शहरं
Join us  
Trending Stories
1
"पाकिस्तानला अक्कल असेल तर बंदुका शांत ठेवाव्यात, नाहीतर..."; CM ओमर अब्दुल्ला यांचा थेट इशारा
2
बीकेसी ते वरळी फक्त १५ मिनिटांत! मेट्रो-३ चा दुसरा टप्पा सुरु, CM फडणवीसांच्या हस्ते उदघाटन
3
Mumbai: भारत- पाकिस्तान युद्धात घाटकोपरमधील जवान शहीद
4
गस्त वाढवा, ‘त्या’ हँडल्सवर लक्ष ठेवा, वरिष्ठांच्या सुट्या रद्द; CM फडणवीसांकडून महत्त्वाचे निर्देश
5
पाकिस्तानला आणखी एक धक्का; सिंधू कराराबाबत जागतिक बँकेने घेतली भारताची बाजू...
6
“उद्धव ठाकरे सत्तेत कमी विरोधी पक्षात जास्त राहिले, कारखाने वाचवण्यासाठी सत्ता नको”: राऊत
7
मत्स्यव्यवसाय क्षेत्राला कृषी दर्जा देण्याचा शासन निर्णय जारी; आजपासून होणार अंमलबजावणी
8
"राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट एकत्र आले तर आक्षेप नाही; काँग्रेसची भूमिका भारत जोडोची’’, हर्षवर्धन सपकाळ यांची प्रतिक्रिया
9
भारताने केलेला ड्रोन हल्ला का रोखला नाही? पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांचं संसदेत अजब उत्तर, म्हणाले...  
10
Jalgaon Accident: भरधाव टिप्परची दुचाकीला धडक; आजी- आजोबांच्या डोळ्यांदेखत दोन नातवंडांचा मृत्यू
11
अक्षय केळकरनं १० वर्षांच्या रिलेशनशिपनंतर 'रमा'सोबत थाटला संसार, पहिला फोटो आला समोर
12
भारत-पाक संघर्षादरम्यान 'या' ड्रोन उत्पादक कंपनीच्या शेअर्सला अपर सर्कीट; तुमच्याकडे आहे का?
13
“भविष्यात STच्या नव्या बसेस हायब्रीड इंधनावर, डिझेलच्या पर्यायांचा विचार आवश्यक”: सरनाईक
14
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर भारतीय रेल्वेचा मोठा निर्णय, उधमपूर-जम्मू-दिल्ली विशेष ट्रेन चालवणार
15
Mumbai: पिझ्झा देण्याच्या बहाण्याने घरी नेले आणि...; आठ वर्षाच्या चिमुकलीसोबत शेजाऱ्याचे संतापजनक कृत्य
16
भारत-पाक संघर्षाचा बाजारावर दबाव! आठवड्यात ३ टक्के घसरण; फक्त 'या' सेक्टरमध्ये तेजी
17
भारत-पाक तणावादरम्यान एअरटेलच्या अध्यक्षांचा मोठा निर्णय, चिनी कंपनीतील हिस्सा खरेदी करणार
18
IPL 2025: आयपीएल रद्द होणार की, उर्वरित सामनेही खेळवले जाणार? बीसीसीआयनं घेतला 'हा' निर्णय
19
India Pakistan: एटीएम २-३ दिवस बंद राहणार? व्हायरल मेसेजबद्दल सरकारने केला खुलासा
20
महामृत्युंजय मंत्र कधी व कोणासाठी म्हणावा? त्यामुळे नेमका कसा लाभ होतो? जाणून घ्या!

शहरात व्यापाऱ्यांनी थाटली रस्त्यावरच दुकाने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2021 04:23 IST

लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : शहरातील मुख्य बाजारपेठेत रस्त्यावर व्यापाऱ्यांनी दुकाने थाटली आहेत. अतिक्रमण करण्याची सवय लागलेल्या दुकानदारांनी आता ...

लोकमत न्यूज नेटवर्क

सांगली : शहरातील मुख्य बाजारपेठेत रस्त्यावर व्यापाऱ्यांनी दुकाने थाटली आहेत. अतिक्रमण करण्याची सवय लागलेल्या दुकानदारांनी आता मोठ्या प्रमाणात हातपाय पसरले आहेत. पण त्यांच्यावर कारवाईचे धारिष्ट अजूनही महापालिकेने दाखविलेले नाही. केवळ दोन दिवसांसाठी अतिक्रमण हटाव मोहीम राबविण्यात आली. मोहिमेची नौटंकी संपताच पुन्हा दुकानदारांनी रस्त्यावर माल आणला आहे. त्यामुळे वाहतुकीची कोंडी होत आहे.

मुख्य बाजारपेठेतील मारुती रोड, हरभट रोड, कापडपेठ, सराफ कट्टा, मेन रोड हे रस्ते अतिक्रमणाच्या विळख्यात सापडले आहेत. दुकानासमोर फळ व किरकोळ विक्रेत्यांनी आधीच अतिक्रमण केले आहे. गेल्या कित्येक वर्षांपासून हे अतिक्रमण हटविण्याचा प्रयत्न झाला. पण सतत राजकीय हस्तक्षेप झाल्याने त्याला यश आले नाही. आता त्यात दुकानदारांची नव्याने भर पडली आहे. मारुती रोडवर तर दुकान कुठले आणि अतिक्रमण कोणते याचाच थांगपत्ता लागत नाही.

दोन-तीन मजली दुकाने असलेल्या व्यापाऱ्यांनीही ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी रस्त्यावरच माल आणला आहे. दुकानात माल कमी आणि रस्त्यावर अधिक अशी स्थिती झाली आहे. स्वत:चा गाळा, दुकान असतानाही व्यापारी रस्त्यावरच उभा राहून माल विकत आहे. त्यात एखादे दुकान बंद पडले असेल तर त्याच्यासमोर नवीनच विक्रेता जागा बळकावितो. टेबल लावून तोही व्यवसाय सुरू करतो. काॅस्मेटिक, कापडापासून ते अगदी कुलर, खुर्च्यांपर्यंत साऱ्या वस्तू रस्त्यावर मांडल्या जात आहेत. मारुती रोड तर केवळ वीस फुटांपेक्षाही कमीच उरला आहे. त्यात हातगाडीवाल्यांचे अतिक्रमण वेगळेच. हीच अवस्था हरभट रोड, कापड पेठेचीही झाली आहे. चारचाकी वाहन या रस्त्यावर जाऊ शकत नाही, अशी स्थिती आहे.

चौकट

महापालिकेची नौटंकी

रस्त्यावरील अतिक्रमण हटविण्याची मोहीम महापालिकेने दिवाळीपूर्वी हाती घेतली होती. नव्याने रुजू झालेले उपायुक्त राहुल रोकडे हे स्वत: रस्त्यावर उतरले होते. पण मोहीम थांबताच पुन्हा दुकानदारांना अतिक्रमण करून रस्ता व्यापला आहे. महापालिकेची अतिक्रमण हटाव मोहिमेची नौटंकी वाहनधारकांना मात्र त्रासदायक ठरत आहे.