्दलही बरंच बोलले
3
'प्रियंका गांधींना पंतप्रधान बनवा', काँग्रेस नेत्याची मागणी; राहुल गांधींचे काय होणार? म्हणाले...
4
"माझाही फोटो आहे, सर्वांचेच...!"; एपस्टीन फाइल्सवर ट्रम्प स्पष्टच बोलले, बिल क्लिंटन यांच्यासंदर्भात काय म्हणाले?
5
WhatsApp: नव्या पद्धतीने हॅक जात आहे व्हॉट्सॲप, सरकारने दिला काळजी घेण्याचा सल्ला
6
बांगलादेशमधील दीपूच्या मृत्यूप्रकरणी दिल्लीत VHP चे निदर्शने; बांगलादेश परराष्ट्र मंत्रालयाने भारतीय उच्चायुक्तांना बोलावले
7
ज्ञानदा रामतीर्थकरचं लग्न ठरलं! अभिनेत्रीने गुपचूप साखरपुडाही केला, आता लवकरच होणार शुभमंगल सावधान
8
Astrology: नावात बरंच काही आहे! बाळाचे नाव ठेवताना 'ही' काळजी घ्या, नाहीतर लोक नावं ठेवतील
9
अखेर चीनने आयडिया चोरलीच! भारताच्या UPI सोबत स्पर्धा करण्यासाठी ॲप लाँच केले... 'Nihao China'
10
Video - हृदयद्रावक! डीजेवर नाचताना आक्रित घडलं, २३ वर्षीय तरुण खाली कोसळला अन्...
11
"तिथं मी बुलेटप्रूफ कारशिवाय बाहेर पडू शकत नाही!"; कारण... अफगाणिस्तान स्टार क्रिकेटर राशीद खानचा खुलासा
12
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
13
“काँग्रेसचा विषय नक्कीच संपलेला आहे, पण निकालानंतर गरज लागली तर…”; संजय राऊतांचे मोठे विधान
14
ठाकरे बंधुंमधील दादर, शिवडीचा तिढा अखेर सुटला, मोठ्या भावासाठी धाकट्याने घेतले झुकते माप
15
महापालिका निवडणूक २०२६ : प्रस्तावच नाही; काँग्रेस-'वंचित'ची युती होणार की नाही? गोंधळ कायम 
16
दीपूचंद्र दासच्या मित्रांनीच केली 'गद्दारी', मारणाऱ्या धर्मांध जमावातच झाले सामील अन्...! सामोर आलं धक्कादायक सत्य
17
खळबळजनक! सकाळी एन्काऊंटर, संध्याकाळी फरार; पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळाला आरोपी
18
महाविकास आघाडी फुटणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, "...तर आम्ही इतर पर्यायांचा विचार करू"
19
पहाटे ५ ची वेळ, उर्फी जावेद घाबरलेल्या अवस्थेत पोलिस स्टेशनमध्ये पोहोचली; नक्की काय घडलं?
20
इंडिगो एअरलाइन्स मार्चनंतर तुर्कीकडून घेतलेली विमानांचे उड्डाण करणार नाही; DGCA ने दिला स्पष्ट नकार
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील ८३ गावांत दूषित पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2017 23:49 IST

जिल्ह्यातील ८३ गावांत दूषित पाणी

लोकमत न्यूज नेटवर्कसांगली : जिल्ह्यातील ८३ गावांतील पाण्याचे १२५ नमुने दूषित आढळून आले असून टीसीएल पावडरचे १६६ नमुनेही निकृष्ट दर्जाचे सापडले आहेत. या टीसीएल पावडरमध्ये क्लोरिनचे प्रमाण ३० टक्केच्या पुढे असणे गरजेचे आहे. परंतु, तपासणी केलेल्या नमुन्यामध्ये ३० टक्केपेक्षा कमी क्लोरिनचे प्रमाण असल्यामुळे जिल्हा परिषदेकडून गावांना नोटिसा बजाविल्या आहेत. जिल्हा परिषदेकडून वारंवार पाण्याचे नमुने दूषित आढळून आलेल्या चोवीस गावांना पिवळे कार्ड दिले आहे.जिल्हा परिषदेकडून दर महिन्याला पाणी आणि टीसीएल पावडरच्या नमुन्यांची तपासणी केली जाते. जून २०१७ या महिन्यात जिल्ह्यातील गावांचे पाणी नमुने तपासणीसाठी घेतले होते. यामध्ये नऊ तालुक्यातील ८३ गावांतील १२५ पाण्याचे नमुने दूषित आढळून आले. आटपाडी तालुक्यातील खुद्द आटपाडी गावातील हजारो जनतेला दूषित पाणी प्यावे लागत आहे. तालुक्याच्या ठिकाणाबरोबरच १६ गावांतील २० पाण्याचे नमुने दूषित आहेत. आटपाडी तालुक्यातील ४३ गावांपैकी २७ गावातील टीसीएल पावडरचे नमुनेही निकृष्ट आढळले आहेत. टीसीएल पावडरमध्ये क्लोरिनचे प्रमाण ३० टक्के गरजेचे असताना, ते त्यापेक्षा कमी आढळून आले आहे. येथील ग्रामपंचायतींना टीसीएलचे प्रमाण जादा वापरण्याच्या जिल्हा परिषदेकडून सूचना दिल्या आहेत. मिरज तालुक्यातील माधवनगर, हरिपूर, बुधगाव, नांद्रेसह वीस गावांतील पाण्याचे नमुने दूषित आढळले आहेत. तसेच मिरज तालुक्यातील १२ गावांतील टीसीएल पावडरचे नमुने घेतले होते. त्यापैकी चार ठिकाणचे टीसीएल पावडरचे नमुने निकृष्ट आढळून आले आहेत. येथेही ग्रामपंचायतींना प्रमाणापेक्षा जादा टीसीएल पावडर वापरण्याच्या सूचना दिल्या आहेत.जत तालुक्यातील १०, कवठेमहांकाळ १५, तासगाव १७, पलूस पाच, वाळवा १२, शिराळा १० आणि खानापूर तालुक्यातील १६ ठिकाणचे पाण्याचे नमुने दूषित आढळले आहेत. टीसीएल पावडरचे नमुनेही निकृष्ट आढळले आहेत. त्यामुळे जादा प्रमाणात टीसीएल पावडर पाण्यात वापरण्याच्या सूचना ग्रामपंचायतींना जिल्हा परिषदेकडून दिल्या आहेत. कडेगाव तालुक्यातील एकाही गावामध्ये पाण्याचे दूषित नमुने आढळून आले नाही.दरम्यान, जिल्ह्यातील काही ग्रामपंचातीकडून वारंवार दुषित पाण्याचा पुरवठा होवूनही त्याकडे जिल्हा परिषद प्रशासन गांभीर्याने लक्ष देत नाही. त्यांच्यावर ठोस कारवाई होत नसल्याच्या नागरिकांच्या तक्रारी आहेत.दूषित पाणी नमुने आढळलेली गावे...आटपाडी तालुका : आटपाडी, मिटकी, पुजारवाडी, देशमुखवाडी, पात्रेवाडी, कौठुळी, कुरूंदवाडी, विभूतवाडी, झरे, घरनिकी, कामत, घानंद, बोंबेवाडी, लेंगरेवाडी, करगणी, माळेवाडी, जत : लोहगांव, हळ्ळी, उटगी, उमदी, बेळोंडगी, बालगांव, कवठेमहांकाळ : आगळगांव, आरेवाडी, ढालगांव, अलकुड एस, कोकळे, बसप्पावाडी, धुळगांव, जायगव्हाण, मळणगांव, शिरढोण, लांडगेवाडी, मिरज : गुंडेवाडी, कदमवाडी, खंडेराजुरी, नांद्रे, कर्नाळ, माधवनगर, हरिपूर, बेळंकी, बुधगावं, बिसूर, काकडवाडी, बेडग, तासगाव : सावर्डे, वासुंबे, बलगवडे, पेड, नरसेवाडी, नागेवाडी, सावळज, पलूस : दुधोंडी, दह्यारी, तुपारी, सुर्यगांव, हजारवाडी, वाळवा : कोरेगांव, फाणेवाडी, येडेनिपाणी, भडकंबे, वाळवा, शिरगांव, जुनेखेड, बावची. शिराळा : आरळा, कणदूर, चिखली, भाटशिरगांव, शिरसटवाडी, शेडगेवाडी, बिळाशी, मांगरूळ. खानापूर : पारे, वाझर, आळसंद, कळंबी, लेंगरे, भेंडवडे, साळशिंगे, करंजे.