शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी दबावाखाली काम करत नाही'; जगदीप धनखड यांनी असे का म्हटले?, राजीनाम्यानंतर व्हिडीओ व्हायरल
2
जगदीप धनखड यांच्या राजीनाम्याचं टायमिंग अनेकांना न पटण्यासारखे; 'त्या' ३ तासांत काय घडले?
3
राजनाथ सिंह यांच्याकडे राजकीय हालचालींना वेग; भाजपा खासदाराच्या कोऱ्या कागदावर का घेतल्या सह्या?
4
एकदा- दोनदा नाही, एअर इंडियाला सहा महिन्यात ९ कारणे दाखवा नोटीस बजावल्या; सरकारची माहिती
5
४ मुलांच्या आईनं २४ वर्षाच्या युवकाशी केलं कोर्ट मॅरेज; पतीनं सोडला सुटकेचा नि:श्वास, म्हणाला...
6
२ शत्रू ग्रहांची युती: ९ राशींचे कल्याण, दुपटीने लाभ; पद-पैसा वृद्धी, राजयोगांचा वरदान काळ!
7
जगदीप धनखड यांचा उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा; प्रकृतीच्या कारणास्तव निर्णय
8
आजचे राशीभविष्य, २२ जुलै २०२५: 'या' २ राशींसाठी लाभदायी दिवस, अचानक धनलाभ होईल
9
'आम्ही अणुकार्यक्रम सुरूच ठेवणार', युरोपीय देशांशी चर्चेपूर्वी इराणचा अमेरिकेला संदेश
10
पहिला दिवस गोंधळाचा; विरोधक झाले आक्रमक; पहलगाम हल्ला ते बिहार मतदारयादीवरून गोंधळ 
11
शाळेवर विमान कोसळून २० ठार; बांगलादेशात अहमदाबादची पुनरावृत्ती!
12
एअर इंडिया विमानाचे तीन टायर फुटले; विमानतळावर लँडिंगच्या वेळी पावसामुळे विमानाने धावपट्टी सोडली
13
मुख्यमंत्र्यांनी कोकाटेंना सुनावले; जे काही घडले ते भूषणावह नाही!
14
मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपींच्या सुटकेसाठी उच्च न्यायालयाला का लागले तब्बल १० वर्षे?
15
ब्रिगिट मॅक्रॉन ‘पुरुष’? खटले आणि वादांना ऊत! दाव्याची सत्यता काय?
16
अंधेरी मेट्रो स्थानकात गळती; पाणी गोळा करण्यासाठी बादल्यांचा वापर
17
भाजपचा नवा फॉर्म्युला; प्रत्येक आमदाराची पाच कामे होणार! पालिका निवडणुकीसाठी रणनीती
18
परिचारिकांच्या संपामुळे पाच दिवसांपासून रुग्णांचे हाल; नियमित शस्त्रक्रियाही पूर्णपणे बंद
19
विधवा महिलेस १.२० लाखात गुजरातेत विकले, दोन वर्षांनी पुत्रप्राप्तीनंतर आणून गावात सोडले!
20
सोळावे वरीस... धोक्याचे नव्हे, निवडणुकीत मत देण्याचे! ब्रिटनचा धाडसी निर्णय; युवाशक्ती लोकशाहीत सहभागी!

पाणी मागणीअभावी म्हैसाळ योजना बंद

By admin | Updated: December 1, 2014 00:07 IST

पिके अडचणीत : नियोजन कोलमडले

मिरज : म्हैसाळ योजनेच्या रब्बी आवर्तनासाठी शेतकऱ्यांनी मागणी नोंदविली नसल्याने म्हैसाळचा पाणी उपसा बंद करण्यात आला आहे. फेब्रुवारीअखेर रब्बी आवर्तनाचे नियोजन करण्यात आले होते. मात्र मागणी नसल्याने पाणी बंद करण्यात आले आहे. शेतकऱ्यांनी पैसे भरून मागणी नोंदविल्यास यापुढे म्हैसाळचे पाणी सुरू करण्यात येणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.म्हैसाळच्या रब्बी आवर्तनासाठी पंप सुरू करण्यात आले होते. मात्र १ कोटी ६२ लाख वीज बिलाच्या थकबाकीसाठी महावितरणने विद्युत पुरवठा खंडित केला. पाटबंधारे विभागाने टंचाई निधीतून वीज बिल भरण्याची हमी दिल्यानंतर म्हैसाळचे पंप दि. ७ नोव्हेंबरपासून पुन्हा सुरू झाले. म्हैसाळचे हजारो हेक्टर लाभक्षेत्र असताना, एकाही शेतकऱ्याने पाण्याची मागणी नोंदविली नसल्याने पाणी उपसा करणाऱ्या पंपाची व जतपर्यंतच्या कालव्याची चाचणी घेण्यात आली. फेब्रुवारीत खरड छाटणीला पाण्याची आवश्यकता असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितल्याने मागणीअभावी रब्बी आवर्तन बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला. दोन दिवसांपूर्वी म्हैसाळचे पाणी बंद करण्यात आले असून, पुढील हंगामात शेतकऱ्यांनी पाणी बिलाची रक्कम भरून मागणी नोंदविल्यास पाणी सुरू करण्यात येणार असल्याचे म्हैसाळ योजनेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. मिरज व तासगाव तालुक्यात पावसाचे पाणी अद्याप ओढे-नाल्यात आहे. जत व कवठेमहांकाळ तालुक्यात झालेल्या पावसामुळे अद्याप येथील शेतकऱ्यांना पाण्याची आवश्यकता नसल्याचेही अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. (वार्ताहर)