शहरं
Join us  
Trending Stories
1
Pooja Khedkar Mother: नवी मुंबईतून ट्रक चालकाचं अपहरण, पुण्यातील घरात ठेवले डांबून; पूजा खेडकरच्या आईचा प्रताप
2
यह नया भारत है..., टीम इंडियाने पाकिस्तानला नमवल्यानंतर भाजपाने विरोधकांना डिवचले  
3
रशिया युक्रेन युद्ध संपूर्ण युरोपात पसरणार, NATO देशांचं सैन्य सज्ज; झेलेन्स्कींचा जगाला मोठा इशारा
4
हृदयद्रावक! BMW ने घेतला भारत सरकारच्या मोठ्या अधिकाऱ्याचा जीव; नेमकं काय घडलं?
5
UPI Rule Change: आजपासून मोठा बदल, मोठा दिलासा; आता UPI मधून एका दिवसात करू शकता 'इतक्या' लाखांचं ट्रान्झॅक्शन
6
Navratri 2025: आई तुळजाभवानीची घोर मंचकी निद्रा प्रारंभ; आता दर्शन थेट घटस्थापनेला!
7
पुढील ३ तासांसाठी मुंबईला 'रेड अलर्ट'; विजांच्या कडकडाट अन् जोरदार वाऱ्यासह पावसाचा इशारा
8
Monorail Mumbai: मोनो रेल्वे पुन्हा बंद पडली, भर पावसात प्रवाशांना काढले बाहेर
9
Stock Markets Today: आठवड्याची सुस्त सुरुवात, ६० अंकांनी वधारला सेन्सेक्स; रियल्टी, मेटल शेअर्समध्ये खरेदी
10
पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात केलेली ती चूक भोवणार? टीम इंडियावर कारवाई होणार?
11
PPF Investment: पती पत्नीसाठी डबल नफ्याची ट्रिक! टॅक्सही शून्य, व्याजही जास्त; कसा घ्याल फायदा?
12
युद्ध स्फोटक वळणावर, रशियन ड्रोन्स रोमानियात; युक्रेनचा रशियातील सर्वात मोठ्या तेल प्रकल्पावर भीषण हल्ला
13
राहुल गांधींवर आरोप करण्याऐवजी त्यांनी केलेल्या आरोपांची चौकशी करा
14
Maharashtra Rain: आजचा दिवस पावसाचा, संपूर्ण महाराष्ट्राला झोडपणार; चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
15
४० हजार एन्ट्री फी, अख्खी रात्र 'Nude Party'; विना कपडे येणार होते २१ मुले-मुली, आयोजकांना अटक
16
ट्रम्प अन् निर्बंधांमुळे रशियन तेल मिळवण्यात भारताला अडचणी; जहाज कंपन्यांनी दिला नकार
17
पाकिस्तानवर ‘फिरकी बाॅम्ब’; इंडियाचा मैदानावरही 'बदला'; हायव्होल्टेज सामन्यात पाकचा दणदणीत पराभव
18
सकाळपासून ते रात्री झोपेपर्यंतच्या सर्व उत्पादनांवर जीएसटी सवलत मिळणार; निर्मला सीतारामण यांचा दावा
19
‘एआय सायकोसिस’ ही स्थिती नेमकी काय आहे? Ai विचारांवर किंवा भावनांवर नियंत्रण ठेवत
20
सायबर भामट्यांनी साेडले खात्यात केवळ ८६ रुपये; बोलण्यात गुंतवून पाठवली लिंक

पाणी मागणीअभावी म्हैसाळ योजना बंद

By admin | Updated: December 1, 2014 00:07 IST

पिके अडचणीत : नियोजन कोलमडले

मिरज : म्हैसाळ योजनेच्या रब्बी आवर्तनासाठी शेतकऱ्यांनी मागणी नोंदविली नसल्याने म्हैसाळचा पाणी उपसा बंद करण्यात आला आहे. फेब्रुवारीअखेर रब्बी आवर्तनाचे नियोजन करण्यात आले होते. मात्र मागणी नसल्याने पाणी बंद करण्यात आले आहे. शेतकऱ्यांनी पैसे भरून मागणी नोंदविल्यास यापुढे म्हैसाळचे पाणी सुरू करण्यात येणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.म्हैसाळच्या रब्बी आवर्तनासाठी पंप सुरू करण्यात आले होते. मात्र १ कोटी ६२ लाख वीज बिलाच्या थकबाकीसाठी महावितरणने विद्युत पुरवठा खंडित केला. पाटबंधारे विभागाने टंचाई निधीतून वीज बिल भरण्याची हमी दिल्यानंतर म्हैसाळचे पंप दि. ७ नोव्हेंबरपासून पुन्हा सुरू झाले. म्हैसाळचे हजारो हेक्टर लाभक्षेत्र असताना, एकाही शेतकऱ्याने पाण्याची मागणी नोंदविली नसल्याने पाणी उपसा करणाऱ्या पंपाची व जतपर्यंतच्या कालव्याची चाचणी घेण्यात आली. फेब्रुवारीत खरड छाटणीला पाण्याची आवश्यकता असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितल्याने मागणीअभावी रब्बी आवर्तन बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला. दोन दिवसांपूर्वी म्हैसाळचे पाणी बंद करण्यात आले असून, पुढील हंगामात शेतकऱ्यांनी पाणी बिलाची रक्कम भरून मागणी नोंदविल्यास पाणी सुरू करण्यात येणार असल्याचे म्हैसाळ योजनेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. मिरज व तासगाव तालुक्यात पावसाचे पाणी अद्याप ओढे-नाल्यात आहे. जत व कवठेमहांकाळ तालुक्यात झालेल्या पावसामुळे अद्याप येथील शेतकऱ्यांना पाण्याची आवश्यकता नसल्याचेही अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. (वार्ताहर)