शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
2
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
3
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
4
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
5
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
6
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
7
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
8
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
9
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
10
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
11
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
12
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
13
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
14
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
15
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
16
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
17
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
18
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
19
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
20
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील एकरकमी एफआरपीबाबत अळीमिळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2021 04:23 IST

दुधगाव : जिल्ह्यातील साखर कारखाने सुरू होऊन दीड ते दोन माहिने झाले तरी अघाप एफआरपीचा ...

दुधगाव : जिल्ह्यातील साखर कारखाने सुरू होऊन दीड ते दोन माहिने झाले तरी अघाप एफआरपीचा पत्ता नाही. जिल्ह्यातील कारखानदार आणि संघटनांनी अळामिळीची भूमिका घेतली आहे. त्यामुळे शेतकरी हतबल झाले आहेत. मोजक्याच कारखान्यांनी एकरकमी एफआरपी दिली आहे.

गतवर्षी महापुराने आणि यंदा अतिवृष्टीने उसावर घाव घातला आहे. परिणामी ऊस उत्पादकांचे कंबरडे मोडले आहे. अवेळी पावसाने आज जिल्ह्यातील हजारो हेक्टर क्षेत्रातील ऊस भुईसपाट झाले. अशाच परिस्थितीतही गाळप झालेल्या उसाची एकरकमी एफआरपी मिळाली नाही. कोल्हापूर जिल्ह्यातील कारखान्यांना एकरकमी एफआरपी देणे परवडू शकते; मग सांगलीत का नाही? असा सवाल शेतकरी उपस्थित करत आहेत.

प्रशासनाकडून त्यांच्यावर ठोस कारवाई केली जात नाही. मात्र अनेक शेतकरी संघटनांचे नेते याबाबत केवळ पत्रक काढून आंदोलनाचे इशारे देतात. प्रत्यक्षात काहीच कृती होत नाही. शेतकऱ्यांना त्यांच्या घामाचे आणि हक्काचे पैसे मिळवून देण्यासाठी आंदोलनाची मागणी होत आहे.

चौकट

कोटयवधी रुपये थकीत

ऊस गाळपानंतर १४ दिवसांच्या आत एफआरपी देणे कायद्याने बंधनकारक आहे. मात्र आजपर्यंत बहुतांश कारखानदारांनी हा नियम धाब्यावरच बसविला आहे. काही कारखाने वगळल्यास आजही अनेक बडया कारखानदारांकडे शेतकऱ्यांचे कोट्यवधी रुपये थकीत आहेत. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या किती कारखान्यांवर कारवाई झाली, हे अगदी जगजाहीर आहे. दरवर्षी शेतकरी संंघटना याबाबत आंदोलन करते, मात्र शेवटपर्यंत आंदोलनाची धार राहत नाही. त्यामुळे निदान यंदा तरी संघटनांनी शेवटपर्यंत लढाई सुरू ठेवावी, अशी मागणी होत आहे.