शहरं
Join us  
Trending Stories
1
पालघर: मासेमारी करताना चुकून पाकिस्तानी हद्दीत प्रवेश केलेले नामदेव मेहेर पाकच्या ताब्यात!
2
आजचे राशीभविष्य, ०८ नोव्हेंबर २०२५: काळजी मिटेल, आनंदाची बातमी मिळेल, धनलाभ शक्य
3
नवी मुंबईत मनसेने भरवले मतदार यादीतील बाेगस नावांचे प्रदर्शन; अमित ठाकरेंच्या हस्ते उद्घाटन
4
पार्थ पवारांच्या कंपनीचा आणखी एक गैरव्यवहार; आधी जमीन घाेटाळा, मग व्यवहार रद्द
5
माझे नाव दोन मतदार याद्यांत असणे ही निवडणूक आयोगाची चूक- आमदार अस्लम शेख
6
धनंजय मुंडेंनी दिली मारण्याची सुपारी; मनोज जरांगे यांचा गंभीर आरोप; पोलिसांकडे तक्रार
7
वर्ल्ड चॅम्पियन्सचा गौरव! स्मृती, जेमिमा, राधा यादव यांना प्रत्येकी सव्वादोन कोटींचे बक्षीस
8
जिल्हा परिषद निवडणुकांची दोन आठवड्यांत घोषणा; ३० दिवसांच्या कालावधीतच पार पाडणार निवडणुका
9
नरेंद्र माेदी माझे मित्र आहेत; पुढील वर्षी मी नक्की भारतात येईन: डोनाल्ड ट्रम्प
10
मनोज जरांगे यांच्या आरोपांची सीबीआय चौकशी व्हायलाच हवी; धनंजय मुंडेंचे आरोपांना प्रत्युत्तर
11
प्रभागरचना, आरक्षणावरील निकालांच्या अधीन असेल स्थानिक संस्था निवडणूक- उच्च न्यायालय
12
धक्कादायक! ऑनलाइन क्रीम खरेदी केली, महिलेच्या शरीरावर सापासारखे व्रण; १० वर्षांत १२ लाख रुपये खर्च
13
अधिकाऱ्यांना वाचवण्याच्या नादात दोघांचा मृत्यू; सॅण्डहर्स्ट रेल्वे अपघातामध्ये मुलीचा मृत्यू; आई जखमी
14
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
15
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
16
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
17
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
18
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
19
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
20
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान

जिल्ह्यातील एकरकमी एफआरपीबाबत अळीमिळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2021 04:23 IST

दुधगाव : जिल्ह्यातील साखर कारखाने सुरू होऊन दीड ते दोन माहिने झाले तरी अघाप एफआरपीचा ...

दुधगाव : जिल्ह्यातील साखर कारखाने सुरू होऊन दीड ते दोन माहिने झाले तरी अघाप एफआरपीचा पत्ता नाही. जिल्ह्यातील कारखानदार आणि संघटनांनी अळामिळीची भूमिका घेतली आहे. त्यामुळे शेतकरी हतबल झाले आहेत. मोजक्याच कारखान्यांनी एकरकमी एफआरपी दिली आहे.

गतवर्षी महापुराने आणि यंदा अतिवृष्टीने उसावर घाव घातला आहे. परिणामी ऊस उत्पादकांचे कंबरडे मोडले आहे. अवेळी पावसाने आज जिल्ह्यातील हजारो हेक्टर क्षेत्रातील ऊस भुईसपाट झाले. अशाच परिस्थितीतही गाळप झालेल्या उसाची एकरकमी एफआरपी मिळाली नाही. कोल्हापूर जिल्ह्यातील कारखान्यांना एकरकमी एफआरपी देणे परवडू शकते; मग सांगलीत का नाही? असा सवाल शेतकरी उपस्थित करत आहेत.

प्रशासनाकडून त्यांच्यावर ठोस कारवाई केली जात नाही. मात्र अनेक शेतकरी संघटनांचे नेते याबाबत केवळ पत्रक काढून आंदोलनाचे इशारे देतात. प्रत्यक्षात काहीच कृती होत नाही. शेतकऱ्यांना त्यांच्या घामाचे आणि हक्काचे पैसे मिळवून देण्यासाठी आंदोलनाची मागणी होत आहे.

चौकट

कोटयवधी रुपये थकीत

ऊस गाळपानंतर १४ दिवसांच्या आत एफआरपी देणे कायद्याने बंधनकारक आहे. मात्र आजपर्यंत बहुतांश कारखानदारांनी हा नियम धाब्यावरच बसविला आहे. काही कारखाने वगळल्यास आजही अनेक बडया कारखानदारांकडे शेतकऱ्यांचे कोट्यवधी रुपये थकीत आहेत. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या किती कारखान्यांवर कारवाई झाली, हे अगदी जगजाहीर आहे. दरवर्षी शेतकरी संंघटना याबाबत आंदोलन करते, मात्र शेवटपर्यंत आंदोलनाची धार राहत नाही. त्यामुळे निदान यंदा तरी संघटनांनी शेवटपर्यंत लढाई सुरू ठेवावी, अशी मागणी होत आहे.