शहरं
Join us  
Trending Stories
1
दक्षिण अमेरिकेत ७.४ रिश्टर स्केलचा भूकंप! चिली, अर्जेंटिना हादरले; घरातून बाहेर पडले लोक; त्सुनामीचा इशारा
2
बेजबाबदार RTI कार्यकर्ते खोट्या तक्रारींद्वारे त्रास देण्याचा 'व्यवसाय' चालवतात- गोपाळ शेट्टी
3
Video: पाहुणचाराचा 'गोडवा'! श्रद्धा कपूरने घरच्या पुरणपोळीने केलं इन्स्टाग्रामच्या CEOचं स्वागत
4
'दोन महिन्यांचे राशन साठवून ठेवा', भारताच्या कारवाईने घाबरेल्या पाकिस्तानचे जनतेला आवाहन
5
पंतप्रधान मोदी अमरावतीत असं काय बोलले? की मुख्यमंत्री चंद्राबाबूंना रोखता आलं नाही आपलं हसू! बघा VIDEO
6
अनिल कपूरच्या आईचे निधन; वयाच्या 90व्या वर्षी निर्मला कपूर यांनी घेतला अखेरचा श्वास...
7
Heavy Rain In Jammu & Kashmir : जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
8
Pahalgam Terror Attack : पाकिस्तानी क्रिकेटरनंतर आता पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यावरही भारताचे डिजिटल स्ट्राइक
9
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
10
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
11
भरधाव कंटेनरने दोन कारला उडविले; पुण्यातील तीन भाविकांचा मृत्यू
12
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
13
श्रीनगरमधील दल सरोवरात वेगवान वाऱ्यांमुळे बोट उलटली, पर्यटकांकडून मदतीसाठी आरडाओरडा
14
उल्हासनगरात बांगलादेशी नागरिक सापडण्याचे सत्र सुरूच, तीन दिवसात ९ बांगलादेशी नागरिकांना अटक 
15
नॅशनल हेराल्ड प्रकरण; राहुल आणि सोनिया गांधींच्या अडचणी वाढल्या, कोर्टाने बजावली नोटीस
16
शिखर धवनने दिली प्रेमाची कबुली..!! कोण आहे Sophie Shine? पहिली भेट कशी झाली?
17
एजाज खानचा 'हाऊस अरेस्ट' शो बंद होणार? महिला आयोगाचं थेट पोलीस महासंचालकांना पत्र
18
“भावाला न्याय मिळत नाही तोपर्यंत चप्पल घालणार नाही”; संतोष देशमुख यांच्या बहिणीचा निर्धार
19
लग्न ठरलं, साखरपुडा झाला, शरीरसंबंधही ठेवले, त्यानंतर... मुंबई इंडियन्सकडून खेळलेल्या खेळाडूवर गंभीर आरोप  
20
पहलगाममधील हल्ल्याचं निमित्त, पूजा करायची असल्याचे सांगून पुजाऱ्याला गंडा, बँक खातं केलं साफ     

काँग्रेस आघाडीच्या मुहूर्तालाच खडा

By admin | Updated: April 24, 2017 23:39 IST

पुन्हा गटबाजीचे दर्शन : विशाल पाटील समर्थक, इद्रिस नायकवडी गटाचा एकत्र येण्यास विरोध

शीतल पाटील ल्ल सांगलीलोकसभा, विधानसभेपाठोपाठ जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीत सपाटून मार खाल्लेल्या काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसने आता एकमेव सत्ताकेंद्र हातात असलेल्या महापालिकेवर पुन्हा झेंडा फडकविण्यासाठी आघाडी करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. पण काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीच्या मुहूर्तालाच खडा लागला असून, काँग्रेसमधील विशाल पाटील समर्थक व माजी महापौर इद्रिस नायकवडी गटाने या निर्णयाला विरोध करण्याची भूमिका घेतली आहे. त्यामुळे गटबाजीचे दर्शन निवडणुकीपूर्वी वर्षभर आधीच सुरू झाले आहे. एकेकाळी काँग्रेस, राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असलेल्या सांगली जिल्ह्याचे राजकारण गेल्या पाच वर्षात वेगाने बदलले आहे. दोन्ही काँग्रेसच्या हातातील सत्ताकेंद्रे भाजपच्या ताब्यात गेली आहेत. लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर विधानसभा निवडणुकीतही दोन्ही पक्ष बॅकफूटवर गेले. त्यातून दोन्ही पक्षांच्या जिल्हा नेतृत्वाने कोणताच धडा घेतला नसल्याचे जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीत दिसून आले. जिल्हा परिषदेच्या स्थापनेपासून दोन्ही काँग्रेसचे वर्चस्व असलेल्या सत्ताकेंद्रात भाजप झिरो टू हिरो ठरला. त्यातून अखेरीस बोध घेत काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार मोहनराव कदम व राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष विलासराव शिंदे यांनी आगामी महापालिका निवडणुकीत आघाडीचे संकेत दिले. दोन्ही काँग्रेसच्या आघाडीची घोषणा होऊन आठवडा लोटण्यापूर्वीच त्याला विरोध सुरू झाला आहे. विशेषत: महापालिका क्षेत्रातील काँग्रेसमधील नेतेमंडळींनी आघाडीला विरोध सुरू केला आहे. त्याचा प्रत्यय रविवारी झालेल्या नगरसेवकांच्या बैठकीतही आला. मिरजेचे नेते माजी महापौर इद्रिस नायकवडी यांनी उघडपणे राष्ट्रवादीशी आघाडी करण्यास विरोध केला. ज्यांच्याशी आम्ही संघर्ष करीत आहोत, त्यांच्याशी आघाडी करणार असाल तर आम्हाला जमेत धरू नका, असा इशारा देण्यासही ते विसरले नाहीत. इद्रिस नायकवडी कधीकाळी राष्ट्रवादीत होते. राष्ट्रवादीच्या नेतृत्वाखालील महाआघाडीच्या काळात ते महापौरही बनले. पण नंतर राष्ट्रवादीचे नेते आमदार जयंत पाटील यांच्याशी बिनसल्याने ते काँग्रेसवासी झाले. पण येथेही त्यांचे मन फारसे रमलेले नाही. गेल्या चार वर्षात निर्णयप्रक्रियेत सहभागी करून घेतले जात नसल्याची तक्रार ते नेहमीच करतात. त्यातून पदाधिकारी निवडणुकीत कुरघोड्या करण्यात त्यांचा हातखंडा आहे. त्यामुळे काँग्रेसला मागासवर्गीय समिती, स्थायी समितीचे सभापतीपद बहुमत असतानाही गमवावे लागले आहे. मध्यंतरी त्यांच्या भाजप प्रवेशाची चर्चा होती. पण आजअखेर ती केवळ चर्चाच ठरली आहे. अजून महापालिका निवडणुकीला वर्षभराचा कालावधी असल्याने नायकवडी यांनी पत्ते गुलदस्त्यातच ठेवले आहेत. दुसरीकडे विशाल पाटील समर्थकांनाही आघाडीचा निर्णय पचनी पडलेला दिसत नाही. त्यामुळेच या नगरसेवकांनी कॉँग्रेस बैठकीवर बहिष्कार टाकल्याची चर्चा पालिका वर्तुळात सुरू आहे. आघाडीचा निर्णय घेताना माजी मंत्री प्रतीक पाटील, विशाल पाटील यांनाही विश्वासात घेण्याची आवश्यकता होती, पण काँग्रेस नेत्यांनी परस्परच निर्णय जाहीर केल्याचे मत एका नगरसेवकाने व्यक्त केले. या साऱ्या घडामोडींमुळे काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीसमोर आतापासून विघ्न आले आहे. जिल्ह्यातील भाजपचा चढता आलेख पाहता दोन्ही पक्षातील बहुतांश विद्यमान नगरसेवकांना आघाडीचे वेध लागले आहे. भाजपचा वारू रोखण्यासाठी दोन्ही काँग्रेस एकत्र आल्यास निश्चित चांगला निकाल लागेल, अशी त्यांची अपेक्षा आहे. पण मुहूर्तालाच खो बसल्याने आघाडीचे भवितव्य काय असेल, हे कळण्यासाठी आणखी काही महिने थांबावे लागेल. चारचा प्रभाग : काहींना लाभ, काहींना तोटामहापालिका निवडणुकीसाठी चार सदस्यांचा एक प्रभाग असेल. त्यानुसार महापालिका प्रशासनाला नवीन प्रभाग रचना करावी लागणार आहे. ही नवी प्रभाग रचना विद्यमान नगरसेवकांतील काहींना लाभदायक, तर काहींना अडचणीची ठरणार आहे. विशेषत: मिरजेतील राजकारणात मोठे बदल अपेक्षित आहेत. मिरजेचे नेतृत्व करणाऱ्या नगरसेवकांना भाजपपेक्षा दोन्ही पक्षातील विरोधकांशीच सामना करावा लागतो. त्यामुळे उमेदवारी मिळविताना अनेकांची कसरत होईल. त्यातून उमेदवारी न मिळाल्यास भाजपचा पर्यायही त्यांच्यासमोर असेल. सांगली व कुपवाडमध्येही काही प्रभागात अशीच परिस्थिती राहण्याची शक्यता आहे. तर काही प्रभाग एकत्र जोडल्यास दोन्ही काँग्रेसला फायदा होऊ शकतो. पण सत्तेच्या चाव्या भाजपकडे असल्याने ते प्रभागरचनेवेळी काय चमत्कार करतात, यावर पुढील गणिते अवलंबून राहणार आहेत.