शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीत आधीच मुसळधार पाऊस, त्यात भूकंपाचे धक्के; १० सेकंद जमीन हादरली, लोक घराबाहेर पळाले
2
कर्नाटकात हालचालींना वेग मुख्यमंत्री बदलणार की बंडखोरी होणार? दोन्ही नेते दिल्लीत पोहोचले; राहुल गांधी निर्णय घेणार
3
गजब होई गवा! महिलेच्या व्होटर आयडीवर छापला बिहारी मुख्यमंत्र्यांचा फोटो; पती म्हणतोय... 
4
भलेही ताकद कमी असेल, पण इरादा पक्का! 'हा' छोटासा देश थेट चीनशी लढण्याच्या तयारीत
5
तीन हजारांवर काॅटेज, हाॅटेलमध्ये ‘सर्च ऑपरेशन’; संशयास्पद ‘बोटी’च्या संदेशानंतर पोलिस ‘अलर्ट’
6
माल्ल्या, नीरव मोदी, पारेख... सर्वांना एकत्र करा; त्यापेक्षाही मोठा आहे जेन स्ट्रीट घोटाळा, अवाक् करणारा दावा
7
फेसबुक लाईव्हवर व्यथा सांगितली अन् १५ मिनिटांत संपवलं जीवन! रिअल इस्टेट व्यावसायिकानं का उचललं टोकाचं पाऊल? 
8
कंगाल पाकिस्तानबद्दल काय म्हणावं? पाकिस्तानची सरकारी एअरलाईन्स खरेदी करण्यासाठी आले सीमेंटवाले
9
पुढील काही महिने पृथ्वी वेगाने फिरणार; भविष्यात घड्याळाची वेळ बदलावी लागणार, ९ जुलैला काय घडलं?
10
रात्री ज्याला चोर म्हणून तुडवला, त्यालाच सकाळी जावई बनवला! रात्रभरात असं नेमकं घडलं काय? 
11
आजचे राशीभविष्य: या राशींसाठी लग्न जुळण्याचा योग, व्यापार - व्यवसायात फायदा होणार, चांगला दिवस
12
हातात हात अन् प्रेग्नंट पत्नीला साथ! शूराची काळजी घेताना दिसला अरबाज खान, व्हिडीओ व्हायरल
13
समलैंगिक संबंध, ब्लॅकमेलिंग अन् शेवट...; मुंबईतील ३ घटना, ३ मृत्यू, नेमकं काय घडले?
14
५० लाख नागरिकांना मिळणार जागेची मालकी; तुकडेबंदी कायदा तूर्त शिथिल, नंतर रद्द करणार
15
...तर खराब रस्त्यांसाठी नागरिकांनी या आमदारांना का मारू नये?; टॉवेल बनियनवर गावगुंडासारखा राडा
16
विद्यार्थिनींची अंतर्वस्त्रे उतरवली, कारण...; शहापूरच्या खासगी शाळेतील अत्यंत घृणास्पद प्रकार
17
सोळावं वरीस धोक्याचं... किशोरवयातच प्रौढपण; खेळण्याच्या वयात मुली पडतायेत वासनेचा बळी
18
मतदारांच्या कमाल संख्येनुसार मतदान केंद्रे; निवडणूक आयोगाचे निर्देश, एका इमारतीत आता १० केंद्रे
19
पंढरीचे ‘एआय’ वारकरी! AI ने केली २७ लाख लोकांची गर्दी मोजण्याची किमया
20
निवडणूक आयोग जनतेला मूर्ख समजतो की काय?; रोखठोक प्रश्न विचारणं आवश्यक बनलंय

स्वच्छता मोहिमेत ९३ टन कचरा संकलित

By admin | Updated: December 21, 2015 00:49 IST

कृष्णा नदी परिसर चकाचक : धर्माधिकारी प्रतिष्ठानचे दीड हजार स्वयंसेवक सहभागी

सांगली : अध्यात्माच्या माध्यमातून प्रबोधन करीत सामाजिक उपक्रम राबविणाऱ्या रेवदंडा (ता. अलिबाग) येथील नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्यावतीने रविवारी कृष्णा नदी परिसरात स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. सकाळी ७ ते ११ या अवघ्या चार तासात एक किलोमीटर परिसरात स्वच्छता करीत तब्बल ९३ टन कचरा संकलित करण्यात आला. कोणत्याही शासकीय यंत्रणेला जे जमले नाही, ते केवळ एका दिवसात करुन दाखवत स्वच्छतेचा नवा आदर्श प्रतिष्ठानच्या स्वयंसेवकांनी नागरिकांसमोर ठेवला. सकाळी सहापासूनच सरकारी आणि समर्थ घाट परिसरात स्वयंसेवक जमण्यास प्रारंभ झाला होता. यामध्ये महाविद्यालयीन युवकांपासून साठ वर्षापर्यंतच्या वृध्दांचा समावेश होता. प्रत्येकाच्या हातात खराटा, फावडे किंवा स्वच्छतेचे कोणते ना कोणते साधन होते. जिल्ह्यातील विविध भागातून स्वयंसेवक घाटावर एकत्र झाले होते. काही वेळातच सर्वांनीच वेळ न दवडता स्वच्छता करण्यास सुरुवात केली. युवकांनी नदीपात्रात उतरुन ओला कचरा गोळा केला. गणेशोत्सवानंतर महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी एक दिवस स्वच्छता अभियान राबविले होते. त्यावेळी केवळ विसर्जन न झालेल्या गणेशमूर्तींचे इतरत्र विसर्जन करण्यात आले होते. परिणामी नदीपात्रात अस्वच्छतेचे साम्राज्य कायम होते. रविवारी मात्र नदीपात्रातील प्रचंड कचरा स्वयंसेवकांनी फावड्याच्या साहाय्याने बाहेर काढून पात्र स्वच्छ केले. महापालिकेने हा कचरा उचलण्यासाठी वाहनांची सोय केली होती. महापालिकेचे २४ कर्मचारीही यात कार्यरत होते. प्रतिष्ठानच्या स्वयंसेवकांनी कर्मचाऱ्यांच्या मदतीने कचरा संकलित करुन तो कंटेनरमध्ये टाकला. सलग चार तास सुरु असलेल्या या मोहिमेत कोणत्याही स्वयंसेवकाने विश्रांती घेतली नाही. स्वच्छतेचे ध्येय साध्य झाल्यावरच त्यांनी विश्रांती घेतली. यावेळी नदी परिसरात आलेल्या नागरिकांचेही स्वयंसेवकांनी प्रबोधन केले. स्वयंसेवकांच्या हातात ‘प्लॅस्टिक हटवा पर्यावरण वाचवा’, ‘ स्वच्छता असे ज्याच्याघरी आरोग्य तेथे वास करी’ आदी संदेश लिहिलेले फलक होते. स्वयंसेवकांची कामाप्रतीची आस आणि त्यांनी स्वच्छतेचा संदेश देत मोहीम राबविल्याने, या मोहिमेचे नागरिकांनी स्वागत केले. (प्रतिनिधी)अविश्रांत स्वच्छता प्रतिष्ठानच्या स्वयंसेवकांनी कर्मचाऱ्यांच्या मदतीने कचरा संकलित करुन तो कंटेनरमध्ये टाकला. सलग चार तास सुरु असलेल्या या मोहिमेत कोणत्याही स्वयंसेवकाने विश्रांती घेतली नाही. स्वच्छतेचे ध्येय साध्य झाल्यावरच त्यांनी विश्रांती घेतली. एका दिवसात स्वयंसेवकांनी स्वच्छता मोहीम राबविली. यासाठी पालिका कर्मचाऱ्यांनीही सहकार्य केले.