शहरं
Join us  
Trending Stories
1
पर्यावरणप्रेमींच्या तीव्र विरोधासमोर केंद्र सरकार झुकलं, ‘अरवली’ला वाचवण्यासाठी घेतला मोठा निर्णय   
2
बीडच्या ‘सह्याद्री देवराई’ला भीषण आग; अभिनेते सयाजी शिंदे यांनी जोपासलेली हजारो झाडे संकटात
3
थायलंड-कंबोडिया सीमेवरील विष्णूची मूर्ती बुलडोझरने पाडली, भारताने घेतला तीव्र आक्षेप  
4
बांगलादेशमध्ये हिंसाचार सुरूच, पेट्रोल बॉम्ब हल्ल्यानंतर आता मध्यरात्री ढाका विद्यापीठात मोडतोड
5
नाताळाच्या पूर्वसंध्येला बांगलादेशची राजधानी हादरली, पेट्रोल बॉम्बच्या स्फोटात एकाचा मृत्यू
6
नवीन वर्षात बदलणार काँग्रेसचं 'पॉवर' समीकरण; प्रियांका गांधींना मिळणार महत्त्वाची जबाबदारी
7
IPL 2026 आधीच RCBच्या स्टार खेळाडूला होणार अटक? तब्बल ५ कोटी मोजून घेतलंय संघात
8
पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी सक्षम ताटेची आई व प्रेयसीचा आत्मदहनाचा प्रयत्न, दिला निर्वाणीचा इशारा...
9
‘प्लॅन २०४९’, चीनची भारताच्या अरुणाचल प्रदेशवर नजर, लष्करी बळावर कब्ज्याची तयारी
10
"आम्हाला मतदान केलं तर प्रश्न सोडवू, पण दुसरीकडे केलं तर..."; नितेश राणेंचा मतदारांना इशारा
11
VIDEO: धावत्या ट्रेनमध्ये WWE स्टाईल राडा! 'इंटरसिटी'मध्ये प्रवाशांमध्ये तुफान हाणामारी
12
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
13
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
14
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
15
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
16
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
17
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
18
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
19
Prashant Jagtap Resignation: २७ वर्षांची साथ सोडली; प्रशांत जगतापांचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला रामराम
20
“राहुल गांधींसारखे पार्ट टाइम राजकारणी होऊ नका, कठोर मेहनत घेत राहा”; नितीन नबीन यांचा संदेश
Daily Top 2Weekly Top 5

सर्वोच्च न्यायालयाचे चाललंय तरी काय? काँग्रेसच्या पृथ्वीराज चव्हाण यांचा सवाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2022 22:26 IST

योग्य न्याय झाला असे आम्हाला वाटत नाही, असेही ते म्हणाले.

अविनाश कोळी। लोकमत न्यूज नेटवर्क, सांगली: यापूर्वी सर्वोच्च न्यायालयाने सुटी दिवशी दिलेला निर्णय अचंबित करणारा आहे. योग्य न्याय झाला असे आम्हाला वाटत नाही. त्यामुळे न्यायदेवतेने कायद्याचे अचूक विश्लेषण करुन न्याय देणे अपेक्षित आहे, असे मत काँग्रेस नेते व माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना व्यक्त केले.

चव्हाण म्हणाले की, सर्वोच्च न्यायालयाच्या दोन न्यायमूर्तींनी यापूर्वी सुटीच्या दिवशी जो निर्णय दिला तो अचंबित करणारा होता. सदस्यांच्या निलंबनाची कारवाई प्रलंबित असताना मुख्यमंत्र्यांना शपथ देणे चुकीचे होते. एकदा मुख्यमंत्र्यांना शपथ दिल्यानंतर अध्यक्ष निवड व अन्य प्रक्रिया होऊन गेली आहे. आता सर्वोच्च न्यायालय हे सगळे घड्याळ उलटे फिरवणार आहे का? त्यामुळे सुप्रिम कोर्टाचे नेमके काय चालले आहे, हे समजत नाही. आमची व जनतेची प्रामाणिक अपेक्षा आहे की, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना जे घटनेमध्ये अभिप्रेत होते त्यानुसार कायद्याचे अचूक विश्लेषण करुन योग्य अर्थ लावून न्यायालयाने न्याय द्यावा. तो न्याय झालेला दिसत नाही. त्यामुळे यापुढे घटनापीठ ज्यावेळी बसेल त्यावेळी मुलभूत गोष्टींचा विचार करुन निवाडा करेल, अशी आशा आहे.

"महाराष्ट्रातील परिस्थिती सुधारेल व घोडेबाजार थांबेल, अशीही आशा आहे. असा घोडेबाजार होणे, ही लाजीरवाणी गोष्ट आहे. त्यास मोदी सरकारच जबाबदार आहे. आतापर्यंत साडे पाच हजार लोकांविरोधात ईडीची कारवाई झाली, त्याचा निकाल काय लागला? भाजपच्या लोकांच्या संस्था मात्र धुतल्या तांदळासारख्या आहेत, असे समजून त्यांच्यावर धाडी टाकल्या जात नाहीत. त्यामुळे संविधानच आता धोक्यात आले आहे. देशाची वाटचाल हुकूमशाहीच्या दिशेने सुरु आहे. भाजपचे अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनीही विरोधी पक्ष संपविण्याचे वक्तव्य करुन त्याबाबतचे संकेत दिले आहेत. त्यामुळे जनतेनेच आता सावध व्हायला हवे", असेही ते म्हणाले.