शहरं
Join us  
Trending Stories
1
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
2
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
3
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
4
'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल
5
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
6
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
7
आणखी एक मुस्कान! मेरठच्या 'सौरभ' हत्याकांडासारखा प्लॅन बनवला; पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीचे केले तुकडे
8
वंचित बहुजन आघाडी दुर्लक्षित राहिली, पण एक नगराध्यक्ष पदासह या ठिकाणांवर मारलीय बाजी
9
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
10
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २२ डिसेंबर २०२५: प्रिय व्यक्तीची भेट होईल, अचानक पदोन्नती होण्याचीही शक्यता!
11
संपादकीय: नगरांचा जनादेश सत्तेला, काँग्रेस पक्ष राज्यात जिवंत असल्याचे...
12
U19 Asia Cup: 'हाय व्होल्टेज' राडा! भारतीय युवा संघाने गमावला आशिया चषक; पाक पीसीबी प्रमुखांच्या हस्ते पदक स्वीकारण्यास नकार
13
‘नगरां’च्या निवडणुकीत मारली बाजी; भाजप ‘धुरंधर’ तर ठाकरेंचा धुव्वा उडाला
14
पक्षाने माझी शक्ती कमी केली- मुनगंटीवार; सत्तारूढ अन् विरोधकांमधील नेत्यांनी कुठे राखली प्रतिष्ठा
15
भारताविरुद्ध बांगलादेशात षड्‌यंत्र! कोण कोण रचतेय...
16
महामुंबईत भाजप-शिंदेसेनेचाच ‘आवाज’; प्रत्येकी पाच नगराध्यपदांवर विजय; अजित पवार गटही दमदार
17
रेल्वे प्रवाशांना नवीन वर्षाचा 'झटका'! २६ डिसेंबरपासून भाडेवाढ लागू; लांब पल्ल्याचा प्रवास आणि 'AC' कोच महागणार
18
दिशाभूल करणाऱ्या प्रचारामुळे संघाबद्दल काही लोकांमध्ये गैरसमज; संघाचा कोणीही शत्रू नाही :  सरसंघचालक मोहन भागवत
19
आमदारांचे पगार की जनतेची थट्टा? ओडिशात २००% पगारवाढीने रणकंदन; पाहा महाराष्ट्रासह कोणत्या राज्यात किती मिळतो पगार!
20
‘हा फोटो बघ’ असा मेसेज तुम्हालाही आलाय का? व्हॉट्सॲप ‘हायजॅक’चे नवे संकट!
Daily Top 2Weekly Top 5

संघर्षात बिघडले घड्याळाचे काटे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2018 00:47 IST

सांगलीतील राष्टÑवादीची अवस्था : पक्षांतर्गत गटबाजीला उधाणलोकमत न्यूज नेटवर्कसांगली : एकमेकांशी पुकारलेले उघड वैरत्व, गटबाजीने सुरू असलेले राजकारण यामुळे सांगली, मिरज, कुपवाड महापालिका क्षेत्रातील घड्याळाचे काटे ऐन महापालिका निवडणुकीत बिघडले आहेत. घड्याळाची वेळ बिघडल्यामुळे नेत्यांच्या डोक्यातील चिंतेचे घड्याळ आता टिकटिक करू लागले आहे.महापालिकेच्या राजकारणात कॉँग्रेसपाठोपाठचा सर्वात मोठा पक्ष म्हणून राष्टÑवादीकडे ...

सांगलीतील राष्टÑवादीची अवस्था : पक्षांतर्गत गटबाजीला उधाणलोकमत न्यूज नेटवर्कसांगली : एकमेकांशी पुकारलेले उघड वैरत्व, गटबाजीने सुरू असलेले राजकारण यामुळे सांगली, मिरज, कुपवाड महापालिका क्षेत्रातील घड्याळाचे काटे ऐन महापालिका निवडणुकीत बिघडले आहेत. घड्याळाची वेळ बिघडल्यामुळे नेत्यांच्या डोक्यातील चिंतेचे घड्याळ आता टिकटिक करू लागले आहे.महापालिकेच्या राजकारणात कॉँग्रेसपाठोपाठचा सर्वात मोठा पक्ष म्हणून राष्टÑवादीकडे पाहिले जाते. संधी असतानाही नेते, पदाधिकारी आणि नगरसेवकांनी आपला महापालिका क्षेत्रातील दबदबा वाढविला नाही. गटबाजीचा प्रश्न सोडविण्याऐवजी तो सातत्याने दाबत ठेवल्याने शनिवारी पक्षीय बैठकीत हा वाद अचानक उफाळून आला.जयंतरावांवर प्रथमच अशाप्रकारच्या उघड गटबाजीला हताशपणे पाहण्याची वेळ आली. त्यांनी निर्णयाचा चेंडू पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांकडे ढकलला असला तरी, महापालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी स्वत:च्या निर्णय क्षमतेलाच दुर्लक्षित केले. दोन्ही डगरीवरचे त्यांचे हात आता पक्षासाठी अधिक अडचणीचे ठरत आहेत.संजय बजाज आणि कमलाकर पाटील यांच्या गटातील हा वाद आता इतका विकोपाला गेला आहे की, तो गुंता सोडवणे कठीण बनले आहे. जयंतरावांनी घेतलेल्या फेरनिवडीच्या निर्णयाला आव्हान देण्याची तयारी कमलाकर पाटील गटाने सुरू केली आहे. व्यक्तिगत वर्चस्ववादातून राष्टÑवादीतील संघर्ष विकोपाला गेला आहे. पक्षाला मोठे करण्यापेक्षा स्वत:ला मोठे करण्याच्या स्पर्धेची कीड राष्टÑवादीला लागली आहे. पक्षाच्या निर्णयाच्या दोºया हाती घेण्यावरून सारे खेळ सुरू झाले आहेत. महापालिकेतही मोठी सदस्य संख्या असूनही सक्षम विरोधी पक्षाची भूमिका राष्टÑवादीला साकारता आली नाही. यालाही गटबाजीच कारणीभूत आहे. जाती-पातीच्या राजकारणाचाही स्पर्श याला झाला आहे.या सर्व गोंधळात निष्ठावंत व गटबाजीपासून दूर असलेले कार्यकर्ते अस्वस्थ आहेत. बिघडलेल्या घड्याळातून अनेकदा धोक्याची घंटा वाजली तरीही त्याकडे नेत्यांनी दुर्लक्ष केले. आर. आर. पाटील यांच्या निधनानंतर जिल्ह्यातील राष्टÑवादीचा सर्व भार एकट्या जयंतरावांवर आला आहे. तरीही जयंतरावांनी नेहमी सावध पावलेच उचलली. प्रसंगी कठोर निर्णय घेऊन पक्षासाठी डोकेदुखी ठरू पाहणाºयांना बाजूला करण्याची त्यांची मानसिकता दिसली नाही.निर्णयक्षमता, अनुभव पाठीशी असतानाही जयंत पाटील यांची कचखाऊ भूमिका त्यांच्याच पक्षासाठी घातक ठरू लागली आहे. त्यांचा शब्द प्रमाण मानणारे कार्यकर्ते आजही पक्षात आहेत. महापालिका क्षेत्रात मदन पाटील यांच्याप्रमाणेच जयंत पाटील यांचीही ताकद आहे, मात्र त्याचा योग्य वापर होताना दिसत नाही. त्यामुळे टिकटिकऐवजी आता किटकिट सुरू झाली आहे. ही किटकिट त्यांचीच डोकेदुखी वाढवत आहे.पक्षात इनकमिंग : होणार तरी कसे?राष्टÑवादीत आता मोठ्या प्रमाणावर इनकमिंग होणार असल्याचे मत जयंत पाटील यांनी शनिवारी पक्षीय बैठकीत मांडले; मात्र पक्षांतर्गत कुरघोड्यांचे राजकारण रंगल्यामुळे हे इनकमिंग होणार तरी कसे, असा प्रश्न प्रामाणिक कार्यकर्त्यांना पडला आहे. पक्षात असलेले लोकच एकसंध नसताना, आयात कार्यकर्त्यांना घेऊन पुन्हा अनागोंदी सुरू होण्याचीच चिन्हे अधिक आहेत. वस्तुस्थिती पाहिली तर गेल्या पाच वर्षात राष्टÑवादीचे आऊटगोर्इंग इतके झाले आहे की, इनकमिंगची आशाच कार्यकर्त्यांनी सोडली आहे.स्वबळाचा नारा दुबळागटबाजीने पोखरलेल्या राष्टÑवादीचे बळ केव्हाचेच कमी झाले आहे. सध्याची परिस्थिती पाहता, एकीचे बळ दिसण्याची शक्यता फारच कमी आहे. संघर्षाची धार तीव्र होत जाताना अनेकजण पक्षाला दुबळे करण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्यामुळे महपाालिका निवडणुकीसाठी राष्टÑवादीने पुकारलेला स्वबळाचा नारा तितकाच दुबळा वाटू लागला आहे.