शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरे-राज ठाकरेंची युती झाली! मुंबई पालिकेआधी 'या' निवडणुका एकत्र लढवणार...
2
कोल्हापुरकरांचा नादच खुळा! वनताराचे पथक दुसऱ्यांदा दाखल, महास्वामींची भेट घेणार
3
यंदा चिंचपोकळीच्या ‘चिंतामणी’चं आगमन कधी? गणेशभक्तांनो 'ही' तारीख ठेवा लक्षात!
4
संघाचा शतकमहोत्सव थाटात साजरा होणार, कार्यक्रमांची रेलचेल, देशोदेशीच्या दूतावासांना निमंत्रण, पण...
5
Dharali Cloud Burst: उरले फक्त दगड आणि गाळ! ढगफुटीनंतरचा धरालीतील पहिला ड्रोन व्हिडीओ
6
गलवानमधील संघर्षानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच चीनच्या दौऱ्यावर जाणार, एससीओ संमेलनात सहभागी होणार
7
मोबाईलमध्ये नको ते व्हिडिओ सापडले, भीतीपोटी पतीला मारले; जीव वाचवण्यासाठी प्रियकराला अडकवले, पण...
8
विकेटची गॅरेंटी देणारा बुमराहच ठरतोय टीम इंडियासाठी 'पनौती'? भयावह आकडेवारीवर सचिन तेंडुलकर म्हणाला...
9
निर्वस्त्र करुन मारहाण, एक्स गर्लफ्रेंडसोबत संबंध; मर्चंट नेव्ही अधिकाऱ्याच्या पत्नीने संपवले आयुष्य
10
मोहम्मद सिराजचा मोठा पराक्रम, गोलंदाज असूनही मोडला धोनीचा रेकॉर्ड!
11
कधी भूस्खलन तर कधी ढगफुटी; नैसर्गिक की मानवी चूक? उत्तराखंड विनाशाच्या वाटेवर...
12
Raksha Bandhan 2025: यंदाही रक्षाबंधनाला भद्राचे सावट? पंचक सुरु होण्याआधी 'या' मुहूर्तावर बांधा राखी!
13
सुप्रीम कोर्टाचा निकाल विरोधात जाण्याची भीती?; शिंदेंच्या दिल्लीवारीबाबत असीम सरोदेंचा मोठा दावा
14
लालू यादवांच्या मुलाची बिहार निवडणुकीसाठी अजब खेळी, अभिनेत्री दिशा पटानीशी कनेक्शन काय?
15
२५% ने बधला नाही, ट्रम्प भारताच्या वर्मावर घाव घालण्याच्या तयारीत; 'या' सेक्टरवर २५०% टॅरिफची धमकी
16
अभिमानास्पद! मित्रांनी वडिलांची उडवली खिल्ली, आईने केला सपोर्ट; लेक गाजवतेय फुटबॉलचं मैदान
17
"महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका VVPAT मशिनवरच घ्यावात’’, काँग्रेसची मागणी
18
मतदार यादीतून वगळलेले ६५ लाख कोण? तीन दिवसांत सादर करा; सर्वोच्च न्यायालयाचा निवडणूक आयोगाला आदेश
19
महेश मांजरेकरांच्या 'वेडात मराठे वीर दौडले सात' सिनेमाचं काय झालं? मुख्य अभिनेता म्हणाला...
20
मच्छर घुसला की काम तमाम...! घरासाठी लेझर गायडेड एअर डिफेन्स सिस्टीम आली; दिसताच आडवा करणार...

स्वच्छतेचा डंका पिटणार्‍या महापालिकेतच अस्वच्छता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 22, 2017 00:22 IST

सांगली : स्वच्छतेचा, हागणदारी मुक्तीचा डंका देशभर पिटणाºया सांगली , मिरज, कुपवाड महापालिकेचा अस्वच्छ चेहरा समोर आला आहे. महापालिकेच्या मुख्यालयातच महिलांच्या स्वच्छतागृहाची प्रचंड दुरवस्था झाली असून, शौचालय दुरुस्तीसाठी लाखो रुपयांच्या खर्चाच्या कामाची फाईल गेली कुठे?, असा प्रश्न निर्माण झाला आहे.महापालिकेच्या मुख्यालयातच महिलांच्या स्वच्छतागृहाची दुरवस्था झाली आहे. सर्वत्र अस्वच्छता, खिडक्यांच्या काचा ...

सांगली : स्वच्छतेचा, हागणदारी मुक्तीचा डंका देशभर पिटणाºया सांगली, मिरज, कुपवाड महापालिकेचा अस्वच्छ चेहरा समोर आला आहे. महापालिकेच्या मुख्यालयातच महिलांच्या स्वच्छतागृहाची प्रचंड दुरवस्था झाली असून, शौचालय दुरुस्तीसाठी लाखो रुपयांच्या खर्चाच्या कामाची फाईल गेली कुठे?, असा प्रश्न निर्माण झाला आहे.महापालिकेच्या मुख्यालयातच महिलांच्या स्वच्छतागृहाची दुरवस्था झाली आहे. सर्वत्र अस्वच्छता, खिडक्यांच्या काचा फुटलेल्या, समोरच न्यायालयाची इमारत, अशा स्थितीतील स्वच्छतागृहामुळे महिलांची गैरसोय होत आहे. महापालिका आयुक्तांनी हागणदारीमुक्ती अभियान राबविले. यासाठी रात्रीचा दिवस करुन लोकांत जागृती केली. ४४ ठिकाणी सार्वजनिक स्वच्छतागृहे उभारण्यासाठी शासनाकडून निधीही मंजूर झाला. यासाठी नगरसेविका रोहिणी पाटील यांच्यासह काही महिला सदस्यांनी पुढाकार घेतला. बाजारपेठा, गर्दीच्या ठिकाणी महिलांसाठी स्वच्छतागृहे उभारण्याची निविदा प्रक्रियाही पूर्ण केली आहे. महिला स्वच्छतागृहे लवकरच उभी केली जाणार असल्याचे आयुक्त रवींद्र खेबूडकर वारंवार सांगत आहेत.मात्र खुद्द महापालिकेतील स्वच्छतागृहाच्या दुरवस्थेबाबत सर्वांचेच दुर्लक्ष झाले आहे. याबाबत महिला सदस्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. महापालिकेत महिलांसाठी एक स्वतंत्र स्वच्छतागृह आहे. त्याठिकाणी फारसे कुणी जात नाही. महिला व बालकल्याण समितीच्या कार्यालयातील स्वच्छतागृहाची दुरवस्था झाली आहे. या कार्यालयात अनेक महिला सदस्या, महिला कर्मचारी कामासाठी येत असतात. त्या या स्वच्छतागृहाचा वापर करीत असतात. पण दुरवस्थेमुळे त्यांची गैरसोय होत आहे. याच्या दुरुस्तीसाठी तत्कालिन नगरअभियंता आर. पी. जाधव यांनी सुमारे दीड-दोन लाखाची फाईल बनवली होती. त्याबाबत पुढे काय झाले, याची माहिती कोणालाही नाही.पाण्याची सोय नाही : नागरिकांच्या तक्रारीमहापालिकेतील आयुक्त कार्यालय सोडले, तर एकाही कार्यालयात शुद्ध पाण्याची सोय नाही. महापौरांच्या कार्यालयात शुद्ध पाण्याची यंत्रणा होती, पण ती बंद पडली. कामासाठी दररोज नागरिक महापालिकेत येत असतात. त्यांना पिण्यासाठीही शुध्द पाणी दिले जात नाही. टाकीतील पाणी पाजले जाते. मिरजेतील पदाधिकारी, अधिकारी सांगलीत मुख्यालयात येताना मिनरल पाण्याच्या बाटल्या घेऊन येताना दिसतात. महापालिकेत प्रत्येक कार्यालयात किंवा मध्यभागी शुद्ध पाण्याची यंत्रणा बसवावी, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.