शहरं
Join us  
Trending Stories
1
गुवाहाटीची खरी कथा मला विचारूनच लिहावी लागेल- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
2
न्यूयॉर्कचे पहिले मुस्लीम मेअर बनले जोहरान ममदानी, ट्रम्प यांच्या धमक्यांनंतरही मोठा विजय!
3
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
4
अमिताभ बच्चन यांनी विकले २ लक्झरी फ्लॅट्स; ‘बिग बीं’ची प्रॅापर्टीमधून बंपर कमाई, कितीमध्ये झाली ही ‘सुपर डील’?
5
"आम्ही कार्यक्रम वेळेत सुरु केलेला, पण..."; माधुरी दीक्षितच्या उशीरा येण्यामागचं खरं कारण आयोजकांनी सांगितलं
6
२०२६ला डबल धमाका, ७ राशींवर असीम शनि कृपा; उत्पन्नात लक्षणीय वाढ, घर खरेदीचे स्वप्न पूर्ण!
7
“६ महिन्यात ४८ लाख मतदार वाढ, डबल स्टार नाही, डबल मतदारांची यादी हवी”; शरद पवार गटाची मागणी
8
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
9
१३,००० कोटींचे कोकेन प्रकरण: डॉन वीरूच्या मुलाला पकडण्यासाठी १८० देशांची फौज; इंटरपोलची रेड नोटीस जारी
10
पालघरमधील तीन नगरपरिषदा, एका नगरपंचायतीत रणधुमाळी; यंदा कोण मारणार बाजी?
11
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
12
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
13
बदलापुरात युतीत लढाई? तर अंबरनाथमध्ये मविआत तडजोड? निवडणुकांमध्ये चुरशीची लढाई
14
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
15
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
16
रायगडमध्ये १० नगरपरिषदांमध्ये धूम युतीची की आघाडीची..? सर्व राजकीय पक्षांकडून हालचाली
17
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
18
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
19
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
20
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू

भाजप नेत्यांकडून सांगली पोलिस प्रमुखांविरोधात तक्रारी, गृहमंत्र्यांकडून दखल

By अविनाश कोळी | Updated: June 7, 2023 12:59 IST

गुन्हेगारीच्या आलेख वाढल्याबद्दल चिंता.

अविनाश कोळीसांगली : भरदिवसा सराफ पेढीवर पडलेल्या दरोड्याच्या घटनेसह गेल्या काही दिवसांतील गंभीर गुन्हेगारी घटनांचा दाखला देत भाजपचे आ. सुधीर गाडगीळ यांनी निष्क्रिय पोलिस अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली. पालकमंत्री सुरेश खाडे यांनीही सोमवारी पोलिसप्रमुखांच्या निष्क्रियेतेचा पाढा फडणवीस यांच्यासमोर वाचला होता. भाजप नेत्यांच्या तक्रारीची गंभीर दखल फडणवीस यांनी घेतल्याने कारवाईचे संकेत मिळत आहेत.

गाडगीळ यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, गेल्या काही महिन्यांपासून सांगली जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती अत्यंत गंभीर झाली आहे. जिल्ह्यात खून व दरोड्याच्या घटनांमध्ये प्रचंड प्रमाणात वाढ झाली आहे. भरदिवसा दरोडे पडत आहेत. लूटमार केली जात आहे. स्त्रियांवरील अत्याचार, नशेखोरीचे प्रमाणही चिंताजनक आहे. तरुण नशा करून गुन्हे करीत असल्याची बाब समोर आली आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

रिलायन्स ज्वेल्स या सोने-चांदीच्या दुकानात एका टोळीने सशस्त्र दरोडा टाकला. हे शोरूम जिल्हा पोलिस अधीक्षकांच्या कार्यालयापासून हाकेच्या अंतरावर आहे. या घटनेच्या काही दिवस अगोदरच कवठेपिरान, शिराळा तालुक्यातील निगडी येथे दरोडे पडले. सांगलीतील एका नगरसेवकावर खुनी हल्ला झाला. या लोकप्रतिनिधीकडे स्वतःचे शस्त्र असल्याने तो बचावला.

अनेक कॉलेज तरुण-तरुणी कॉलेजमध्ये तसेच आसपासच्या कॅफेमध्ये नशा करत आहेत. सावकारी वाढली आहे. बनावट नोटा चलनात आणल्या गेल्या, मात्र मुख्य सूत्रधारास अद्याप अटक करण्यात पोलिसांना यश आलेले नाही. गुन्हेगारीने कळस गाठला असताना पोलिस अधिकारी शांत आहेत. अशा निष्क्रिय अधिकाऱ्यांवर तातडीने कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.

फडणवीस यांच्याकडून कारवाईचे संकेततक्रारी प्राप्त होताच फडणवीस यांनी सांगली जिल्ह्यातील निष्क्रिय अधिकाऱ्यांवर तातडीने कारवाई करण्याचे आश्वासन गाडगीळ यांना दिले. येत्या काही दिवसांत पोलिस दलात फेरबदल होण्याची शक्यता आहे.यांनीही केल्या तक्रारीभाजपचे पालकमंत्री खाडे, आ. गाडगीळ यांच्यासह शिवसेनेच्या शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख आनंदराव पवार यांनीही जिल्ह्यातील निष्क्रिय पोलिस अधिकाऱ्यांबाबत सरकारकडे तक्रार केली आहे.

टॅग्स :SangliसांगलीDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस