शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

मिरज तालुक्यात पराभवामुळे काँग्रेसला मरगळ

By admin | Updated: December 1, 2014 00:14 IST

पुन्हा अस्तित्वाची लढाई : सोसायटी, ग्रामपंचायत निवडणुकांत रंगणार

प्रवीण जगताप- लिंगनूर -मिरज तालुक्यातील कॉँग्रेसला सलग लोकसभा व विधानसभा निवडणुकीत दारूण पराभवाचा सामना करावा लागल्याने, कॉँग्रेस कार्यकर्त्यांत निराशाजनक वातावरण आहे. मोठ्या मताधिक्याने भाजपला जनतेने कौल दिल्याने, आता पुन्हा आगामी येणाऱ्या सर्व प्रकारच्या निवडणुका सर्वच पक्षांसाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहेत. या निवडणुकांत तरी कॉँग्रेसला ‘अच्छे दिन’ मिरज तालुक्यात पाहावयास मिळतील का? असा प्रश्न आहे. त्यामुळे गावा-गावात आगामी सोसायटी व ग्रामपंचायत निवडणुकांत अस्तित्वाची लढाई लढावी लागणार आहे. मिरज तालुका तसा वसंतदादांचा तालुका म्हणून ओळखला जातो. पण मागील दोन निवडणुकांतील स्थिती पाहिली, तर कॉँग्रेससाठी सध्या ‘बुरे दिन’ सुरू झाल्याचे चित्र निर्माण झाले आहे. लोकसभा व विधानसभा निवडणुकीत भाजप उमेदवारांना साठ हजारावर मताधिक्य मिळाल्याने, कॉँग्रेससाठी ही धोक्याची घंटा आहे. त्यातच राष्ट्रवादीही सोबत नसल्याने, येणाऱ्या सर्वच निवडणुकीत नव्याने मोर्चेबांधणी करावी लागणार आहे. नजीकच्या काळात कॉँग्रेसच्या कार्यकर्त्यांची पुनर्बांधणी करून जोमाने कामाला लागावे लागणार आहे. अन्यथा भाजपचे कार्यकर्ते विजयाचा ‘टेंपो’ पुढेच रेटण्याच्या तयारीत आहेत. त्यामुळे आजतागायत सोसायटी व ग्रामपंचायत निवडणुकीत स्वतंत्रपणे न उतरणारा पक्ष व कार्यकर्ते नेटाने उतरण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे येणाऱ्या सोसायटी व ग्रामपंचायत निवडणुका सर्वच पक्षांसाठी मोठ्या अस्तित्वाच्या लढाया ठरणार आहेत. आता या निवडणुकांत मात्र कार्यकर्त्यांमधील ‘दूध का दूध और पानी का पानी ’ हे स्पष्ट होणार आहे. कारण विधानसभा निवडणुकीत सर्वच पक्षांनी अचानक काडीमोड घेतल्याने स्थानिक नेत्यांच्याही भूमिका अचानक बदलल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे उमेदवारांनाही कोणते कार्यकर्ते कोणाचे काम करीत होते, याचा अंदाज अद्याप बांधता आलेला नाही. अशातच मिरज विधानसभेसाठी तर पूर्वाश्रमीचे कॉँग्रेस नेते बाळासाहेब होनमोरे अचानक राष्ट्रवादीतून उभे राहिले. सी. आर. सांगलीकर यांनी पंचायत समितीची फळी सोबत घेऊन बंडखोरी केली, तर सिद्धार्थ जाधव यांना कॉँग्रेसचे तिकीट मिळूनही खडतर प्रवास करावा लागला. अर्थात केंद्रापासून राज्यापर्यंत पोषक वातावरण आणि स्थानिक कॉँग्रेसमध्ये फुटीने आलेला कमकुवतपणा भाजपच्या चांगलाच कामाला आला अन् मोठे मताधिक्य मिळाले. भाजपला मिरज मतदारसंघात ‘लाल दिवा’ मिळालाच, तर मोठ्या ताकदीने सर्वच निवडणुकांत भाजपचे कार्यकर्ते नेटाने सामोरे गेल्यास आश्चर्य वाटायला नको. तेव्हा कॉँग्रेसला आता खडतर काळ सुरू आहे. हा खडतर काळ नष्ट हाईल का? कॉँग्रेसला पुन्हा अच्छे दिन येतील का? पक्षाचे नेते या पराभवातून धडा घेऊन कार्यरत होणार का? याकडे सर्वांचे लक्ष आहे.घोरपडे-खाडे यांनी पक्की मोट बांधली तर..?मिरज पूर्व भागात माजी मंत्री अजितराव घोरपडे यांच्या कार्यकर्त्यांची मोठी फळी आहे. निवडणुकीत घोरपडे जरी भाजपध्ये गेले तरी, स्थानिक नेते राष्ट्रवादीतच, असे उसने अवसान राष्ट्रवादीच्या बड्या नेत्यांनी आणले होते. पण ते अवसान निवडणुकांच्या निकालावरून गळून पडल्याचेच दिसून आले. शिवाय अचानक कॉँग्रेसमधून राष्ट्रवादीत आलेल्या उमेदवारासोबत राहण्यापेक्षा अंतिमक्षणी गावा-गावातल्या कार्यकर्त्यांनी भाजपला पसंती दिली. त्यामुळे घोरपडे व खाडे गटातील तथाकथित संघर्ष निवडणुकीच्या निकालात शमला (?) असल्याचेच दिसून आले. ते एकत्रितपणे या निवडणुकीला सामोरे गेल्यास मात्र पुन्हा कॉँग्रेसची वाट बिकट होईल, असा राजकीय विश्लेषकांचा अंदाज आहे.