शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधींच्या सुरक्षेत मोठी चूक; तरुण Kiss घेऊन पळाला, व्हिडिओ व्हायरल...
2
बायकोला जिवंत जाळल्याचा आरोप असलेल्या पतीची पहिली प्रतिक्रिया, पत्नीच्या हत्येमागील कारण काय सांगितले?
3
गर्भवती पत्नीची निर्घृण हत्या, मृतदेहाचे तुकडे करून पतीने लपवले; धक्कादायक घटनेने परिसर हादरला!
4
"रोज म्हणतात व्होट चोरी... व्होट चोरी..., यांचं डोकं चोरी झालंय!" देवेंद्र फडणवीस यांचा विरोधकांवर हल्लाबोल; स्पष्टच बोलले
5
'कर्नाटक-महाराष्ट्रात मतचोरी; बिहारमध्ये होऊ देणार नाही', राहुल गांधींचा निवडणूक आयोगावर निशाणा
6
५,००० रुपयांची SIP तुम्हाला बनवेल लखपती? जाणून घ्या १५ वर्षांत किती परतावा मिळेल
7
"मर्यादेत राहा...!"; आशिया कपमध्ये भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी वसीम अक्रमचा इशारा, नेमकं काय म्हणाला?
8
उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी ६८ अर्ज; अनेक खासदारांच्या बनावट स्वाक्षरी केल्याचे उघड
9
सोहम बांदेकरसोबत लग्नाच्या चर्चांनंतर अभिनेत्री पूजाने पहिल्यांदाच शेअर केली स्टोरी, म्हणाली...
10
८व्या वेतन आयोगात बँक कर्मचाऱ्यांचे पगारही वाढतील का? कधी होणार लागू? मोठी अपडेट समोर
11
Sara Ali Khan : जबरदस्त ट्रान्सफॉर्मेशन! सारा अली खानने फक्त 'या' २ गोष्टी सोडून कमी केलं ४५ किलो वजन
12
'आधी १९७१ चा प्रश्न सोडवा, मग आपण चर्चा करू', बांगलादेशच्या भूमीवर पाकिस्तानच्या परराष्ट्रमंत्र्यांचा अपमान
13
बायकोला जाळणाऱ्या नवऱ्याचा एन्काउंटर; पायाला लागली गोळी, पळून जाण्याचा करत होता प्रयत्न
14
समुद्रात भारताची ताकद वाढणार, जर्मनीसोबत ७० हजार कोटींचा करार; ६ हाय-टेक पाणबुड्या बांधणार
15
Cheteshwar Pujara: भारतीय क्रिकेटमधील मोठी 'इनिंग' संपली; 'मिस्टर डिपेंडेबल' आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त!
16
युक्रेनमध्ये हाहाकार, रशियानं 143 ठिकाणांवर केली  बॉम्बिंग; डोनेत्स्कमध्ये दोन गावांवर कब्जा!
17
"हुंड्यात स्कॉर्पिओ, बुलेट दिली तरी माझ्या मुलीची हत्या, आरोपींच्या घरावर बुलडोझर चालवा अन्यथा..."
18
एआयची कमाल, 25 वर्षांनंतर परतला महिलेचा आवाज...! कसा घडला हा चमत्कार? जाणून थक्क व्हाल!
19
लग्नाला ८ वर्षं होऊनही मुलबाळ नाही, तांत्रिक महिलेला म्हणाला तंत्रमंत्राने गर्भधारणा करतो, त्यानंतर...
20
फलकावरुन झालेल्या वादातून दगडफेक; कोल्हापुरात दोन्ही गटांतील ४०० जणांवर दंगलीचा गुन्हा, लाखोंचे नुकसान

वादाच्या बिकट वाटेवरून सामंजस्याची वहिवाट...

By admin | Updated: December 21, 2015 00:50 IST

तुरचीतील शेतकऱ्यांचा आदर्श : द्राक्षबाग काढून केला रस्ता - गुड न्यूज

तासगाव : इंच न् इंच जागेसाठी वादाच्या रक्तरंजित कहाण्या लिहल्या जात असतानाच, तासगाव तालुक्यातील तुरची येथील शेतकऱ्यांनी सामंजस्याची नवी कहाणी लिहून लोकांसमोर आदर्श निर्माण केला आहे. तालुक्यातील अनेक गावांत शेतकऱ्यांना स्वत:च्या शेतात जाण्यासाठी रस्ते नाहीत. काही ठिकाणी रस्त्यांसाठी एकमेकांवर दावे दाखल आहेत. यावर तोडगा काढण्यासाठी तहसीलदार सुधाकर भोसले यांनी महाराजस्व अभियानांतर्गत मोहीम सुरु केली आणि तुरचीतील शेतकऱ्यांनी स्वत:च्या द्राक्षेबागांतील काही झाडे काढून तब्बल दीड किलोमीटर लांबीचा रस्ता तयार केला आहे.शेतीच्या रस्त्याचा प्रश्न अनेक शेतकऱ्यांसाठी डोकदुखी ठरत आहे. त्यातच बागायती शेती असेल आणि रस्ता नसेल, तर शेत असून अडचण आणि नसून खोळंबा, अशीच अवस्था असते. शेतीला रस्ता मिळावा, यासाठी प्रशासनाकडे दाखल होणाऱ्या दाव्यांची संख्याही मोठी आहे. दावा दाखल झाल्यानंतर अनेक वर्षे सुनावणीसाठी हेलपाटे मारून आणि वकिलासाठी पैसे मोजण्यात शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. शेतकऱ्यांचे अशा पध्दतीने होणारे नुकसान टाळण्यासाठी तहसीलदार सुधाकर भोसले यांनी महाराजस्व अभियान प्रभावीपणे राबविण्याचा निर्णय घेतला. या अभियानांतर्गत तालुक्यातील सर्व पाणंद रस्ते खुले करणे, रस्ते नसलेल्या शेतकऱ्यांना मार्गदर्शन करुन रस्त्याची सोय करुन देण्यासाठी मोहीम सुरु केली आहे. या मोहिमेचा लाभ तुरचीतील शेतकऱ्यांना झाला आहे. तुरची येथील अनेक शेतकऱ्यांना शेतात जाण्यासाठी वाट नव्हती. द्राक्षबागा असलेल्या शेतकऱ्यांची रस्त्याअभावी मोठी गैरसोय होत होती. वाट मिळावी, यासाठी प्रशासनाकडे दावाही दाखल करण्यात आला होता. या ठिकाणच्या शेतकऱ्यांना तहसीलदार भोसले यांनी मार्गदर्शन केल्यानंतर सर्वच शेतकऱ्यांनी रस्ता करण्यासाठी पुढाकार घेतला. खाशाबा चव्हाण, वसंत चव्हाण, राजाराम चव्हाण, रवींद्र चव्हाण, जगन्नाथ चव्हाण या शेतकऱ्यांनी रस्त्यासाठी अडसर ठरणाऱ्या स्वत:च्या द्राक्षबागा तोडून रस्ता तयार केला. त्यामुळे तुरचीत लोकसभागातून दीड किलोमीटर लांबीचा रस्ता तयार झाला. (वार्ताहर)शासनाच्या महाराजस्व अभियानांतर्गत पाणंद रस्ते खुले करुन देण्यासाठी विशेष मोहीम सुरु केली आहे. शेतकऱ्यांना रस्त्याचा प्रश्न जिव्हाळ्याचा आहे. शेतकऱ्यांची गैरसोय तसेच आर्थिक नुकसान टाळण्यासाठी प्रशासनाने पुढाकार घेतला आहे. या मोहिमेअंतर्गत आजअखेर २५ पाणंद रस्ते खुले केले आहेत. पाणंद रस्त्यांबाबत तक्रारी असल्यास प्रशासनाशी संपर्क साधवा. प्रशासनाकडून योग्य ते सहकार्य केले जाईल.- सुधाकर भोसले, तहसीलदार, तासगाव.