शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
3
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
4
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
5
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
6
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
7
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
8
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
9
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
10
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
11
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
12
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
13
मैत्रिणीचे लग्न आटोपून घरी येताना अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, ९ जणांना अटक
14
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
15
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
16
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
17
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
18
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
19
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे

वाळवा-शिराळ्यात राजकीय समीकरणांचा गोंधळ

By admin | Updated: July 7, 2017 23:25 IST

वाळवा-शिराळ्यात राजकीय समीकरणांचा गोंधळ

अशोक पाटील । लोकमत न्यूज नेटवर्कइस्लामपूर : शिराळा मतदार संघात दोन्ही काँग्रेसच्या ताकदीपुढे भाजपची ताकद कमी पडते. त्यातच भाजपचे आमदार शिवाजीराव नाईक यांनी विकास आघाडीच्या माध्यमातून बांधलेली मोट राजू शेट्टी-सदाभाऊ खोत यांच्या वादाने भरकटत चालली आहे. याउलट इस्लामपूर मतदार संघात जयंत पाटील यांच्याविरोधात सदाभाऊ खोत आव्हान उभे करत आहेत. त्यांना अद्याप विविध गटांचे पाठबळ मिळालेले नाही. त्यामुळे आगामी ग्रामपंचायत निवडणुकीवर पक्षापेक्षा गटा-तटांचाच प्रभाव दिसून येणार आहे.शिराळा मतदार संघातील वाळवा तालुक्याच्या ४९ गावांत नानासाहेब महाडिक, पी. आर. पाटील, सी. बी. पाटील, जनार्दन पाटील, रवींद्र बर्डे यांच्यासारखे मातब्बर नेते आहेत. त्यांचे गटही सक्रिय आहेत. शिराळ्याचे आमदार शिवाजीराव नाईक यांना वैयक्तिक पातळीवर मानणाऱ्या सर्वच पक्षांतील कार्यकर्त्यांची संख्याही मोठी आहे. याचा फायदा आ. नाईक यांना होत आला आहे. मात्र शिराळ्यात दोन्ही काँग्रेस एकत्र आल्या की, भाजपचा टिकाव लागत नाही, हे वेळोवेळी स्पष्ट झाले आहे.इस्लामपूर मतदार संघातील ग्रामीण भागात आमदार पाटील यांचे वर्चस्व आहे. प्रत्येक गावात त्यांचे दोन-दोन गट कार्यरत आहेत. ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत दोन्ही गट एकमेकांच्या विरोधात भिडतात. काही गट लोकनेते राजारामबापूंचे छायाचित्र प्रचारात वापरतात, तर काहीजण आ. पाटील यांना डिजिटल फलकावर स्थान देतात. या मतदार संघात हुतात्मा संकुलाचे नेते वैभव नायकवडी, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष विलासराव शिंदे, राजारामबापू दूध संघाचे अध्यक्ष विनायकराव पाटील, राज्य बँकेचे माजी अध्यक्ष माणिकराव पाटील, जि. प. सदस्य जितेंद्र पाटील यांचेही गट आहेत. हे नेते आपापल्या पातळीवर ग्रामपंचायत निवडणुकीत उतरतात.कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी आता ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपला मोठे यश मिळवून देण्यासाठी प्रयत्न चालवले आहेत. यासाठी त्यांनी पहिल्या सत्रात इस्लामपूरचे नगराध्यक्ष निशिकांत पाटील यांना भाजपमध्ये दाखल केले आहे. आष्टा शहर व परिसरात वैभव शिंदे यांना जवळ करून तेथील ग्रामपंचायतीत यश मिळते का, याचीही चाचपणी सुरू आहे.