शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025: घासून नाही ठासून जिंकली मॅच! राजस्थान रॉयल्सला 'आउट' करत मुंबई इंडियन्स टॉपला
2
मतदार याद्यांमधील घोळ कमी होणार! निवडणूक आयोग करणार हे महत्त्वाचे बदल, जाणून घ्या सविस्तर
3
IPL 2025 : रोहित शर्माचा बॉल बॉयसोबतचा व्हिडिओ होतोय व्हायरल; नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
"दहशतवाद्यांनाही त्यांच्या कुटुंबीयांसमोर गोळ्या घालाव्यात’’, पहलगाममध्ये मृत्युमुखी पडलेल्या शुभम यांच्या पत्नीची मागणी 
5
...अन् हिटमॅन रोहितनं युवा बॅटर वैभवला पुन्हा हिमतीनं मैदानात उतरण्यासाठी दिलं बळ
6
काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या गिरिजा व्यास यांचं निधन, पूजा करताना साडीला आग लागून झाल्या होत्या गंभीर जखमी
7
जे रोहित-विराटलाही नाही जमलं ते सूर्या भाऊनं करून दाखवलं; मोडला ११ वर्षांपूर्वीचा विक्रम
8
बुलढाण्यात जळका भडंग नजिक एसटी बस उलटली; दिवसभरात किरकोळ अपघातांची मालिका सुरूच
9
जातनिहाय जनगणनेनंतर आता काँग्रेसचा आणखी मोठा डाव, मल्लिकार्जुन खर्गेंनी केली अशी मागणी
10
केवळ युद्धाच्या नावानेच पाकिस्तानला भरलीय धडकी, बंद केले पीओकेतील 1000 हून अधिक मदरसे!
11
IPL 2025 : विक्रमी शतकवीर वैभवच्या पदरी भोपळा! विकेट गमावल्यावर १४ वर्षांच्या पोरानं डोळे मिटले अन्...
12
भारतासाठी गुड न्यूज...! सीमेवर तणावाची स्थिती असतानाच मोठी मदत करणार अमेरिका; पाकिस्तानचं टेन्शन वाढणार!
13
"मुस्लिम आणि काश्मिरींविरोधात द्वेष पसरवू नका’’, पहलगाममध्ये हत्या झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीचं आवाहन
14
"जातीनिहाय जनगणनेसाठी गळा काढणारे शरद पवार, उद्धव ठाकरे आता गप्प का?"; भाजपाचा सवाल
15
भारतासोबतचा तणाव कमी करण्यासाठी पाकिस्तानची ट्रम्प यांच्याकडे धाव, म्हणाला मोठ्या...
16
सरकार जात विचारणार, पण एखाद्याने जात सांगितली नाही तर? याबाबत कायदा काय सांगतो  
17
RR vs MI : एक सेकंद बाकी असताना DRS घेतल्यामुळे वाचला; मग रोहितनं फिफ्टीसह नवा इतिहास रचला
18
"घर में घुसकर मारेंगे नहीं, अब घर में घुस के...!"; पाकिस्तान विरुद्ध निर्णायक युद्ध करण्याची ओवेसी यांची मागणी, बघा VIDEO
19
IPL 2025: राजस्थान रॉयल्सला मोठा धक्का! स्टार गोलंदाज दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर
20
Mumbai RTO: महिलेकडून आरटीओ कर्मचाऱ्याला मारहाण, कार्यालयातही तोडफोड; मुंबईतील घटना

जिल्ह्यातील एकरकमी एफआरपीबाबत अळीमिळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2021 04:23 IST

दुधगाव : जिल्ह्यातील साखर कारखाने सुरू होऊन दीड ते दोन माहिने झाले तरी अघाप एफआरपीचा ...

दुधगाव : जिल्ह्यातील साखर कारखाने सुरू होऊन दीड ते दोन माहिने झाले तरी अघाप एफआरपीचा पत्ता नाही. जिल्ह्यातील कारखानदार आणि संघटनांनी अळामिळीची भूमिका घेतली आहे. त्यामुळे शेतकरी हतबल झाले आहेत. मोजक्याच कारखान्यांनी एकरकमी एफआरपी दिली आहे.

गतवर्षी महापुराने आणि यंदा अतिवृष्टीने उसावर घाव घातला आहे. परिणामी ऊस उत्पादकांचे कंबरडे मोडले आहे. अवेळी पावसाने आज जिल्ह्यातील हजारो हेक्टर क्षेत्रातील ऊस भुईसपाट झाले. अशाच परिस्थितीतही गाळप झालेल्या उसाची एकरकमी एफआरपी मिळाली नाही. कोल्हापूर जिल्ह्यातील कारखान्यांना एकरकमी एफआरपी देणे परवडू शकते; मग सांगलीत का नाही? असा सवाल शेतकरी उपस्थित करत आहेत.

प्रशासनाकडून त्यांच्यावर ठोस कारवाई केली जात नाही. मात्र अनेक शेतकरी संघटनांचे नेते याबाबत केवळ पत्रक काढून आंदोलनाचे इशारे देतात. प्रत्यक्षात काहीच कृती होत नाही. शेतकऱ्यांना त्यांच्या घामाचे आणि हक्काचे पैसे मिळवून देण्यासाठी आंदोलनाची मागणी होत आहे.

चौकट

कोटयवधी रुपये थकीत

ऊस गाळपानंतर १४ दिवसांच्या आत एफआरपी देणे कायद्याने बंधनकारक आहे. मात्र आजपर्यंत बहुतांश कारखानदारांनी हा नियम धाब्यावरच बसविला आहे. काही कारखाने वगळल्यास आजही अनेक बडया कारखानदारांकडे शेतकऱ्यांचे कोट्यवधी रुपये थकीत आहेत. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या किती कारखान्यांवर कारवाई झाली, हे अगदी जगजाहीर आहे. दरवर्षी शेतकरी संंघटना याबाबत आंदोलन करते, मात्र शेवटपर्यंत आंदोलनाची धार राहत नाही. त्यामुळे निदान यंदा तरी संघटनांनी शेवटपर्यंत लढाई सुरू ठेवावी, अशी मागणी होत आहे.