पेठ : सुरुल ग्रामस्थांची मागणी असलेल्या सुरुल ते भटवाडी रस्त्याचे काम लवकरच पूर्ण करू, असे प्रतिपादन आमदार मानसिंगराव नाईक यांनी केले.
सुरुल (ता. वाळवा) येथे रस्ता काँक्रिटीकरण कामास प्रारंभ करण्यात आला; त्याप्रसंगी ते बोलत होते. पंचायत समिती सदस्य शंकरराव चव्हाण प्रमुख उपस्थित होते.
आमदार नाईक म्हणाले, ग्रामस्थांनी मागणी केलेल्या रस्ता काँक्रिटीकरण कामास २५/१५ योजनेतून सुमारे १८ लाख रुपये मंजूर केले आहेत. अनेक दिवसांपासून मागणी होत असलेले सुरुल ते भटवाडी रस्त्याचे कामही लवकरच मार्गी लावले जाईल. गावात होत असलेली कामे दर्जेदार कशी होतील यावर नागरिकांनी लक्ष ठेवावे. गावाच्या विकासात्मक बदलात ते महत्त्वाचे आहे.
पंचायत समिती सदस्य शंकरराव चव्हाण यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. आमदार नाईक यांच्याहस्ते रस्ता काँक्रिटीकरण कामाचे उद्घाटन करण्यात आले. महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या सरचिटणीस मंजुषा पाटील, माजी सरपंच संदेश पाटील यांची भाषणे झाली. यावेळी माजी सरपंच मारुती कांबळे, सतीश, संतोष, सचिन, प्रकाश, चंद्रकांत, अमोल, राजेंद्र, संजय, तुकाराम व बबन पाटील, ग्रामपंचायत सदस्य शीला पाटील, मनीषा पाटील, सीमा पाटील, माणिक बंडगर, अशोक पाटील, श्रीरंग मदने, कुंडलिक गायकवाड आदी उपस्थित होते. उपसरपंच बंडोपंत नांगरे यांनी आभार मानले.
फोटो ओळी :
सुरुल (ता. वाळवा) : येथे २५/१५ योजनेतून रस्ता काँक्रिटीकरण कामाचा प्रारंभ करताना आमदार मानसिंगराव नाईक, शेजारी शंकरराव चव्हाण, मंजुषा पाटील, बंडोपंत नांगरे आदी मान्यवर.