शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
3
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
4
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
5
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
6
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
7
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
8
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
9
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
10
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
11
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
12
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
13
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
14
पोलिसाच्या घरातच चोरी; सोन्याचे मंगळसूत्र, २ मोबाईलसह मौल्यवान वस्तू घेऊन चोर फरार!
15
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
16
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
17
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
18
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
19
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
20
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग

भाजप नेत्यांकडून सांगली पोलिस प्रमुखांविरोधात तक्रारी, गृहमंत्र्यांकडून दखल

By अविनाश कोळी | Updated: June 7, 2023 12:59 IST

गुन्हेगारीच्या आलेख वाढल्याबद्दल चिंता.

अविनाश कोळीसांगली : भरदिवसा सराफ पेढीवर पडलेल्या दरोड्याच्या घटनेसह गेल्या काही दिवसांतील गंभीर गुन्हेगारी घटनांचा दाखला देत भाजपचे आ. सुधीर गाडगीळ यांनी निष्क्रिय पोलिस अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली. पालकमंत्री सुरेश खाडे यांनीही सोमवारी पोलिसप्रमुखांच्या निष्क्रियेतेचा पाढा फडणवीस यांच्यासमोर वाचला होता. भाजप नेत्यांच्या तक्रारीची गंभीर दखल फडणवीस यांनी घेतल्याने कारवाईचे संकेत मिळत आहेत.

गाडगीळ यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, गेल्या काही महिन्यांपासून सांगली जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती अत्यंत गंभीर झाली आहे. जिल्ह्यात खून व दरोड्याच्या घटनांमध्ये प्रचंड प्रमाणात वाढ झाली आहे. भरदिवसा दरोडे पडत आहेत. लूटमार केली जात आहे. स्त्रियांवरील अत्याचार, नशेखोरीचे प्रमाणही चिंताजनक आहे. तरुण नशा करून गुन्हे करीत असल्याची बाब समोर आली आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

रिलायन्स ज्वेल्स या सोने-चांदीच्या दुकानात एका टोळीने सशस्त्र दरोडा टाकला. हे शोरूम जिल्हा पोलिस अधीक्षकांच्या कार्यालयापासून हाकेच्या अंतरावर आहे. या घटनेच्या काही दिवस अगोदरच कवठेपिरान, शिराळा तालुक्यातील निगडी येथे दरोडे पडले. सांगलीतील एका नगरसेवकावर खुनी हल्ला झाला. या लोकप्रतिनिधीकडे स्वतःचे शस्त्र असल्याने तो बचावला.

अनेक कॉलेज तरुण-तरुणी कॉलेजमध्ये तसेच आसपासच्या कॅफेमध्ये नशा करत आहेत. सावकारी वाढली आहे. बनावट नोटा चलनात आणल्या गेल्या, मात्र मुख्य सूत्रधारास अद्याप अटक करण्यात पोलिसांना यश आलेले नाही. गुन्हेगारीने कळस गाठला असताना पोलिस अधिकारी शांत आहेत. अशा निष्क्रिय अधिकाऱ्यांवर तातडीने कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.

फडणवीस यांच्याकडून कारवाईचे संकेततक्रारी प्राप्त होताच फडणवीस यांनी सांगली जिल्ह्यातील निष्क्रिय अधिकाऱ्यांवर तातडीने कारवाई करण्याचे आश्वासन गाडगीळ यांना दिले. येत्या काही दिवसांत पोलिस दलात फेरबदल होण्याची शक्यता आहे.यांनीही केल्या तक्रारीभाजपचे पालकमंत्री खाडे, आ. गाडगीळ यांच्यासह शिवसेनेच्या शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख आनंदराव पवार यांनीही जिल्ह्यातील निष्क्रिय पोलिस अधिकाऱ्यांबाबत सरकारकडे तक्रार केली आहे.

टॅग्स :SangliसांगलीDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस