शहरं
Join us  
Trending Stories
1
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
2
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
3
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
4
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
5
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
6
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
7
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
8
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
9
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
10
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
11
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
12
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
13
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
14
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
15
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
16
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
17
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
18
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
19
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
20
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?

वाळवा-शिराळ्यात राजकीय समीकरणांचा गोंधळ

By admin | Updated: July 7, 2017 23:25 IST

वाळवा-शिराळ्यात राजकीय समीकरणांचा गोंधळ

अशोक पाटील । लोकमत न्यूज नेटवर्कइस्लामपूर : शिराळा मतदार संघात दोन्ही काँग्रेसच्या ताकदीपुढे भाजपची ताकद कमी पडते. त्यातच भाजपचे आमदार शिवाजीराव नाईक यांनी विकास आघाडीच्या माध्यमातून बांधलेली मोट राजू शेट्टी-सदाभाऊ खोत यांच्या वादाने भरकटत चालली आहे. याउलट इस्लामपूर मतदार संघात जयंत पाटील यांच्याविरोधात सदाभाऊ खोत आव्हान उभे करत आहेत. त्यांना अद्याप विविध गटांचे पाठबळ मिळालेले नाही. त्यामुळे आगामी ग्रामपंचायत निवडणुकीवर पक्षापेक्षा गटा-तटांचाच प्रभाव दिसून येणार आहे.शिराळा मतदार संघातील वाळवा तालुक्याच्या ४९ गावांत नानासाहेब महाडिक, पी. आर. पाटील, सी. बी. पाटील, जनार्दन पाटील, रवींद्र बर्डे यांच्यासारखे मातब्बर नेते आहेत. त्यांचे गटही सक्रिय आहेत. शिराळ्याचे आमदार शिवाजीराव नाईक यांना वैयक्तिक पातळीवर मानणाऱ्या सर्वच पक्षांतील कार्यकर्त्यांची संख्याही मोठी आहे. याचा फायदा आ. नाईक यांना होत आला आहे. मात्र शिराळ्यात दोन्ही काँग्रेस एकत्र आल्या की, भाजपचा टिकाव लागत नाही, हे वेळोवेळी स्पष्ट झाले आहे.इस्लामपूर मतदार संघातील ग्रामीण भागात आमदार पाटील यांचे वर्चस्व आहे. प्रत्येक गावात त्यांचे दोन-दोन गट कार्यरत आहेत. ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत दोन्ही गट एकमेकांच्या विरोधात भिडतात. काही गट लोकनेते राजारामबापूंचे छायाचित्र प्रचारात वापरतात, तर काहीजण आ. पाटील यांना डिजिटल फलकावर स्थान देतात. या मतदार संघात हुतात्मा संकुलाचे नेते वैभव नायकवडी, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष विलासराव शिंदे, राजारामबापू दूध संघाचे अध्यक्ष विनायकराव पाटील, राज्य बँकेचे माजी अध्यक्ष माणिकराव पाटील, जि. प. सदस्य जितेंद्र पाटील यांचेही गट आहेत. हे नेते आपापल्या पातळीवर ग्रामपंचायत निवडणुकीत उतरतात.कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी आता ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपला मोठे यश मिळवून देण्यासाठी प्रयत्न चालवले आहेत. यासाठी त्यांनी पहिल्या सत्रात इस्लामपूरचे नगराध्यक्ष निशिकांत पाटील यांना भाजपमध्ये दाखल केले आहे. आष्टा शहर व परिसरात वैभव शिंदे यांना जवळ करून तेथील ग्रामपंचायतीत यश मिळते का, याचीही चाचपणी सुरू आहे.