शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

कडधान्ये-तृणधान्ये, तेलबिया नियमनमुक्तीचा विचार : सदाभाऊ खोत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 8, 2017 19:34 IST

भाजीपाला नियमनमुक्तीनंतर आता कडधान्ये, तृणधान्ये आणि तेलबियाही नियमनमुक्त करण्याचा विचार आहे. शासनाने यासाठी आपल्या अध्यक्षतेखाली समिती नेमली आहे. ही समिती लवकरच आपला अहवाल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सादर करणार असल्याचे कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी लोकमतशी बोलताना सांगितले.

ठळक मुद्देयवतमाळ घटनेबाबत शासन गंभीर

इस्लामपूर, 8 : भाजीपाला नियमनमुक्तीनंतर आता कडधान्ये, तृणधान्ये आणि तेलबियाही नियमनमुक्त करण्याचा विचार आहे. शासनाने यासाठी आपल्या अध्यक्षतेखाली समिती नेमली आहे. ही समिती लवकरच आपला अहवाल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सादर करणार असल्याचे कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी लोकमतशी बोलताना सांगितले.

खोत म्हणाले, भाजीपाला नियमनमुक्तीचा निर्णय घेतल्यावर शेतकºयांची अडत, हमाली, तोलाई आणि बाजार समित्यांचा सेस अशा सगळ्या जाचातून मुक्तता झाली. त्यामुळे शेतकरी आपला भाजीपाला कोठेही विकू शकतो. नियमनमुक्तीच्या या लाभानंतर आता शेतकºयांनी कडधान्य, तृणधान्य आणि तेलबियासुध्दा नियमनमुक्त करा, अशी मागणी केली आहे.

ते म्हणाले, शेतकºयांच्या या मागणीचा विचार करुन मुख्यमंत्र्यांनी माझ्या अध्यक्षतेखाली समिती नेमली आहे. शेतकºयांच्या मागणीनुसार कडधान्य, तृणधान्य व तेलबिया नियमनमुक्त करण्याचा शासनाचा सकारात्मक विचार आहे. नियमनमुक्तीचा हा निर्णय झाल्यावर शेतकºयांना बाजारभावापेक्षा १०० रुपयांचा जादा दर मिळेल. त्यामुळे समिती आपला अहवाल लवकरच मुख्यमंत्र्यांना सादर करणार आहे.

यवतमाळ घटनेबाबत शासन गंभीरखोत म्हणाले, यवतमाळ येथील शेतकरी मृत्यूप्रकरणी सरकार गंभीर आहे. या घटनेत दोषी असणारे अधिकारी, औषध विक्रेते आणि कंपन्यांविरुध्द फौजदारी गुन्हे दाखल करुन मृत शेतकºयांच्या वारसांना नुकसानभरपाई देण्याचा प्रयत्न आहे.

यवतमाळ येथे जाऊन आपण स्वत: पाहणी केली आहे. सर्व वस्तुस्थिती समजून घेतल्यानंतर या शेतकरी मृत्यूप्रकरणी दोषी असणाºयांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी करणारा अहवाल मुख्यमंत्र्यांना सादर केल्याचेही कृषी राज्यमंत्री खोत यांनी स्पष्ट केले.