शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानवर हसावं की रडावं.... आता म्हणे मोहसीन नक्वीला गोल्ड मेडल देणार, सन्मान करणार !
2
लाखोंच्या गर्दीत हरवलेला 'मुन्ना' काही मिनिटांत 'अण्णा'च्या गळ्यात; बापलेकांची भावनिक भेट
3
सानिया मिर्झाशी घटस्फोट, आता शोएब मलिकचे सना जावेदशीही लग्न तुटणार? VIDEO मुळे उडाली खळबळ
4
नवी मुंबई विमानतळाला दि.बा.पाटील यांचेच नाव लागणार; CM फडणवीसांचे कृती समितीला आश्वासन
5
ट्रॅक्टरमध्ये बसून थेट बांधावर... सोलापूरच्या अधिकाऱ्यांची तत्परता, शेतकऱ्यांना दिला धीर
6
'फिट' है तो 'हिट' है... बॉलिवूड अभिनेत्रीचा कमालीचा फिटनेस, या वयातही चाहत्यांना करते घायाळ
7
२ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना कफ सिरप देऊ नका, केंद्राचा सल्ला; राजस्थान, मध्य प्रदेशात ११ बालकांचा मृत्यू
8
वेळागर समुद्रात आठजण बुडाले; तिघांचे मृतदेह हाती, एकीचा जीव वाचला, किनाऱ्यावर आक्रोश
9
राज्यात अतिवृष्टी, पूरस्थिती; अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेची ४-६ ऑक्टोबरला अंतिम विशेष फेरी
10
शेतकऱ्यांसाठी काँग्रेस रस्त्यावर; नुकसानग्रस्तांना तत्काळ मदत मिळण्यासाठी राज्यभर आंदोलन
11
“बावळट-मूर्ख, मनोज जरांगेंसारखा नेता मिळणे मराठ्यांचे दुर्दैव”; लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल
12
"तुम्ही आम्हाला शिकवू नका..."; भारताने पाकिस्तानला चांगलंच सुनावलं, UN मध्ये काय घडलं?
13
आशाबाई, अंबिका अन् सुनीता... सोलापुरात दोन दिवसांत तीन महिलांची हत्या, कारण एकच
14
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा. पाटलांचे नाव; PM मोदींची राज्य सरकारच्या निर्णयाला मंजुरी
15
IND vs AUS : तिलक वर्माचं शतक थोडक्यात हुकलं; ऑस्ट्रेलियाविरुद्ध अभिषेकवर 'गोल्डन डक'ची नामुष्की
16
RSS च्या पथसंचलनात ढोल वाजवणाऱ्या स्वयंसेवकाचा हृदयविकाराने मृत्यू; व्हिडिओ व्हायरल
17
वैभव खेडेकरांचा तीनदा भाजपा प्रवेश रखडला, आता शिवसेनेत जाणार? शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
18
काँग्रेसनेही निवडणुकांसाठी कंबर कसली! नागपुरात ४, ५ ऑक्टोबरला विचारमंथन कार्यशाळा
19
IND vs WI: ‘ध्रुव तारा’ चमकला! पहिल्या सेंच्युरीनंतर बॅटची बंदूक करून 'बाप-माणसाला' सेल्युट! (VIDEO)
20
Business: २ मित्रांनी सोडली कॉर्पोरेट नोकरी, दूध विकून झाले कोट्यधीश, तयार केला मोठा ब्रँड!

वाळवा-शिराळ्यात राजकीय समीकरणांचा गोंधळ

By admin | Updated: July 7, 2017 23:25 IST

वाळवा-शिराळ्यात राजकीय समीकरणांचा गोंधळ

अशोक पाटील । लोकमत न्यूज नेटवर्कइस्लामपूर : शिराळा मतदार संघात दोन्ही काँग्रेसच्या ताकदीपुढे भाजपची ताकद कमी पडते. त्यातच भाजपचे आमदार शिवाजीराव नाईक यांनी विकास आघाडीच्या माध्यमातून बांधलेली मोट राजू शेट्टी-सदाभाऊ खोत यांच्या वादाने भरकटत चालली आहे. याउलट इस्लामपूर मतदार संघात जयंत पाटील यांच्याविरोधात सदाभाऊ खोत आव्हान उभे करत आहेत. त्यांना अद्याप विविध गटांचे पाठबळ मिळालेले नाही. त्यामुळे आगामी ग्रामपंचायत निवडणुकीवर पक्षापेक्षा गटा-तटांचाच प्रभाव दिसून येणार आहे.शिराळा मतदार संघातील वाळवा तालुक्याच्या ४९ गावांत नानासाहेब महाडिक, पी. आर. पाटील, सी. बी. पाटील, जनार्दन पाटील, रवींद्र बर्डे यांच्यासारखे मातब्बर नेते आहेत. त्यांचे गटही सक्रिय आहेत. शिराळ्याचे आमदार शिवाजीराव नाईक यांना वैयक्तिक पातळीवर मानणाऱ्या सर्वच पक्षांतील कार्यकर्त्यांची संख्याही मोठी आहे. याचा फायदा आ. नाईक यांना होत आला आहे. मात्र शिराळ्यात दोन्ही काँग्रेस एकत्र आल्या की, भाजपचा टिकाव लागत नाही, हे वेळोवेळी स्पष्ट झाले आहे.इस्लामपूर मतदार संघातील ग्रामीण भागात आमदार पाटील यांचे वर्चस्व आहे. प्रत्येक गावात त्यांचे दोन-दोन गट कार्यरत आहेत. ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत दोन्ही गट एकमेकांच्या विरोधात भिडतात. काही गट लोकनेते राजारामबापूंचे छायाचित्र प्रचारात वापरतात, तर काहीजण आ. पाटील यांना डिजिटल फलकावर स्थान देतात. या मतदार संघात हुतात्मा संकुलाचे नेते वैभव नायकवडी, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष विलासराव शिंदे, राजारामबापू दूध संघाचे अध्यक्ष विनायकराव पाटील, राज्य बँकेचे माजी अध्यक्ष माणिकराव पाटील, जि. प. सदस्य जितेंद्र पाटील यांचेही गट आहेत. हे नेते आपापल्या पातळीवर ग्रामपंचायत निवडणुकीत उतरतात.कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी आता ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपला मोठे यश मिळवून देण्यासाठी प्रयत्न चालवले आहेत. यासाठी त्यांनी पहिल्या सत्रात इस्लामपूरचे नगराध्यक्ष निशिकांत पाटील यांना भाजपमध्ये दाखल केले आहे. आष्टा शहर व परिसरात वैभव शिंदे यांना जवळ करून तेथील ग्रामपंचायतीत यश मिळते का, याचीही चाचपणी सुरू आहे.