शहरं
Join us  
Trending Stories
1
जयपूरच्या एसएमएस रुग्णालयात भीषण अग्नितांडव: आयसीयूमध्ये ६ रुग्णांचा दुर्दैवी अंत, ५ जणांची प्रकृती चिंताजनक
2
संपादकीय: बिहार ठरवेल आगामी दिशा? जनसुराज्य, जंगलराज ते मागासच राहिलेले राज्य...
3
काटा मारणाऱ्या कारखान्यांवर कारवाई: मुख्यमंत्री म्हणाले, कारखान्यांच्या नफ्यातील पैसे मागितले, एफआरपीचे नाही
4
बिहारमध्ये २२ वर्षांनंतर मतदारयादीचे ‘शुद्धीकरण’; केंद्रीय निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचा दावा
5
पुतीन यांच्या जाळ्यात ट्रम्प अडकले की काय? अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष मोठ्या भ्रमात होते, पण...
6
महाराष्ट्रातील पूरग्रस्तांना केंद्र भरीव मदत करणार; केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची ग्वाही
7
‘आरएटी’ सक्रिय झाल्याने एअर इंडियाच्या विमानाचे लँडिंग
8
शासकीय रुग्णालयांना चक्क बोगस औषधांचा पुरवठा, स्थानिक पातळीवर खरेदी
9
राज्यात प्राध्यापकांच्या १२ हजारांपेक्षा जास्त जागा रिक्त; पीएच.डी., नेट, सेट असूनही अनेक प्राध्यापक कंत्राटी
10
लष्करी सेवेतील दीर्घ ताणामुळे कॅन्सर बळावू शकतो; मृताच्या वारसांना पेन्शन देण्याचा हायकोर्टाचा निर्णय
11
बिल्डरकडून सरकारी जागेवर इमारती उभारून ११२ रहिवाशांची फसवणूक; ३६ वर्षांनी प्रकार उघड
12
पाकच्या पोकळ वल्गना सुरूच; म्हणे, भारत त्यांच्याच विमानांच्या ढिगाऱ्याखाली दबेल
13
मनसे ‘मविआ’ सहभागी? ठाण्यातील बैठकीत संकेत
14
आफ्रिकेतील टांझानियाच्या घनदाट जंगलांतली जादूगार
15
नेपाळमध्ये दोन वर्षांची आर्यतारा नवी देवी!
16
कुशीवली धरणाचा मोबदला संतप्त शेतकऱ्यांनी नाकारला; प्रतिगुंठा २० हजार; रक्कम नाशिक लवादाकडे जमा करण्याच्या हालचाली
17
जळालेल्या चार्जरमुळे सापडला दहशतवाद्यांना मदत करणारा युसूफ; पहलगाम हल्ल्याआधी चारवेळा भेटला
18
जीवघेण्या कफ सिरपचा कहर सुरूच, मध्य प्रदेशात आणखी २ मुलांचा मृत्यू, आतापर्यंत १६ जणांचा गेला बळी
19
IND vs PAK: टॉस वेळी पाकिस्तानी कॅप्टनची चिटिंग? ते हरमनप्रीतलाही नाही कळलं (VIDEO)
20
एक फोन कॉल अन्...! मामे भावाच्या प्रेमात 'पागल' झाली पत्नी, 'लव्ह अफेअरचा चक्कर'मध्ये पतीची निर्घृन हत्या केली! 

लॉकडाऊनमध्ये सवलत, पण फाजील आत्मविश्वास नको, अन्यथा तिसरी लाट दूर नसेल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2021 04:18 IST

फोटो ०२ संतोष ०१ लॉकडाऊनमध्ये शिथिलता आणल्यानंतर मंगळवारी सांगलीतील बाजारपेठेत अशी गर्दी झाली होती. १. संस्थात्मक विलगीकरणाकडे दुसऱ्या लाटेत ...

फोटो ०२ संतोष ०१

लॉकडाऊनमध्ये शिथिलता आणल्यानंतर मंगळवारी सांगलीतील बाजारपेठेत अशी गर्दी झाली होती.

१. संस्थात्मक विलगीकरणाकडे दुसऱ्या लाटेत पूर्णत: दुर्लक्ष झाले.

२. रुग्णांच्या संपर्कातील नातेवाइकांचे कॉन्टॅक्ट ट्रेसिंग अपेक्षेनुसार पुरेशा प्रमाणात झाले नाही.

३. पुण्या-मुंबईसारख्या मोठ्या शहरांतून येणाऱ्यांची चोख नाकेबंदी झाली नाही, ते फिरतच राहिले.

४. होम आयसोलेशनमधील रुग्णांवर पूर्ण लक्ष व नियंत्रण राहिले नाही, ते बाहेर फिरत राहिल्याने सुपर स्प्रेडर ठरले.

५. लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतर बाजारात गर्दी ओसंडून वाहिली, नियमांचे उल्लंघन झाले.

लोकमत न्यूज नेटवर्क

सांगली : जिल्ह्यात कोरोनाला उतार लागला, तशी १ जूनपासून लॉकडाऊनमध्ये सवलत मिळाली आहे. पण कोरोना पूर्ण गेला या गैरसमजात राहिल्यास तिसऱ्या लाटेचे संकट कधीही येऊ शकते, याकडे तज्ज्ञांनी लक्ष वेधले आहे. सवलत काळातील नागरिकांची बेफिकिरी जिल्ह्याला पुन्हा एकदा कोरोना संकटाच्या खाईत ढकलू शकते, असा इशारा त्यांनी दिला आहे.

दुसऱ्या लाटेत जिल्ह्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येने लाखांचा आकडा पार केला आहे. पहिल्या लाटेपेक्षा अधिक तीव्रतेने व गतीने दुसरी लाट फैलावली. एका दिवशी २२०० रुग्ण ही सर्वोच्च संख्या ठरली. त्यानंतर दररोज घसरण होत आहे. चार दिवसांपूर्वी ८१० रुग्ण ही दोन महिन्यांतील निचांकी रुग्णसंख्या ठरली. घसरणीचे आकडे येऊ लागल्याने नागरिकांत फाजील आत्मविश्वास निर्माण होण्याची चिन्हे आहेत. उत्साहाला वेळीच आवर घातला नाही, तर तिसऱ्या लाटेचे वादळ जिल्ह्याचा उंबरठा ओलांडू शकते.

दुसऱ्या लाटेत प्रशासन आणि लोकांनीही अनेक चुका केल्या. बाजारपेठा अंशत: खुल्या होताच गर्दी उसळत गेली. कोरोनाच्या नियमांना नागरिकांनी फाट्यावर बसवले. मास्क, फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन केलेच नाही. होम आयसोलेशनमधील रुग्ण बिनधास्तपणे बाजारात फिरत राहिले. आता सवलत मिळाल्यावर याचीच पुनरावृत्ती झाली, तर तिसरी लाट दूर असणार नाही. ती अधिक तीव्र आणि गंभीर असेल याकडे तज्ज्ञांनी लक्ष वेधले आहे.

बॉक्स

प्रशासन गाफील नाहीच...

१. १ जूनपासून प्रशासनाने लॉकडाऊनमध्ये सवलत दिली असली तरी नागरिकांना स्वैरपणे वावरता येणार नाही. प्रशासनाचे त्यांच्यावर काटेकोर लक्ष असेल.

२. महापालिकेची पथके शहरभरात लक्ष ठेवून असतील. सकाळी आकरानंतरही व्यवसाय सुरू राहिल्यास मोठ्या दंडाला तोंड द्यावे लागेल.

३. जीवनावश्यक वस्तुंशिवाय अन्य दुकाने उघडता येणार नाहीत. आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई केली जाईल.

४. जिल्हाभरात फौजदारी प्रक्रियेचे १४४ कलम लागू आहे. योग्य कारणाशिवाय बाहेर फिरण्यावर निर्बंध आहेत.

५. आदेशाचा भंग केल्यास दंड होईल, वारंवार भंग केल्यास दुकान पूर्ण साथरोग कालावधीत सील केले जाईल.

पॉईंटर्स

अनलॉक-पहिला - ४ ऑक्टोबर २०२० - एकूण कोरोनारुग्ण -३८,५१८, मृत्यू - १,४०३.

अनलॉक-दुसरा - १ जून २०२१ - एकूण कोरोनारुग्ण - १,१९,३७४, मृत्यू - ३,४५०.