शहरं
Join us  
Trending Stories
1
Shrivardhan Nagar Parishad Election Result 2025: रायगडमध्ये मोठा ट्विस्ट! श्रीवर्धनमधील ठाकरे गटाचा विजयी नगराध्यक्ष शिंदेसेनेत प्रवेश करणार?
2
Maharashtra Nagar Palika Election Result: महाराष्ट्रातील २४६ नगरपरिषदांमध्ये कोण झालं नगराध्यक्ष? वाचा, पक्षनिहाय यादी
3
Maharashtra Election Results 2025: भाजपाचं 'शतक', ठाकरेसेना सगळ्यात मागे; सर्वाधिक नगराध्यक्ष कुणाचे? शिंदे-अजितदादांमध्ये 'टफ फाइट'
4
Loha Nagar Parishad Election Result 2025: लोह्यात भाजपाला घराणेशाहीचा मोठा फटका; एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव
5
'आता तरी आपली लायकी ओळखावी' ; परळीतील विजयानंतर धनंजय मुंडेंची खा. सोनवणेंवर टीका
6
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: राज्यात शिवसेनेची जोरदार फाईट, भाजपाही मजबूत; उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला किती जागा? जाणून घ्या
7
भोकरदनमध्ये दानवे पिता-पुत्रांना मोठा धक्का, शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या समरीन मिर्जा विजयी; भाजपला किती जागा मिळाल्या? 
8
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 : 'एकदम ओक्के'! सर्वांनी एकट पाडलं, पण शहाजीबापूंनी मैदान मारलं; सांगोल्यात शिवसेनेचा मोठा विजय
9
Nitesh Rane: निवडणुका संपल्या, आता...; सिंधुदुर्गातील निकाल स्पष्ट होताच नितेश राणे म्हणाले...
10
Shahada Nagar Parishad Election Results 2025: २९ पैकी २० जागा भाजपाने जिंकल्या, पण नगराध्यक्षद जनता विकास आघाडीकडे
11
Bhagur Nagar Parishad Election Result 2025: २७ वर्षांची शिवसेनेची सत्ता गेली, भगूरमध्ये अजित पवार गटाचा मोठा विजय; ‘अशी’ झाली लढत!
12
Kankavali Nagar Parishad Election Result 2025: कणकवलीत भाजपा मंत्री नितेश राणेंना मोठा धक्का; शहर विकास आघाडीचे संदेश पारकर विजयी
13
Georai Nagar Parishad Election Result 2025: गेवराईत भाजपचे कमळ फुलले; नगराध्यक्षपदाच्या उमेदवार गीता पवार विजयी
14
शूटिंग करताना अक्षय खन्नाला 'या' गोष्टीचा होतो त्रास, 'धुरंधर' अभिनेता म्हणाला- "रात्रीच्या वेळी मला..."
15
Maharashtra Nagar Palika Election Result: अमरावतीत १२ पैकी ४ निकाल हाती, बच्चू कडूंच्या 'प्रहार', भाजपचं काय झालं?
16
क्रूरतेचा कळस! कोंबडा बनवलं, नाक घासायला लावलं...; कचरा वेचणाऱ्या मुलांना अमानुषपणे मारलं
17
धोक्याची घंटा! डिजिटल युगाचा 'सायलेंट किलर'; १८ हजार वृद्ध विसरले घरचा पत्ता, ५०० जणांचा मृत्यू
18
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींवर अष्टविनायक कृपा, सरकारी नोकरी योग; अडकलेले पैसे येतील, धनलाभ!
19
Dharangoan Nagar Parishad Election Result 2025 : शिंदेसेनेचे मंत्री गुलाबराव पाटील यांना होमपीचवर मोठा धक्का; मविआ उमेदवाराचा मोठा विजय
Daily Top 2Weekly Top 5

धुराडी बंद, तरीही ‘एफआरपी’ नाही..!

By admin | Updated: April 10, 2016 00:24 IST

शेतकरी चिंतेत : जिल्ह्यात ७७ लाख टन उसाचे गाळप, ९४ लाख क्विंटल साखरेचे उत्पादन

अशोक डोंबाळे सांगली जिल्ह्यात १६ साखर कारखान्यांनी ७८ लाख ६६ हजार ४८० टन उसाचे गाळप करून ९४ लाख ४८ हजार ५०३ क्विंटल साखरेचे उत्पादन घेतले आहे. बहुतांशी साखर कारखान्यांची धुराडी बंद झाली असून, पहिला हप्ता प्रतिटन २००० ते २२०० रूपयांप्रमाणे शेतकऱ्यांना मिळाला आहे. परंतु, दुसरा हप्ता विश्वास कारखाना वगळता कोणीही दिलेला नाही. साखरेचे दर वाढूनही दुसरा हप्ता देण्यासाठी कारखानदारांकडून विलंब का केला जात आहे, असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. जिल्ह्यातील विश्वास (शिराळा), वसंतदादा (सांगली), हुतात्मा (वाळवा) या तीन साखर कारखान्यांनी विक्रमी उसाचे गाळप केले आहे. राजारामबापू साखराळे शाखेचे २०१४-१५ या वर्षाचे गाळप नऊ लाख सात हजार ४९२ टन होऊन साखर उत्पादन ११ लाख ७४ हजार क्विंटल झाले होते. २०१५-१६ यावर्षी आठ लाख १५ हजार २६९ टन ऊस गाळप होऊन १० लाख ५२ हजार ६०० क्विंटल साखर उत्पादन झाले आहे. मागील गळीत हंगामाच्या तुलनेत यंदा एक लाख टन उसाचे गाळप कमी झाले आहे. उर्वरित साखर कारखान्यांनी मागील हंगामाएवढेच गाळप करून हंगाम बंद केले आहेत. सरासरी उताऱ्यात मात्र अर्धा ते एक टक्का घट झाल्याचे दिसत आहे. उतारा घटण्यामागे उन्हाळ्याच्या तीव्रतेचे कारण सांगितले जाते. जिल्ह्यात १६ साखर कारखान्यांनी २०१४-१५ या वर्षात ७७ लाख ४३ हजार ४३२ टन उसाचे गाळप करून ९४ लाख ७४ हजार ५०३ क्विंटल साखर उत्पादित केली होती. सरासरी साखर उतारा १२़२४ टक्के होता. यावर्षी ७८ लाख ६६ हजार ४८० टन उसाचे गाळप करून ९४ लाख ४८ हजार ५०३ क्विंटल साखरेचे उत्पादन घेतले आहे. सरासरी उतारा १२.१९ टक्केपर्यंत आहे. काही साखर कारखान्यांचे कमी गाळप झाले असले तरी, काही कारखान्यांनी गाळप क्षमता वाढविल्यामुळे, मागील हंगामाएवढीच साखर जिल्ह्यात उपलब्ध झाली आहे. सध्या बहुतांशी साखर कारखान्यांनी धुराडी बंद केली आहेत. पहिला हप्ता कारखान्यांनी दिला आहे. पण, दुसऱ्या हप्त्याची बिले दिली नाहीत. शेतकरी संघटना म्हणतात, कायद्यानुसार एफआरपीचे बिल ऊस गाळपास गेल्यापासून चौदा दिवसात मिळाले पाहिजे. प्रत्यक्षात कारखान्यांनी हंगाम बंद केले तरीही, विश्वास कारखाना वगळता कुणीही दुसरा हप्ता दिलेला नाही. विश्वास कारखान्याची एफआरपी प्रतिटन २४८० आहे. त्यानुसार पहिला हप्ता दोन हजाराचा देऊन दुसरा हप्ता ५०० रूपयांचा दिला आहे. वसंतदादा कारखान्याची १९८७ एफआरपी असल्यामुळे त्यांनी प्रतिटन २००० रूपयेप्रमाणे बिल दिले आहे. असे असले तरी, त्यांनी दि. १५ डिसेंबरपासून गाळपास आलेल्या उसाची बिले दिलेली नाहीत. जिल्ह्यातील कारखान्यांचे गाळप व उत्पादित साखर कारखाना ऊस गाळप साखर उतारा वसंतदादा ६३२००० ६७५००० ११.१० राजारामबापू (साखराळे) ८१५२६९ १०५२६०० १२.९० विश्वास ५४७५९० ६४२१३० ११.७५ हुतात्मा ७००००० ९१२५०० १३.१९ माणगंगा १७२६६८ १७७००० १०.३५ महांकाली २५७६४० २६९६३० १०.८३ राजारामबापू (वाटेगाव) ५४०८८६ ६९३२०० १२.८५ सोनहिरा ६९२५६२ ८७२२०६ १२.६२ क्रांती ८४६२२४ १०५६९३० १२.५० सर्वोदय ४४१७७६ ५७५४०० १३.०० मोहनराव शिंदे ४३०४२५ ५१७७०० १२.०० डफळे २७८६४० ३०१५०० १०.८२ यशवंत (गणपती संघ) १६७००० १८०००० १०.७८ केन अ‍ॅग्रो ५५०००० ५८०००० ११़६० उदगिरी शुगर ४२७८०० ५२७७०७ ११.७९ सद्गुरु श्री श्री शुगर ३६६००० ४१५००० ११़०४ एकूण ७८६६४८० ९४४८५०३ १२़२४ (ऊस गाळप मेट्रिक टनात, तर साखर उत्पादन क्विंटलमध्ये आहे)