शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपाच्या सांगण्यावरून शिवसेना चालणार का?; संतप्त शिंदेसेनेच्या कार्यकर्त्यांचं पुण्यात आंदोलन
2
"ड्रग्ज... शिंदे... माजी पोलीस अधिकारी..., राज्याचं राजकारण नशेबाज झालंय!"; राऊतांचा फडणवीसांवर निशाणा
3
पुन्हा राज्यसभेवर संधी मिळेल का? मोदी सरकारमधील सहा मंत्र्यांची 2026 मध्ये ‘अग्निपरीक्षा’
4
सरकारी कर्मचारी दांपत्यांना दिलासा! पती-पत्नीची एकाच शहरात नियुक्ती करण्याचे केंद्राचे निर्देश
5
Accident : भाड्याने थार घेतली, गर्लफ्रेंडला भेटायला निघाला; समोर कुटुंब दिसताच गाडी पळवू लागला अन्... 
6
Ola Electric ला सरकारकडून मिळणार ३६६.७८ कोटी रुपयांचा मोठा दिलासा; शेअरमध्ये जोरदार तेजी, जाणून घ्या
7
क्रिकेटमधील उल्लेखनीय कामगिरीची दखल; वैभव सूर्यवंशीचा राष्ट्रपतींच्या हस्ते राष्ट्रीय बाल पुरस्काराने गौरव
8
सर्व (पक्ष) समावेशक भाजपा नीती! काँग्रेस रिकामी, उद्धवसेनेचे घर खाली, मनसेचा कणा मोडला
9
कोंबडी आधी की अंडं? शतकानुशतके पडलेल्या या जुन्या प्रश्नाचं उत्तर अखेर वैज्ञानिकांना सापडलं
10
तुम्ही सुद्धा 'हर्बल टी' पिता का? FSSAI नं कंपन्यांना दिला इशारा, नक्की प्रकरण काय?
11
Girish Mahajan : भाजपामध्ये प्रवेशाचे 'महाभारत'; मंत्री गिरीश महाजन यांना घेराव; निष्ठावंतांवरच अन्याय का?
12
गोपनीय बैठका अन् भाजपाच्या 'एकहाती' सत्तेला खिंडार पाडण्याची रणनीती; जळगावात 'कणकवली पॅटर्न'?
13
Viral : टेक्नोलॉजिया! अवघ्या एका विटेत पठ्ठ्याने तयार केला रूम हीटर; ५० रुपयांच्या खर्चात थंडी केली गायब
14
ऑनलाइन सेवा विस्कळीत होणार? 'या' ९ मागण्यांसाठी डिलिव्हरी बॉईजचे देशव्यापी आंदोलन
15
शिंदेसेनेकडून ४२ जागांचा प्रस्ताव, जागा वाटपाचा तिढा सुटेना; तीन मंत्र्यांसह नेत्यांची जंबो बैठक
16
"मला खूप दुखतंय...", उपचारांसाठी ८ तास वेटिंग; कॅनडात वडिलांसमोर भारतीयाचा तडफडून मृत्यू
17
Travel : 'या' देशात मुस्लिम  बहुसंख्य, पण नोटांवर आहे गणपती! भारतातून १००००० रुपये घेऊन जाल तर कोट्यधीश व्हाल
18
महापालिका निवडणूक: मतांचे विभाजन कोणाच्या पथ्यावर? काँग्रेसचे गणित बिघडण्याची शक्यता! 
19
Shyam Dhani Industries IPO: मसाला बनवणाऱ्या कंपनीनं मागितलेले ₹३८ कोटी, गुंतवणूकदारांनी झोळीत टाकले ₹२५,००० कोटी; पाहा डिटेल्स
20
कंपनीच्या CEO चा कारनामा, आयटी मॅनेजरसोबत गँगरेप; कारच्या डॅशकॅम सगळं रेकॉर्ड झालं, मग...
Daily Top 2Weekly Top 5

वाळवा-शिराळ्यामध्ये दावे-प्रतिदाव्यांना ऊत-- : लोकसभा निवडणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2019 00:24 IST

हातकणंगले लोकसभा मतदार संघात महाआघाडीतील ‘स्वाभिमानी’चे उमेदवार राजू शेट्टी यांच्याविरोधात शिवसेनेचे धैर्यशील माने यांच्या उमेदवारीने रंगत वाढली होती. आता या दोन्ही उमेदवारांच्या कार्यकर्त्यांकडून विजयाचे दावे-प्रतिदावे सुरू झाले

ठळक मुद्देकार्यकर्त्यांत चर्चा; मताधिक्याबद्दल संभ्रमावस्था

- अशोक पाटील ।इस्लामपूर : हातकणंगले लोकसभा मतदार संघात महाआघाडीतील ‘स्वाभिमानी’चे उमेदवार राजू शेट्टी यांच्याविरोधात शिवसेनेचे धैर्यशील माने यांच्या उमेदवारीने रंगत वाढली होती. आता या दोन्ही उमेदवारांच्या कार्यकर्त्यांकडून विजयाचे दावे-प्रतिदावे सुरू झाले आहेत.

वाळवा-शिराळ्यात स्वाभिमानी संघटनेचे खासदार राजू शेट्टी यांचे प्रमुख कार्यकर्ते असलेल्या सयाजी मोरे, भागवत जाधव यांनी, शेट्टी किमान लाखाहून अधिक मतांनी विजयी होतील, असा दावा केला आहे. दुसरीकडे महायुतीच्या बाजूने दावा करताना कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी दोघांचा दावा खोडून काढत, धैर्यशील माने किमान ७५ हजार मतांनी विजयी होतील, असे सांगितले.

खोत यांच्याकडे मंत्रीपद असले तरी, त्यांच्याकडे कार्यकर्त्यांचा अभाव आहे. त्यांनी शिवसेनेचे आनंदराव पवार आणि भाजपचे विक्रम पाटील यांची मदत घेतली आहे. भाजपमध्ये दुफळी असून विक्रम पाटील व भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष तथा नगराध्यक्ष निशिकांत पाटील यांच्यात मतभिन्नता आहे. मात्र त्या दोघांंनीही माने हेच विजयी होतील, असे सांगितले आहे. शिराळ्याचे आमदार शिवाजीराव नाईक यांच्यासह भाजप कार्यकर्त्यांनी जरी माने यांच्या विजयाचा दावा केला असला तरी, त्यामध्ये ठोसपणा दिसून येत नाही. महाडिक व हुतात्मा गटाचीही भूमिका तशीच आहे. त्यांच्यातील काही कार्यकर्ते आणि एकाच घरातील दोन नेते शेट्टी आणि माने या दोघांच्याही विजयाचा दावा करत आहेत.

ज्यांनी खासदार शेट्टींच्या फंडातून स्वत:च्या मिलसमोरील रस्ता करुन घेतला, त्या पवार बंधूंची भूमिका मात्र गुलदस्त्यात आहे. हे काँग्रेसचे पाईक म्हणवून घेत असले तरी, शेट्टींच्या प्रचारात ते कोठेही दिसले नाहीत.वाळवा-शिराळ्यात राष्ट्रवादीची ताकद मोठी आहे. त्यामुळे या दोन्ही तालुक्यात आ. जयंत पाटील हे राजू शेट्टी यांना चांगले मताधिक्य मिळवून देतील, असा विश्वास पहिल्यापासूनच व्यक्त होत होता. परंतु मतदानानंतर मात्र या चर्चेला पूर्णविराम मिळाला असून, ५०:५० टक्के मतदान होईल, असे राष्ट्रवादीचे काही कार्यकर्ते बोलू लागले आहेत.पैजा लागल्या : चर्चा रंगलीआमदार जयंत पाटील यांना विधानसभेचे वेध लागले असून त्यांनी जनसंपर्क वाढवला आहे, तर खासदार राजू शेट्टी हे मतदार संघात भेटीगाठी घेऊन आभार मानत आहेत. परंतु स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि शिवसेना यांच्यातील लोकसभा निवडणुकीच्या संघर्षाचा निकाल काय लागणार, याची गोळाबेरीज करण्यासाठी दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये मोठ्या रकमेच्या पैजा लागल्या आहेत. त्यामुळे शेट्टी की माने, यापैकी कोण निवडून येणार, याची चर्चा रंगली आहे.

टॅग्स :ElectionनिवडणूकSangliसांगलीPoliticsराजकारण