शहरं
Join us  
Trending Stories
1
इकडे विरोधक टीका करतायत; तिकडे आफ्रिकेचा निवडणूक आयोग पारदर्शक प्रणाली पाहण्यासाठी खासदारांना पाठविणार
2
"पार्थ पवारांकडून खुलासा घेणे गरजेचे; उद्योग विभागाचा या प्रकरणाशी संबंध नाही"; शिंदे गटाच्या मंत्र्यांनी स्पष्टच सांगितले
3
सुरेश रैना, शिखर धवन यांना ईडीचा झटका; कोट्यवधी रुपयांची संपत्ती जप्त, कोणत्या मालमत्तांचा समावेश?
4
१ कोटींचं घर अवघ्या ११ लाखांत, EWS कोट्यातील ७२ जणांना लॉटरी; योगी आदित्यनाथ यांनी कमाल
5
बाजार 'लाल' रंगात बंद! निफ्टी २५,५२० च्या खाली, IT वगळता सर्वच क्षेत्रांत दबाव; 'या' कारणांचा झाला परिणाम
6
बिहारमध्ये राडा! उपमुख्यमंत्र्यांच्या ताफ्यावर हल्ला; दुसरीकडे सीपीएम आमदाराला मारहाण, गाडी फोडली
7
Ravi Shastri On Shubman Gill : शुभमन गिल आधीच होतोय ट्रोल, त्यात शास्त्रींच्या कमेंटची भर, म्हणाले...
8
लॅपटॉपच्या स्क्रीनवर धूळ बसली आहे? टिश्यू पेपर की कापड कशाने साफ कराल? 'या' टिप्स येतील कामी
9
सैनिकी शाळेत १२ वर्षीय मुलाचा गूढ मृत्यू,'त्या' बंद दारामागे काय घडले?; बहिणीचा गंभीर आरोप
10
सोशल मीडियाच्या ट्रॉलिंगचा बळी; माफी मागितली तरी छळ थांबेना, तरुणाने अखेर जीवन संपवले
11
बदल्याची आग! तरुणाने नकार देताच 'ती' संतापली, ११ राज्यांमधील शाळांना दिली बॉम्बची धमकी
12
"14 तारखेला 11 वाजेपर्यंत लालू अँड कंपनीचा..."; अमित शाह स्पष्टच बोलले, घुसखोरांसंदर्भात काय म्हणाले?
13
Anil Ambani ED: अनिल अंबानींची पुन्हा चौकशी होणार, ED नं १४ नोव्हेंबरला बोलावलं; प्रकरण काय?
14
विजय देवराकोंडा-रश्मिका मंदाना 'या' महिन्यात लग्न करणार? काही दिवसांपूर्वीच झालेला साखरपुडा
15
बायकोला ब्रेन ट्युमर, नवऱ्याने मृत्यूच्या दारातून परत आणलं; मराठी रीलस्टार कपलच्या रिअल लाइफ स्टोरीवर येतोय साऊथ मुव्ही
16
भाजप कार्यकर्त्याने आधी दिल्लीत नंतर बिहारमध्ये मतदान केले; राहुल गांधींनंतर आप नेत्याने आरोप केला
17
Canada Visa Rules : कॅनडाने व्हिसा नियमांमध्ये केला मोठा बदल, भारतावर काय परिणाम होईल?
18
SBI नं रचला इतिहास, मार्केट कॅप १०० अब्ज डॉलर्सच्या पार; देशातील दिग्गजांच्या यादीत सामील
19
"माझ्या पप्पांना अडकवण्यात आलंय"; वडील जेलमध्ये, लेकीने अभ्यास सोडून केला प्रचार
20
Jara Hatke: चांदीचा वर्ख कसा तयार होतो माहितीय? वर्ख लावलेली मिठाई खावी की नाही? तुम्हीच ठरवा!

संघर्षात बिघडले घड्याळाचे काटे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2018 00:47 IST

सांगलीतील राष्टÑवादीची अवस्था : पक्षांतर्गत गटबाजीला उधाणलोकमत न्यूज नेटवर्कसांगली : एकमेकांशी पुकारलेले उघड वैरत्व, गटबाजीने सुरू असलेले राजकारण यामुळे सांगली, मिरज, कुपवाड महापालिका क्षेत्रातील घड्याळाचे काटे ऐन महापालिका निवडणुकीत बिघडले आहेत. घड्याळाची वेळ बिघडल्यामुळे नेत्यांच्या डोक्यातील चिंतेचे घड्याळ आता टिकटिक करू लागले आहे.महापालिकेच्या राजकारणात कॉँग्रेसपाठोपाठचा सर्वात मोठा पक्ष म्हणून राष्टÑवादीकडे ...

सांगलीतील राष्टÑवादीची अवस्था : पक्षांतर्गत गटबाजीला उधाणलोकमत न्यूज नेटवर्कसांगली : एकमेकांशी पुकारलेले उघड वैरत्व, गटबाजीने सुरू असलेले राजकारण यामुळे सांगली, मिरज, कुपवाड महापालिका क्षेत्रातील घड्याळाचे काटे ऐन महापालिका निवडणुकीत बिघडले आहेत. घड्याळाची वेळ बिघडल्यामुळे नेत्यांच्या डोक्यातील चिंतेचे घड्याळ आता टिकटिक करू लागले आहे.महापालिकेच्या राजकारणात कॉँग्रेसपाठोपाठचा सर्वात मोठा पक्ष म्हणून राष्टÑवादीकडे पाहिले जाते. संधी असतानाही नेते, पदाधिकारी आणि नगरसेवकांनी आपला महापालिका क्षेत्रातील दबदबा वाढविला नाही. गटबाजीचा प्रश्न सोडविण्याऐवजी तो सातत्याने दाबत ठेवल्याने शनिवारी पक्षीय बैठकीत हा वाद अचानक उफाळून आला.जयंतरावांवर प्रथमच अशाप्रकारच्या उघड गटबाजीला हताशपणे पाहण्याची वेळ आली. त्यांनी निर्णयाचा चेंडू पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांकडे ढकलला असला तरी, महापालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी स्वत:च्या निर्णय क्षमतेलाच दुर्लक्षित केले. दोन्ही डगरीवरचे त्यांचे हात आता पक्षासाठी अधिक अडचणीचे ठरत आहेत.संजय बजाज आणि कमलाकर पाटील यांच्या गटातील हा वाद आता इतका विकोपाला गेला आहे की, तो गुंता सोडवणे कठीण बनले आहे. जयंतरावांनी घेतलेल्या फेरनिवडीच्या निर्णयाला आव्हान देण्याची तयारी कमलाकर पाटील गटाने सुरू केली आहे. व्यक्तिगत वर्चस्ववादातून राष्टÑवादीतील संघर्ष विकोपाला गेला आहे. पक्षाला मोठे करण्यापेक्षा स्वत:ला मोठे करण्याच्या स्पर्धेची कीड राष्टÑवादीला लागली आहे. पक्षाच्या निर्णयाच्या दोºया हाती घेण्यावरून सारे खेळ सुरू झाले आहेत. महापालिकेतही मोठी सदस्य संख्या असूनही सक्षम विरोधी पक्षाची भूमिका राष्टÑवादीला साकारता आली नाही. यालाही गटबाजीच कारणीभूत आहे. जाती-पातीच्या राजकारणाचाही स्पर्श याला झाला आहे.या सर्व गोंधळात निष्ठावंत व गटबाजीपासून दूर असलेले कार्यकर्ते अस्वस्थ आहेत. बिघडलेल्या घड्याळातून अनेकदा धोक्याची घंटा वाजली तरीही त्याकडे नेत्यांनी दुर्लक्ष केले. आर. आर. पाटील यांच्या निधनानंतर जिल्ह्यातील राष्टÑवादीचा सर्व भार एकट्या जयंतरावांवर आला आहे. तरीही जयंतरावांनी नेहमी सावध पावलेच उचलली. प्रसंगी कठोर निर्णय घेऊन पक्षासाठी डोकेदुखी ठरू पाहणाºयांना बाजूला करण्याची त्यांची मानसिकता दिसली नाही.निर्णयक्षमता, अनुभव पाठीशी असतानाही जयंत पाटील यांची कचखाऊ भूमिका त्यांच्याच पक्षासाठी घातक ठरू लागली आहे. त्यांचा शब्द प्रमाण मानणारे कार्यकर्ते आजही पक्षात आहेत. महापालिका क्षेत्रात मदन पाटील यांच्याप्रमाणेच जयंत पाटील यांचीही ताकद आहे, मात्र त्याचा योग्य वापर होताना दिसत नाही. त्यामुळे टिकटिकऐवजी आता किटकिट सुरू झाली आहे. ही किटकिट त्यांचीच डोकेदुखी वाढवत आहे.पक्षात इनकमिंग : होणार तरी कसे?राष्टÑवादीत आता मोठ्या प्रमाणावर इनकमिंग होणार असल्याचे मत जयंत पाटील यांनी शनिवारी पक्षीय बैठकीत मांडले; मात्र पक्षांतर्गत कुरघोड्यांचे राजकारण रंगल्यामुळे हे इनकमिंग होणार तरी कसे, असा प्रश्न प्रामाणिक कार्यकर्त्यांना पडला आहे. पक्षात असलेले लोकच एकसंध नसताना, आयात कार्यकर्त्यांना घेऊन पुन्हा अनागोंदी सुरू होण्याचीच चिन्हे अधिक आहेत. वस्तुस्थिती पाहिली तर गेल्या पाच वर्षात राष्टÑवादीचे आऊटगोर्इंग इतके झाले आहे की, इनकमिंगची आशाच कार्यकर्त्यांनी सोडली आहे.स्वबळाचा नारा दुबळागटबाजीने पोखरलेल्या राष्टÑवादीचे बळ केव्हाचेच कमी झाले आहे. सध्याची परिस्थिती पाहता, एकीचे बळ दिसण्याची शक्यता फारच कमी आहे. संघर्षाची धार तीव्र होत जाताना अनेकजण पक्षाला दुबळे करण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्यामुळे महपाालिका निवडणुकीसाठी राष्टÑवादीने पुकारलेला स्वबळाचा नारा तितकाच दुबळा वाटू लागला आहे.