शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरे सोबत आले, तर शिवसेना (UBT) इंडिया आघाडीतून बाहेर पडणार का? उद्धव ठाकरे म्हणाले...
2
'तुमच्याकडे पुरावे आहेत, न्यायालयात का जात नाही?', राहुल गांधींच्या आरोपांवर भाजपचा पलटवार
3
राहुल गांधींनी उल्लेख केलेला आदित्य श्रीवास्तव खरोखरच ३ राज्यांत मतदार आहे? समोर आली अशी माहिती  
4
'त्यांच्या मेंदूची चीप चोरीला गेलीये, म्हणून ते...'; CM देवेंद्र फडणवीस राहुल गांधींच्या ECI वरील आरोपांवर भडकले
5
Asia Cup 2025 मध्ये IND vs PAK सामना रद्द होणार का? दुबईतून आली मोठी अपडेट
6
या पाच कारणांमुळे डोनाल्ड ट्रम्प भडकलेत; म्हणून भारतावर कर लावलेत
7
येसूबाई अन् 'शंभुराज'! प्राजक्ता गायकवाडचा झाला साखरपुडा; होणाऱ्या नवऱ्यासोबत फोटोशूट
8
VIDEO : सॉरी सॉरी...! वैभव सूर्यवंशीची पॉवर; गोळीच्या वेगानं मारला चेंडू; बचावासाठी कॅमेरामनची 'कसरत'
9
ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी सॅमसंगने आणलाय 5G फोन, किंमतही कमी!
10
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मोठा घोटाळा, राहुल गांधी यांनी सादर केले पुरावे, मतदार यादीतील घोळ केला उघड   
11
धुळ्यात ईव्हीएम स्ट्राँगरूम बाहेर ड्युटीवर असताना पोलिसाने स्वतःवरच झाडली गोळी
12
संजू सॅमसन राजस्थानची साथ सोडणार, मॅनेजमेंटकडे रिलीज करण्याची विनंती; पण नियम काय सांगतो?
13
"राहुल गांधी यांचा हा करंटेपणा, त्यांना..."; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे का संतापले?
14
मंदिरात आला, पिंडीवर जल अर्पण केले, हात जोडले आणि तिथली भांडी चोरली, सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्ड झाली चोरी
15
Asia Cup 2025 Hockey : पाकिस्तानची माघार; भारतात येऊन खेळण्यास दिला नकार, आता...
16
नागरिकांचं आरोग्य महत्त्वाचं, आदेशाचा अवमान करू नका; मुंबई उच्च न्यायालयाने पिळले कान
17
प्रेमाच्या नादात नातंच विसरले! २ मुलांच्या आईने भाच्याशी केलं लग्न, नवऱ्याला पाठवले फोटो
18
Aisa Cup 2025: सूर्यकुमार यादव संघात नसेल तर कर्णधार कोण? 'या' ३ खेळाडूंमध्ये चुरशीची स्पर्धा
19
कुबेरेश्वर धाममध्ये आणखी ३ भाविकांचा मृत्यू; आतापर्यंत ७ जणांनी गमावला जीव, कारण काय..?
20
रशियाचे राष्ट्राध्यक्ष भारतात येणार, ट्रम्प यांच्या 'दबावतंत्रा'वर मोदी-पुतीन तोडगा काढणार!

ढगाळ हवामानाचा द्राक्षबागांना फटका

By admin | Updated: March 31, 2015 00:25 IST

व्यापाऱ्यांनी दर पाडले : किलोला चार ते पाच रुपयांनी दर कमी, एकरी लाखाची तूट

सांगली : गेल्या दोन महिन्यांपासून जिल्ह्याला विचित्र हवामानाचा फटका बसत आहे. आज (सोमवारी) दिवसभर सांगली, मिरज शहरांसह जिल्ह्याच्या काही भागामध्ये ढगाळ हवामान होते. सांगलीच्या काही भागामध्ये सकाळी पावसाच्या हलक्या सरी पडल्या. या वातावरणामुळे व्यापाऱ्यांनी द्राक्षाचे दर किलोला चार ते पाच रुपयांनी पाडल्यामुळे शेतकऱ्यांना एकरी लाखाचा फटका बसत आहे. शेतकऱ्यांच्यादृष्टीने ढगाळ हवामान आणि पाऊस हे मोठे संकट निर्माण झाले आहे. पुणे येथील भारतीय हवामानशास्त्र विभागाने उद्या (दि. ३१ रोजी) सांगली जिल्ह्याच्या काही भागामध्ये गडगडाटासह पाऊस पडण्याचा अंदाज व्यक्त केला आहे.जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून ढगाळ हवामान असून, आज सकाळी तापमानात कमालीची घट अनुभवण्यात आली. सकाळी थंडी आणि दाट धुक्याची झालर, तर दुपारी कडक ऊन आणि ढगाळ हवामान, अशा लहरी हवामानामुळे अवकाळीच्या संकटातून बचावलेल्या द्राक्षबागा, बेदाणा आणि रब्बी पिकांवर विपरित परिणाम होत आहे. तासगाव, जत, कवठेमहांकाळ, मिरज पूर्व भागातील द्राक्ष बागायतदारांनी बेदाणा शेडवर बेदाण्यासाठी द्राक्षे टाकली आहेत. परंतु, या हवामानाचा बेदाण्यावर परिणाम होणार असल्यामुळे शेतकरी चिंतेत सापडला आहे. दरम्यान, खानापूर, जत, कडेगाव, पलूस, वाळवा तालुक्याच्या काही भागामध्ये रब्बी पिकांची काढणी आणि मळणी चालू आहे. येथील शेतकऱ्यांनी ढगाळ हवामानामुळे मळण्या थांबविल्या आहेत. दि. ३१ रोजी सांगली जिल्ह्याच्या काही भागात ढगांच्या गडगडाटासह पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे. (प्रतिनिधी)बागायतदारांची संकटांची मालिका कायममार्च महिन्यातच सहावेळा अवकाळी पाऊस, गारपीट आणि ढगाळ वातावरणाने द्राक्ष बागायतदारांचे मोठे नुकसान झाले आहे. बागायतदारांसमोरील संकटांची मालिका सुरूच आहे. जिल्ह्यातील निर्यातक्षम द्राक्षांचेही मोठे नुकसान झाले असून, यंदा निर्यात पूर्णपणे थांबली आहे. मागणी असूनही व्यापारी द्राक्ष नेण्यास तयार नाहीत. त्यामुळे बागायतदारांवरील चिंतेचे ढग कायम आहेत.