शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...
2
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
3
स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...
4
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
5
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
6
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
7
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
8
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
9
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
10
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
11
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
12
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
13
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
14
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
15
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...
16
“राहुल गांधींनी पुरावे दिले, चौकशी करा, रामराज्याची भाषा मग अग्निपरिक्षेला का घाबरता?”: सपकाळ
17
6 एअरबॅगची सुरक्षा, 23Km चे मायलेज अन् ₹70000 + ₹1.10 लाखाचा डिस्काउंट, आताच करा बुक...
18
“संजय राऊत शरद पवारांकडे बसलेले असायचे, त्यांच्यामुळेच ठाकरे गटाचे नुकसान”; शिंदे गटाचे उत्तर
19
"जेव्हा कोणतंच काम नव्हतं तेव्हा..."; लोकप्रिय अभिनेत्याने केला ७ वर्षे खूप स्ट्रगल
20
Asia Cup 2025: जो मॅटर गाजला तोच पॅटर्न! IND vs PAK हायहोल्टेज सामन्यासंदर्भात मोठा निर्णय

संघर्षात बिघडले घड्याळाचे काटे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2018 00:47 IST

सांगलीतील राष्टÑवादीची अवस्था : पक्षांतर्गत गटबाजीला उधाणलोकमत न्यूज नेटवर्कसांगली : एकमेकांशी पुकारलेले उघड वैरत्व, गटबाजीने सुरू असलेले राजकारण यामुळे सांगली, मिरज, कुपवाड महापालिका क्षेत्रातील घड्याळाचे काटे ऐन महापालिका निवडणुकीत बिघडले आहेत. घड्याळाची वेळ बिघडल्यामुळे नेत्यांच्या डोक्यातील चिंतेचे घड्याळ आता टिकटिक करू लागले आहे.महापालिकेच्या राजकारणात कॉँग्रेसपाठोपाठचा सर्वात मोठा पक्ष म्हणून राष्टÑवादीकडे ...

सांगलीतील राष्टÑवादीची अवस्था : पक्षांतर्गत गटबाजीला उधाणलोकमत न्यूज नेटवर्कसांगली : एकमेकांशी पुकारलेले उघड वैरत्व, गटबाजीने सुरू असलेले राजकारण यामुळे सांगली, मिरज, कुपवाड महापालिका क्षेत्रातील घड्याळाचे काटे ऐन महापालिका निवडणुकीत बिघडले आहेत. घड्याळाची वेळ बिघडल्यामुळे नेत्यांच्या डोक्यातील चिंतेचे घड्याळ आता टिकटिक करू लागले आहे.महापालिकेच्या राजकारणात कॉँग्रेसपाठोपाठचा सर्वात मोठा पक्ष म्हणून राष्टÑवादीकडे पाहिले जाते. संधी असतानाही नेते, पदाधिकारी आणि नगरसेवकांनी आपला महापालिका क्षेत्रातील दबदबा वाढविला नाही. गटबाजीचा प्रश्न सोडविण्याऐवजी तो सातत्याने दाबत ठेवल्याने शनिवारी पक्षीय बैठकीत हा वाद अचानक उफाळून आला.जयंतरावांवर प्रथमच अशाप्रकारच्या उघड गटबाजीला हताशपणे पाहण्याची वेळ आली. त्यांनी निर्णयाचा चेंडू पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांकडे ढकलला असला तरी, महापालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी स्वत:च्या निर्णय क्षमतेलाच दुर्लक्षित केले. दोन्ही डगरीवरचे त्यांचे हात आता पक्षासाठी अधिक अडचणीचे ठरत आहेत.संजय बजाज आणि कमलाकर पाटील यांच्या गटातील हा वाद आता इतका विकोपाला गेला आहे की, तो गुंता सोडवणे कठीण बनले आहे. जयंतरावांनी घेतलेल्या फेरनिवडीच्या निर्णयाला आव्हान देण्याची तयारी कमलाकर पाटील गटाने सुरू केली आहे. व्यक्तिगत वर्चस्ववादातून राष्टÑवादीतील संघर्ष विकोपाला गेला आहे. पक्षाला मोठे करण्यापेक्षा स्वत:ला मोठे करण्याच्या स्पर्धेची कीड राष्टÑवादीला लागली आहे. पक्षाच्या निर्णयाच्या दोºया हाती घेण्यावरून सारे खेळ सुरू झाले आहेत. महापालिकेतही मोठी सदस्य संख्या असूनही सक्षम विरोधी पक्षाची भूमिका राष्टÑवादीला साकारता आली नाही. यालाही गटबाजीच कारणीभूत आहे. जाती-पातीच्या राजकारणाचाही स्पर्श याला झाला आहे.या सर्व गोंधळात निष्ठावंत व गटबाजीपासून दूर असलेले कार्यकर्ते अस्वस्थ आहेत. बिघडलेल्या घड्याळातून अनेकदा धोक्याची घंटा वाजली तरीही त्याकडे नेत्यांनी दुर्लक्ष केले. आर. आर. पाटील यांच्या निधनानंतर जिल्ह्यातील राष्टÑवादीचा सर्व भार एकट्या जयंतरावांवर आला आहे. तरीही जयंतरावांनी नेहमी सावध पावलेच उचलली. प्रसंगी कठोर निर्णय घेऊन पक्षासाठी डोकेदुखी ठरू पाहणाºयांना बाजूला करण्याची त्यांची मानसिकता दिसली नाही.निर्णयक्षमता, अनुभव पाठीशी असतानाही जयंत पाटील यांची कचखाऊ भूमिका त्यांच्याच पक्षासाठी घातक ठरू लागली आहे. त्यांचा शब्द प्रमाण मानणारे कार्यकर्ते आजही पक्षात आहेत. महापालिका क्षेत्रात मदन पाटील यांच्याप्रमाणेच जयंत पाटील यांचीही ताकद आहे, मात्र त्याचा योग्य वापर होताना दिसत नाही. त्यामुळे टिकटिकऐवजी आता किटकिट सुरू झाली आहे. ही किटकिट त्यांचीच डोकेदुखी वाढवत आहे.पक्षात इनकमिंग : होणार तरी कसे?राष्टÑवादीत आता मोठ्या प्रमाणावर इनकमिंग होणार असल्याचे मत जयंत पाटील यांनी शनिवारी पक्षीय बैठकीत मांडले; मात्र पक्षांतर्गत कुरघोड्यांचे राजकारण रंगल्यामुळे हे इनकमिंग होणार तरी कसे, असा प्रश्न प्रामाणिक कार्यकर्त्यांना पडला आहे. पक्षात असलेले लोकच एकसंध नसताना, आयात कार्यकर्त्यांना घेऊन पुन्हा अनागोंदी सुरू होण्याचीच चिन्हे अधिक आहेत. वस्तुस्थिती पाहिली तर गेल्या पाच वर्षात राष्टÑवादीचे आऊटगोर्इंग इतके झाले आहे की, इनकमिंगची आशाच कार्यकर्त्यांनी सोडली आहे.स्वबळाचा नारा दुबळागटबाजीने पोखरलेल्या राष्टÑवादीचे बळ केव्हाचेच कमी झाले आहे. सध्याची परिस्थिती पाहता, एकीचे बळ दिसण्याची शक्यता फारच कमी आहे. संघर्षाची धार तीव्र होत जाताना अनेकजण पक्षाला दुबळे करण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्यामुळे महपाालिका निवडणुकीसाठी राष्टÑवादीने पुकारलेला स्वबळाचा नारा तितकाच दुबळा वाटू लागला आहे.