शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

नागरी वस्तीतील आरक्षणे वगळणार..!

By admin | Updated: October 28, 2015 00:01 IST

महापालिकेला दिलासा : ‘नगरविकास’कडून ३० रोजी म्हणणे मांडण्याचे आदेश

सांगली : महापालिकेच्या विकास आराखड्यात नागरी वस्तीत आरक्षणे टाकण्यात आली असून, ती अन्यायकारक असल्याचा अभिप्राय सहायक संचालक, पुणे यांनी राज्य शासनाकडे पाठविला आहे. याबाबत नगरविकास विभागाने ३० आॅक्टोबर रोजी महापालिकेला म्हणणे मांडण्याचे आदेश दिले आहेत. या प्रक्रियेमुळे नागरी वस्तीतील आरक्षणे उठविण्याची शक्यता वर्तविली जात आहे. महापालिकेचा विकास आराखडा गेली तेरा वर्षे रखडला होता. दोन वर्षापूर्वी ७५ टक्के आराखडा जाहीर झाला. त्यावर तीन महिन्यापूर्वी शासनाने नागरिकांकडून हरकती व सूचना मागविल्या होत्या. पुणे येथील नगररचना विभागाच्या सहायक संचालकांच्या कार्यालयात सुनावणी झाली. आराखड्यात १९३ आरक्षणे ठेवण्यात आली आहेत. त्यात क्रीडांगण, शाळा, शॉपिंग सेंटर यांचा प्रामुख्याने समावेश आहे. यातील ७७ आरक्षणे नागरी वस्तीवर आहेत. आराखड्यातील आरक्षणावरून दहा वर्षे पालिकेचे राजकारण ढवळून निघाले होते. माजी महापौर किशोर जामदार यांच्या कार्यकालात ही आरक्षणे उठविण्यात आली होती. पण नंतर सत्तेत आलेल्या विकास महाआघाडीने ठराव रद्द करून आरक्षणे कायम ठेवली. शासनानेही आरक्षणे कायम करीत आराखडा प्रसिद्ध केला होता. पुणे येथील सुनावणीदरम्यान नागरिकांनी रहिवासी क्षेत्रावर आरक्षणे टाकण्यात आल्यास हरकत घेतली. त्यानंतर सहायक संचालकांनी सांगलीत येऊन नागरिकांच्या तक्रारी ऐकून घेतल्या. काही आरक्षणे नागरिकांवर अन्याय करणारी असून, ती नागरी वस्तीवर टाकण्यात आल्याची वस्तुस्थिती त्यांनीही मान्य केल्याचे सांगण्यात येत आहे. आरक्षण जागेवर मोठ्या प्रमाणात बांधकामे झाली आहेत. काही ठिकाणी गरज नसताना रस्त्याची रुंदी वाढविली आहे. नऊ मीटरचा रस्ता पुरेसा असताना तिथे २४ मीटर रस्त्याचे आरक्षण आहे. त्यामुळे अनेक घरे बाधित होत आहेत, अशी शिफारस शासनाच्या नगरविकास विभागाकडे केली आहे. त्यावर नगरविकास विभागाने महापालिकेला ३० रोजी म्हणणे मांडण्याचे आदेश दिले आहेत. पालिकेचे म्हणणे आल्यानंतर अंतिम आराखडा प्रसिद्ध होणार आहे. (प्रतिनिधी)आराखडा अजून लांबचमहापालिकेचा विकास आराखडा सुमारे तेरा वर्षे रखडला आहे. दोन वर्षापूर्वी ७५ टक्के आराखडा जाहीर झाला. तीन महिन्यापूर्वी शासनाने नागरिकांकडून हरकती व सूचना मागविल्या. आराखड्यात १९३ आरक्षणे ठेवण्यात आली आहेत. यातील ७७ आरक्षणे नागरी वस्तीवर आहेत. आरक्षण जागेवर मोठ्या प्रमाणात बांधकामे झाली आहेत. ३० रोजी पालिकेचे म्हणणे आल्यानंतर अंतिम आराखडा प्रसिद्ध होण्याची शक्यता आहे.