शहरं
Join us  
Trending Stories
1
१ पद, २ विभाग अन् २ आदेश; CM देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्या खात्यांमध्ये नियुक्तीवरून संघर्ष?
2
“जनभावनेचा आदर करणारे हे सरकार, आम्ही...”; ‘महादेवी’ परतण्याबाबत एकनाथ शिंदेचे मोठे विधान
3
एकनाथ शिंदेंची दिल्लीवारी; अमित शाहांशी बैठकीत काय चर्चा झाली? खुद्द उपमुख्यमंत्री म्हणाले...
4
आधार ओटीपी वापरून ITRचं ई-व्हेरिफिकेशन करा, अन्यथा रिटर्न अवैध ठरेल; पाहा संपूर्ण प्रोसेस
5
८० वर्षांपूर्वी उत्खननात सापडलेले शिवमंदिर; आता पुन्हा धराली दुर्घटनेत जमिनीखाली गाडले गेले
6
'कायद्याच्या कचाट्यात महादेवी हत्तीला अडकवू नका, ... तोपर्यंत लढा सुरूच राहणार'; राजू शेट्टींनी स्पष्टच सांगितलं
7
बुकिंग करणाऱ्या ग्राहकांवरच शाओमी उलटली; आता म्हणतेय आठवड्यात पूर्ण पैसे द्या नाहीतर...
8
Wasim Jaffer: वसीम जाफरवर मोठी जबाबदारी, आता विदर्भातील खेळाडूंना शिकवतील फलंदाजीचे धडे!
9
ICC Test Ranking : मियाँ 'मॅजिक'नंतर 'मार मुसंडी' शो! सिराजला ICC कडून मिळालं मोठं गिफ्ट
10
ITR आणि टॅक्स डेडलाईनमध्ये काय फरक आहे? शेवटची तारीख कधी? ५,००० दंडापासून वाचण्यासाठी लगेच वाचा!
11
एकनाथ शिंदे-उद्धव ठाकरेंची एकाचवेळी दिल्लीवारी; टायमिंगची चर्चा, नवे समीकरण दिसणार?
12
"आधी माझ्या बायकोला वाचवा...."; पुरात अडकलेल्या नवऱ्याची धडपड, जिंकली लोकांची मनं
13
एकटं बसलं होतं जोडपं, पाठीमागून २ युवक आले; गर्लफ्रेंडला सोडून बॉयफ्रेंड पळाला, त्यानंतर जे घडलं...
14
तो 'सोंगाड्या'! DSP सिराजसंदर्भात नेमकं काय म्हणाला जो रुट?
15
'स्वराज्यरक्षक संभाजी' फेम प्राजक्ता गायकवाडचा उद्या साखरपुडा, मेहंदीचा व्हिडीओ आला समोर
16
दिल्लीसह देशभरातील वीज ग्राहकांना बसणार ‘शॉक’, वीजदरात वाढ करण्यास सुप्रीम कोर्टाची मंजुरी
17
इराणमध्ये मोठे राजकीय फेरबदल; 'सुप्रीम लीडर'ने कट्टरपंथी विरोधी नेत्याला दिली मोठी जबाबदारी
18
एकनाथ शिंदे यांनी केले अमित शाह यांचे तोंडभरून कौतुक; बाळासाहेब ठाकरेंचे नाव घेत म्हणाले...
19
वडिलांना सांगितलं कॉल सेंटरमध्ये नोकरी मिळाली; रोज ८-१० ग्राहकांना खूष...
20
IND vs ENG: इंग्लंडविरूद्ध ऐतिहासिक विजय मिळाल्यानंतरही टीम इंडियाने सेलिब्रेशन का नाही केलं? कारण...

लॉकडाऊनमध्ये सवलत, पण फाजील आत्मविश्वास नको, अन्यथा तिसरी लाट दूर नसेल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2021 04:18 IST

फोटो ०२ संतोष ०१ लॉकडाऊनमध्ये शिथिलता आणल्यानंतर मंगळवारी सांगलीतील बाजारपेठेत अशी गर्दी झाली होती. १. संस्थात्मक विलगीकरणाकडे दुसऱ्या लाटेत ...

फोटो ०२ संतोष ०१

लॉकडाऊनमध्ये शिथिलता आणल्यानंतर मंगळवारी सांगलीतील बाजारपेठेत अशी गर्दी झाली होती.

१. संस्थात्मक विलगीकरणाकडे दुसऱ्या लाटेत पूर्णत: दुर्लक्ष झाले.

२. रुग्णांच्या संपर्कातील नातेवाइकांचे कॉन्टॅक्ट ट्रेसिंग अपेक्षेनुसार पुरेशा प्रमाणात झाले नाही.

३. पुण्या-मुंबईसारख्या मोठ्या शहरांतून येणाऱ्यांची चोख नाकेबंदी झाली नाही, ते फिरतच राहिले.

४. होम आयसोलेशनमधील रुग्णांवर पूर्ण लक्ष व नियंत्रण राहिले नाही, ते बाहेर फिरत राहिल्याने सुपर स्प्रेडर ठरले.

५. लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतर बाजारात गर्दी ओसंडून वाहिली, नियमांचे उल्लंघन झाले.

लोकमत न्यूज नेटवर्क

सांगली : जिल्ह्यात कोरोनाला उतार लागला, तशी १ जूनपासून लॉकडाऊनमध्ये सवलत मिळाली आहे. पण कोरोना पूर्ण गेला या गैरसमजात राहिल्यास तिसऱ्या लाटेचे संकट कधीही येऊ शकते, याकडे तज्ज्ञांनी लक्ष वेधले आहे. सवलत काळातील नागरिकांची बेफिकिरी जिल्ह्याला पुन्हा एकदा कोरोना संकटाच्या खाईत ढकलू शकते, असा इशारा त्यांनी दिला आहे.

दुसऱ्या लाटेत जिल्ह्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येने लाखांचा आकडा पार केला आहे. पहिल्या लाटेपेक्षा अधिक तीव्रतेने व गतीने दुसरी लाट फैलावली. एका दिवशी २२०० रुग्ण ही सर्वोच्च संख्या ठरली. त्यानंतर दररोज घसरण होत आहे. चार दिवसांपूर्वी ८१० रुग्ण ही दोन महिन्यांतील निचांकी रुग्णसंख्या ठरली. घसरणीचे आकडे येऊ लागल्याने नागरिकांत फाजील आत्मविश्वास निर्माण होण्याची चिन्हे आहेत. उत्साहाला वेळीच आवर घातला नाही, तर तिसऱ्या लाटेचे वादळ जिल्ह्याचा उंबरठा ओलांडू शकते.

दुसऱ्या लाटेत प्रशासन आणि लोकांनीही अनेक चुका केल्या. बाजारपेठा अंशत: खुल्या होताच गर्दी उसळत गेली. कोरोनाच्या नियमांना नागरिकांनी फाट्यावर बसवले. मास्क, फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन केलेच नाही. होम आयसोलेशनमधील रुग्ण बिनधास्तपणे बाजारात फिरत राहिले. आता सवलत मिळाल्यावर याचीच पुनरावृत्ती झाली, तर तिसरी लाट दूर असणार नाही. ती अधिक तीव्र आणि गंभीर असेल याकडे तज्ज्ञांनी लक्ष वेधले आहे.

बॉक्स

प्रशासन गाफील नाहीच...

१. १ जूनपासून प्रशासनाने लॉकडाऊनमध्ये सवलत दिली असली तरी नागरिकांना स्वैरपणे वावरता येणार नाही. प्रशासनाचे त्यांच्यावर काटेकोर लक्ष असेल.

२. महापालिकेची पथके शहरभरात लक्ष ठेवून असतील. सकाळी आकरानंतरही व्यवसाय सुरू राहिल्यास मोठ्या दंडाला तोंड द्यावे लागेल.

३. जीवनावश्यक वस्तुंशिवाय अन्य दुकाने उघडता येणार नाहीत. आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई केली जाईल.

४. जिल्हाभरात फौजदारी प्रक्रियेचे १४४ कलम लागू आहे. योग्य कारणाशिवाय बाहेर फिरण्यावर निर्बंध आहेत.

५. आदेशाचा भंग केल्यास दंड होईल, वारंवार भंग केल्यास दुकान पूर्ण साथरोग कालावधीत सील केले जाईल.

पॉईंटर्स

अनलॉक-पहिला - ४ ऑक्टोबर २०२० - एकूण कोरोनारुग्ण -३८,५१८, मृत्यू - १,४०३.

अनलॉक-दुसरा - १ जून २०२१ - एकूण कोरोनारुग्ण - १,१९,३७४, मृत्यू - ३,४५०.