शहरं
Join us  
Trending Stories
1
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
2
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात
3
बांगलादेश, नेपाळनंतर आता पाकिस्तानात Gen Z आंदोलन पेटले; शहबाज शरीफ यांच्या सत्तेला हादरा?
4
पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही
5
अक्षरच्या फिरकीची जादू, वॉशिंग्टनच्या ८ चेंडूत ३ विकेट्स! कांगारुंची शिकार करत टीम इंडियाची मालिकेत आघाडी
6
Babar Azam: बाबर आझमचं करिअर धोक्यात? वयाच्या ३१ व्या वर्षीच निवृत्त होण्याची येऊ शकते वेळ!
7
Video: ऑन कॅमेरा उपमुख्यमंत्री अन् आमदारात खडाजंगी; एकमेकांवर वाहिली शिव्यांची लाखोळी...
8
इकडे विरोधक टीका करतायत; तिकडे आफ्रिकेचा निवडणूक आयोग पारदर्शक प्रणाली पाहण्यासाठी खासदारांना पाठविणार
9
Mumbai: 'मुंबई वन' अ‍ॅप वापरता? 'असं' काढा तिकीट, महिन्यात सहा वेळा वाचेल २० टक्के रक्कम!
10
"पार्थ पवारांकडून खुलासा घेणे गरजेचे; उद्योग विभागाचा या प्रकरणाशी संबंध नाही"; शिंदे गटाच्या मंत्र्यांनी स्पष्टच सांगितले
11
"...तर भाजपा नेत्यांना झाडाला बांधून ठेवा"; TMC आमदाराच्या विधानाने राजकारण तापलं
12
जीएसटी कमी पडला की काय...! टाटा, मारुती, होंडापासून सर्व कंपन्यांनी इअर एंड डिस्काऊंट सुरु केले...
13
साप तरुणाला चावला, रागाच्याभरात तरुणानेही सापाचा चावा घेतला! प्रकरण ऐकून डॉक्टरही हैराण
14
सुरेश रैना, शिखर धवन यांना ईडीचा झटका; कोट्यवधी रुपयांची संपत्ती जप्त, कोणत्या मालमत्तांचा समावेश?
15
१ कोटींचं घर अवघ्या ११ लाखांत, EWS कोट्यातील ७२ जणांना लॉटरी; योगी आदित्यनाथ यांनी कमाल
16
बाजार 'लाल' रंगात बंद! निफ्टी २५,५२० च्या खाली, IT वगळता सर्वच क्षेत्रांत दबाव; 'या' कारणांचा झाला परिणाम
17
Ravi Shastri On Shubman Gill : शुभमन गिल आधीच होतोय ट्रोल, त्यात शास्त्रींच्या कमेंटची भर, म्हणाले...
18
लॅपटॉपच्या स्क्रीनवर धूळ बसली आहे? टिश्यू पेपर की कापड कशाने साफ कराल? 'या' टिप्स येतील कामी
19
सैनिकी शाळेत १२ वर्षीय मुलाचा गूढ मृत्यू,'त्या' बंद दारामागे काय घडले?; बहिणीचा गंभीर आरोप
20
सोशल मीडियाच्या ट्रॉलिंगचा बळी; माफी मागितली तरी छळ थांबेना, तरुणाने अखेर जीवन संपवले

रोजगार बुडवून कचरा वेचक महिलांकडून स्वच्छता...

By admin | Updated: May 7, 2017 23:52 IST

‘आस्था’चा उपक्रम : महिलांचे कौतुक, मोती तळ्याची श्वेता सिंघल यांच्याकडून पाहणी

लोकमत न्यूज नेटवर्कसातारा : स्वत: घाणीत जाऊन कचरा डेपो स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न करणाऱ्या कचरा वेचक महिलांनी रविवारी पुन्हा एकदा आदर्श निर्माण केला. दिवसाचा रोजगार बुडवून सुमारे दहा ते बारा कचरा वेचक महिलांनी शहरातील मोती तळ्याची स्वच्छता केली. त्यांच्या या कामाचे कौतुक जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांनी त्यांना भेटून केले.याबाबत अधिक माहिती अशी, येथील आस्था सामाजिक संस्था व सर्व कचरा वेचक श्रमिक संघ यांच्या वतीने सातारा शहरातील मध्यवर्ती ठिकाणच्या ऐतिहासिक मोती तळे गेल्या काही दिवसांपासून शेवाळे होते. परिसरातील नागरिकांनी या तळ्यात घाण टाकल्याने तळ्यावर शेवाळे चढले होते. हे शेवाळे इतके वाढले होते की, त्याखाली पाणी असल्याच्या खुणाच नष्ट झाल्या होत्या. साताऱ्यातील अनेकांनी या तळ्याची दुर्दशा पाहून खिन्न मन केले. पण त्यापुढे काही कोणाची पावले उठली नाहीत. पण शहराबाहेर राहणाऱ्या आणि अभावानेच या तळ्याच्या आसपास फिरकणाऱ्या या महिलांनी शहराप्रती आपले कर्तव्य दाखवत मोती तळ्याची स्वच्छता केली. याची पाहणी साताऱ्याच्या जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांनी केली. यावेळी त्यांच्यासमवेत तहसीलदार नीलप्रसाद चव्हाण हेही उपस्थित होते. ‘आस्था’ संस्थेचे काम आदर्शवत असून, आपण व कचरा वेचक श्रमिक संघास यासारख्या उपक्रमांना आवश्यक ते सहकार्य शासनाच्या वतीने करण्याचे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले. सकाळी ७ ते ११ वाजेपर्यंत मोती तळे परिसराची स्वच्छता मोहीम सुरू होती. यामध्ये तळ्यातील प्लास्टिक पिशव्या व इतर कचरा गोळा केला. प्राथमिक स्वरुपातील कचरा काढला असून, उर्वरित टप्प्यातील कामही करून संपूर्ण तळे कचरा मुक्त करण्याचा संकल्प असल्याची माहिती ‘आस्था’चे विजयकुमार निंबाळकर यांनी दिली. या उपक्रमास सातारा नगरपरिषदेचे बांधकाम सभापती किशोर शिंदे यांनीही भेट देऊन सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी म्युन्सिपल कर्मचारी संघटनेचे शिवाजी पवार, ‘आस्था’चे सुजीत शेडगे, जनार्दन निपाणे, हेमंत दरेकर, सुनील भोसले, गोरख निपाणे, मंगेश लावंड, मनोज निपाणे, सुधीर शेडगे, विशाल दाभाडे, कन्हैयालाल राजपुरोहित, कचरा वेचक संघाचे अध्यक्ष प्रकाश भिसे, कचरा वेचक संघाच्या महिला सदस्य उपस्थित होते. मोती तळ्यात नारळांचा खचघरातील विविध धार्मिक कार्यक्रम उरकल्यानंतर निर्माल्य ‘वाहत्या पाण्यात’ टाका असे अनेक पूजा करणारे गुरुजी सांगतात. सातारा शहरात राहणाऱ्यांना ओढ्याशिवाय वाहते पाणी मिळत नाही आणि ओढ्यात निर्माल्य टाकणं म्हणजे पाप असे समजून सोयीस्करपणे ‘साठलेल्या पाण्यात’ अर्थात बंदिस्त तलावात निर्माल्य टाकतात. फक्त निर्माल्य पाण्यात टाकले तर किंबहुना त्याचे विघटन पाण्यात होण्याची शक्यता असते. मात्र, प्लास्टिकच्या पिशवीसह टाकलेल्या निर्माल्याचे विघटन होणे अवघडच! त्यातच काही महाभागांनी तर चक्क अख्खे नारळचं या पाण्यात टाकले आहेत. प्लास्टिकच्या पिशव्या आणि नारळांचा खच या तलावातून काढण्यात आला.