शहरं
Join us  
Trending Stories
1
'गरिबाच्या मुलांनी इंग्रजी भाषा शिकावी, हे BJP-RSS ला नकोय', राहुल गांधींचा हल्लाबोल
2
'युद्धविरामासाठी भारताला विनंती केली', ऑपरेशन सिंदुरबाबत पाकिस्तानच्या उप-पंतप्रधानांची कबुली
3
HSRP Number Plate : वाहनधारकांसाठी खुशखबर! ‘एचएसआरपी’ नंबरप्लेटसाठी तिसऱ्यांदा मुदतवाढ
4
'परिवार का साथ, परिवार का विकास...', बिहारमधून पीएम मोदींची काँग्रेस-राजदवर खोचक टीका
5
हल्ल्यात २ एअरबेस उद्धवस्त, पाकची कबुली; युद्धविरामसाठी भारताला कुणी केला होता फोन?
6
Mumbai Local Fight : मुंबई लोकलमध्ये चढताना धक्का लागला अन् तरुणीचा पारा चढला; महिलेला रक्तबंबाळ होईपर्यंत मारलं
7
ENG vs IND, 1st Test: गिलनं IPL जोडीदार साई सुदर्शनला दिली पदार्पणाची संधी; करुण नायरसह शार्दुल ठाकूरवरही भरवसा
8
पुण्यावरून कोकणात जाताय, थांबा! वरंध घाट मार्ग तीन महिने राहणार बंद; आता कोणत्या मार्गाने प्रवास कराल?
9
Video - धक्कादायक वास्तव! छतावरुन टपकतंय पाणी, वर्गात छत्री घेऊन शिकताहेत ६८ मुलं
10
इस्रायलसोबत युद्ध सुरू असताना अचानक ३ इराणी विमाने ओमानमध्ये पोहोचली, नेमकं कारण काय?
11
पैसे कुठे खर्च होतात कळत नाही? 'या' ५ ॲप्समुळे खर्च ट्रॅक करणे होईल सोपे, आता तुम्हीही व्हा बजेट एक्सपर्ट!
12
सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; ३ दिवसांत ४ हजारांनी घसरली चांदीची किंमत; पाहा लेटेस्ट रेट
13
Two-Wheeler New Rules : नवीन सर्व दुचाकींना 'एबीएस आणि दोन हेल्मेट' सक्तीचे; केंद्रीय परिवहन मंत्रालयाचा मोठा निर्णय
14
कुणी फुकट खाऊ घालत नाही...! आसिम मुनीर-डोनाल्ड ट्रम्प 'लन्च पॉलिटिक्स'नं पाकिस्तानचंच टेन्शन वाढवलं
15
Air India Plane Crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेवेळी एका टिफिनवाल्याने वाचवला ८० डॉक्टरांचा जीव
16
पोरी हुश्शार! एकत्र बालपण अन् आता एकत्र झाल्या IAS; शिक्षकाच्या लेकींनी रचला इतिहास
17
Pandharpur Wari 2025: आता स्वस्तात करा विठ्ठलाचे दर्शन; एसटी महामंडळाची खास ऑफर!
18
१ जुलैपासून बदलणार बँकिंगचे नियम, क्रेडिट कार्ड बिल पेमेंटमध्येही होणार बदल; जाणून घ्या माहिती
19
क्रुझर प्रेमींची पहिली पसंत; नवीन अवतारात येणार Bajaj ची Avenger, किंमत फक्त...
20
Debt on US: ट्रम्प अडकले... संकटात अमेरिका; कर्ज ३७ ट्रिलियन डॉलर्सच्या पार, भारताचं किती देणं लागतो US

सहकार पंढरीतच सहकार दूषित

By admin | Updated: October 3, 2016 00:19 IST

शुद्धीकरणास वाव : सहकार मंत्र्यांच्या मोहिमेने न्याय मिळणार का?

सांगली : राजकारणाच्या दावणीला सहकार बांधून विकासाच्या गंगेला दूषितपणाचा शाप देण्याचे कार्य सहकाराची पंढरी समजल्या जाणाऱ्या सांगलीतच पार पडले. हजारो ठेवीदारांची हक्काच्या पैशासाठी चालू असलेली अनेक वर्षांची धडपड, तडफड सहकार मंत्र्यांच्या शुद्धीकरण मोहिमेतून तरी थांबणार का?, असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी शनिवारी सांगलीत सहकाराच्या बिघडलेल्या परिस्थितीचा आढावा घेताना, सहकाराच्या शुद्धीकरणाची मोहीम राबविणार असल्याचे स्पष्ट केले. केवळ औषधोपचाराने सहकाराचा आजार ठीक होणार नसेल, तर आॅपरेशनही करावे लागेल, असेही संकेत त्यांनी दिले. ज्या सहकार पंढरीत सहकार क्षेत्रावर विश्वास ठेवणाऱ्यांचा सर्वाधिक घात झाला, त्याठिकाणीच त्यांनी ही घोषणा केली. सहकाराच्या शुद्धीकरणाला सर्वाधिक वाव सांगली जिल्ह्यातच आहे. त्यामुळे सहकाराचे पाणी दूषित करणाऱ्यांना हा एक प्रकारचा धक्काच आहे. मात्र सहकारात भरडलेल्या ठेवीदारांना अजूनही अशा मोहिमांबद्दल साशंकता वाटते, असे ते म्हणाले. सांगलीत एकेकाळी सहकारी संस्थांचे मोठे जाळे होते. हजारो संस्था आता बंद पडल्याने ही संख्या निम्म्यावर आली आहे. पतसंस्थांच्या माध्यमातून एक मोठी आर्थिक चळवळ जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यात उभारण्यात आली होती. याचा सर्वसामान्य घटकांना लाभ झाला असला तरी, सर्वसामान्य लोकांनी आयुष्यभर बचतीतून जमा केलेली पुंजी पतसंस्थांमध्ये कायमची अडकली. शेकडो पतसंस्थांमध्ये अडकलेल्या रकमा मिळविण्यासाठी वर्षानुवर्षे हे ठेवीदार धडपडत आहेत. त्यांच्या वेदनांचा आढावा शनिवारी जिल्हा उपनिबंधकांच्या आकडेवारीतूनही अप्रत्यक्षपणे मांडला गेला. आजही न्यायालयांमध्ये पतसंस्थांच्या संचालकांविरोधात, कर्जदारांविरोधात खटले चालू आहेत, अशी माहिती जिल्हा उपनिबंधकांनी दिली आहे. सहकारी पतसंस्थांबरोबरच सहकारी बँकांमध्येही शेकडो कोटींचे घोटाळे घडले. बँका आर्थिकदृष्ट्या अडचणीत आल्या. प्रशासक नियुक्त होतानाच घोटाळ्यांच्या चौकशाही सुरू झाल्या. चौकशांचे गुऱ्हाळ सुरूच आहे. अनेक बँका अवसायनात गेल्याने ठेवीदार हवालदिल झाले. अर्थचक्र इतके बिघडले की, सहकार विभागही या परिस्थितीसमोर हतबल झाल्याचे दिसत आहे. ठेवीदारांच्या ठेवी कशा मिळवून द्यायच्या?, असा प्रश्न त्यांच्यासमोर निर्माण झाला आहे. त्यामुळे सहकारमंत्र्यांची नवी मोहीम तरी सहकारात भरडलेल्या सर्वसामान्य लोकांना न्याय देणार का?, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. पण शुद्धीकरण म्हणजे नेमके काय, याचा खुलासा सहकार मंत्र्यांनी केला नाही. यापूर्वीचे सहकारमंत्री चंद्रकांत पाटील यांनी शुद्धीकरण मोहीम राबविताना बंद असलेल्या व केवळ नावापुरत्या स्थापन झालेल्या संस्था बंद केल्या. बंद पडलेल्या पतसंस्था आणि बँकांमधील पैशासाठी त्यांनी काहीही केले नाही. (प्रतिनिधी) मोहिमेचे संकेत : धाबे दणाणले घोटाळ्यांमुळे अडचणीत आलेल्या बँका, पतसंस्थांच्या माजी संचालकांचे धाबे सहकार मंत्र्यांच्या घोषणेने दणाणले आहेत. आता नेमके कोणते ‘आॅपरेशन’ सहकारमंत्री राबविणार आहेत, याबाबत तर्कवितर्क केला जात आहे. घोटाळ्यात अडकलेल्या अनेक संचालकांना वित्तीय संस्थांचे दरवाजे बंद झाले आहेत. नव्या मोहिमेमुळे आणखी काय होणार, याची चिंताही त्यांना सतावत आहे. कर्जदारांचे काय होणार ज्या कर्जदारांनी बॅँका, पतसंस्थांचे पैसे बुडविले, त्यांच्यावर अद्याप कोणतीही कारवाई झालेली नाही. अडचणीत आलेल्या सहकारी वित्तीय संस्थांचे खरे दुखणे थकीत कर्जात लपले आहे. कर्जाची वसुली झाली तर ठेवीदारांचे पैसे देता येतील, असे गणित त्यांनी बांधले आहे. वास्तविक कर्जदारांकडील वसुलीसाठी कोणतीही ठोस भूमिका सरकारने घेतलेली नाही. त्यामुळे अडचणी वाढल्या आहेत.