शहरं
Join us  
Trending Stories
1
CBSE बोर्डाचा १०वीचा निकाल जाहीर! गेल्या वर्षींपेक्षा जास्त विद्यार्थी उत्तीर्ण, मुली मुलांपेक्षा वरचढ
2
Mumbai Local: सीएसएमटी स्थानकात प्लॅटफॉर्म क्लिनिंग मशीन रेल्वे रुळावर कोसळली, मोटरमननं दाखवलं प्रसंगावधान!
3
पाकिस्तानने केलेला एअरबेस उडवल्याचा दावा; PM मोदी तिथेच पोहोचले, जवानांशी साधला संवाद
4
धक्कादायक! अचानक तोल गेला अन् खासदार अजय मंडल पडले खाली; पायाला झालं फ्रॅक्चर
5
₹२३९२ चा 'हा' शेअर आपटून आला ₹५१ वर; सोमवारी दोन मोठे राजीनामे, गुंतवणूकदारांना झटका
6
Astro Tips: गाडीच्या डॅशबोर्डवर कोणत्या देवतेची मूर्ती ठेवणे ठरते अधिक लाभदायी?
7
"वाढलेल्या वजनामुळे मला.."; 'हास्यजत्रा' फेम ईशाने केला मोठा खुलासा, झालेला हा आजार
8
Operation Sindoor : काहींचे हात तुटले, तर काहींना गंभीर दुखापत झाली, असीम मुनीर यांनी पाकिस्तानी सैनिकांची अवस्था दाखवली
9
म्युच्युअल फंड की FD.. गुंतवणुकीसाठी कोणता पर्याय चांगला? फक्त परतावा पाहू नका, 'हे' समजून घ्या
10
लग्नात नायट्रोजनचा धूर ठरला घातक; नवरा-नवरीच्या एन्ट्रीदरम्यान ७ वर्षांच्या मुलीचा गेला जीव
11
भारतीय सैन्याच्या रिटायर्ड कॅप्टनची घरात घुसून हत्या; सरपंचाने मध्यरात्री केला हल्ला
12
High Alert: दोन दिवसांत बॉम्बस्फोट घडवण्याची धमकी; महाराष्ट्र पोलीस कंट्रोल रुमला ई-मेल, शोधमोहीम सुरू
13
आधी वरमाला घातली अन्..; अभिनेत्याचा बायकोसोबत खास डान्स, रत्नागिरीत गावकऱ्यांच्या साथीने धरला ठेका
14
IPL च्या सामन्यांतून BCCI ची कमाई किती होते, उत्पन्नाचे स्त्रोत काय, कुठून येतो पैसा?
15
SSC Result 2025: दहावीचा निकाल ९४.१० टक्के; पहिला नंबर कोकणचाच, पाठोपाठ कोल्हापूर! इथे पाहा निकाल
16
वादळ वारं सुटलं गं! पुण्यात बहुतांश भागात पावसाची हजेरी; दुचाकीचालकांनो, जरा सांभाळूनच...
17
CBSE Board 12th Result 2025: सीबीएसई बोर्डाचाही १२ वीचा निकाल जाहीर; महाराष्ट्राची आकडेवारी आली, ९०.९३ टक्के निकाल
18
Video: निवृत्तीच्या दुसऱ्याच दिवशी विराट कोहली पत्नीसह प्रेमानंद महाराजांच्या चरणी नतमस्तक...
19
प्रेग्नंट गर्लफ्रेंडला खायला लावली अबॉर्शनची गोळी, प्रकृती बिघडताच बॉयफ्रेंड पसार! तरुणीचा दुर्दैवी अंत
20
कोच गंभीरमुळे हिटमॅन रोहितसह किंग कोहलीवर आली कसोटीतून निवृत्ती घेण्याची वेळ?

धुराडी बंद, तरीही ‘एफआरपी’ नाही..!

By admin | Updated: April 10, 2016 00:24 IST

शेतकरी चिंतेत : जिल्ह्यात ७७ लाख टन उसाचे गाळप, ९४ लाख क्विंटल साखरेचे उत्पादन

अशोक डोंबाळे सांगली जिल्ह्यात १६ साखर कारखान्यांनी ७८ लाख ६६ हजार ४८० टन उसाचे गाळप करून ९४ लाख ४८ हजार ५०३ क्विंटल साखरेचे उत्पादन घेतले आहे. बहुतांशी साखर कारखान्यांची धुराडी बंद झाली असून, पहिला हप्ता प्रतिटन २००० ते २२०० रूपयांप्रमाणे शेतकऱ्यांना मिळाला आहे. परंतु, दुसरा हप्ता विश्वास कारखाना वगळता कोणीही दिलेला नाही. साखरेचे दर वाढूनही दुसरा हप्ता देण्यासाठी कारखानदारांकडून विलंब का केला जात आहे, असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. जिल्ह्यातील विश्वास (शिराळा), वसंतदादा (सांगली), हुतात्मा (वाळवा) या तीन साखर कारखान्यांनी विक्रमी उसाचे गाळप केले आहे. राजारामबापू साखराळे शाखेचे २०१४-१५ या वर्षाचे गाळप नऊ लाख सात हजार ४९२ टन होऊन साखर उत्पादन ११ लाख ७४ हजार क्विंटल झाले होते. २०१५-१६ यावर्षी आठ लाख १५ हजार २६९ टन ऊस गाळप होऊन १० लाख ५२ हजार ६०० क्विंटल साखर उत्पादन झाले आहे. मागील गळीत हंगामाच्या तुलनेत यंदा एक लाख टन उसाचे गाळप कमी झाले आहे. उर्वरित साखर कारखान्यांनी मागील हंगामाएवढेच गाळप करून हंगाम बंद केले आहेत. सरासरी उताऱ्यात मात्र अर्धा ते एक टक्का घट झाल्याचे दिसत आहे. उतारा घटण्यामागे उन्हाळ्याच्या तीव्रतेचे कारण सांगितले जाते. जिल्ह्यात १६ साखर कारखान्यांनी २०१४-१५ या वर्षात ७७ लाख ४३ हजार ४३२ टन उसाचे गाळप करून ९४ लाख ७४ हजार ५०३ क्विंटल साखर उत्पादित केली होती. सरासरी साखर उतारा १२़२४ टक्के होता. यावर्षी ७८ लाख ६६ हजार ४८० टन उसाचे गाळप करून ९४ लाख ४८ हजार ५०३ क्विंटल साखरेचे उत्पादन घेतले आहे. सरासरी उतारा १२.१९ टक्केपर्यंत आहे. काही साखर कारखान्यांचे कमी गाळप झाले असले तरी, काही कारखान्यांनी गाळप क्षमता वाढविल्यामुळे, मागील हंगामाएवढीच साखर जिल्ह्यात उपलब्ध झाली आहे. सध्या बहुतांशी साखर कारखान्यांनी धुराडी बंद केली आहेत. पहिला हप्ता कारखान्यांनी दिला आहे. पण, दुसऱ्या हप्त्याची बिले दिली नाहीत. शेतकरी संघटना म्हणतात, कायद्यानुसार एफआरपीचे बिल ऊस गाळपास गेल्यापासून चौदा दिवसात मिळाले पाहिजे. प्रत्यक्षात कारखान्यांनी हंगाम बंद केले तरीही, विश्वास कारखाना वगळता कुणीही दुसरा हप्ता दिलेला नाही. विश्वास कारखान्याची एफआरपी प्रतिटन २४८० आहे. त्यानुसार पहिला हप्ता दोन हजाराचा देऊन दुसरा हप्ता ५०० रूपयांचा दिला आहे. वसंतदादा कारखान्याची १९८७ एफआरपी असल्यामुळे त्यांनी प्रतिटन २००० रूपयेप्रमाणे बिल दिले आहे. असे असले तरी, त्यांनी दि. १५ डिसेंबरपासून गाळपास आलेल्या उसाची बिले दिलेली नाहीत. जिल्ह्यातील कारखान्यांचे गाळप व उत्पादित साखर कारखाना ऊस गाळप साखर उतारा वसंतदादा ६३२००० ६७५००० ११.१० राजारामबापू (साखराळे) ८१५२६९ १०५२६०० १२.९० विश्वास ५४७५९० ६४२१३० ११.७५ हुतात्मा ७००००० ९१२५०० १३.१९ माणगंगा १७२६६८ १७७००० १०.३५ महांकाली २५७६४० २६९६३० १०.८३ राजारामबापू (वाटेगाव) ५४०८८६ ६९३२०० १२.८५ सोनहिरा ६९२५६२ ८७२२०६ १२.६२ क्रांती ८४६२२४ १०५६९३० १२.५० सर्वोदय ४४१७७६ ५७५४०० १३.०० मोहनराव शिंदे ४३०४२५ ५१७७०० १२.०० डफळे २७८६४० ३०१५०० १०.८२ यशवंत (गणपती संघ) १६७००० १८०००० १०.७८ केन अ‍ॅग्रो ५५०००० ५८०००० ११़६० उदगिरी शुगर ४२७८०० ५२७७०७ ११.७९ सद्गुरु श्री श्री शुगर ३६६००० ४१५००० ११़०४ एकूण ७८६६४८० ९४४८५०३ १२़२४ (ऊस गाळप मेट्रिक टनात, तर साखर उत्पादन क्विंटलमध्ये आहे)