शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरेंच्या मताला दिल्लीत वजन, मागणीची तत्काळ दखल; इंडिया आघाडीची होणार लवकरच बैठक
2
डोनाल्ड ट्रम्प यांच्या आक्रामक टॅरिफ धोरणापुढे 'ड्रॅगन' फुस्स...; अमेरिकेची चांदी, झाला अब्जावधी डॉलर्सचा नफा
3
CM फडणवीसांनी उद्धव ठाकरेंना दिलेल्या ऑफरवर संजय राऊत थेट बोलले, म्हणाले, “तुम्ही आधी...”
4
नर्स निमिषा प्रियाची फाशी तात्पुरती स्थगित, पण मृत तलालचा भाऊ ऐकेचना! आता म्हणाला...
5
"राज्यात गुटखाबंदी असल्याचे म्हणणं हास्यास्पद"; भाजप आमदाराने सरकारलाच घेरलं; म्हणाले, 'कुठेही जा...'
6
"बाळासाहेब म्हणाले, उद्या मी शिवसेना सोडली तर...?"; निष्ठेचा मुद्दा, अंबादास दानवेंनी सांगितला २००४ मधील किस्सा
7
इस्रायलचा सीरियावर हल्ला; Baba Vanga चे भाकित खरे ठरले, तिसऱ्या महायुद्धाची चाहुल..?
8
Water Cut: महत्त्वाची बातमी! मुंबईत १२ तास आणि नवी मुंबईत १८ तास पाणीपुरवठा राहणार बंद
9
एअर इंडियाच्या कॅप्टननेच इंधन स्वीच बंद केला; को-पायलटचा कापरा आवाज...; अमेरिकी रिपोर्टमध्ये मोठा दावा
10
Video - ना हेलिकॉप्टर, ना रुग्णवाहिका, विद्यार्थ्यांनी लढवली शक्कल; शिक्षिकेसाठी केलं असं काही...
11
सावधान! खोटे टॅक्स क्लेम केलेल्यांना आयकरच्या AI ने पकडले; भरावा लागेल २००% दंड आणि ७ वर्षांपर्यंत जेल!
12
माता न तू वैरिणी! प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत पाहिलं; ६ वर्षांच्या चिमुकलीला आईनंच संपवलं
13
Ritual: तीर्थक्षेत्री गेल्यावर अचानक पाळी आली तर दर्शन घ्यावे की नाही? प्रेमानंद महाराजांनी केला खुलासा!
14
इंदूर सलग आठव्यांदा ठरलं भारतातील सर्वात स्वच्छ शहर, महाराष्ट्रातील या शहरानं पटकावला तिसरा क्रमांक  
15
"तुझे पाय कापून टाकू, बघू तुला योगी वाचवतात की मोदी..."; छांगुर गँग द्यायची धमक्या, महिलांनी केला पर्दाफाश
16
“ST महामंडळात काय चाललेय हे मलाच माहिती नाही”; खुद्द प्रताप सरनाईक उद्विग्न, प्रकरण काय?
17
"आता हाच माझा पती"; फेसबुकवर झाली मैत्री, २० वर्षांच्या मुलासोबत २ मुलांच्या आईने थाटला संसार! पतीला कळलं अन्...
18
'पोलिसांची परवानगी घेतली नव्हती', बंगळुरू चेंगराचेंगरी प्रकरणावर कर्नाटक सरकारचा अहवाल; कोहलीचेही नाव घेतले
19
Reliance Infra Share Price: १२००% नं वधारला अनिल अंबानींच्या कंपनीचा 'हा' शेअर; आता ₹९००० कोटी उभारण्याची तयारी
20
महिलेने ९ भिक्षूंना ब्लॅकमेल करून उकळले तब्बल १०२ कोटी रुपये; घरी सापडले ८०,००० अश्लील व्हिडिओ!

‘नागरी हक्क’चा पालिकेवरच निशाणा

By admin | Updated: June 3, 2015 01:01 IST

विट्यातील नागरिकांचा सवाल : शासकीय कार्यालयात न्याय मिळतो का?

दिलीप मोहिते - विटा -विटा शहरातील नागरिकांना त्यांचे हक्क मिळवून देण्यासाठी गेल्या दोन-चार वर्षांपासून स्थापन केलेल्या (विना नोंदणीकृत) नागरी हक्क संघटनेने केवळ विटा नगरपरिषद व तेथील सत्ताधाऱ्यांना टार्गेट केले आहे. नागरिकांना अन्य शासकीय कार्यालयात ‘हक्क’ मिळवून देण्याकडे संघटनेने पाठ फिरवली आहे. त्यामुळे ही संघटना केवळ नगरपालिकेपुरतीच मर्यादित आहे का? असा सवाल विटेकर नागरिकांतून उपस्थित झाला आहे. दरम्यान, नागरी हक्क संघटनेने फक्त विटा नगरपालिकेवरच निशाणा साधल्याने ‘नागरी हक्क’ची लढाई ही राजकीय सूडभावनेतून सुरू असल्याची चर्चा सध्या शहरात जोर धरू लागली आहे.विटा शहरात गेल्या चार वर्षांपूर्वी नागरी हक्क संघटनेच्या माध्यमातून पालिकेच्या कारभारावर अंकुश ठेवण्याचे काम सुरू आहे. गाळे वाटप प्रक्रिया, पालिका सभेतील बेकायदेशीर ठराव, यात्रा समितीच्या जागेची विक्री, पंचमुखी मंदिरापाठीमागील जागेची विक्री, विविध विकास कामे, रस्ते, वीज, पाणी, मुव्हेबल गाळे यांसह अन्य लाखो रूपयांच्या विकास कामांवर नागरी संघटनेने निशाणा साधला. माहिती अधिकाराखाली अर्ज देऊन माहिती संकलित करण्याचे काम मोठ्या प्रमाणावर हाती घेऊन, प्रसंगी उच्च न्यायालयापर्यंत धडक देण्याचे धाडस नागरी हक्क संघटनेने केले.त्यामुळे नागरी हक्क संघटनेच्या कामांचे नागरिकांतून कौतुक होऊ लागले. पण, हे कौतुक फार काळ टिकू शकणार नसल्याची परिस्थिती शहरात निर्माण झाली आहे. कारण ‘नागरी हक्क’ने विटा पालिका सोडून अन्य शासकीय कार्यालयांतील नागरिकांचे प्रश्न सोडविण्याकडे पाठ फिरवली आहे. राज्य शासनाचा वनीकरण, कृषी विभाग, तहसील कार्यालय यांसह अनेक शासकीय कार्यालयातही सर्वसामान्यांची कामे मोठ्या प्रमाणात अडकून पडली आहेत. त्यामुळे लोकांना प्रशासकीय कार्यालयांचे उंबरठे झिजवावे लागत आहेत. मग याठिकाणची नागरिकांची कामे करून देऊन त्यांना हक्क मिळवून देण्याचे धाडस नागरी संघटना का करीत नाही? असा सवाल उपस्थित होत आहे.केवळ विटा पालिकेवरच निशाणा न साधता, नागरिकांची अन्य शासकीय कार्यालयांतील कामेही मार्गी लावून नागरिकांना तेथेही त्यांचे हक्क देण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी मागणी होत आहे.अंकुश ठेवण्याचे काम...विटा शहरात नागरिकांना हक्क देण्यासाठी स्थापन केलेल्या नागरी हक्क संघटनेचे सुनील सुतार हे अध्यक्ष, पोपटराव जाधव उपाध्यक्ष, प्रवीण गायकवाड सचिव, तर संजय भिंगारदेवे हे सदस्य आहेत. असे चौघेजण सध्या तरी नागरी हक्क संघटनेचे काम पाहत आहेत. त्यांनी संघटनेच्या माध्यमातून पालिकेच्या अनधिकृत कारभारावर हातोडा मारण्याचे काम उत्तमरित्या करीत, शहरातील विकास कामांवर अंकुश ठेवण्याचे काम केले. हे जितके कौतुकास्पद आहे, तितकेच या संस्थापक-सदस्यांनी विटेकर नागरिकांची पालिकेतील व अन्य शासकीय कार्यालयांतील छोटी-मोठी कामे मार्गी लावून नागरिकांना त्यांचे ‘हक्क’ मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील राहावे, अशी नागरिकांची अपेक्षा आहे.