शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
5
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
6
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
7
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
8
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
9
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
10
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
11
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
12
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
13
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
14
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
15
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
17
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
18
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
19
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
20
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

कडधान्ये-तृणधान्ये, तेलबिया नियमनमुक्तीचा विचार : सदाभाऊ खोत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 8, 2017 19:34 IST

भाजीपाला नियमनमुक्तीनंतर आता कडधान्ये, तृणधान्ये आणि तेलबियाही नियमनमुक्त करण्याचा विचार आहे. शासनाने यासाठी आपल्या अध्यक्षतेखाली समिती नेमली आहे. ही समिती लवकरच आपला अहवाल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सादर करणार असल्याचे कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी लोकमतशी बोलताना सांगितले.

ठळक मुद्देयवतमाळ घटनेबाबत शासन गंभीर

इस्लामपूर, 8 : भाजीपाला नियमनमुक्तीनंतर आता कडधान्ये, तृणधान्ये आणि तेलबियाही नियमनमुक्त करण्याचा विचार आहे. शासनाने यासाठी आपल्या अध्यक्षतेखाली समिती नेमली आहे. ही समिती लवकरच आपला अहवाल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सादर करणार असल्याचे कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी लोकमतशी बोलताना सांगितले.

खोत म्हणाले, भाजीपाला नियमनमुक्तीचा निर्णय घेतल्यावर शेतकºयांची अडत, हमाली, तोलाई आणि बाजार समित्यांचा सेस अशा सगळ्या जाचातून मुक्तता झाली. त्यामुळे शेतकरी आपला भाजीपाला कोठेही विकू शकतो. नियमनमुक्तीच्या या लाभानंतर आता शेतकºयांनी कडधान्य, तृणधान्य आणि तेलबियासुध्दा नियमनमुक्त करा, अशी मागणी केली आहे.

ते म्हणाले, शेतकºयांच्या या मागणीचा विचार करुन मुख्यमंत्र्यांनी माझ्या अध्यक्षतेखाली समिती नेमली आहे. शेतकºयांच्या मागणीनुसार कडधान्य, तृणधान्य व तेलबिया नियमनमुक्त करण्याचा शासनाचा सकारात्मक विचार आहे. नियमनमुक्तीचा हा निर्णय झाल्यावर शेतकºयांना बाजारभावापेक्षा १०० रुपयांचा जादा दर मिळेल. त्यामुळे समिती आपला अहवाल लवकरच मुख्यमंत्र्यांना सादर करणार आहे.

यवतमाळ घटनेबाबत शासन गंभीरखोत म्हणाले, यवतमाळ येथील शेतकरी मृत्यूप्रकरणी सरकार गंभीर आहे. या घटनेत दोषी असणारे अधिकारी, औषध विक्रेते आणि कंपन्यांविरुध्द फौजदारी गुन्हे दाखल करुन मृत शेतकºयांच्या वारसांना नुकसानभरपाई देण्याचा प्रयत्न आहे.

यवतमाळ येथे जाऊन आपण स्वत: पाहणी केली आहे. सर्व वस्तुस्थिती समजून घेतल्यानंतर या शेतकरी मृत्यूप्रकरणी दोषी असणाºयांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी करणारा अहवाल मुख्यमंत्र्यांना सादर केल्याचेही कृषी राज्यमंत्री खोत यांनी स्पष्ट केले.