शहरं
Join us  
Trending Stories
1
CBSE बोर्डाचा १०वीचा निकाल जाहीर! गेल्या वर्षींपेक्षा जास्त विद्यार्थी उत्तीर्ण, मुली मुलांपेक्षा वरचढ
2
Mumbai Local: सीएसएमटी स्थानकात प्लॅटफॉर्म क्लिनिंग मशीन रेल्वे रुळावर कोसळली, मोटरमननं दाखवलं प्रसंगावधान!
3
शत्रुला शांतपणे झोप का लागत नाही? पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 'त्या' फोटोद्वारे दिला थेट संदेश...
4
अवघ्या ४ महिन्यांपूर्वी लग्न झालेले सिवानचे जवान रामबाबू सिंह शहीद; पत्नीला अजून सांगितलंच नाही...
5
१० तारखेला वाढदिवस साजरा केला अन् दुसऱ्याच दिवशी...; आईसह २ मुलांचा दुर्दैवी अंत
6
धक्कादायक! अचानक तोल गेला अन् खासदार अजय मंडल पडले खाली; पायाला झालं फ्रॅक्चर
7
₹२३९२ चा 'हा' शेअर आपटून आला ₹५१ वर; सोमवारी दोन मोठे राजीनामे, गुंतवणूकदारांना झटका
8
पाकिस्तानने केलेला एअरबेस उडवल्याचा दावा; PM मोदी तिथेच पोहोचले, जवानांशी साधला संवाद
9
Astro Tips: गाडीच्या डॅशबोर्डवर कोणत्या देवतेची मूर्ती ठेवणे ठरते अधिक लाभदायी?
10
"वाढलेल्या वजनामुळे मला.."; 'हास्यजत्रा' फेम ईशाने केला मोठा खुलासा, झालेला हा आजार
11
Operation Sindoor : काहींचे हात तुटले, तर काहींना गंभीर दुखापत झाली, असीम मुनीर यांनी पाकिस्तानी सैनिकांची अवस्था दाखवली
12
म्युच्युअल फंड की FD.. गुंतवणुकीसाठी कोणता पर्याय चांगला? फक्त परतावा पाहू नका, 'हे' समजून घ्या
13
लग्नात नायट्रोजनचा धूर ठरला घातक; नवरा-नवरीच्या एन्ट्रीदरम्यान ७ वर्षांच्या मुलीचा गेला जीव
14
भारतीय सैन्याच्या रिटायर्ड कॅप्टनची घरात घुसून हत्या; सरपंचाने मध्यरात्री केला हल्ला
15
High Alert: दोन दिवसांत बॉम्बस्फोट घडवण्याची धमकी; महाराष्ट्र पोलीस कंट्रोल रुमला ई-मेल, शोधमोहीम सुरू
16
आधी वरमाला घातली अन्..; अभिनेत्याचा बायकोसोबत खास डान्स, रत्नागिरीत गावकऱ्यांच्या साथीने धरला ठेका
17
IPL च्या सामन्यांतून BCCI ची कमाई किती होते, उत्पन्नाचे स्त्रोत काय, कुठून येतो पैसा?
18
वादळ वारं सुटलं गं! पुण्यात बहुतांश भागात पावसाची हजेरी; दुचाकीचालकांनो, जरा सांभाळूनच...
19
CBSE Board 12th Result 2025: सीबीएसई बोर्डाचाही १२ वीचा निकाल जाहीर; महाराष्ट्राची आकडेवारी आली, ९०.९३ टक्के निकाल
20
Video: निवृत्तीच्या दुसऱ्याच दिवशी विराट कोहली पत्नीसह प्रेमानंद महाराजांच्या चरणी नतमस्तक...

काँग्रेसची विधानसभा तयारी गटबाजीने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2019 23:29 IST

अविनाश कोळी । लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : लोकसभा निवडणुकीत गटबाजीमुळे स्वत:च्या पायावर कुºहाड मारुन घेतल्यानंतरही, काँग्रेसमधील नेत्यांनी अद्याप ...

अविनाश कोळी ।लोकमत न्यूज नेटवर्कसांगली : लोकसभा निवडणुकीत गटबाजीमुळे स्वत:च्या पायावर कुºहाड मारुन घेतल्यानंतरही, काँग्रेसमधील नेत्यांनी अद्याप बोध घेतलेला नाही. विधानसभा निवडणुकीच्या तयारीसाठी आयोजित केलेल्या पहिल्याच बैठकीत गटबाजीचे उघड दर्शन घडवून, पुन्हा संघर्षाची वाट नेते व कार्यकर्त्यांनी स्वीकारल्याचे चित्र दिसत आहे.सांगली लोकसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसअंतर्गत गटबाजीने कहर केला. तीन गटात विभागल्या गेलेल्या पक्षाचे तिकीट मित्रपक्षांच्या पदरात पडले. पक्षाची हक्काची जागा गेल्यानंतर काँग्रेस भवनाला टाळे ठोकण्याचा प्रकारही घडला. संपूर्ण राज्यभर या घटनेचे पडसाद उमटले. प्रदेशाध्यक्षांनाही येथील नेत्यांची कानउघाडणी करावी लागली. त्यानंतरही फारसा फरक पक्षीय वातावरणात झाला नाही. लोकसभा निवडणुकीत लागलेले गटबाजीचे ग्रहण विधानसभा निवडणुकीपर्यंत कायम आहे. कधी उमेदवारी नको म्हणून वाद, कधी उमेदवारी आणि पक्षाचे चिन्ह हवे म्हणून मारामारी, तर कधी उमेदवारीचा डंका पिटला म्हणून संघर्ष... अशा अनेक गोष्टींनी काँग्रेसचे अंतर्गत वातावरण दूषित झाले आहे.शनिवारी सांगलीत पक्षीय निवडणूक प्रक्रियेसाठी बोलाविण्यात आलेल्या बैठकीत काँग्रेस नेते व वसंतदादा कारखान्याचे अध्यक्ष विशाल पाटील यांच्या गटातील कार्यकर्त्यांनी शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांच्या उमेदवारीच्या घोषणेबद्दल टीका केली. पृथ्वीराज पाटील यांनी आपण इच्छुक असल्याचे जाहीर करून पक्षाकडूनही सकारात्मक प्रतिसाद असल्याचे म्हटले होते.या गोष्टीवरून काँग्रेसच्या दुसऱ्या गटातील कार्यकर्त्यांनी गदारोळ केला. वास्तविक इच्छुक व्यक्ती नेहमीच पक्षाकडून तिकीट मिळण्याचा दावा करीत असते. तशी दावेदारी पाटील यांनी केली होती. नेमकी हीच गोष्ट पक्षांतर्गत विरोधी कार्यकर्त्यांना पसंत पडली नाही. त्यांनी पृथ्वीराज पाटील यांना लक्ष्य केले. जिल्हाध्यक्ष आ. मोहनराव कदम यांनी वादावर पडदा टाकला असला तरी, हा वाद अंतर्गत धुमसत राहणार हे निश्चित.कधीकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून सांगली लोकसभा व विधानसभा मतदारसंघ ओळखला जात होता. पक्षांतर्गत वादावादीत मश्गुल राहिलेल्या नेत्यांमुळे हा बालेकिल्ला ढासळला. भाजपने नेमकी संधी साधत हा गड केव्हाच काबीज केला आहे. एकामागोमाग एक संस्था, मतदारसंघ हातातून जात असतानाही, काँग्रेसने त्यातून काहीही शिकण्याचा प्रयत्न केला नाही. याउलट गटबाजीला आणखी धार देण्याचे काम सर्वांनी मिळून केले. आता ही धार स्वकीयांनाच संपविण्यासाठी वापरली जात आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या अधिकृत उमेदवारास ही गटबाजीच घातक ठरण्याची चिन्हे आहेत.उमेदवारीवरून : पक्षात तीन गटपृथ्वीराज पाटील यांनी उमेदवारीची मागणी केली असली तरी, पक्षात तीन गटातून इच्छुक पुढे येण्याची चिन्हे आहेत. यामध्ये मदन पाटील गटातर्फे काँग्रेसच्या केंद्रीय कार्यकारिणी सदस्या जयश्रीताई पाटील यांच्या उमेदवारीसाठी आग्रह धरला जाणार आहे. विशाल पाटील यांच्या गटातूनही ऐनवेळी उमेदवारीबाबत मागणी केली जाऊ शकते. अद्याप त्यांनी कोणतीही भूमिका जाहीर केली नसली तरी, इच्छुकांमागून गटबाजीचे अस्तित्व या निवडणुकीत राहण्याची दाट शक्यता आहे.निकालावरूनही संशयकल्लोळलोकसभा निवडणुकीत आघाडीचे उमेदवार व काँग्रेस नेते विशाल पाटील यांचा पराभव झाल्यानंतर, काँग्रेसचे वर्चस्व असलेल्या मतदारसंघात व भागात कमी मते पडल्यावरून संशयकल्लोळ सुरू आहे. हा कल्लोळ अजूनही शांत झालेला नाही. त्यामुळे लोकसभा निवडणुकीच्या निकालाचे पडसाद विधानसभा निवडणुकीतही काँग्रेसअंतर्गत वातावरणावर उमटण्याची चिन्हे आहेत.