शहरं
Join us  
Trending Stories
1
केजरीवालांचा शीषमहल, तर रेखा गुप्तांचा 'मायामहल'; ९ लाखांचे टीव्ही, रिनोवेशनसाठी ६० लाखांचे टेंडर
2
विराट-रोहितच्या संदर्भात आली मोठी अपडेट; टीम इंडियाच्या चाहत्यांचा पुन्हा होणार 'मूड ऑफ'
3
होम लोन घेण्याचा विचार करताय? ३ सरकारी बँकांनी कमी केले व्याजदर; पाहा कोणत्या बँकेत मिळतंय स्वस्त कर्ज
4
हृदयद्रावक! खेळताना प्लास्टिकचा बॉल गिळला; दीड वर्षांच्या लेकीचा पालकांसमोर तडफडून मृत्यू
5
"माझा मुलगा मानव ठणठणीत आहे...", मुलाच्या आत्महत्येची खोटी बातमी पसरवणाऱ्यांवर संतापली रेशम टिपणीस
6
मुंबईतील तरुणीवर अलिबागमध्ये बलात्कार, पार्टीनंतर ऑफिसमधील सहकाऱ्यानेच केला घात; पीडितेसोबत काय घडलं?
7
इराणसोबत गेम झाला ...! इस्रायलवरील हल्ले रोखण्यासाठी लढाऊ विमाने, हेलिकॉप्टर पाठविलेली...
8
पालकांनो लक्ष द्या! मुलांच्या शिक्षणासाठी आणि लग्नासाठी 'ही' SIP ठरेल गेम चेंजर!
9
मेळाव्यात कोण कुठे बसणार? कुणाची भाषणं होणार? सगळं ठरलं; दोन्ही ठाकरेंचं १५ मुद्द्यांवर एकमत...
10
SEBI ची मोठी कारवाई, शेअर बाजारात या कंपनीला बंदी; ₹४८४३ कोटींचा नफाही होणार जप्त
11
Viral Video: इस्रायलने इराणवर केलेल्या हल्ल्याचा व्हिडीओ पाहून अंगाचा थरकाप उडेल!
12
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांच्या नातेवाईकांचे एअर इंडियावर गंभीर आरोप, कंपनीनं दिलं असं स्पष्टीकरण
13
Sonam Raghuwanshi : "मला सतत वकिलांचे फोन येताहेत, पण माझी एक अट..."; सोनमच्या भावाने स्पष्टच सांगितलं
14
AI म्हणालं, चूप, तुझं अफेअर उघड करीन! एआय माॅडेलच्या या धमकीनं साऱ्यांनाच धडकी भरली
15
महागाई भत्त्यात ४ टक्क्यांची वाढ होण्याची शक्यता; मोदी सरकार कर्मचाऱ्यांना देऊ शकतं मोठं गिफ्ट
16
टाटांच्या या कंपनीला मोठा धक्का! एका घोषणेने शेअर ९% घसरला, गुंतवणूकदारांचे लाखो कोटी बुडाले!
17
छत्रपती संभाजीनगर हादरलं; काळा गणपती मंदिरासमोर कारने ६ जणांना उडवलं, एकाचा मृत्यू
18
तरुण दिसण्यासाठी भारतीय लाखो रुपये उधळतायेत? ग्लुटाथिओनची किंमत पाहून धक्का बसेल!
19
IND vs ENG: भारताने इंग्लंडच्या 'बॅझबॉल'ची काढली हवा, नवा रेकॉर्ड बनवला; पाकिस्तानला टाकले मागे
20
पंतप्रधान कमलांसह 38 मंत्री, 4 खासदार; PM मोदींच्या स्वागतासाठी पूर्ण मंत्रिमंडळ विमानतळावर दाखल

धुराडी बंद, तरीही ‘एफआरपी’ नाही..!

By admin | Updated: April 10, 2016 00:24 IST

शेतकरी चिंतेत : जिल्ह्यात ७७ लाख टन उसाचे गाळप, ९४ लाख क्विंटल साखरेचे उत्पादन

अशोक डोंबाळे सांगली जिल्ह्यात १६ साखर कारखान्यांनी ७८ लाख ६६ हजार ४८० टन उसाचे गाळप करून ९४ लाख ४८ हजार ५०३ क्विंटल साखरेचे उत्पादन घेतले आहे. बहुतांशी साखर कारखान्यांची धुराडी बंद झाली असून, पहिला हप्ता प्रतिटन २००० ते २२०० रूपयांप्रमाणे शेतकऱ्यांना मिळाला आहे. परंतु, दुसरा हप्ता विश्वास कारखाना वगळता कोणीही दिलेला नाही. साखरेचे दर वाढूनही दुसरा हप्ता देण्यासाठी कारखानदारांकडून विलंब का केला जात आहे, असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. जिल्ह्यातील विश्वास (शिराळा), वसंतदादा (सांगली), हुतात्मा (वाळवा) या तीन साखर कारखान्यांनी विक्रमी उसाचे गाळप केले आहे. राजारामबापू साखराळे शाखेचे २०१४-१५ या वर्षाचे गाळप नऊ लाख सात हजार ४९२ टन होऊन साखर उत्पादन ११ लाख ७४ हजार क्विंटल झाले होते. २०१५-१६ यावर्षी आठ लाख १५ हजार २६९ टन ऊस गाळप होऊन १० लाख ५२ हजार ६०० क्विंटल साखर उत्पादन झाले आहे. मागील गळीत हंगामाच्या तुलनेत यंदा एक लाख टन उसाचे गाळप कमी झाले आहे. उर्वरित साखर कारखान्यांनी मागील हंगामाएवढेच गाळप करून हंगाम बंद केले आहेत. सरासरी उताऱ्यात मात्र अर्धा ते एक टक्का घट झाल्याचे दिसत आहे. उतारा घटण्यामागे उन्हाळ्याच्या तीव्रतेचे कारण सांगितले जाते. जिल्ह्यात १६ साखर कारखान्यांनी २०१४-१५ या वर्षात ७७ लाख ४३ हजार ४३२ टन उसाचे गाळप करून ९४ लाख ७४ हजार ५०३ क्विंटल साखर उत्पादित केली होती. सरासरी साखर उतारा १२़२४ टक्के होता. यावर्षी ७८ लाख ६६ हजार ४८० टन उसाचे गाळप करून ९४ लाख ४८ हजार ५०३ क्विंटल साखरेचे उत्पादन घेतले आहे. सरासरी उतारा १२.१९ टक्केपर्यंत आहे. काही साखर कारखान्यांचे कमी गाळप झाले असले तरी, काही कारखान्यांनी गाळप क्षमता वाढविल्यामुळे, मागील हंगामाएवढीच साखर जिल्ह्यात उपलब्ध झाली आहे. सध्या बहुतांशी साखर कारखान्यांनी धुराडी बंद केली आहेत. पहिला हप्ता कारखान्यांनी दिला आहे. पण, दुसऱ्या हप्त्याची बिले दिली नाहीत. शेतकरी संघटना म्हणतात, कायद्यानुसार एफआरपीचे बिल ऊस गाळपास गेल्यापासून चौदा दिवसात मिळाले पाहिजे. प्रत्यक्षात कारखान्यांनी हंगाम बंद केले तरीही, विश्वास कारखाना वगळता कुणीही दुसरा हप्ता दिलेला नाही. विश्वास कारखान्याची एफआरपी प्रतिटन २४८० आहे. त्यानुसार पहिला हप्ता दोन हजाराचा देऊन दुसरा हप्ता ५०० रूपयांचा दिला आहे. वसंतदादा कारखान्याची १९८७ एफआरपी असल्यामुळे त्यांनी प्रतिटन २००० रूपयेप्रमाणे बिल दिले आहे. असे असले तरी, त्यांनी दि. १५ डिसेंबरपासून गाळपास आलेल्या उसाची बिले दिलेली नाहीत. जिल्ह्यातील कारखान्यांचे गाळप व उत्पादित साखर कारखाना ऊस गाळप साखर उतारा वसंतदादा ६३२००० ६७५००० ११.१० राजारामबापू (साखराळे) ८१५२६९ १०५२६०० १२.९० विश्वास ५४७५९० ६४२१३० ११.७५ हुतात्मा ७००००० ९१२५०० १३.१९ माणगंगा १७२६६८ १७७००० १०.३५ महांकाली २५७६४० २६९६३० १०.८३ राजारामबापू (वाटेगाव) ५४०८८६ ६९३२०० १२.८५ सोनहिरा ६९२५६२ ८७२२०६ १२.६२ क्रांती ८४६२२४ १०५६९३० १२.५० सर्वोदय ४४१७७६ ५७५४०० १३.०० मोहनराव शिंदे ४३०४२५ ५१७७०० १२.०० डफळे २७८६४० ३०१५०० १०.८२ यशवंत (गणपती संघ) १६७००० १८०००० १०.७८ केन अ‍ॅग्रो ५५०००० ५८०००० ११़६० उदगिरी शुगर ४२७८०० ५२७७०७ ११.७९ सद्गुरु श्री श्री शुगर ३६६००० ४१५००० ११़०४ एकूण ७८६६४८० ९४४८५०३ १२़२४ (ऊस गाळप मेट्रिक टनात, तर साखर उत्पादन क्विंटलमध्ये आहे)