शहरं
Join us  
Trending Stories
1
मध्यरात्री भारत-पाकिस्तानात खणखणला फोन; तणाव कमी करण्यासाठी कुणी घेतला पुढाकार?
2
शत्रू भारताचं काही वाकडे करू शकणार नाहीत, परंतु...; प्रसिद्ध भेंडवळची भविष्यवाणी
3
गुरु-राहु-केतु गोचर: ७ राशींना मे महिना दमदार, अचानक धनलाभ; पैसा राहील, धनलक्ष्मी प्रसन्न!
4
१५ बँका बंद ते एटीएम, रेल्वे तिकीट बुकिंगपासून बँकिंग आणि गॅस सिलिंडरपर्यंत, आजपासून बदलले अनेक नियम
5
माहिरा खान ते हानिया आमिर, पाकिस्तानी कलाकारांचे इन्स्टाग्राम अकाऊंट भारताकडून 'बॅन'
6
'सीमा हैदरला पाकिस्तानात पाठवू नका, ती इथे...'; उत्तर प्रदेश राज्य महिला आयोगाच्या सदस्याचे विधान
7
नियोजित वेळेपूर्वीच अजितदादा आले, उद्घाटनही केले; भाजपा खासदार नाराज झाले, नेमके काय घडले?
8
देशात होणार जातनिहाय जनगणना; केंद्रीय मंत्रिमंडळाच्या राजकीय व्यवहार समितीच्या बैठकीत ऐतिहासिक निर्णय
9
पहलगाम हल्ल्यानंतर अचानक गायब झाली पाकिस्तानी महिला; UP मध्ये केली ९ वर्ष सरकारी नोकरी
10
"तुम्हाला माहितीये आमचे सैन्य काय करू शकते, आता परिणाम भोगायला तयार रहा"; अमेरिकेचा इराणला इशारा
11
“‘सुसंस्कृत राज्य’ म्हणून महाराष्ट्राची ओळख अबाधित ठेवण्याचा दृढनिश्चय करूया”: अजित पवार
12
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
13
LPG Price 1 May 2025: एलपीजी सिलिंडर झाला स्वस्त, पाहा दिल्ली ते चेन्नईपर्यंतचे नवे दर
14
धक्कादायक! Instagram वरचे फॉलोअर्स कमी झाल्यानं सोशल मीडिया इन्फ्लुएंसरनं संपवलं आयुष्य
15
यावेळी तीन तुकडेच करा! पाकिस्तानचे शेपूटच मुरगाळले पाहिजे, तेदेखील असे की...
16
आजचे राशीभविष्य, १ मे २०२५: व्यापारात फायदा अन् नोकरीत बढतीची शक्यता
17
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
18
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
19
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
20
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी

पाणी मागणीअभावी म्हैसाळ योजना बंद

By admin | Updated: December 1, 2014 00:07 IST

पिके अडचणीत : नियोजन कोलमडले

मिरज : म्हैसाळ योजनेच्या रब्बी आवर्तनासाठी शेतकऱ्यांनी मागणी नोंदविली नसल्याने म्हैसाळचा पाणी उपसा बंद करण्यात आला आहे. फेब्रुवारीअखेर रब्बी आवर्तनाचे नियोजन करण्यात आले होते. मात्र मागणी नसल्याने पाणी बंद करण्यात आले आहे. शेतकऱ्यांनी पैसे भरून मागणी नोंदविल्यास यापुढे म्हैसाळचे पाणी सुरू करण्यात येणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.म्हैसाळच्या रब्बी आवर्तनासाठी पंप सुरू करण्यात आले होते. मात्र १ कोटी ६२ लाख वीज बिलाच्या थकबाकीसाठी महावितरणने विद्युत पुरवठा खंडित केला. पाटबंधारे विभागाने टंचाई निधीतून वीज बिल भरण्याची हमी दिल्यानंतर म्हैसाळचे पंप दि. ७ नोव्हेंबरपासून पुन्हा सुरू झाले. म्हैसाळचे हजारो हेक्टर लाभक्षेत्र असताना, एकाही शेतकऱ्याने पाण्याची मागणी नोंदविली नसल्याने पाणी उपसा करणाऱ्या पंपाची व जतपर्यंतच्या कालव्याची चाचणी घेण्यात आली. फेब्रुवारीत खरड छाटणीला पाण्याची आवश्यकता असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितल्याने मागणीअभावी रब्बी आवर्तन बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला. दोन दिवसांपूर्वी म्हैसाळचे पाणी बंद करण्यात आले असून, पुढील हंगामात शेतकऱ्यांनी पाणी बिलाची रक्कम भरून मागणी नोंदविल्यास पाणी सुरू करण्यात येणार असल्याचे म्हैसाळ योजनेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. मिरज व तासगाव तालुक्यात पावसाचे पाणी अद्याप ओढे-नाल्यात आहे. जत व कवठेमहांकाळ तालुक्यात झालेल्या पावसामुळे अद्याप येथील शेतकऱ्यांना पाण्याची आवश्यकता नसल्याचेही अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. (वार्ताहर)