शहरं
Join us  
Trending Stories
1
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
2
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
3
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
4
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
5
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
6
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
7
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
8
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
9
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
10
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
11
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
12
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
13
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
14
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
15
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
16
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
17
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
18
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
19
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
20
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?

वाळवा-शिराळ्यामध्ये दावे-प्रतिदाव्यांना ऊत-- : लोकसभा निवडणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2019 00:24 IST

हातकणंगले लोकसभा मतदार संघात महाआघाडीतील ‘स्वाभिमानी’चे उमेदवार राजू शेट्टी यांच्याविरोधात शिवसेनेचे धैर्यशील माने यांच्या उमेदवारीने रंगत वाढली होती. आता या दोन्ही उमेदवारांच्या कार्यकर्त्यांकडून विजयाचे दावे-प्रतिदावे सुरू झाले

ठळक मुद्देकार्यकर्त्यांत चर्चा; मताधिक्याबद्दल संभ्रमावस्था

- अशोक पाटील ।इस्लामपूर : हातकणंगले लोकसभा मतदार संघात महाआघाडीतील ‘स्वाभिमानी’चे उमेदवार राजू शेट्टी यांच्याविरोधात शिवसेनेचे धैर्यशील माने यांच्या उमेदवारीने रंगत वाढली होती. आता या दोन्ही उमेदवारांच्या कार्यकर्त्यांकडून विजयाचे दावे-प्रतिदावे सुरू झाले आहेत.

वाळवा-शिराळ्यात स्वाभिमानी संघटनेचे खासदार राजू शेट्टी यांचे प्रमुख कार्यकर्ते असलेल्या सयाजी मोरे, भागवत जाधव यांनी, शेट्टी किमान लाखाहून अधिक मतांनी विजयी होतील, असा दावा केला आहे. दुसरीकडे महायुतीच्या बाजूने दावा करताना कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी दोघांचा दावा खोडून काढत, धैर्यशील माने किमान ७५ हजार मतांनी विजयी होतील, असे सांगितले.

खोत यांच्याकडे मंत्रीपद असले तरी, त्यांच्याकडे कार्यकर्त्यांचा अभाव आहे. त्यांनी शिवसेनेचे आनंदराव पवार आणि भाजपचे विक्रम पाटील यांची मदत घेतली आहे. भाजपमध्ये दुफळी असून विक्रम पाटील व भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष तथा नगराध्यक्ष निशिकांत पाटील यांच्यात मतभिन्नता आहे. मात्र त्या दोघांंनीही माने हेच विजयी होतील, असे सांगितले आहे. शिराळ्याचे आमदार शिवाजीराव नाईक यांच्यासह भाजप कार्यकर्त्यांनी जरी माने यांच्या विजयाचा दावा केला असला तरी, त्यामध्ये ठोसपणा दिसून येत नाही. महाडिक व हुतात्मा गटाचीही भूमिका तशीच आहे. त्यांच्यातील काही कार्यकर्ते आणि एकाच घरातील दोन नेते शेट्टी आणि माने या दोघांच्याही विजयाचा दावा करत आहेत.

ज्यांनी खासदार शेट्टींच्या फंडातून स्वत:च्या मिलसमोरील रस्ता करुन घेतला, त्या पवार बंधूंची भूमिका मात्र गुलदस्त्यात आहे. हे काँग्रेसचे पाईक म्हणवून घेत असले तरी, शेट्टींच्या प्रचारात ते कोठेही दिसले नाहीत.वाळवा-शिराळ्यात राष्ट्रवादीची ताकद मोठी आहे. त्यामुळे या दोन्ही तालुक्यात आ. जयंत पाटील हे राजू शेट्टी यांना चांगले मताधिक्य मिळवून देतील, असा विश्वास पहिल्यापासूनच व्यक्त होत होता. परंतु मतदानानंतर मात्र या चर्चेला पूर्णविराम मिळाला असून, ५०:५० टक्के मतदान होईल, असे राष्ट्रवादीचे काही कार्यकर्ते बोलू लागले आहेत.पैजा लागल्या : चर्चा रंगलीआमदार जयंत पाटील यांना विधानसभेचे वेध लागले असून त्यांनी जनसंपर्क वाढवला आहे, तर खासदार राजू शेट्टी हे मतदार संघात भेटीगाठी घेऊन आभार मानत आहेत. परंतु स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि शिवसेना यांच्यातील लोकसभा निवडणुकीच्या संघर्षाचा निकाल काय लागणार, याची गोळाबेरीज करण्यासाठी दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये मोठ्या रकमेच्या पैजा लागल्या आहेत. त्यामुळे शेट्टी की माने, यापैकी कोण निवडून येणार, याची चर्चा रंगली आहे.

टॅग्स :ElectionनिवडणूकSangliसांगलीPoliticsराजकारण