शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

स्वच्छता मोहिमेत ९३ टन कचरा संकलित

By admin | Updated: December 21, 2015 00:49 IST

कृष्णा नदी परिसर चकाचक : धर्माधिकारी प्रतिष्ठानचे दीड हजार स्वयंसेवक सहभागी

सांगली : अध्यात्माच्या माध्यमातून प्रबोधन करीत सामाजिक उपक्रम राबविणाऱ्या रेवदंडा (ता. अलिबाग) येथील नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्यावतीने रविवारी कृष्णा नदी परिसरात स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. सकाळी ७ ते ११ या अवघ्या चार तासात एक किलोमीटर परिसरात स्वच्छता करीत तब्बल ९३ टन कचरा संकलित करण्यात आला. कोणत्याही शासकीय यंत्रणेला जे जमले नाही, ते केवळ एका दिवसात करुन दाखवत स्वच्छतेचा नवा आदर्श प्रतिष्ठानच्या स्वयंसेवकांनी नागरिकांसमोर ठेवला. सकाळी सहापासूनच सरकारी आणि समर्थ घाट परिसरात स्वयंसेवक जमण्यास प्रारंभ झाला होता. यामध्ये महाविद्यालयीन युवकांपासून साठ वर्षापर्यंतच्या वृध्दांचा समावेश होता. प्रत्येकाच्या हातात खराटा, फावडे किंवा स्वच्छतेचे कोणते ना कोणते साधन होते. जिल्ह्यातील विविध भागातून स्वयंसेवक घाटावर एकत्र झाले होते. काही वेळातच सर्वांनीच वेळ न दवडता स्वच्छता करण्यास सुरुवात केली. युवकांनी नदीपात्रात उतरुन ओला कचरा गोळा केला. गणेशोत्सवानंतर महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी एक दिवस स्वच्छता अभियान राबविले होते. त्यावेळी केवळ विसर्जन न झालेल्या गणेशमूर्तींचे इतरत्र विसर्जन करण्यात आले होते. परिणामी नदीपात्रात अस्वच्छतेचे साम्राज्य कायम होते. रविवारी मात्र नदीपात्रातील प्रचंड कचरा स्वयंसेवकांनी फावड्याच्या साहाय्याने बाहेर काढून पात्र स्वच्छ केले. महापालिकेने हा कचरा उचलण्यासाठी वाहनांची सोय केली होती. महापालिकेचे २४ कर्मचारीही यात कार्यरत होते. प्रतिष्ठानच्या स्वयंसेवकांनी कर्मचाऱ्यांच्या मदतीने कचरा संकलित करुन तो कंटेनरमध्ये टाकला. सलग चार तास सुरु असलेल्या या मोहिमेत कोणत्याही स्वयंसेवकाने विश्रांती घेतली नाही. स्वच्छतेचे ध्येय साध्य झाल्यावरच त्यांनी विश्रांती घेतली. यावेळी नदी परिसरात आलेल्या नागरिकांचेही स्वयंसेवकांनी प्रबोधन केले. स्वयंसेवकांच्या हातात ‘प्लॅस्टिक हटवा पर्यावरण वाचवा’, ‘ स्वच्छता असे ज्याच्याघरी आरोग्य तेथे वास करी’ आदी संदेश लिहिलेले फलक होते. स्वयंसेवकांची कामाप्रतीची आस आणि त्यांनी स्वच्छतेचा संदेश देत मोहीम राबविल्याने, या मोहिमेचे नागरिकांनी स्वागत केले. (प्रतिनिधी)अविश्रांत स्वच्छता प्रतिष्ठानच्या स्वयंसेवकांनी कर्मचाऱ्यांच्या मदतीने कचरा संकलित करुन तो कंटेनरमध्ये टाकला. सलग चार तास सुरु असलेल्या या मोहिमेत कोणत्याही स्वयंसेवकाने विश्रांती घेतली नाही. स्वच्छतेचे ध्येय साध्य झाल्यावरच त्यांनी विश्रांती घेतली. एका दिवसात स्वयंसेवकांनी स्वच्छता मोहीम राबविली. यासाठी पालिका कर्मचाऱ्यांनीही सहकार्य केले.