शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
2
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
3
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
4
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
5
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
6
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
7
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
8
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
9
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
10
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
11
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
12
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
13
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
14
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
15
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
16
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
17
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
18
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
19
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ

सर्वोच्च न्यायालयाचे चाललंय तरी काय? काँग्रेसच्या पृथ्वीराज चव्हाण यांचा सवाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2022 22:26 IST

योग्य न्याय झाला असे आम्हाला वाटत नाही, असेही ते म्हणाले.

अविनाश कोळी। लोकमत न्यूज नेटवर्क, सांगली: यापूर्वी सर्वोच्च न्यायालयाने सुटी दिवशी दिलेला निर्णय अचंबित करणारा आहे. योग्य न्याय झाला असे आम्हाला वाटत नाही. त्यामुळे न्यायदेवतेने कायद्याचे अचूक विश्लेषण करुन न्याय देणे अपेक्षित आहे, असे मत काँग्रेस नेते व माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना व्यक्त केले.

चव्हाण म्हणाले की, सर्वोच्च न्यायालयाच्या दोन न्यायमूर्तींनी यापूर्वी सुटीच्या दिवशी जो निर्णय दिला तो अचंबित करणारा होता. सदस्यांच्या निलंबनाची कारवाई प्रलंबित असताना मुख्यमंत्र्यांना शपथ देणे चुकीचे होते. एकदा मुख्यमंत्र्यांना शपथ दिल्यानंतर अध्यक्ष निवड व अन्य प्रक्रिया होऊन गेली आहे. आता सर्वोच्च न्यायालय हे सगळे घड्याळ उलटे फिरवणार आहे का? त्यामुळे सुप्रिम कोर्टाचे नेमके काय चालले आहे, हे समजत नाही. आमची व जनतेची प्रामाणिक अपेक्षा आहे की, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना जे घटनेमध्ये अभिप्रेत होते त्यानुसार कायद्याचे अचूक विश्लेषण करुन योग्य अर्थ लावून न्यायालयाने न्याय द्यावा. तो न्याय झालेला दिसत नाही. त्यामुळे यापुढे घटनापीठ ज्यावेळी बसेल त्यावेळी मुलभूत गोष्टींचा विचार करुन निवाडा करेल, अशी आशा आहे.

"महाराष्ट्रातील परिस्थिती सुधारेल व घोडेबाजार थांबेल, अशीही आशा आहे. असा घोडेबाजार होणे, ही लाजीरवाणी गोष्ट आहे. त्यास मोदी सरकारच जबाबदार आहे. आतापर्यंत साडे पाच हजार लोकांविरोधात ईडीची कारवाई झाली, त्याचा निकाल काय लागला? भाजपच्या लोकांच्या संस्था मात्र धुतल्या तांदळासारख्या आहेत, असे समजून त्यांच्यावर धाडी टाकल्या जात नाहीत. त्यामुळे संविधानच आता धोक्यात आले आहे. देशाची वाटचाल हुकूमशाहीच्या दिशेने सुरु आहे. भाजपचे अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनीही विरोधी पक्ष संपविण्याचे वक्तव्य करुन त्याबाबतचे संकेत दिले आहेत. त्यामुळे जनतेनेच आता सावध व्हायला हवे", असेही ते म्हणाले.