शहरं
Join us  
Trending Stories
1
कबुतरखान्यांबद्दल 'सर्वोच्च' निर्णय आला, आता सरकार काय करणार? CM फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
2
Donald Trump's Tariffs : मोठी तयारी! कर लादणाऱ्या अमेरिकेला धक्का बसणार! भारत या शस्त्राचा वापर करणार
3
नाशिकमध्ये शिंदेसेनेच्या बैठकीत अहिल्यानगरचे दोन गट भिडले; शरद पवार गटाचा पदाधिकारी बैठकीत शिरल्याचा दावा
4
Bank Job: बँकेत नोकरी करण्याचे स्वप्न पूर्ण होणार; आयओबीमध्ये भरती, महाराष्ट्रासाठी 'इतक्या' जागा राखीव
5
Dadar Kabutarkhana Ban : मोठी बातमी! कबुतरखान्यांवरील बंदीबाबत सुप्रीम कोर्टाने दिला महत्वाचा निर्णय
6
Ramdas Athawale : Video - "राहुल गांधी निवडणूक आयोगाला घाबरतात, म्हणूनच ते..."; रामदास आठवलेंचा हल्लाबोल
7
अरेरेरे! तीन वर्षांच्या लेकीलाच बापाने खाऊ खातले विषारी बिस्किट; पत्नीचा पतीवर गंभीर आरोप
8
सोन्याचं नक्षीकाम, एकधारी पातं, मुल्हेरी मूठ... महाराष्ट्राने लिलावात जिंकली 'फिरंग' तलवार (PHOTOS)
9
Rahul Gandhi's Allegations Against Election Commission : 'मी सही करणार नाही, हा निवडणूक आयोगाचा डेटा..', राहुल गांधींचे प्रत्युत्तर, म्हणाले- निवडणूक आयोग दिशाभूल करतेय
10
'आम्ही अशा धमक्यांपुढे झुकणार नाही', असीम मुनीरच्या धमकीवर भारताचे सडेतोड उत्तर
11
ट्रेनच्या फूटबोर्डवर बसताच गर्दुल्ल्याचा हल्ला; तोल जाऊन खाली पडलेल्या प्रवाशाने पाय गमावला, आरोपीला अटक
12
ChatGPT चा सल्ला घेणं बेतलं जीवावर, मिठाऐवजी खाल्लं 'विष', नेमकं काय आहे हे प्रकरण?
13
शेकडो वाहनांचा ताफा, फुलांचा वर्षाव, इंग्लंड दौरा गाजवणाऱ्या आकाश दीपचं घरी जंगी स्वागत
14
लंडन: शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची ऐतिहासिक तलवार महाराष्ट्र सरकारच्या ताब्यात
15
याला म्हणतात शेअर...! 39 दिवसांपासून सातत्याने लागतंय अप्पर सर्किट, ₹63 वर आलाय भाव; करतोय मालामाल
16
भाजपच्या उपमुख्यमंत्र्यांकडेच दोन मतदान ओळखपत्र; निवडणूक आयोगाची नोटीस, बिहारमध्ये काय घडलं?
17
"माझं घर वाचवा...", कवी सौमित्र यांची मुख्यमंत्र्यांना कळकळीची विनंती, बिल्डरकडून फसवणुकीचा आरोप
18
Uddhav Thackeray: निवडणूक आयोग हे राष्ट्रपतींपेक्षाही मोठे झाले का? उद्धव ठाकरेंचा कडवट सवाल!
19
दिवसाढवळ्या बँकेवर दरोडा, बंदुकीच्या धाकावर हिसकावू लागला पैसे, पण कर्मचाऱ्यांनी हिंमत दाखवली आणि...  
20
राहुल गांधींविरोधात वक्तव्य भोवले; काँग्रेसच्या मंत्र्याला द्यावा लागला राजीनामा, नेमकं काय म्हणाले?

पूरग्रस्त भागात दुप्पट भरपाईसह संपूर्ण कर्जमाफी द्या : विश्वजित कदम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 16, 2019 20:11 IST

आ. कदम यांनी पलूस तालुक्यातील पूरग्रस्त भागाच्या स्थितीबद्दलची छायाचित्रे व व्हिडीओच्या माध्यमातून सविस्तर माहिती दिली. यावर फडणवीस यांनी, आगामी मंत्रिमंडळ बैठकीत नुकसानीचा आढावा घेऊन ठोस निर्णय घेतला जाईल, असे आश्वासन दिले.

ठळक मुद्देमुख्यमंत्र्यांना दिली माहिती

कडेगाव : महापुरात घरे, शेती व पशुधनाचे झालेले नुकसान लक्षात घेता, जाहीर केलेल्या नुकसान भरपाईच्या दुप्पट रक्कम पूग्रस्तांना द्यावी, तसेच या भागात शंभर टक्के कर्जमाफीचा निर्णय घ्यावा, यासह १५ मागण्या प्रदेश काँग्रेसचे कार्याध्यक्ष आमदार डॉ. विश्वजित कदम यांनी मुख्यमंत्रीदेवेंद्र फडणवीस यांच्याकडे केल्या.

आ. कदम यांनी पलूस तालुक्यातील पूरग्रस्त भागाच्या स्थितीबद्दलची छायाचित्रे व व्हिडीओच्या माध्यमातून सविस्तर माहिती दिली. यावर फडणवीस यांनी, आगामी मंत्रिमंडळ बैठकीत नुकसानीचा आढावा घेऊन ठोस निर्णय घेतला जाईल, असे आश्वासन दिले.

कदम यांनी शुक्रवारी मुंबई येथील ‘वर्षा’ निवासस्थानी मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेतली. यावेळी सांगली, कोल्हापूर व सातारा जिल्ह्यात महापुराने झालेल्या नुकसानीसंदर्भात माहिती दिली व पूरपरिस्थितीवरून निर्माण झालेल्या संकटातून मार्ग काढण्यासाठी केलेल्या विविध १५ मागण्यांबाबतचे निवेदन दिले.

पलूस तालुक्यात मदतकार्य करताना पाहिलेल्या स्थितीची माहिती दिली. शेती, पिके, रस्ते, दुकाने, पायाभूत सुविधांचे मोठे नुकसान झाले आहे. शेतजमिनीची मातीही वाहून गेली आहे. शेतकऱ्यांनी पुरामुळे सोडून दिलेले पशुधनही वाहून गेले आहे. पूरग्रस्त नागरिकांसमोर संसार सावरण्याचे संकट आहे. २००५ च्या पूरपरिस्थितीत मदतीला धावून जाणाºया माजी मंत्री आमदार डॉ. पतंगराव कदम यांच्या पश्चात पूरग्रस्तांना धीर देताना हृदय हेलावून जात आहे, असे आमदार कदम यांनी सांगितले.मदतकार्याबद्दल आराखडाआमदार डॉ. कदम यांनी मदतकार्याबद्दल तयार केलेला आराखडा मुख्यमंत्री फडणवीस यांना सादर केला. शासनाने जाहीर केलेल्या रकमेच्या दुप्पट रक्कम भरपाई म्हणून मिळावी, शेतकऱ्यांची त्वरित कर्जमाफी व्हावी, शेतमजूर, व्यापाºयांना आर्थिक साहाय्य केले जावे, ज्यांच्या पशुधनाची वा घराची हानी झाली आहे, अशांना मदत मिळावी, शाळांची दुरुस्ती केली जावी व शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य तसेच पाठ्यपुस्तके मोफत मिळावीत, अशा विविध बाबींचा या आराखड्यात समावेश केला आहे. 

टॅग्स :Sangli Floodसांगली पूरministerमंत्रीDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस